श्री
श्री
शांत होणे ही स्थिती कायम असते आणि उपस्थित असतेच. ती आपल्या बरोबर असतेच.
मन हे अस्तित्वाने निर्माण केले आहे, म्हणून ते कायम *क्रियेत* भरलेले असणार. क्रिया अनेक प्रकारच्या सामावलेले आहेत आणि ते सूक्ष्म वृत्ती पासून ते स्थूल आकार किंव्हा देह किंव्हा इंद्रिये असे प्रकट होत राहतात. मन हा शक्तीचा छोटा डोह आहे आणि म्हणून तिला एका प्रकारे क्रिया दिसून येते किंव्हा परिणाम पाडून घेते. With the changing "scales" of existence (which can be said as a context or a situation), the feelings and imagination of being changes too. It can be therefore said as a given scale implies a given imagination. This varies from tribal or indigenous world view to a modern world view.
वरील गोष्टीतून असे दिसून येते की जेवढ आपलं मन सूक्ष्म होईल, तेवढ ते विशाल होत राहतं आणि अस्तित्वाची जाणीव बदलते. क्रिया चालू राहते कारण जाणीव असतेच. म्हणजे मनस्थिती कायम भरलेली असते. त्यातून पूर्ण विचारांचं गाठोड मावळून आपण नुसते पूर्ण भगवतस्वरूप - भाव होतो. त्या भावनेचा परिणाम म्हणजे अत्यंत शांत आणि समाधानी राहणे.
म्हणून बदल किंव्हा संबंध कायम नसतात. ते आपले मन, किंव्हा त्यातील शक्ती वळवू शकते भगवंताला भेटण्यासाठी. म्हणून ज्या परिस्थितीत सध्या आपण आहोत, ती बदलू शकते आपल्या हिता करिता. ती सत्य नाही आणि त्यातून मी ठरतं नाही आणि मागे किंव्हा पुढेही ठरणार नाही. मी ह्या सर्वातून वेगळा आहे आणि सर्व गोष्टी माझ्यात सामावले आहेत.
परावलंबी असणे ही स्थिती आहे, _गरज नाही._ एक स्थिती जर पूर्णपणे आपण स्वीकार करू शकलो तर त्या _स्वीकारण्याच्या प्रक्रियेत भगवंत दिसून येतो_.
म्हणून भगवंत दिसणे म्हणजे दृश्य सोडणे असे होत नाही - पण ती पूर्ण क्रिया समाधानी पद्धतीने स्वीकारणे, असे होते.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home