Sunday, December 22, 2024

श्री

 श्री 


आस्तित्व ही क्रिया आहे, कार्य आहे (ते असणार कायम), परिणाम आहे, भाव आहे, जाणीव आहे. म्हणजे त्या शक्तितून जे काही प्रकट होते, त्याला वरील गोष्टी लागू होतात - प्रत्येक गोष्ट "जिवंत" असते आणि बंधनात + संबंधात वावरत असते. 

प्रकट होतांना बंधन आणि संबंध सर्व स्तारांना, आकाराना आणि रुपाना चढते/ आवरण घेते, त्यात मिसळते, ते गुण त्याच्यावर येतात आणि आपल्याला जे दिसते ते दृश्य जग, गती, बदल, गुण वगैरे. 

म्हणून मन असते, वृत्ती, विचार, भावना, शरीर असतात आणि _त्यांचे त्यांचे गुण धर्म_ आपल्या अंगी आपण घेतो. *गुण* म्हणून हा ही शब्द आपण क्रिया, चक्र, कार्य, भाव, दृश्य, संबंध असा बघू शकतो.  प्रत्येक गुणाचा परिणाम असणार. म्हणून सात्विक गुणांच महत्व हे की त्यांनी भाव शुध्द होतो, सूक्ष्म होतो, मन विशाल होते आणि मन स्वतः भगवतस्वरुप होते. 

तो भाव अंगी आणण्याकरिता नामस्मरण करणे असे संताने सांगितले आहे. त्या सांगण्यावर श्रद्धा ठेवून ती क्रिया करायला घेणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home