Friday, December 06, 2024

श्री

श्री 

सर्व गोष्टी सांगणे आणि ते सांगताना स्पष्टीकरण देणे किंव्हा हेतू दर्शवणे याची गरज नसते. गोष्टींचे होणे ही सूक्ष्मातून होणारी क्रिया स्वीकारली हवी, म्हणजे त्याला माप - दंड, रंग, गुण, तर्क या सर्व चौकटीत मांडू नये. आपण त्याला मांडू इच्छेतो कारण तसा आपला भाव असतो. _वेग_ ही अशी संकल्पना आहे की गोष्टी ध्यानात येणे आणि त्यावर प्रतिक्रिया किंव्हा संबंध जोडणे हे एकाच वेळेला घडणारे क्रिया आहेत. म्हणून गोष्टी "कोणत्या किंव्हा असायला हव्या" असे काही तर्क असू नये. जर अस्तित्वाचे कार्य असतेच, तर त्यातील कुठल्याही संकल्पनेचे होणे - गोष्टी आणि संबंध - ही दैवी प्रकट होणारी क्रिया आहे. म्हणजे त्याला "भेट" म्हणून बघणे.

गोष्टी गोल असतात, बदलत राहतात, ते येतात आणि जातात. म्हणून पक्के असे काहीही नसते आणि धरून ठेवण्याची गरज नसते. आपण पूर्ण असतोच. भगवंत सगळीकडे भरलेला आहे. त्यात अनेक स्तर, स्थिती, आकार निर्माण होत राहतात आणि ते गुंतून राहतात, येतात आणि जातात. हे सारे भगवंताचा विलास दर्शवतात. म्हणून परिस्थिती काहीही असो, आपण भगवंताच्या घरी असतो. मौन राहणे महत्त्वाचे आहे, कारण त्यातून आतील भावना कळून येते. भावना कळणे हळूवार आणि मऊ असण्याचे कार्य आहे - तो गहंपणा  जाणवून येईल. त्यावर श्रद्धा ठेवावी.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home