श्री
श्री
वरील लेखात असे दिसून येते, की माझी स्वतः बद्दलची व्याख्या सूक्ष्म ते स्थूल ह्या संबंधांच्या स्पष्टीकरणावर अवलंबून केली जात आहे माझ्या कडून. ते संबंध *गूढ* असतात, हे _मला स्वीकारणे_ भाग आहे, बुद्धीने ते सांगणे कठीण. म्हणून बुद्धी अपुरी पडते, असे एक विधान प्रस्तुत होते मला, म्हणजे त्यावरून सर्व अर्थ अपूर्ण पडतात, असे दुसरे विधान होते.
ह्याचा अर्थ हा की गुढते ने होणारे संबंध आणि कार्यावर भरवसा वाढवणे, म्हणजे मी शांत होईन.
त्यासाठी मला चिंतन करण्याची गरज आहे. त्या गुढतेवर परिणाम कसा होईल, ते मला भगवंतावर सोपवावे लागेल... तो योग्य परिवर्तन आणेल!...
हरि ओम.
श्री
प्रत्येक क्षणाचा किंव्हा अनुभवाचा किंव्हा विचार धारा असण्याचा, वावरण्याचा आणि निर्णयाचा _स्पष्टीकरण_ देण्याची गरज असू नये.
हे सर्व घटक आणि इतरही वावरत असतील आणि संबंधात असतील. त्यातून एक संकल्पना किंव्हा भगवत इच्छा म्हणजे "मी" होतो. असे जर असले, तर त्या इच्छेपोटी जे काही माझ्या रुपात घडते, अनुभवात येते आणि दृश्याशी संपर्क साधले जाते, त्यात सर्व प्रथम त्याचीच इच्छा कार्य करत असते आणि त्यामुळे सारे अनुभव आपण संपादन करतो. मग स्पष्टीकरणाचा प्रश्न आलाच कुठे?!!
हे प्रकरण जरा विचित्र आहे. की आपण विषय किंव्हा स्पष्टीकरण देण्याला खूप मुल्य जोडत राहतो, पण त्याची जरूरी खरी नसतेच कधीही. मग ह्या संकल्पनेला का धरून असतो आपण? म्हणजे भगवत इच्छा आपल्या पचनी पडली नाही का?!!
हरि ओम.
श्री
कार्य आणि सर्व काही चालू असतं अस्तित्वात. त्या प्रमाणे, त्याच पद्धतीने आपण व्यवहार करावा, असे मानणे कितपत योग्य आहे? विघटन एक घटक असल्यामुळे, आपल्या मध्ये एक असा गुण असतो, जो शांती संक्रांत करून देऊ शकतो. त्याचे जतन करावे आणि त्या मार्गावर लागावे. भगवंत स्वतः अवतरून दृश्यात येतात, "माझ्या द्वारे प्रकट" होतात, मग साहजिकच त्यांच्या पर्यंत मी पोहोचू शकतो, विलीन होता येऊ शकतं!...
ओम शांती
ReplyForward |