Saturday, October 12, 2024

श्री

 श्री 


इतक्या गोष्टी सूक्ष्म होत असतात आपल्या अनुभवातून की ते उलगडण्याची गरज असावी का? आणि त्यातून स्वतःची किंमत ठरवणे योग्य आहे का? मुळात अंतर्मुख होणे हे स्वतःसाठी अपरिहार्याने घडते. तो प्रवास भगवातस्वरुप होतो. 

अनंत काळापासून आपण वावरत असतो, स्वभाव होत राहतो, आकलन होत राहतो. मग इतक्या गोष्टी सांगण्याची गरज असावी का? गरज का लागते? कोण निर्माण करतो गरज? माझ्या आत खूप काही चालू राहते आणि ते इतर आकारांवर निगडित असते. त्या एकंदरीत परिस्थितीचा भाव आहे तात्पुरतेपण आणि अहं आणि वेगळेपण. हा भाव आहे, दोष नाही. 

असे असल्यामुळे खरे स्वरूप कळणे तितके सोपे नसावे आणि वाट गूढ असली हवी. 

सैय्यम.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home