श्री
श्री
संवाद अनेक प्रकारचा असतो. काही गोष्टी खूप सूक्ष्म असल्यामुळे, शब्दात मांडणे कठीण जाते आणि ते मांडले, तरी त्यात सहजता राहणे कठीण.
सांगण्याचा उद्देश काय हवा? कोडी सोडवणे हा उद्देश शेवटचा असायला हवा. सर्व भगवंत करतो, तर वासना त्यांनी दिल्या आहेत, तर तो दोष का मानावा आणि त्यातून समस्या सोडवण्याची जबाबदारी का उचलावी?! आपण स्वतःच्या किंव्हा इतरांच्या वृत्तीतून ठरत असतो का?!
कसे वागावे किंव्हा बोलावे, ह्यात हेतू असला, तर त्याने कष्ट होऊ शकतात. हेतू असणार जीवनात, ह्याला नैसर्गिक जरी मानले, तरीही तो टप्पा किंव्हा परिस्थिती ओलांडावी लागण्याची गरज निर्माण व्हायला लागते. असे वाटायला हवे कधीतरी, की हेतूची गरज शांतीसाठी खरी नसते.
म्हणजेच शांती स्वतः सिद्ध असते. परिस्थितीची बडबड करत राहणे, हे कितपत योग्य असते, ते ओळखावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home