श्री
श्री
कुठल्याही धाग्या बरोबर धावणे - हे गुंतून राहण्याचे लक्षण आहे - तो धागा कुठलाही असो - वैचारिक, भावनिक, शारीरिक - अगदी कुठलाही. कारण त्यातून वेगळेपण आणि तात्पुरतेपण सरत _नाही_ आणि ही _क्रिया_ एकंदरीत वेगळेपणाची भावना घेऊनच निर्माण होत राहते आणि प्रज्वलित राहते! एखादा भाव अस्तित्वात असला, तर त्यातून अनेक चक्र कार्य करत राहतात - ज्याला "मी" असे मानतो. आणि त्या धाग्याचे संस्कार होत राहतात.
म्हणून अस्तीत्व *धागा नाही* हे ओळखणे आले. म्हणजे *शांत होणे* हे अभिप्रेत आहे. म्हणजे अस्तित्वाला जीवाच्या भावाची, चक्राची, आकाराची गरज लागत नाही.
म्हणजेच की अस्तीत्व असतेच! ते स्वतः सिद्ध आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home