श्री
श्री
रूप निर्माण होते, आणि त्यातून क्रिया आणि स्मरण. हे कार्य खूप गूढ आहे आणि *शुद्ध भगवत शक्तीचे परिवर्तन* होऊन ते स्थूलात अवतरते. प्रत्येक स्तरात संबंध होतो, त्या संबंधाची भूमिका होते, तिचा परिणाम होतो आणि त्या प्रक्रियेत "भाव" होतो (किंव्हा अहं वृत्ती, वेगळेपण, मर्यादा, बदल, हालचालींची जाणीव, तात्पुरतेपण). म्हणजे आपले मन कुठल्यातरी स्थितीच्या कार्याला "धरून" ठेवते. त्याला धरून राहिल्याने, त्या स्थितीचे "संस्कार" मनात रुजू होतात आणि तसे परिणाम आपण भोगतो, त्या प्रकारे विचार करतो, तसे भावना होतात. भगवंताच्या कार्यात असे आहे की त्या प्रक्रियेमुळे रूप किंव्हा जीव होतील (आणि स्मरणही त्या प्रकारे होईल) म्हणून भगवंताचा "विसर" त्या रूपाला होईल (वेगळेपण आणि तात्पुरतेपण) आणि कधीतरी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव त्या जीवाला झाली की तो परत योग्य मार्ग निवडून शुद्ध होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे भगवंताचे स्मरण वाढवत जाईल आणि ते रूप विलीन होईल.
भगवंत आपल्या अनुभवातला, जीवनातला, परिस्थितीतला एक घटक ओळखायला हवा आणि कालांतराने मुख्य घटक तो आहे, आणि त्याच्या पुढे "तोच" आहे, अशी प्रचिती व्हायला हवी.
अनुभव म्हणून टप्पे, प्रवास, प्रवाह, स्मरण, प्रमाण, प्रसाद, अर्पण - असे बघायला लागते, सिद्ध होण्यासाठी किंव्हा हेतू प्रज्वलित ठेवण्यासाठी *नाही*.
त्या पद्धतीने अनुभवांकडे बघण्यासाठी नामस्मरण करत राहावे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home