Shree
Shree
Anybody's experience is evolving and connecting and an
open loop. So how things get conceived, perceived and acted upon are to be seen
in an expansive way and not a rigid way.
Many times we impose our beliefs onto people. It is
worthwhile to take a step back, slow down, consider the alternatives,
understand perspectives and work through it.
Yet for me, this is only to be seen as venting of things
that are perceived as complex. This may not be assumed as a compulsion or an
inner expectation. That, by _doing_ this, a meaning gets created. Therefore not
me or anyone else needs to evaluate or judge this process of expression nor is
it required to be perceived in that manner by my self. Why this process happens
and what it creates as an action and experience is a function of Existence. Why
should some answer desperately be found?!...
Hari Om.
Shree
Life is full of complexity and pushes and pulls. The mind
tends to search for a balance and for this, a discovery of sorts is
inevitable.
In the process, many things happen, many changes get
perceived, many thoughts occur, many preferences are expressed in subtle
ways...all is a part of the search. The search is an integral aspect of the
human dimension and in it, there would be many questions for which, only
pondering on them is suggested.
Pondering has its own place. It needn't be expressed or
delivered or articulated. It is an experience that is allowed to enter a mind.
It doesn't seek anything, it is not for clarification, it doesn't have any
definition of time or place and it is not defined by any 'thing'.
I don't see any reason why pondering dreams ought to get
defined in any specific way to create action at a ground level in some time and
place. Dreams may come through. Let them. To force to come through, is quite a
stressful way to ensure action.
Hari Om.
श्री
भगवंत सारे कार्य घडवून आणतो, आपल्याला ते जाणवू
किंव्हा नाही. जाणवण्यासाठी कार्य किंव्हा कर्तव्य, श्रद्धा,
प्रयत्न कायम असायला लागते.
विचारच मुळात विघटित असतात आणि त्याच्यातून _स्मरण_
होते, तर काय करावे?! विचारांचे स्पंदने
जसे येतात, तशी साखळी तैय्यार होत राहते आणि अधिकाधिक विचार
प्रज्वलित राहतात.
जेवढा जास्ती विचार करू, तसा तो मनात घट्ट
होत जातो, आणि तसा भाव प्रज्वलित राहतो. विचाराने विचार सुटत
नाहीत. ते कार्य करून, श्रद्धा ठेवून विलीन होऊ शकतात. विलीन होणे,
म्हणजे स्थिर माध्यम ध्यानी येणे.
ह्याचा सरळ अर्थ असा आहे, की काळजी चे विचार
आणखीन काळजी निर्माण करतात. त्याच नियमाने, भगवंताचे विचार
भगवंताचे कार्य दर्शनास आणू शकतात.
त्या अर्थाने विचार हा जोडण्याचा दुवा आहे. काय जोडावे,
ते मनाने पक्के करावे आणि तसा मार्ग पत्करावे.
हरि ओम.
श्री
सर्वच्या सर्व गोष्टी शब्दात मांडू शकत नाही. काही स्तरांचे कार्य किंव्हा
परिणाम दृश्याच्याही अधिक सूक्ष्म स्थितीत वावरत राहतो,
ज्यामुळे शेवटी दृश्यात घडणाऱ्या हालचाली दर्शन देतात.
परिणाम, हा एक तर्फी प्रकार न राहता,
सर्व ठिकाणी, सर्व स्थितीत, आत ते बाहेर चक्र
प्रमाणे प्रकार असतो. म्हणून विचार स्थिती हे ही _चक्र_
आहे जिच्यामुळे तसा भाव आणि स्मरण प्रज्वलित राहते. ह्याचा अर्थ भाव आणि स्मरण
देखील चक्र क्रिया आहे.
आता चक्र क्रियाचे स्थान प्रस्थापित कश्यामुळे होते - हा मूळ प्रश्न आहे.
त्याचे उत्तर आहे *भगवंत*. ते ओळखण्यासाठी आपण सूक्ष्म चक्रात प्रवेश करणे गरजेचे
ठरते. तिथे "प्रवेश" करणे म्हणजे आत्ताच्या दृश्याचा स्थितीत परिवर्तन
होऊ देणे (दृश्याशी न गुंतणे) आणि सूक्ष्मात स्थित होणे.
हे घडण्यासाठी मार्ग आहे नामस्मरणाचा.
हरि ओम.
श्री
अस्तित्वात मूळ स्थिरपणा जो आहे, तो म्हणजे *आनंद
भाव*. हे माध्यम आहे, अनुभव आहे, कार्य आहे,
जिवंतपणा आहे. ह्या आनंदाला काळ, स्थळ,
हेतू, रूप, आकार
"नाही". त्यातून, इच्छेखातीर तो आनंद अवतरून खूप सारे रूप आणि
आकारामध्ये वाटला जातो आणि क्रिया दाखवतो आणि संबंधित राहतो. त्यातूनच आपणही होतो.
नंतर ते चक्र अनेक स्थितीत वावरत राहत आणि आपला प्रवास सुरू राहतो.
अस्तित्व म्हणजे चक्र क्रिया आणि त्यातून येणारा परिणाम किंव्हा आनंदाचा रंग
किंवा भाव किंवा अनुभव.
ह्यावरून भीती का असते, हे ओळखावे. आपल्या आत नेमके काय होते,
हे समजून घ्यावे आणि आपला संबंध दृश्याशी कसा निगडित होतो,
हे ओळखावे. कार्य करणे भाग आहे आणि अनुभव असणे, हे ही स्थित आहे.
कार्य आणि भगवंताचा संबंध त्यातून जोपासावे.
ओळखून बदल होणे स्वाभाविक आहे. जे काही परिवर्तन होईल,
ते योग्य होईल.
हरि ओम.
श्री
कधी कधी काय होते की भगवंत आणि वेगाचा त्याचा संबंध बौद्धिक पद्धतीने जोडणे
कठीण असते. तसा तो संबंध थेट नसावा. म्हणून त्यामुळे व्याकुळ होऊ नये. माझीही गती
आहे, वेग आहे, संबंध आहे. माझ्या
वेगाचा संबंध दृश्याशी व्हायला हवा, हा अट्टाहास किंव्हा
अपेक्षा शिथिल करावी. त्याने काय होईल? प्रथम भीती वाटेल की
दृश्यावर स्वतःचा ताबा निघून जाईल. इथे आपली मनोरचना दिसून येते,
दृश्यांची संकल्पना दिसते आणि त्यातील घटक दिसून येतात.
हे सर्व शांतीने ओळखावे लागते, विषय म्हणून नाही.
तसे करत गेल्यावर जे ध्यानात येते, ते म्हणजे समाधान.
हरि ओम.
श्री
व्यक्त होणे ह्या हेतूच्या आणखीन सूक्ष्म होणे आहे. दृश्य होणे,
ते दिसणे, हे न संपणारे गुंतणे ठरते. दृश्य जाणवण्यातही अनेक
स्तर असतात, ज्यांचाही एकमेकांशी संबंध असतो,
म्हणून विचार सूक्ष्म होत जाण्याच्या अनेक स्तर आणि परिणाम असतात,
ज्याला सामोरे जायला लागतं.
विचार अस्तित्व शक्तीतून, म्हणजेच भगवंताकडून,
तैय्यार होतात, आणि त्यातून स्मरणही. *विचारांना सामोरे जाणे आले.*
विचार नुसते "बघावे" शांतीने. त्याला प्रतिक्रिया देत रहाणे किंव्हा
मुल्य देणे गरजेचे नसते, कारण त्याच्याही पलीकडे सूक्ष्म स्थिती असते. विचार
गूढ असतात, आणि ते शांतीने बघितले तर त्याचे गुढत्व उमगते आणि
त्यात आपण योग्य पद्धतीने सामोरे जाऊ शकतो. विचार गूढ जाणवले,
तर दृश्यही गूढ जाणवायला लागते.
कुठल्याही होण्याचे कारण गूढ जाणवायला हवे.
माझ्या मते, "प्रकट कार्य" हा सर्वात महत्वाचा प्रश्न आणि गूढ
स्थिती ओळखावी. ते कळणे, मानवी जीवाचे ध्येय मानून घेणे. सर्व dnyan
संपादन करण्याची दिशा तिथे सूचित करायला हवी.
हरि ओम

0 Comments:
Post a Comment
<< Home