Friday, October 25, 2024

श्री

 श्री 


सकाळी विषय संस्कारांचा चालत होता आणि चुकून पुसून गेलं सगळं लिहिलेलं! तात्पर्य असा की मन हे एक चक्र आहे, ज्यात संस्कार होतच राहतात, विचारांच्या प्रवाहामुळे आणि अनेक स्थितीच्या वावरण्यामुळे. त्यामुळे जगाशी संबंध घडतो आणि त्यात गुंतून राहतो आपण. 

प्रत्येक स्थितीचा स्वभाव आणि परिणाम आहे. बुद्धी बघा. Linear, logical and causal are its _patterns_ of actions. हे त्या बुद्धीचे अस्तित्वाचे गुण धर्म आहे. तसे त्याने वागले नाही तरच नवल! पण ह्याने होते काय की त्या स्वभावाला आपण धरून राहतो आणि तसे भोग झेलतो. बुद्धी जे फळ देईल, ते आपल्यावर परिणाम करते. म्हणून चिंता, त्रास, राग, सुख, दुःख वगैरे. हे भावना परावलंबी आहेत, दृश्यात निर्माण होतात, बदलांमुळे होतात आणि हेतूवर निर्भर असतात. तात्पर्य बुद्धीच्या स्वभावामुळे हे भावना आपल्या मनात वावरत राहतात. 

बुद्धिपेक्षा अधिक सूक्ष्म होणे हा पर्याय राहतो. ते म्हणजे *श्रद्धा*. श्रद्धेला मर्यादा नसते म्हणून ते आपल्याला सूक्ष्म करत भगवंताची स्थिती मनात संक्रांत करते. भगवंत आहेच. तो आपल्याला दिसत नाही. एका विशिष्ट क्रियेच्या परिणामांमुळे तो आपल्या जवळ येऊन आपण त्याच्यात विलीन होतो. 

ती क्रिया आहे श्रद्धा वाढवण्याची. त्यातील एक मार्ग आहे नामस्मरण.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home