Monday, June 08, 2026

श्री

 श्री 


आपले भवितव्य, मनस्थिती,  शांती भाव - परिस्थितीवर, नात्यावर, जबाबदाऱ्यांवर, कामावर *ठरण्याची अजिबात गरज नाही*. प्रवाह होत राहणार, त्यात स्वतः आपण कुठे हवे, असा विचार आणण्याची गरज नाही ध्यानात. विचार एका पद्धतीचे किंव्हा एका स्वरूपाचे असे का येऊ पाहतात, हे सांगणे अवघड किंव्हा नाही कळत. ते कळले नाही, तरीही त्यात गुंतण्याची आणि कोडी सोडवण्याची _गरज_ असते का?! विचारांचे संपूर्ण रूप कळले नाही, तरी त्यामुळे त्रास, कष्ट, व्याकुळ होण्याची गरज नाही. जे काही आहे, जे काही येत राहते, जे काही येणार असते, जे काही निर्माण होते, ते भगवंताच्या इच्छेने येते.  _गरज_ स्वतःची जाणीव प्रज्वलित ठेवते. ती शुद्ध झाली, की गरजही उरणार नाही, तरीही शांती भाव संक्रांत होईल. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home