Friday, May 29, 2026

श्री: काही विचार

श्री: काही विचार

संकल्पना, किंव्हा होणाऱ्या गोष्टींचे चिंतन, प्रत्यक्ष अनुभव वावरत होताना, आणि परिणाम भोगण्यातून होणारे चिंतन - ह्या तिन्ही गोष्टीतून शांत होण्याचा मार्ग निघतो....म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींना "सामोरे" जायला लागते. त्याला आपण अनुभवांचा प्रवाह असेही म्हणून शकतो आणि त्यातून घडणारा प्रवास जाणिवेचा. अध्यात्म अभ्यासात ह्या तिन्ही गोष्टींचा उल्लेख केला आहे - की योग्य विचार म्हणजे काय, प्रत्यक्ष अनुभवात जाणीव कशी असावी आणि परिणामांकडे कसे बघावे....थोडक्यात हे सर्व ध्यानात असणारे चक्र आहे, किंव्हा _संबंधांचे स्वरूप_ आहे, म्हणून सर्व संबंधित असणाऱ्या गोष्टींवर टीका केली आहे. 

संबंध होत राहतात भगवंत इच्छेतून आणि एकातून एक अशा गोष्टी ध्यानात संक्रांत होतात. त्या गोष्टींचे चक्र म्हणजे स्तर,भाव, आतून ते बाहेर होणारी प्रक्रिया, भगवंत भाव ते दृश्याचे स्थान, दृश्य आणि मी ह्यात होणारा संबंध, भगवंत आणि मी, भगवंत आणि दृश्य वगैरे. 

विचार - हे काल्पनिक आहे, प्रत्यक्ष अनुभव संक्रांत करणारे आहे, भावनेतून निर्माण झालेले आहे, गूढ माध्यमातून स्थित झालेले आहे, चिंतनात असणारे आहे. म्हणजे सत्याचे अस्तित्व, त्यातून येणारा संबंध, त्यातून होणारा विचारांचा स्वभाव, त्यातून निश्चय क्षमता, त्यातून अनुभव, त्यातून परिणाम, त्यातून चक्र - असा काहीसा _गूढ संबंध अस्तित्वाशी जोडला गेलेला दिसत आहे._

 _सर्वांगीण अनुभव_ ह्याला म्हणत असावे आणि ते कसे योग्य व्हावे जेणेकरून शांती ध्यानात येते, हा अध्यात्म अभ्यासाचा ध्येय मानावा. त्यात सुचवलेले मार्ग, आणि त्यातील एक मार्ग म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

 *प्रत्यक्ष* सत्याला सामोरे जाणे आणि ध्यानात येऊ देणे सर्व काही असते. अस्तित्व, हा प्रत्यक्षाचा भाग आहे, म्हणून त्यात प्रत्यक्षपणे सारे स्तर, त्याचे कार्य, त्याचे संबंध, परिणाम, भोग, जाणीव - हा स्वतःच्या अनुभवातील घडणाऱ्या गोष्टी असणार आहेतच. 

ह्यावरून असे आत्मसात होणे आहे, की संपूर्ण कार्य, हे भगवंताच्या इच्छेमुळे प्रस्थापित होते...म्हणजे संपूर्ण प्रकाराचे जे काही संबंधांचे रूप निर्माण होत असतील ते. अशी एकही जागा नाही, किंव्हा एकही काळ नाही, किंव्हा एकही विचार नाही, किंव्हा एकही क्रिया नाही, किंव्हा एकही संबंध नाही - ज्यात भगवंताचे वास्तव्य नसते. म्हणून सर्व गोष्टींचे, स्वतः होण्याचे, परिवर्तनाचे - हे भगवंताशी जोडलेल्या गोष्टी असतात. 

हरि ओम.

Shree

 Shree 


Liberation from dependence through effective use of intellect is an illusion. The idea of liberation as conceived by intellect _may result_(unknowingly) in further isolation, aggression, speed, weird expectations, desperations, disconnections, fragmentation, rupture, exploitation and so on. 

Neither can the mind 'avoid' effects of vibrations. So, essentially there is a problem of acceptance of self/ existential phenomenon. The problem has no intellectual answer, according to me. And to find one, may land in an inversion idea of intellect, which again, may cause annoyance. How can intellect decode it's own beginning by its own language?!! 

Therefore there needs to be an approach of something different, _beyond_ the path that is felt by the intellect. 

Hari Om.


श्री 

वरील लेखाचे तात्पर्य हे, की विचारांचे मर्यादा आत्मसात व्हायला हवे आणि त्यातून मार्ग प्रस्थापित होण्याची निर्मिती होते. 

विचारांना खूप काहीसे संकल्पना कळून येतात संबंधातून - काल, आज, उद्या, स्मरण, नाती, रूप, आकार, भाव, साखळी, बदल, भावना, परिणाम, चक्र, अनेक स्तर, वगैरे. ह्याचा संबंध आणि ताबा कसा मिळवावा किंव्हा त्यातून कसे सुटावे, हा प्रश्न विचार उद्भवू शकतो, पण तो प्रश्न योग्य असतो का, हे ओळखावे.  

विचारांची भूमिका वरील कित्येक घटकातून उद्भवते किंव्हा स्थित होते, तर चिंता का करावी त्या होण्याची? विचारांचा साहजिकच स्वभावही होत असेल, जो जीवाला इकडे आणि तिकडे धावपळ करायला लावेल. तो स्वभाव शांतीने बघावा. त्यातून तो स्वभाव _मावळतो_ आणि शांतीचा अनुभव प्रस्थापित होतो. 

हरि ओम.

Wednesday, May 27, 2026

श्री

 श्री 


भगवंताचा _प्रश्न_ (महत्व, गरज, प्रयास, श्रद्धा, मार्ग, कृपा) निर्माण किंव्हा स्थित व्हायला कारण गूढ असते. कशातून ती गरज निर्माण होते, हे सांगणे कठीण...भगवत कृपा म्हणावी. 

जीव असा प्राणी आहे, की त्याला स्वतःच्या स्तराची, संबंधांची, परिणामांची, भोगाची, कार्याची जाणीव असते/ प्रखर करता येते. म्हणून त्याला पडणारे प्रश्न औरच असतात! त्या प्रश्नातून शोध स्थित राहतो, तो नंतर मार्ग बनतो आणि शेवटी सत्य दर्शनास आणतो. 

प्रश्नाची रचना आणि तिला साजेल असे उत्तर रेषेसारखे सरळ नसतात बहुतांश. सरळ नाही म्हणजे ते विचारांच्याही पलीकडे स्थित असते. अपुरेपण, तात्पुरतेपण, वेगळेपण - हा भाव सर्वांगीण सर्व स्तरात पसरलेला असतो किंव्हा स्थित असतो. म्हणून विचारांच्या शक्तीवर समाधानकारक उत्तरे सामावलेले नसतात. 

दररोजच्या दृश्यात वावरताना हालचाली हे टप्पे किंव्हा निमित्त मानावे. म्हणजे त्यांचा परिणाम शांत होण्यासाठी व्हावा, नाही की व्याकुळता प्रस्थापित होण्यासाठी. 

प्रत्येक जीवाचे त्याचे त्याचे रूप असते, विचारांची पद्धत असते. त्यातून मार्ग आत्मसात व्हावा लागतो. प्रत्येकाच्या वाट्याला प्रवास आहे, त्याला तो पत्करावा लागतो, त्याचे देणे असते, तो स्वीकारावा लागतो, त्यात कार्य करावे लागते, त्यात शरण जावे लागते. सैय्यम ठेवावा आणि शांत व्हावे.

हरि ओम.




श्री 

व्यवहार किंव्हा द्वैताशी संबंध प्रस्थापित होणे आणि स्वतःशी/ अंतर्मुख होण्यात संबंध प्रस्थापित होणे, ह्यांचे त्या त्या स्थितीत परिणाम होत राहतात आणि एकमेकांशीही संबंधित असतात. 

त्याकडे शांतीने नुसते बघावे. त्यातून काही अभिप्रेत असते का? काही मिळवायचे असते का? काही हेतू असायला हवा का? हे प्रश्न त्वरित संपणे अशक्य. ते प्रश्न असतात, म्हणून नकळत सत्याचा शोध होत राहतो. जीवात शोध, _हे कार्य_, स्थित असते, म्हणून शांतीचे दर्शन कधी ना कधीतरी होणार. त्यावर श्रद्धा ठेवावी. 

हरि ओम.

श्री

 श्री 


दर रोज व्यवहार करत असताना जाणीव रेषेसारखी किंव्हा गोलाकार किंव्हा विलीन - ह्या तिन्ही स्थितीत वावरू शकते किंव्हा वावरण्याची परिस्थिती उद्भवू शकते. जाणिवेचे रूप कसेही जरी होत असले त्या क्षणी, तरीही जाणीव भगवंताची शक्तीच आहे ह्या भावनेत कायम स्थिर असायला हवी - म्हणजेच की मुळातील सर्व प्रकाराचे संबंध, प्रवाह, स्तर, कार्य हे भगवंताने प्रकट केले आहेत, असे ओळखणे आणि कायम त्या ध्यानात राहणे. ह्याला "स्थिर होणे" असे म्हणतात, की स्मरण सतत भगवंताचे असते, अनुसंधान त्याचेच असते. 

आपण म्हणजे जीव, विषय सोडवणे कठीण. कितीही विचार केला, तरीही त्यातून अहं भाव प्रस्थापित राहतो. अहं भावाचे एक विशिष्ठ क्रिया असते, म्हणून परिणाम होतात. आपल्याला व्याकुळता येईल, दुःख होईल, कष्ट होतील, प्रश्न पडतील, दुविधेत असू, हे सगळं अहं भाव ध्यानात असल्यामुळे होणारा परिणाम. म्हणजेच एका अर्थी भावातून होणारी क्रिया, चक्र, संबंध, जाणीव आणि परिणाम (perception/ memory)!

दृश्यात वावरत असताना प्रश्न येणारच आणि मनासारखे गोष्टींच्या हालचाली नसणार. म्हणजेच सत्य वेगळेच असते, ही जाणीव होण्याची गरज आहे. आपण संबंध असे का लावतो, हा गूढ सवाल आहे. _संबंधांचे उत्तरे_ बुद्धी किंवा विचारात सामावलेले नाही, त्यासाठी शांत होणे अभिप्रेत आहे.

कुठल्याही परिस्थितीत शांत होण्याचा अभ्यास चालू ठेवावा.

हरि ओम.




श्री 

भगवंत जाणीव आहे, वस्तू नाही. सर्व वस्तू स्वतःतूनच येत असतात, तसेच भगवंत स्वतः मधेच ओळखायला हवा. ह्याला _दुहेरी_ परिणाम म्हणायचा जाणीव राखण्याचा. जाणीव म्हणलं तर दुहेरी परिणाम आला. 

 _सर्व गोष्टी होत राहतात_, गती असते, हालचाली असतात, बदल असतात, संबंध असतात.  हे ओळखावे, पचनी होऊ द्यावे, स्वीकारावे आणि शांत रहावे. 

दृश्याचे प्रयोजन काय, ह्यासाठी भगवंताचे चिंतन करत राहावे. हा सवाल बौद्धिक असतो का?! की आणखीन सूक्ष्मात सामावलेला असतो? प्रश्नाचे उत्तर आणि सूक्ष्मात पदार्पण होणे हे अवलंबून असते का?!! अवलंबून संकल्पना आपण निर्माण होऊ देतो - तसे प्रत्यक्षात होण्याची गरज नसते! 

आणि तेच शिकायचे असते किंव्हा जाणीव तशी होऊ द्यायची असते. 

हरि ओम.

Tuesday, May 26, 2026

श्री

श्री 

एकांतात बसणे, काही क्षण हेतू बाजूला ठेवून क्षण अनुभवणे ह्यात काही चुकीचे नाही. अनेक क्षण असतात की त्यात हेतू असतो, नसतो, बदलत राहतो, संबंधित गोष्टी आणतो वगैरे. म्हणजे अनुभव खूप प्रकाराचे संक्रांत होत राहतात, बदलत राहतात, दोऱ्या मध्ये ओवलेल्या जातात, वगैरे. सर्व त्या प्रकारे "संबंधितच" असते. हे _संबंध_ अस्तित्व कार्यातून उद्भवते, म्हणून संबंधांना मूळ _मानवी हेतू नसतो_ किंव्हा ते भगवत इच्छेतून स्थित होते.  

अहं भाव आणि त्याचे स्मरण राहणे, हा अस्तित्वातील एक भाग आहे आणि त्यातून येणारे विचार, भावना, वगैरे. ते गैर नाही, पण ते कायमही नाही. अहं भावनेतून गोष्टी जाणवतील, ते नुसते बघावे. म्हणल्या प्रमाणे, त्यात मानवी हेतू नसतो, म्हणून ते शांतीने बघावे, एवढेच अभिप्रेत आहे. 

हरि ओम.

श्री

 श्री 


प्रवासात बंदपणा नसतो. प्रवाहात आणि संबंधित गोष्टी जाणवत राहतात. मध्य भागी स्थिरता असल्यामुळे, त्या पार्श्वभूमीवर प्रवास आणि प्रवाह _जाणवतो_. म्हणजे जाणिवेत दोन गोष्टी सामील आहेत - स्थिरतेचे माध्यम आणि प्रवास/ हालचाली/ बदल. त्यातून जो काही अनुभव संक्रांत होत असतो तो. म्हणजे त्या ओघाने देखील स्मरण स्थिरतेचे आणि दृश्याचे असे दोन्ही सामील असतात. किंव्हा स्मरणात अनंत कार्य, सामूहिक अंग, संबंधित अंग, कौटुंबिक अंग, व्यक्तीक अंग अशा छटा असतात. आणि त्यामुळे मनाला आत आणि बाहेर ह्या दोन्ही गोष्टींची जाणीव असते. "मन" हे मध्य भागी उभे आहे. 

सांगण्याचे तात्पर्य हे, की वास्तुकलेत वरील दोन्ही गोष्टींचे अस्तित्व _आकार_ देण्यात प्रभाव आणतात. Transcendence or permanence *and* movement. कलाकृती करताना नजर दोन्ही ठिकाणी ठेवण्याची गरज असते, म्हणजेच पलीकडील संकल्पना आणि विशिष्ट स्थळ - काळ अशी चौकट, दोघांना dnyay देता येतो. 

बऱ्याच वेळेला, चर्चा "आत्ताची परिस्थिती आणि त्या अनुषंगाने कलाकृती" असे काहीसे वादातीत मुद्दे पुढे आणले जातात. पण हे विसरू नये की स्थिर तत्वाच्या आधारे ही चर्चा आधारलेली हवी. तरच योग्य किंव्हा अयोग्य ह्याचा भेद होऊ शकतो. 

म्हणून _आकार_ , ह्या संकल्पनेत दोन्ही गोष्टींचे समावेश होणे गरजेचे असते. मी, पर्यावरण, लोकं, प्रश्न, अर्थ, भिंती, खिडक्या, हालचाली, आकाश, वारा...ह्यांची रचना दोन्ही संकल्पनेवर आधारलेली हवी.

हरि ओम.

Monday, May 25, 2026

श्री

  

श्री 

 संवादाला महत्व असते नकळत. एक तर श्रद्धा असावी की जे काही होत आहेजे काही घडेलजे काही आपण करणार असतोजे काही ध्यानी येत राहतेते योग्य असते आणि आपल्या हितासाठी असते. मग त्यात चर्चाभेदशांत बसणेबदलसंबंधचिंता - सर्व काही त्यात येते. 

 गोष्टींच्या _होण्याला_, जो काही काळ अस्तित्व मागतोतो देणे गरजेचे असते. मग त्यात जन्म,मरणजीर्ण होणेप्रगतीबदल ह्या सर्व गोष्टी आल्या.  गोष्टींच्या हालचाली सूक्ष्मातून स्थूल स्थितीत _अवतरतराहतात आणि गडपही होत राहतात आणि हे कार्य भगवंताची शक्ती करते. म्हणून _हालचालीयोग्यच असतात आणि त्याच्या इच्छेने होत राहतात. 

 श्रद्धा वाढवावी प्रवासात. पुढे काय लिहून ठेवले आहेकाय होईलकसे होईलकाय देणे लागतेकुठे जायला लागतेकसा हेलपाटा पडू शकतो - सारे काही त्याच्या भरवसावर सोपवणे. आत्मसात होण्याच्या क्रियेला देखील देणे लागते अस्तित्वाला आणि ते द्यावे. 

 होणे - हे कार्य असते - ज्यात आपण फक्त देतो. ते बुद्धीवर निर्भर नसते - त्याच्याही पलीकडे स्थित असतेम्हणून होण्याच्या कार्यक्षमतेला भगवंताची शक्ती कारण ठरतेबुद्धी नाही. बुद्धीने जे काही संक्रांत होते (speculation), त्याच्याही पलीकडे अस्तित्व शक्ती कार्य करत राहते. एखादी गोष्ट होणेह्याला घाबरण्याचे काय कारण असतेआपली श्रद्धा किंव्हा शुद्ध जाणीव कमी पडते. म्हणून श्रद्धा वाढवणे. 

 हरि ओम.

 

 श्री 

 ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोण आहेकाय करतोकुठे जाणार असतोकाय वाटते वगैरे - हे कुणाला पटवण्यासाठी नसते. मी कुठून येतोहे मलाही ठाऊक नाहीतर त्या बद्दल अडून राहण्यात काय तथ्य असते?!! तरीही लोकं एकमेकांचे झिंझ्या उपटण्यात कमी करत नाही! 

 प्रवास कसा असतोहे पूर्णपणे माहित नाही. प्रवास म्हणजेच भगवंताने आखलेला किंव्हा त्याच्या इच्छेने संक्रांत होत राहणार. प्रत्यक्षात परिस्थिती येत राहते. तिला सामोरे जायला लागतेत्यात दुमत नाही. आपल्या ध्यानी गोष्टींचा प्रवाह स्थित असणार. 

 हरि ओम.

 

 Shree 

 Emphasis to solve a problem at any cost may  imply a disconnect with surrounding concerns or less faith in deriving lessons from what the environment seems to say. 

 Why does this happen?! Not very sure of this....I don't wish to assume a deterministic stance since it is quite useless and what's the harm in admitting and accepting that there are far subtle forces at play which can't be even known by a thought! 

 It is not for us to solve any problem. A problem is a creation of the mind and how it gets defined how it gets engaged with and what outcome comes from it. It is never ending. A problem is a fictional idea. 

 The journey that has been inherited includes many problems. But that needn't define us. The problem requires to be seen. It doesn't indicate that there has to be an answer or one should force oneself to find out one.

 Hari Om.

 

Friday, May 22, 2026

श्री

 श्री 


भगवंताचे चिंतन आणि परिस्थितीचा एकमेकांशी बौद्धिक संबंध किंव्हा हेतू सहित संबंध जोडू नये. हेतू म्हणला तर स्वतःची अहं वृत्ती दर्शनास येते आणि तिथे भगवंताचा भाव नसतो. 

म्हणून हेतू रहित, स्वार्थी न होता, देह बुद्धी नमवून भगवंताचे चिंतन करत राहावे. जेवढ्या वेळेला तशी मनोरचना होईल, तितक्या पटीने संस्कार आत खोल जात राहतील. म्हणून जितक्या वेळेला भगवंताचे नाम घेण्याची आठवण होईल आणि घेतले जाईल, त्याचा अर्थ की मन अंतर्मुख होत आहे. 

जाणीव शुद्ध होण्याची वरील प्रक्रिया ओळखावी. आपल्या पेक्षा रूप,आकार वेगळे नाही. जे काही आत असते, तेच हेतू घेऊन बाहेर रूप आणि आकार होते. The form of architecture is also a reflection of this. 

प्रश्न असा आहे, की रूपाला, आकाराला मुल्य देऊन जिवंतपणा कसा येतो? स्पंदनातून. आपल्या आतील भावातून. म्हणून जिवंतपणाचे मूळ आत असते. दुसरी गोष्ट ही, की सध्या जिवंतपणा म्हणजे रूप, आकार,संबंध, बदल, दिसणे, असे संस्कार त्यावर आपण बहार केले आहेत. पण वास्तविक जिवंतपणाचे स्तर असतात, आणि काही सूक्ष्म स्तरात आकार किंव्हा रूप जरी नसले, तरीही हालचाली किंव्हा कार्य होत असते आणि जिवंतपणाचा रंग तिथे निराळा ठरतो. किंबहुना रूप आणि आकाराच्या सूक्ष्म गुणांचा वावर त्या स्तरात होत असतो. 

म्हणून जिवंतपणेची सगळ्यात सूक्ष्म अवस्था म्हणजे अस्तित्व भाव किंवा स्वतः सिद्ध भाव किंव्हा शांती भाव. तिथे कुठल्याही गुणांचा लाग होत नाही. 

त्याची सुरुवात तिथे होण्याची म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.

Thursday, May 21, 2026

Shree

Shree 

You have to come to terms with movement, change, connections, memory - life and death. It is not a problem to be solved or controlled.

Or perhaps the idea of control is to realise the Truth. Realization is not a function, but an integral experience of awareness. 

It is a very deep level introspection. The journey of experiences or of perception is a mystery.

This journey may have its own concepts, engagements, pushes, pulls....one needn't comment on the _nature_ of journey. Journey is a given, inherited, passed on, continued.

Hari Om.


Shree 

Some people, even the one's who come to the inner orbit of your life, may not perhaps understand the depth of experience you are going through and the reasons for certain actions that would subsequently be undertaken. That's a journey we all undertake. Perhaps we look for reason, whereas the experience of Divinity is more important to realise than reason itself. 

Awareness or realization is not a function of reason. It should materialize independently. The phenomena are steps in that direction, not necessarily linear or lateral or circular or web. It is not our undertaking to say what should be or what shouldn't. 

All happens. 

Hari Om.

श्री

 श्री 


संवाद अनेक प्रकारचा असतो. काही गोष्टी खूप सूक्ष्म असल्यामुळे, शब्दात मांडणे कठीण जाते आणि ते मांडले, तरी त्यात सहजता राहणे कठीण. 

सांगण्याचा उद्देश काय हवा? कोडी सोडवणे हा उद्देश शेवटचा असायला हवा. सर्व भगवंत करतो, तर वासना त्यांनी दिल्या आहेत, तर तो दोष का मानावा आणि त्यातून समस्या सोडवण्याची जबाबदारी का उचलावी?! आपण स्वतःच्या किंव्हा इतरांच्या वृत्तीतून ठरत असतो का?! 

कसे वागावे किंव्हा बोलावे, ह्यात हेतू असला, तर त्याने कष्ट होऊ शकतात. हेतू असणार जीवनात, ह्याला नैसर्गिक जरी मानले, तरीही तो टप्पा किंव्हा परिस्थिती ओलांडावी लागण्याची गरज निर्माण व्हायला लागते. असे वाटायला हवे कधीतरी, की हेतूची गरज शांतीसाठी खरी नसते. 

म्हणजेच शांती स्वतः सिद्ध असते. परिस्थितीची बडबड करत राहणे, हे कितपत योग्य असते, ते ओळखावे.

हरि ओम.

Saturday, May 16, 2026

श्री

श्री 

स्वतःच्या अस्तित्वाला कारण लागत नाही. No justification required. अस्तित्व असतेच, त्यातून निर्मिती होते, संबंध होतात, स्मरण होते, चक्र होते, व्यवहार होत राहतात, आपण होतो, आणि परिवर्तित होतो सर्व स्थितीत. एखादी _गोष्ट_ अशी का होते, अशी का आली, अशी का बदलत राहील, ह्याने का चिंतीत व्हावे?! दृश्याचा स्वभाव "बदल" आहे, आणि दृश्याचा मूळ संबंध भगवंताशी आहे, म्हणून अस्तित्वात _पसरण आणि खोल_ अशा दोन्ही गोष्टी आढळून येत राहतात. ह्या सर्वातून _प्रवास_ असतो स्वतःचा.  विचारांच्या धारा आणि चक्र दररोजची गोष्ट आहे. त्याकडे बघण्याची कला साधली हवी. 

स्वतःला काय वाटतं, ही बाब स्वतः सिद्ध आहे आणि त्यासाठी खरे पाहिले तर स्पष्टीकरणेची जरुरी नसते. आपण हेतू लावतो विचारातून आणि परिणाम भोगतो आणि त्यात गुंतून राहतो - हा दिव्य भाव जाणवायला हवा. दृश्याचे _संस्कार_ मनात आणल्यामुळे तात्पुरतेपण, अहं भाव, स्मरण, गुंतागुंती, धावपळ, भीती, अशा भावना प्रस्थापित केल्या जातात, ज्याच्याशी आपण आसक्ती धरतो. 

Dnyanatun जर हेतूच बळावला, तर ते व्यर्थ ठरू शकतं. काही मिळवण्यासाठी, काम करण्यासाठी, जगण्यासाठी, "हेतू" कसा असावा, ह्याकडे लक्ष द्यावे. आणि तरीही भगवंताला सर्व अर्पण करत राहावे.

हरि ओम.