श्री
श्री
एकांतात बसणे, काही क्षण हेतू बाजूला ठेवून क्षण अनुभवणे ह्यात काही चुकीचे नाही. अनेक क्षण असतात की त्यात हेतू असतो, नसतो, बदलत राहतो, संबंधित गोष्टी आणतो वगैरे. म्हणजे अनुभव खूप प्रकाराचे संक्रांत होत राहतात, बदलत राहतात, दोऱ्या मध्ये ओवलेल्या जातात, वगैरे. सर्व त्या प्रकारे "संबंधितच" असते. हे _संबंध_ अस्तित्व कार्यातून उद्भवते, म्हणून संबंधांना मूळ _मानवी हेतू नसतो_ किंव्हा ते भगवत इच्छेतून स्थित होते.
अहं भाव आणि त्याचे स्मरण राहणे, हा अस्तित्वातील एक भाग आहे आणि त्यातून येणारे विचार, भावना, वगैरे. ते गैर नाही, पण ते कायमही नाही. अहं भावनेतून गोष्टी जाणवतील, ते नुसते बघावे. म्हणल्या प्रमाणे, त्यात मानवी हेतू नसतो, म्हणून ते शांतीने बघावे, एवढेच अभिप्रेत आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home