Saturday, December 14, 2024

श्री

 श्री 


चिंतेने कोडी सुटत नाहीत. आकार निर्माण करणे हा हेतू असू नये - आणि ते कुठल्याही वृत्तीने होत राहते आणि संबंध, तात्पुरतेपण, अपुरेपण प्रकट करत राहते. 

म्हणून सिद्ध होण्याचा भाव, वेळेची कमतरता आणि बदल - या गोष्टींना कितपत प्राधान्य देत राहणे हे स्वतः विचार करणे. कारण सिद्ध होत राहणे आणि त्यावरून कार्याची व्याख्या ठरवणे हे योग्य नाही शांती अनुभवण्यासाठी. 

आपण मुळातच शांती स्वरूप आहोत, मुळातच असतो, मुळातच अस्तीत्व भावातून आलो आहोत, तर आपण हे का विसरतो?! हा प्रश्न आत खोल नेणे गरजेचे आहे. आत नेतांना त्याचे परिवर्तन होईल हे ही ध्यानात राहू देणे. म्हणजे आतून पूर्ण परिवर्तन होऊ देण्याला स्वीकारणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home