Thursday, March 06, 2025

श्री

 श्री 


मनात कार्य घडत असते आणि ते काही अनुभव प्रकट करतात, आणि ती साखळी कायम राहते. 

आपल्याला कुठल्या पद्धतीने कार्य करायचे आहे, ते ठरवावे. प्रेमातून केले तर फार उत्तम, कारण त्याचे परिणाम चांगल्या पद्धतीने वृत्तीला शुद्ध करतात आणि विश्वभर पसरतात. ते कसे, ह्याकडेही चिकित्सा खूप करू नये. ते होते, असे मानून श्रद्धेने शुद्ध कार्य करत राहावे. 

श्वास, काळ, स्थळ, साखळी, कार्य हे सतत निर्माण होणारे, बदलत राहणारे, परिणाम करणारे घटक आहेत. सत्य जाणून घेणे म्हणजे ह्या सर्व घटकांच्या द्वारे स्थिरता मिळवणे. स्थिरता म्हणजे काळजी, चिंता, त्रास न होऊ देणे ह्या हालचालींमुळे. 

त्यासाठी नामस्मरणात राहण्याची सवय लावून घेणे.

हरि ओम.


श्री 

जगात कुठलीही गोष्ट किंव्हा कुठलेही रूप कायम नसतं - असे लिहिणे ही नाही! 

नाही म्हणणे ह्यात खूप मोठी शक्ती आहे आणि सत्य आहे. आपल्या बरोबर पुढे कुठलेही रूप येत नाही आणि जे काही येते, त्याला आपणच उत्तेजीत किंव्हा प्रकट केलेले असते. म्हणून जे येऊ पाहते, ते येऊ देणे - _कारण_ त्यातूनच बदल, अर्थ, मार्ग, शांती भाव प्रकट होईल. तोच आपला मार्ग.  

गोष्टी येणे आणि जाणे हे दैवी कार्य आहे, आपण निमित्त ठरतो. It is only a pause, called life. Pause itself is a phenomenon of existence and it will continue as a journey. 

सर्व स्वीकारावे श्रद्धेने.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home