श्री
श्री
भगवंताचे चिंतन आणि परिस्थितीचा एकमेकांशी बौद्धिक संबंध किंव्हा हेतू सहित संबंध जोडू नये. हेतू म्हणला तर स्वतःची अहं वृत्ती दर्शनास येते आणि तिथे भगवंताचा भाव नसतो.
म्हणून हेतू रहित, स्वार्थी न होता, देह बुद्धी नमवून भगवंताचे चिंतन करत राहावे. जेवढ्या वेळेला तशी मनोरचना होईल, तितक्या पटीने संस्कार आत खोल जात राहतील. म्हणून जितक्या वेळेला भगवंताचे नाम घेण्याची आठवण होईल आणि घेतले जाईल, त्याचा अर्थ की मन अंतर्मुख होत आहे.
जाणीव शुद्ध होण्याची वरील प्रक्रिया ओळखावी. आपल्या पेक्षा रूप,आकार वेगळे नाही. जे काही आत असते, तेच हेतू घेऊन बाहेर रूप आणि आकार होते. The form of architecture is also a reflection of this.
प्रश्न असा आहे, की रूपाला, आकाराला मुल्य देऊन जिवंतपणा कसा येतो? स्पंदनातून. आपल्या आतील भावातून. म्हणून जिवंतपणाचे मूळ आत असते. दुसरी गोष्ट ही, की सध्या जिवंतपणा म्हणजे रूप, आकार,संबंध, बदल, दिसणे, असे संस्कार त्यावर आपण बहार केले आहेत. पण वास्तविक जिवंतपणाचे स्तर असतात, आणि काही सूक्ष्म स्तरात आकार किंव्हा रूप जरी नसले, तरीही हालचाली किंव्हा कार्य होत असते आणि जिवंतपणाचा रंग तिथे निराळा ठरतो. किंबहुना रूप आणि आकाराच्या सूक्ष्म गुणांचा वावर त्या स्तरात होत असतो.
म्हणून जिवंतपणेची सगळ्यात सूक्ष्म अवस्था म्हणजे अस्तित्व भाव किंवा स्वतः सिद्ध भाव किंव्हा शांती भाव. तिथे कुठल्याही गुणांचा लाग होत नाही.
त्याची सुरुवात तिथे होण्याची म्हणजे नामस्मरण.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home