श्री
श्री
प्रश्नावरून संबंधांचा अर्थ लागतो. प्रत्येक व्यक्ती हा प्रश्न घेऊन आला असतो, प्रश्नात वावरतो आणि प्रश्नाचा शोधत असतो. हे नैसर्गिक आहे आणि ते स्वीकारायचे असते. एखाद्या व्यक्तीला प्रश्नाचे स्वरूप असे का पडावे, हा सार्वजनिक चर्चेचा विषय असण्याची गरज नाही, असे माझे मत. अर्थात प्रश्न मांडण्याची मुभा द्यावी, त्यातून काय निष्पन्न होईल असा विचार असू नये आणि तो प्रश्न सर्वांना एकत्र आणू शकतो का, हे बघावे.
प्रश्न असतात. ते नेहमीच सोडवण्यासाठीच असतात का, असे नाही. प्रश्न सोडवायला हवेच का, असेही नाही. प्रश्न आपोआप सुटतील का, तर शक्यता आहे. प्रश्नातून आपण स्वतःला दोष द्यावा का, तर तसेही मुळीच नाही. प्रश्न छोटा की मोठा, ह्या विचाराने दुसऱ्यांना लेखू नये.
मानवी जीव म्हणलं, तर प्रश्न असणारच. आणि विघटन क्रिया मुळे ते येत राहणारच.
प्रश्नांना शांतीने स्वीकारावे. ते सत्य खुणावत असतील!
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home