श्री
श्री
आपण वेगळं तसं काही करत नसतो. वेगळ करणे, वेगळं अपेक्षा ठेवणे, वेगळ्या स्थळी जाणे, वेगळ्या काळाची अपेक्षा ठेवणे, हा भ्रम आहे किंव्हा ती एक मनोरचना आहे.
साहजिकच त्याचा उगम मन कसे कार्य करते त्यावर आहे. आपल्याला एका वेळेस, एकच गोष्ट दिसते, एकच चक्र दिसतं, एकाच भावात वावरतो, एकाच पद्धतीचे स्मरण होते. हे नैसर्गिक जगणे आहे मनाचे...ते तसेच होणार. म्हणून मागे काय, किंव्हा पुढे काय हे ध्यानात नसल्यामुळे आपण क्षणात खूप गुंतले गेलो असतो....आणि त्यातून "जोडावे कसे सर्व घटक ह्यांना" हा प्रश्न मनात येतो.
त्याचा मार्ग कोणता? हा महत्त्वाचा प्रश्न आहे मनाने प्रस्तुत केलेला. कारण वरील क्रियेची मर्यादा जाणून घेतल्याने मन धडपड करते ह्या साखळीला अजून कैक पटीने " efficient" करायला. त्यातून संशोधनाची दिशा "production" कडे वळते, "maximization" कडे वळते किंव्हा "multi tasking" कडे वळते.
पण प्रश्न असा आहे, की ह्याने परावलंबन संपते का? वरील संशोधन किंव्हा प्रगतीमुळे समाधान मिळते का? मनाच्या भाषेतून जे काही निर्माण करू, ते शेवटी परावलंबन भाव प्रज्वलित ठेवणार आहे. म्हणून उत्तर वरील संशोधनात साठवलेले नाही.
सर्व वरील संशोधन एकंदरीत बहिर्मुख आहे...परिस्थितीशी निगडित. संशोधन अंतर्मुख केले गेले, तर अनुभव वेगळे होतील आणि कदाचित परावलंबित भूमिका शिथिल होऊ शकेल. तर तसे करून बघायला हवे.
दुसरी गोष्ट ही, की "मर्यादा" वरील क्रियेमुळे अनुभवात असणारच आहे. त्यातून सुटणे अशक्य. मर्यादेतून मार्ग निघतो, शांतीचा शोध होतो. मर्यादा पुसून टाकायची म्हणाली मनाने तर वाट्याला वेडेपणा यावा किंव्हा भान नसल्या सारखे जगणे होऊ शकेल. The foundation of morality is in context and limitations/ conditions.
In architecture, there is a critical voice towards some people believing that there should be no context, which is quite stupid. Everything has a context, even abstract forms. But abstraction also comes *from* a context and isn't divorced from it. And perhaps abstraction is one of the greatest powers of the mind (to understand a pattern of action).
Therefore the point is, one should be concerned about "peace in life" and what that means in whatever one engages with.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home