श्री
श्री
प्रवासात बंदपणा नसतो. प्रवाहात आणि संबंधित गोष्टी जाणवत राहतात. मध्य भागी स्थिरता असल्यामुळे, त्या पार्श्वभूमीवर प्रवास आणि प्रवाह _जाणवतो_. म्हणजे जाणिवेत दोन गोष्टी सामील आहेत - स्थिरतेचे माध्यम आणि प्रवास/ हालचाली/ बदल. त्यातून जो काही अनुभव संक्रांत होत असतो तो. म्हणजे त्या ओघाने देखील स्मरण स्थिरतेचे आणि दृश्याचे असे दोन्ही सामील असतात. किंव्हा स्मरणात अनंत कार्य, सामूहिक अंग, संबंधित अंग, कौटुंबिक अंग, व्यक्तीक अंग अशा छटा असतात. आणि त्यामुळे मनाला आत आणि बाहेर ह्या दोन्ही गोष्टींची जाणीव असते. "मन" हे मध्य भागी उभे आहे.
सांगण्याचे तात्पर्य हे, की वास्तुकलेत वरील दोन्ही गोष्टींचे अस्तित्व _आकार_ देण्यात प्रभाव आणतात. Transcendence or permanence *and* movement. कलाकृती करताना नजर दोन्ही ठिकाणी ठेवण्याची गरज असते, म्हणजेच पलीकडील संकल्पना आणि विशिष्ट स्थळ - काळ अशी चौकट, दोघांना dnyay देता येतो.
बऱ्याच वेळेला, चर्चा "आत्ताची परिस्थिती आणि त्या अनुषंगाने कलाकृती" असे काहीसे वादातीत मुद्दे पुढे आणले जातात. पण हे विसरू नये की स्थिर तत्वाच्या आधारे ही चर्चा आधारलेली हवी. तरच योग्य किंव्हा अयोग्य ह्याचा भेद होऊ शकतो.
म्हणून _आकार_ , ह्या संकल्पनेत दोन्ही गोष्टींचे समावेश होणे गरजेचे असते. मी, पर्यावरण, लोकं, प्रश्न, अर्थ, भिंती, खिडक्या, हालचाली, आकाश, वारा...ह्यांची रचना दोन्ही संकल्पनेवर आधारलेली हवी.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home