Monday, June 08, 2026

श्री

श्री 

स्पष्टीकरणाला जर खूप कारण लागले, तर समजावे की आपण खूप परावलंबित झालेले आहोत. मनाचा मार्ग स्पष्टीकरण देत राहण्याचा असतो, म्हणून ते नाहिसे करण्यास ते आणखीन विघटित मार्ग पत्करते, ज्यामुळे स्पष्टीकरणाची गरज क्षणो क्षणी प्रकट होत राहते! 

स्वस्थता ह्याचा मार्ग, वरील मार्गाच्या विरुद्ध आत्मसात होण्याचा आहे. म्हणजे कारण शोधण्याची गरज न उत्पन्न होणे, धरून न ठेवणे, देह बुद्धी विलीन होऊ देणे, प्रवाह दिसणे, कार्याची ओळख होणे, सूक्ष्म होणे, चिकित्सा सोडून देणे, शांत होणे, वगैरे. आपण कप्प्यात वावरत नसतो. म्हणजे एक कप्पा स्थळ, दुसरा कप्पा काळ, तिसरा कप्पा क्रिया, चौथा काम, पाचवा नाती, सहावा व्यवहार, सातवा स्मरण, आठवा आणखीन काही....कप्पा करण्याची हौस विलीन व्हायला हवी. कोडी, विषय, कप्पे, गती, मन, गुंतणे, सोडवणे, सिद्ध होऊ पाहणे - हे एकाच धाग्यात बांधल्या गेलेल्या संकल्पना आहेत. एक सोडवता सोडवता सगळा गोळा सोडवायला लागतो. त्यात मनाचे कष्ट आहेत. दुसरा मार्ग नामस्मरणाचा की त्यातून शांती भाव आत्मसात झाली म्हणजे समजावे की कप्पे विलीन झालेले आहेत.

हरि ओम.


श्री 

वरील लेखातून हे ही जाणवते की अहं भावामुळे किंव्हा जीवाच्या होण्यामध्ये सिद्ध करणे हा त्यात उपजत भाग येतो, म्हणून कप्प्यात संकल्पना मांडत राहणे आणि त्याला सोडवणे असे आपण गुंतत राहतो! हा अहं भावाचा परिणाम ओळखावा - किंव्हा प्रवाहाला सतत विघटन स्वरूपात मांडत राहणे आणि त्यामुळे अनंत रूप आणि आकाराना सामोरे जात राहणे! 

मन विशाल आणि सूक्ष्म होऊ देणे म्हणजे प्रवाहाची जाणं प्रज्वलित होणे आणि सर्व कर्तेपण भगवंत माध्यमाला सुपूर्त करणे. 

प्रवाह सत्य आहे, कप्प्यात गोष्टी होणे नाही.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home