Tuesday, October 01, 2024

श्री

श्री 

सर्व बदल आणि हालचाली आणि गती आणि आकारांचे अस्तीत्व आणि त्यांच्यातील संबंध भगवंत ठरवतो. त्याच्या अस्तित्वामुळे आपण - शक्ती, क्रिया, ज्ञान, कार्य, जाणीव, संकल्पना, इच्छा - अशी अनेक उपमा त्याच्या नामासाठी देतो. नाम घेणे म्हणजे वरील संकल्पनेवर श्रद्धा ठेवणे. 

हे दृश्य जग स्वतःच्या वासनेमुळे, स्पंदने मुळे, संपर्कात किंव्हा जाणिवेत येते. It is an 'imagination'. So imagination is a phenomenon of Being that creates things or forms or relations or connections or meanings out of vibrations. 

मनाच्या शक्तीचे कार्य आहे. ती शक्ती दृश्य भासवते/ निर्माण करते/ स्वभाव देते. म्हणजे शक्तीचे अस्तीत्व, तिचे कार्य, तिचा परिणाम, त्यावरून होणारा अनुभव, त्यावरील केलेली प्रक्रिया, त्यातून परत होणारी क्रिया हे चक्र दर्शवते.

एकंदरीत त्याला आपण कार्य म्हणू. कार्य होत राहणार आणि त्याचे माध्यम शक्ती किंव्हा अस्तीत्व आहे. त्याला आपण भगवंत म्हणतो.  

जो पर्यंत संपर्क स्मरणात राहते, तो पर्यंत दृश्य जगाचा स्वभाव, परिणाम मनावर संस्कार करत राहते. स्मरण भगवतस्वरुप झाले की दृश्याच अस्तीत्व किंव्हा त्याचा परिणाम ( म्हणजे मी वेगळा आहे असा भाव ) नाहीसा होतो. मन विचार शून्य होते, म्हणजे शुध्द अस्तित्वाच्या शक्तिमध्ये स्थिर होते.

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home