Wednesday, December 18, 2024

Shree

 Shree 


कधी शांती रस अनुभवात निर्माण होईल तो प्रश्न काळाच्यावर सोडणे, असे वाटते. इतर गोष्टी कळत नाहीत आणि आपल्याला वेगळेपण वाटतं राहते - यातच सर्व गोष्टी आल्या आणि यातच शांतीचा भाव दडलेला आहे. _दृश्य_ हा आपला मार्ग अस्तीत्व जाणून घेण्याचा. म्हणून दृश्याचे स्थान आणि त्याचे परिणाम डावळून नाही चालत. दृश्य भगवंताच्या शक्तितुन येते, म्हणून त्याचे प्रयोजन असेलच आपल्या प्रगतीसाठी आणि भगवंताला भेटण्यासाठी. ते कसे, हे त्याच्यावरच श्रद्धेने सोपवावे. 

आपण दृश्यात वावरण्याचा न कळत परिणाम असेलच. ते स्वीकारावे आणि चिंता करू नये. गुण आणि अवगुण घेऊन आपण कार्यात वावरतो आणि ते ही एका सूक्ष्म स्थितीतून आलेले असते. जसे आहोत, तसे चक्र निर्माण करत काही परिस्थिती अनुभवात आणतो, बदल बघतो, आणि गुंतून राहतो. हे होणार. ते स्वीकारावे आनंदाने - म्हणजे कष्टी किंव्हा त्रागा न करता.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home