Sunday, December 15, 2024

श्री

 श्री 


दृश्याचा भाव आणि परिणाम याची अजिबात जरुरी नाही सिद्ध व्हायला! आपण - म्हणजे अस्तीत्व - स्वतः सिद्ध आहे, म्हणून त्यासाठी कुठल्याही वृत्तीची, वासनेची, आकाराची, चक्राची, कारणची, स्थळाची, स्थानाची आडकाठी लागत नाही. कार्य कसे करावे - हे ही त्याने योजिले आहेच - तर आपण का विचारात गुरफटून जावे?! आपण स्वतःला पक्के म्हणावे की काहीही हो, कुठल्याही गोष्टीचा विपरीत परिणाम मी स्वतःवर होऊ देणार नाही. म्हणजेच की भगवंताचे प्रेम मिळवणे. 

I remember a reference to a book on _Clutches in Architecture_ (or etc.) and perhaps it maybe argued in the book that the core value of architecture is way beyond any kind of justification used to create it - this means core value is fundamental to all and is beyond the weathering effects of space and time, so to say. 

 *प्रेम* हे एका प्रकारचे चक्र किंव्हा क्रिया आहे - स्पंदनेतून प्रकट होणारी. सर्व वासना भगवंताच्या प्रेमाकडे वळवावे म्हणजेच तेच स्पंदन येऊ देणे. जगाची निर्मिती आणि त्यातील *संबंध* स्पंदनांच्या द्वारे होऊ पाहते आणि त्यात आपल्याला इंद्रियांच्या दिशेने नेते. स्पंदन हे शक्तीचे कार्य आहे, म्हणून ते होत राहणार. 

प्रेम करणे महत्वाचे का आहे कारण ते जाणिवांना सूक्ष्म करू पाहते आणि शुद्धतेकडे नेते. जाणीव सूक्ष्म होणे म्हणजेच शुध्द, निऱ्हेतू प्रेम प्रकट होऊ देणे. त्यासाठीच आपले सारे अंग वापरणे - वृत्ती, बुद्धी, भावना, शरीर. 

हरि ओम

0 Comments:

Post a Comment

<< Home