Tuesday, December 10, 2024

श्री

 श्री 


भगवतस्वरुप भाव सर्वांगीण संपादन व्हायला श्रद्धेचा उपयोग करायला लागतो. श्रद्धेने जीवाची शक्ती शांत होते आणि शुध्द शक्तित - म्हणजे भगवतात - विलीन होते, एकरस होते. 

बुद्धीने विघटित स्वरूप, अनेक स्तर, गुंतागुंती, स्थिती, संबंध, बदल, परावलंबंचे स्वरूप, भावाचा अर्थ - या गोष्टी कळून येतात. पण त्यातील कुठलाही एक घटक असा वेगळा काढता येत नाही, जेणे करून सगळ्या कोडी सुटतील. It is not a tree diagram or any branching pattern. A tree or a branch is a snapshot of a reality, but not the complete feel of existence. म्हणून बुद्धीने वेचून काढण्याचा प्रयत्न टोकाचा जरी घेतला तरी कदाचित त्याला मर्यादा जाणिवेत यावे. मर्यादा या करिता की बुद्धीचे गुण आणि पद्धत सर्वांगीण नाही ठरतं अस्तीत्व जाणण्या करिता. भगवंताची शक्ती बुद्धी पेक्षाही सूक्ष्म आहे आणि हेतुरहित आहे. ते जाणिवेत आणण्यासाठी बुद्धीला शांत करावे लागते. 

शांत करणे ही क्रिया जरी वाटली, तरी तो परिणामही आहे, भाव आहे, सत्याचे दर्शन आहे, मुळाची जाणीव आहे, स्थिरता आहे. 

ते श्रद्धेने होते असा संतांचा शब्द आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home