श्री
श्री
अस्तित्वाचे कार्य एक असे आहे की सिद्ध होण्याची क्रिया, काहीतरी होत राहण्याची क्रिया. त्या होण्यामध्ये अनेक घटक, स्तर, चक्र, भाव, वृत्ती ते आकार अशा गोष्टी संबंधित होतात. आपल्या जाणिवेत आपण ह्या कार्याला निरनिराळे नावे संबोधतो, जसे की भगवत इच्छा, शक्तीचे कार्य, मर्यादा, घडामोडी, परिस्थितीचे होणे, जीव आणि इतर आकार, दृश्य भाव, तात्पुरतेपण, वेगळेपण, वगैरे.
ह्यातून हे कळेल की आपण एका स्थितीच्या प्रभावाखाली वावरत असतो आणि त्यातून विचार आणि भावना आणि देह पदार्पण करतो. हे पदार्पण करण्याच्या गोष्टी "घेतल्या आहेत", ते "उपजत नाही आहेत".
म्हणून प्रश्न असा आहे की मूळ तत्व किंव्हा मूळ स्वभाव तो कोणता? असे म्हणतात की मूळ स्वभाव आहे तो भगवंताचा - सूक्ष्म आणि शांत आणि एकच सत्य. त्यातून आपला जन्म होतो किंव्हा एखादे _रूप_ "धारण" करतो. त्याला धरून राहिल्यामुळे होणारे परिणाम आणि स्मरण.
ह्याला आपल्या मर्यादेच्या चौकटीत "अनुभव" म्हणतात. आपण त्यात मुल्य घालतो आणि अनुभवाची बाधा होते. अनुभव म्हणजेच "मी" किंव्हा माझा स्वभाव, अशी समजूत होते.
हे जसे कळून येते, तसा विचार होतो की ह्या परिस्थितीत काय करावे? त्यासाठीचा उपाय सांगितला आहे नामस्मरण.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home