Wednesday, October 30, 2024

श्री

 श्री 


वस्तुस्थिती अशी आहे की मन खूप प्रकारे क्रियांना चिकटून राहते. जे दिसते ते कैक पटीने सूक्ष्म स्थितीत घडतं असते म्हणून गुंतून राहणे ही क्रिया खूप खोलवर चालू राहते. त्या प्रमाणे आपण भरलेले असतो. 

चिकटून राहणे, ह्यातून मोकळे व्हावे म्हणले तर त्यात प्रयास आहेत सर्वांगीण पद्धतीने. त्या क्रियेला अंतर्मुख होणे, शक्तीचे सूक्ष्म स्वरूप ओळखणे, प्रेम देणे, भक्ती करणे, स्वीकारणे, सैय्यम ठेवणे, श्रद्धा वाढवणे या सर्व गोष्टी येतात.

Things do exist in multitudes, diverse and "parallels" too. Parallel situations are a personal perception but created from the same source. Therefore never argue or fight any parallel or diverse or a fragmented scenario. To align everything through intellect is a limited proposition. A better realization is of acceptance of things as they appear, connect, and go - as an Action of vibrations.

This may be realised as God's Will or grace or from where we come or what is inherited and who is this "we" and where we seem to go. These vibrations are of God and they make up the whole of phenomena of multiverse. 

ज्ञानदेवांच्या शब्दात सांगायचे तर तर आपण (all sorts of phenomena) भगवंताच्या _घरी_ आहोत. जेव्हा ह्याचं आकलन होत, तेव्हा पूर्ण भाव जागृत होतो. 

म्हणून आत्ताचा क्षण तेवढाच महत्वाचं आहे. पुढे, मागे वगैरे हे स्वप्नातले गोष्टी समजाव्यात! मागून किंव्हा पुढून आपण घडतं नाही की ठरतं नाही. आपण कशानेही ठरतं नाही. ठरणे ही मर्यादित क्रिया आहे, निर्णय देणे तो परिस्थितीतून येतो. म्हणजे निर्णय क्षमता निर्माण होते. त्याला आपण चिकटून राहतो.

प्रगती ती की निर्णय देणे हा भाव " कार्य घडणे " असे आकलन व्हायला हवे. कार्य घडते कारण ती क्रिया म्हणून वावरतच असते. त्यात आपण प्रवाहाचा एक भाग आहोत. आपल्या हाती अनुभव येतात, घडतात आणि निघूनही जातात - हे विधिलिखित आहे. आणि त्या अनुभवातून प्रेम कुठूनही जागृत होऊ शकते - त्या भावनेला स्थळ आणि काळाच्या चौकटीत जकडू नये. म्हणजे खरे प्रेम किंव्हा शांती भाव हे सर्व शक्तींच्या पलीकडे आहे, सर्व क्रियांचा पलीकडे आहेत - म्हणजेच ते - आई वडील समजावे. 

प्रेमातून सर्व गोष्टी स्वीकारल्या जातील आणि ते शांत होतील. जग असेल की नाही, मी असीन की नाही ह्या प्रश्नाच्या फंदात पडू नये. भगवंत माध्यम सर्व ठीकच करेल. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home