Saturday, December 28, 2024

श्री

  

श्री 

 अस्तीत्व आणि त्यामुळे होणारे निर्मिती कार्य असतेच. ते कायम सुरू राहतेम्हणून काय होणार पुढे त्याची आपण चिंता करू नये. 

 आपण अस्तित्वात आहोतत्याचे एक रूप आहोत. रूप म्हणजे चक्रस्तरस्थितीसंबंधप्रक्रियाअनुभवआकार. रूप देवाकडून आले आहेम्हणून रूपाने चिंतित होऊ नका. रूप कोडे सोडवण्यासाठी आला नाही जगात. तो भगवंत जाणून घेण्यासाठी आला आहेकिंव्हा "मी कोण आहे"हा शुध्द भाव प्रकट होण्यासाठी निमित्त करून आला आहे. हा पूर्ण खेळ भगवंताचा आहे.

 रूपाला बाहेरची खेच दिली असते शक्तीनेम्हणून दृश्य जग निर्माण करून त्यातच गुंतून राहते. हा झाला शक्तीचा परिणाम. आपल्याला अंतर्मुख व्हायचे आहे आणि त्या क्रियेमध्ये वृत्तीविचारभावना आणि कृती - या सर्वांचा उपयोग आणि परिणाम आचरणात घ्यायला लागतो. अंतर्मुख क्रिया सर्व अंगांवर परिणाम करते. 

 सर्व सामान्य व्यवहारात वृत्ती कुठेतरी सारखी चिकटली असते - ज्याला आपण विषय म्हणतो. त्याने आपण बेचैन राहतो आणि कोडे सोडवण्याचा सतत प्रयत्न करतो. तर त्या चक्रातून पलीकडे होणे किंव्हा चक्र शांत होऊ देणे,  हा अभ्यास सुरू ठेवायचा आहे.

 अस्तीत्व भाव खरा आहे. आपण अस्तित्वात आहोत म्हणजे सारे काही आले. म्हणून नामस्मरण करणे.

 हरि ओम.

  

श्री 

 सोडवण्याचा अट्टाहास असू नये. त्याच्या पायी आपण नवीन संबंध घेऊन येतो किंव्हा निर्माण करतोम्हणून एकंदरीत गुंता _एकाठिकाणाहून निघून _वेगळ्याठिकाणी जातो किंव्हा मुळात "गुंता" ही संकल्पना राहतेच!! म्हणजेच आपण गुंतून राहतो! त्याला प्रपंच म्हणतात आणि तो स्वार्थी वृत्तीमुळे किंव्हा स्वार्थी भावामुळे निर्माण होतो. 

 तसेच त्रासेला काही विशिष्ठ कार्य किंव्हा कृती लागते की नाहीहे मला माहीत नाही. ते होऊ देणे की सोडवण्याची धडपड करणेहे माहीत नाही. ते परिस्थिती आणते का मी निर्माण करतोहे माहीत नाही. परिस्थिती खरी म्हणायची का ती निर्मिती शक्तितून दृश्यात येतेहे माहीत नाही. 

 म्हणजे आपण "स्वस्थ" राहावे काहीही घडले तरीही. गोष्टी होणेयेणे आणि जाणे हा अस्तित्वाचा गुण धर्म आहे - _म्हणजे तो जाणिवेत येणारच.मग का त्रासून घेणे स्वतःला?!!

 हरि ओम.

  

श्री 

 मूळ एकदा कळले की सर्व विघटीत संबंध त्यातून येतात हे कळते. म्हणजे कुठलाही तुकडा स्वतंत्र किंव्हा वेगळा वाटणे हा भास आहे - तो मुळात पूर्णच असतो (म्हणून क्रियाचक्रबदल आणि संबंध) आणि तो पूर्ण माध्यमातून निर्माण झाला असतो. 

 त्या पार्श्वभूमीवर, _निर्मिती क्रियाविघटन होण्याची न समजतातो पूर्णत्वाचा भाग आहे किंव्हा छटा आहे असे ओळखावे. जसं आग बघितलं की गरम वाटणारचत्या प्रमाणे पूर्ण शांती रस अनुभवला तर त्यातून सर्व गुणगतीस्तरस्थितीबदलसंबंध येणारच. जसं गरम वाटण्यास आग कारणीभूत आहेतसे दृश्य भाव निर्माण करण्याचं _कारणआहे भगवंत. हे एकदा ध्यानात आणलेतर दृश्यात बदल किंव्हा घडामोडी खूप त्रास देणार नाहीत. दृश्य भगवंताची सावली आहे - जो पर्यंत भगवंत आहेतो पर्यंत दृश्य असते आणि जी त्याच्यावर पूर्ण अवलंबून राहते. म्हणून त्या सत्याला स्वीकारा. म्हणजेच की सूक्ष्म व्हा. 

 भगवंत कैक पद्धतीने कळता येऊ शकतो. भगवंत कळणे म्हणजेच मन शांत करणेजी प्रक्रिया आहे. त्या कळण्याला कुठलीही स्थितीसंबंधकाळ आणि स्थळ चालू शकेल. तो कुठल्याही साखळी पासून जाणून घेता येतोकारण आपण त्याच्याच घरी आहोत. 

 हरि ओम.

 

0 Comments:

Post a Comment

<< Home