श्री
श्री
विषय करणे, बाऊ करणे हे सर्व साखळीतील घटक मानावे किंव्हा त्या क्रियेचा परिणाम. मनाची तळमळ जी असते, ती त्यामुळे होते, आपल्या स्वतःच्याच क्रियेमुळे.
त्यातून internalisation ह्याचे स्थान होते आणि ते म्हणजे कसे असते, ह्यावर टीका किंव्हा अनुभव. ह्या बद्दल आपण बरेच काही बोलू शकतो, पण प्रामुख्याने अंतर्मुख होण्याची शक्ती आत्मसात केली तर विषय सुटावेत किंव्हा त्यावर जास्त लक्ष किंव्हा अपेक्षा केंद्रित नाही राहणार.
म्हणून गुंतून घेतल्यामुळे विषय राहतातच. न गुंतणे हा ही पर्याय नाही. असे करू का तसे करू, हा ही चक्रात राहण्याचा भाग आहे. ह्यावरून कळेल की शांती संक्रांत होऊ देणे, ह्याला सैय्यम, अभ्यास आणि श्रद्धा लागू शकते.
एक ध्यानात राहणे आहे, की वरील प्रवास, जी बहिर्मुख असते, मग जाणीव होणे त्या बद्दल आणि अंतर्मुख होण्याचा मार्ग मग निवडणे - ह्याला अजिबात दोष मानु नये आणि स्वतःला न्यूनपणा देऊ नये. सारे भगवंत करतो, म्हणून वरील अनुभवातून आपल्याला जाणे भाग आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home