Thursday, June 04, 2026

श्री

 श्री 


विचारांकडे "नुसते न गुंतता बघावे लागते". हा गूढ प्रकार आहे. आपण बऱ्याच सूक्ष्म गोष्टी शब्दात मांडू शकतो, पण त्यावरून लगेच व्यवहारात त्याचे नियोजन करावे अशी अपेक्षा असणे जरा कठीण आहे. _शब्द_ म्हणजे पूर्ण सत्य नाही किंव्हा पूर्ण ताबाही नाही. माझ्या मते, "मी", किंव्हा होणे, किंव्हा कुठल्याही दृश्यात घडामोडी ह्यावरून ताबा मिळवण्याची व्याख्या कदापि होत नसते. म्हणजे दुसऱ्या अर्थाने, कशानेही _हेतूची_ संकल्पना निर्माण होत नाही/ निर्माण करू नये. जिथे विचारांमध्ये कुठेही (कुठल्याही स्तरात किंव्हा रूपात) गुंतणे झाले (identification with _any_ form of thought), तिथे हेतू आला, भाव आला, स्मरण आले, तात्पुरतेपण आले, वगैरे. 

अस्तित्व भाव खूप गूढ आहे, की तिथे अनुभव हेतुला धरून किंव्हा हेतूशी संबंधित नसतो. जन्म, मरण, चक्र, स्मरण, भाव, हेतू, परिणाम, व्यवहार, इच्छा, गुंतणे, भीती, राग, सुख आणि दुःख, परावलंबन - हे _एकाच_ वेळेला प्रकट होतात. इथे स्तर अनेक, माध्यमे अनेक, कार्य अनेक - कुठे मूळ शोधावे आणि त्यावरून लेखावे स्वतःला किंव्हा इतरांना?!!

 *शोधाचा* अर्थ दोन प्रकारे ओळखता येतो. विचारांच्या पातळीवरून (म्हणजे त्याच्या सर्व स्वभावात गुंतून) शोध व्हावे. पण विचारांना अंत नाही, म्हणून ह्या मार्गावरून शोधाचा अंत नाही, किंव्हा सत्य पूर्णपणे कळणे अवघड. दुसरी पद्धत म्हणजे विचारांची मर्यादा आत्मसात होणे आणि त्यांना शांत होऊ देणे आणि स्थिर होणे/ सूक्ष्म होत राहणे/ श्रद्धा वाढवणे/ पलीकडे जात राहणे/ अंतर्मुख होणे. इथे पूर्णपणे स्थिर होणे, म्हणजे शोधाचा अंत होणे, असे आपण ओळखू शकतो. स्वतःला विलीन होऊ द्यावे लागते, की त्यातून शांती प्रस्थापित होते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home