श्री
श्री
अस्तित्व हे स्थिर असण्यामध्ये आहे आणि निर्मिती मध्ये आहे, आकार होण्यात आहे किंव्हा तत्पूर्तेपणात आहे. हे दोन्ही पद्धतीत अस्तीत्व असणार. म्हणून वारंवार संस्कार देत राहणे महत्त्वाचे आहे. दृश्यात गुंतून राहणे आहे, प्रश्न आहे आणि त्यातून स्थिर होणे हे ही आहे. एक सत्य आहे आणि अनेक आकारांची जाणीव आहे. आपणात दोन्ही प्रकारच्या मनोरचने आहेत आणि ते असणार.
निर्मिती मध्ये रूप किंव्हा आकार होतो आणि जीवही किंव्हा स्वभावही असतो. म्हणजे निर्मितीत जाणीव किंव्हा भाव आणि त्याचे रूप ह्या दोन्ही गोष्टी असतात. म्हणून द्रुष्यास समजून घेणे म्हणजे भाव आणि आकार हे दोन्ही गोष्टी आल्या - किंव्हा ह्या दोन्ही गोष्टी मिळून अस्तित्वाची व्याख्या होते.
जेवढा आपला भाव अस्थिर किंव्हा विघटित, तेवढे दृष्यातील आकार, हालचाली, गती दिसत राहतील. इथे दिसणे हे भासणे अश्या अर्थाने समोधित केले आहे. विघटित मनोरचना असल्यामुळे आपले अनेक स्तरान बरोबर गुंतणे निर्माण होते आणि म्हणून वृत्ती प्रमाणे जगाशी संबंध होत राहतात.
वृत्ती अशी गोष्ट आहे की ती प्रवाह सारखी सर्वव्यापी असते पण जीवाला स्वतंत्र भाव ( अहं ) निर्माण करते, जो प्रत्यक्षपणे परावलंबी भाव ठरतो. म्हणजे ही *विरोधाभास* स्थिती झाली! कदाचित हा निर्मितीचा परिणाम झाला मग! आपण *एक* आहोत पण आपल्याला भासत राहते की आपण प्रत्येकी वेगळे आहोत!! ह्या विरोधाभास _स्थिती - स्वभावामुळे_ आपण परावलंबी आणि संबंधित राहतो आणि सत्याला विसरून जातो!
कदाचित हीच भगवंताची इच्छा आणि कार्य असेल! आपल्याला विरोधाभासी संकल्पनेतून पलीकडे व्हायचे आहे. त्यासाठी नामस्मरण - त्या शक्तीचे ध्यान जीच्यातून ही संकल्पना घडते....!
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home