श्री
श्री
भगवंताचे चिंतन, किंव्हा नामस्मरण दर क्षणी आत्मसात करावे कारण, विचारांचा भाव अनेक स्वरूपात वावर होत असतो ज्यात मन तिथे गुंतले असते. म्हणजे कधीतरी विचार संकल्पना करेल, नुसते बसेल, कधीतरी ते प्रत्यक्ष गोष्टीना सामोरे जाण्यात मग्न असेल, तर कधीतरी ते परिमाण झाल्यावर त्यावर टीका करेल किंवा त्यात गुंतून राहील. सर्व _विचार परिस्थितीत_ भगवंताचे भान प्रस्थापित व्हायला हवे, कारण सर्व क्षणात त्याच्यातून सर्व हेतू प्रस्थापित होत असतात. म्हणजे "होण्याचे कारण" - मग ती इच्छा असो, की संकल्पना, का प्रत्यक्ष अनुभव, किंव्हा परिणाम - सर्वांना अस्तित्व भाव कारणीभूत ठरते. किंव्हा दुसऱ्या पद्धतीने सांगायचे तर सगळी साखळी, स्तर, स्मरणांचा प्रकार - सर्व भगवंतामध्ये सामावलेले असते. लाट कशीही असू द्यावी, भरती आणि ओहोटी कशीही येऊ द्यावी, चढ उतार कसाही असू द्यावा, प्रत्यक्षात भगवंताचे कार्य चालू असते...आणि म्हणून ह्या सर्व प्रकारच्या _हालचाली होत राहतात_.
मनाचीही हालचाल असते, वस्तुंसारखी. ही हालचाल अदृश्य असते किंव्हा गूढ असते. त्या हालचालीला - *कार्य* - असेही संबोधले असते. म्हणून मन म्हणजे काय आणि ते कसे होते, हे अध्यात्मातील प्रश्न असतात.
जीवाच्या पार्श्वभूमीवरुन बघितले, तर जाणीव शुद्ध आणि सूक्ष्म होत राहणे, म्हणजे सर्व हालचालींचा अवाका ध्यानात येणे आणि मन स्थिर होणे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home