Saturday, May 16, 2026

श्री

श्री 

स्वतःच्या अस्तित्वाला कारण लागत नाही. No justification required. अस्तित्व असतेच, त्यातून निर्मिती होते, संबंध होतात, स्मरण होते, चक्र होते, व्यवहार होत राहतात, आपण होतो, आणि परिवर्तित होतो सर्व स्थितीत. एखादी _गोष्ट_ अशी का होते, अशी का आली, अशी का बदलत राहील, ह्याने का चिंतीत व्हावे?! दृश्याचा स्वभाव "बदल" आहे, आणि दृश्याचा मूळ संबंध भगवंताशी आहे, म्हणून अस्तित्वात _पसरण आणि खोल_ अशा दोन्ही गोष्टी आढळून येत राहतात. ह्या सर्वातून _प्रवास_ असतो स्वतःचा.  विचारांच्या धारा आणि चक्र दररोजची गोष्ट आहे. त्याकडे बघण्याची कला साधली हवी. 

स्वतःला काय वाटतं, ही बाब स्वतः सिद्ध आहे आणि त्यासाठी खरे पाहिले तर स्पष्टीकरणेची जरुरी नसते. आपण हेतू लावतो विचारातून आणि परिणाम भोगतो आणि त्यात गुंतून राहतो - हा दिव्य भाव जाणवायला हवा. दृश्याचे _संस्कार_ मनात आणल्यामुळे तात्पुरतेपण, अहं भाव, स्मरण, गुंतागुंती, धावपळ, भीती, अशा भावना प्रस्थापित केल्या जातात, ज्याच्याशी आपण आसक्ती धरतो. 

Dnyanatun जर हेतूच बळावला, तर ते व्यर्थ ठरू शकतं. काही मिळवण्यासाठी, काम करण्यासाठी, जगण्यासाठी, "हेतू" कसा असावा, ह्याकडे लक्ष द्यावे. आणि तरीही भगवंताला सर्व अर्पण करत राहावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home