श्री : मी आहे
श्री : मी आहे
मी आहे, हा भाव किंव्हा जाणीव, जीवावर ठरतं नाही किंव्हा त्या स्पंदनांवर किंव्हा त्यातून होणाऱ्या प्रक्रियेवर. अस्तित्व किंव्हा शुध्द जाणीव असतेच - त्यातूनच सर्व घडामोडी आणि आकार येत राहतात.
ह्याचा अर्थ असाही आपण लाऊ शकतो की अर्थ देणे आणि त्याच्यातील स्तर आणि संबंध हे आपल्या जाणीव ह्यावर ठरवू शकतो. जे दिसते, त्याही पेक्षा जे जाणिवेत येऊ पाहते ते सत्य आहे. म्हणून आकार होणे आणि ते काय आहे हा दैवी भाव आहे. तो भाव स्थिरावले सर्वात महत्वाचं आहे. त्या भावाने काय उमटेल आणि काय घडेल आणि काय बघितले जाईल त्याचा संबंध जोडण्याचा अट्टाहास करू नये. तसा विचार केला तर भाव उमटण्यास वेळ लागू शकतो.
Can we go beyond causal awareness? Is causal awareness the only way of understanding reality? Does causal awareness 'make me'? Is causal awareness the measure for knowing everything?
हा शोध आहे. कितीही दृश्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो अपूर्ण, तात्पुरता ठरतो - इंद्रधनुष्य सारखा. ते आहे की नाही - अशी परिस्थिती निर्माण होते आणि तो भाव निर्माण होतो आपल्यात. म्हणून सर्व अस्थिर आणि स्थिर असा मामला आहे.
तसेच वास्तुशास्त्रातील कलाकृतीचा विचार खूप गूढपणाने प्रकट होऊ शकतो. त्याने " आकाराची " दृश्यांची व्याख्या काहीही असू शकते - ती अशीच पाहिजे किंव्हा तशीच किंव्हा अश्या पद्धतीने उलटली पाहिजे आणि ह्या वेळेतच आणि ह्या स्थळतच असे असू नये/ अट्टाहास धरू नये.
आपण विषयाला किंव्हा वृत्तीला धरून ठेवतो म्हणून खूप खोलवर अहं भाव प्रकट होत राहतो. जे काही बोलतो आणि अनुभवतो, ते वृत्तीतून येत असते आणि ते येऊ देणे आणि मनाला लाऊ न देणे ह्यातच आपलं हीत आहे. वृत्ती कुणाचीही नाही, स्थळाची नाही, वेळेची नाही. म्हणजे तिला येण्याला आणि वावरायला आणि संबंधित राहायला काही अमुक एक कारण नसते - ह्याचा अर्थ ते बुद्धीच्या पलीकडे असते. ती भगवंताची लीला आहे, म्हणून त्याला स्मरून रहा. स्मरणात तोच राहूदे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home