Tuesday, December 31, 2024

श्री

श्री 

अस्तीत्व - ही वस्तुस्थिती असणार आहे. म्हणजे आपण असणारच आहोत आणि अनुभव निर्माण होत राहणार आहे. त्यात सारे स्तर, क्रिया, चक्र, गुंतागुंती, बदल, गुण, गती, भाव आणि खूप सारे घटक वावरत जाणिवेत येणार आहेत. ते दृश्य जगाची उत्पत्ती आणि लय दर्शवत राहतील. हे अनंत काळ चालू राहणार आहे. ह्या सर्व क्रियेत आलेला शक्तीला प्रश्न असा आहे की मी कोण आहे आणि माझे  स्थान ह्या सर्व घडामोडीत काय आहे? 

ह्यावरून स्पंदने योग्य होण्याचे सामर्थ्य आहे शक्तित - ज्याला त्याचा त्याचा काळ लागू शकेल. तो मार्ग झाला. मार्ग म्हणजे दृश्य अनुभवातून (जी काही परिस्थिती असावी जाणिवेत) स्थिर होणे. स्थिर होण्यात अनंत गोष्टींचे अर्थ पचनी पडायला लागतील. गोष्टी निर्माण होणे, जाणिवेत वावरणे, त्यात गुंतून राहणे, बदल होणे, परिवर्तन होणे, पचनी पडणे आणि त्यावरून साखळीचे रूप निर्माण होत राहणे - हे असे होणार. 

हे झाले अस्तित्वाचे *दर्शन*. _दर्शन अनुभवाचे_ रूप शांती भाव प्रत्ययास यायला हवे. म्हणून नामस्मरण.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home