श्री
श्री
आपण अस्तित्वात असतो, म्हणून एक भाव _धरलेला_ असतो. धरणे ही भगवंत इच्छा आहे, अस्तित्वाचा परिणाम आहे, होणे आहे, वावरणे आहे, जाणे आहे, अनुभव प्रकट होणे आहे, परिणाम आहे, चक्र आहे, प्रश्न आहेत, शोध आहे...
दृश्य निर्माण होणे (निर्मिती - ही क्रिया), असतेच. सत्य वेगळ्या पद्धतीने दिसणे, हे असणार. त्यातून स्थिरता काय आहे, हे ओळखणे, असणार. दृश्याला खरे मानून त्याचा परिणाम भोगणे, हे असणार. त्या परिणामांना चक्र म्हणून स्वीकारणे ही असणार. त्यात आणखीनच गहन प्रश्नांना सामोरे जाणे होणार. त्यातून गुदमरून बाहेर पडून घेणे होणार. त्यातून सर्व स्वच्छ दिसणे होणार.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home