Saturday, September 27, 2025

श्री

श्री 

चांगल्या बरोबर वाईट विचार येऊ पाहतात कारण आपल्याला अधून मधून भगवंताच्या सूक्ष्म शक्ती बद्दल आठवण येते पण तिथे आपले मन स्थिरावत नाही, किंव्हा त्यातून बाहेर येऊन प्रपंचा बद्दल विचार मनात येतात, म्हणजे मन आकुंचित होते. थोड्या वेळाने परत सूक्ष्म होण्याकडे प्रवृत्ती होते.

हे सूक्ष्म पलीकडे होणे आणि परत आकुंचित होणे, आकाश आणि फिरणाऱ्या ढगां सारखे आहे. किंव्हा वस्तू दिसणे आणि "नाही" देखील. म्हणजे कृती वस्तूवर, व्यक्तीवर, रूपावर, आकारावर, साखळीवर, स्थळावर, काळावर आधारलेली होणे आणि सर्वांच्याही पलीकडे स्थित असणे. किंवा वस्तू ध्यानात आणणे म्हणजे तिथे चक्राची क्रिया केंद्रित होणे आणि वास्तूच्या पलीकडे स्थित होणे म्हणजे चक्राची गरज न भासणे. 

असे आलटून पालटून घडणाऱ्या परिस्थितीला ओळखणे. ते ओळखल्यावर, शांत भाव कायम संक्रांत होणे, हा मार्ग झाला. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home