Wednesday, May 27, 2026

श्री

 श्री 


दर रोज व्यवहार करत असताना जाणीव रेषेसारखी किंव्हा गोलाकार किंव्हा विलीन - ह्या तिन्ही स्थितीत वावरू शकते किंव्हा वावरण्याची परिस्थिती उद्भवू शकते. जाणिवेचे रूप कसेही जरी होत असले त्या क्षणी, तरीही जाणीव भगवंताची शक्तीच आहे ह्या भावनेत कायम स्थिर असायला हवी - म्हणजेच की मुळातील सर्व प्रकाराचे संबंध, प्रवाह, स्तर, कार्य हे भगवंताने प्रकट केले आहेत, असे ओळखणे आणि कायम त्या ध्यानात राहणे. ह्याला "स्थिर होणे" असे म्हणतात, की स्मरण सतत भगवंताचे असते, अनुसंधान त्याचेच असते. 

आपण म्हणजे जीव, विषय सोडवणे कठीण. कितीही विचार केला, तरीही त्यातून अहं भाव प्रस्थापित राहतो. अहं भावाचे एक विशिष्ठ क्रिया असते, म्हणून परिणाम होतात. आपल्याला व्याकुळता येईल, दुःख होईल, कष्ट होतील, प्रश्न पडतील, दुविधेत असू, हे सगळं अहं भाव ध्यानात असल्यामुळे होणारा परिणाम. म्हणजेच एका अर्थी भावातून होणारी क्रिया, चक्र, संबंध, जाणीव आणि परिणाम (perception/ memory)!

दृश्यात वावरत असताना प्रश्न येणारच आणि मनासारखे गोष्टींच्या हालचाली नसणार. म्हणजेच सत्य वेगळेच असते, ही जाणीव होण्याची गरज आहे. आपण संबंध असे का लावतो, हा गूढ सवाल आहे. _संबंधांचे उत्तरे_ बुद्धी किंवा विचारात सामावलेले नाही, त्यासाठी शांत होणे अभिप्रेत आहे.

कुठल्याही परिस्थितीत शांत होण्याचा अभ्यास चालू ठेवावा.

हरि ओम.




श्री 

भगवंत जाणीव आहे, वस्तू नाही. सर्व वस्तू स्वतःतूनच येत असतात, तसेच भगवंत स्वतः मधेच ओळखायला हवा. ह्याला _दुहेरी_ परिणाम म्हणायचा जाणीव राखण्याचा. जाणीव म्हणलं तर दुहेरी परिणाम आला. 

 _सर्व गोष्टी होत राहतात_, गती असते, हालचाली असतात, बदल असतात, संबंध असतात.  हे ओळखावे, पचनी होऊ द्यावे, स्वीकारावे आणि शांत रहावे. 

दृश्याचे प्रयोजन काय, ह्यासाठी भगवंताचे चिंतन करत राहावे. हा सवाल बौद्धिक असतो का?! की आणखीन सूक्ष्मात सामावलेला असतो? प्रश्नाचे उत्तर आणि सूक्ष्मात पदार्पण होणे हे अवलंबून असते का?!! अवलंबून संकल्पना आपण निर्माण होऊ देतो - तसे प्रत्यक्षात होण्याची गरज नसते! 

आणि तेच शिकायचे असते किंव्हा जाणीव तशी होऊ द्यायची असते. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home