Thursday, March 12, 2026

श्री

 

श्री 

 

बदल...हा भाव असतो अनुभवात निर्माण होणारा...जो प्रकट होतो, साखळी दर्शवतो, संबंध जोडतो, परिवर्तित होतो, चक्रात राहतो. 

 

ह्या भावनेला शांतपणे स्वीकारावे. म्हणजेच की ह्या हालचालींचे बीज कुठे असते आणि कसे कार्य करते, हे स्वीकारावे शांतीने. 

 

त्या सूक्ष्म हालचालींचे बीज मोठे झाल्यावर "प्रपंच" नावाचे झाड होते ज्याचे फळे स्वतःला पचनी करायला लागतात. थोडक्यात जसे बीज, तसे झाड, तशी फळे, तसा परिणाम. 

 

सांगण्याचे तात्पर्य एवढेच की बदल हा गूढ भाव अस्तित्वाच्या कार्यात आढळून येतो. तो का असतो माहीत नाही मला. तो स्वीकारणे एवढेच आपल्या हातात असते. _माहीत नसल्या गोष्टी तरीही गोष्टींचा स्वभाव संपूर्ण स्वीकारण्याची ताकद आपल्यात असते_. ही जाणीव अत्यंत महत्त्वाची आहे असे मला वाटते विचार करत असताना. आपण इथे कसे आलो, का आलो, कुठे जाणार, का जाणार, कसे जाणार, संबंध कसे होतात, नाती का होतात, ह्याचे उत्तरे मिळाले नसले तरीही माणूस समाधानी राहू शकतो. हे शक्य आहे. विचार करावे, पण मनाची वळवळ करून घेण्याची गरज नाही. विचार कुतुहलपोटी करावे, त्यातून सिद्ध होण्याची भावना प्रकट होऊ देऊ नये...त्या भावनेशी संपर्कात असू नये. 

 

इथे असे जाणवते की विचार शक्ती ही भावना ही प्रकट करते आणि प्रज्वलित ठेवते. विचारातून भावना चक्र आणि भावनेतून विचार चक्र असा संबंध असतो. पाहिले कोण आणि नंतर कोण अशा कोड्यात पडण्याची जरुरी नाही. त्यात आपण पडतो कारण अशी अपेक्षा असते की मूळ कळले, तर त्यातून सर्व गोष्टींचा ताबा मिळवणे सोपे जाईल. ही अपेक्षा चुकीची असते असे म्हणत नाही मी, पण ती सदोष असते, त्या अपेक्षेला मर्यादा येते. 

 

समजून घेण्यापुरती सूक्ष्म काय आणि स्थूल काय असे विश्लेषण असते. पण ती रेघ नाही हुकूम सोडवण्यासाठी. तिला संपूर्ण स्वीकारून मार्ग पत्करला जातो. ह्यातून शांती भाव संक्रांत होऊ पाहते. 

 

मनुष्याने प्रगतीचा अर्थ म्हणजे वासनेवर ताबा मिळवणे असा केला आहे. त्यातून भली मोठी भीती भावना निर्माण होते. विघटित झाल्यामुळे, खूप वेगात गेल्या मुळे आणि एकलकोंडी झाल्यामुळे, जे निर्माण झालेले दिसते, ते म्हणजे exploitation of every moment to an unimaginable extreme level. कितीही केले तरी पूर्ण समाधान मिळणार नाही, जो पर्यंत आपण संपूर्ण स्वतःला भगवंताला शरण जाणार नाही. 

 

भगवंत गूढ आहे आणि तो रूप, आकार, संबंध ह्या सर्व हालचालींच्या पलीकडे त्याचे कार्य असते. कार्याचा निश्चित परिणाम प्रपंचात होतो. तो आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण चिंतेत राहतो. भगवंत आहे, तर हालचाली होणारच आणि वाट्याला प्रपंच तो येणारच आणि त्यातील सर्व प्रश्न ओघाने निर्माण होणारच आणि त्यातून शोध आणि पुढे मार्ग आणि शेवटी शांती भाव असे संक्रांत होणारच. ह्या सर्व गोष्टीला "अंतर्मुख होणे" असे म्हणतात. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अनुभव प्रत्येकाचा निराळा असतो. भगवंत त्यातून शोधायचा असतो. पूर्वी ह्या पद्धतीने भगवंत किंव्हा कुठलीही शुद्ध संकल्पना कळली, तरीही आता तशीच कळून घ्यायला हवी, हे कितपत योग्य असते? संकल्पना हा संबंध दर्शवतो. आपल्या मनोरचने प्रमाणे त्याच्या संबंधात आपण येतो, त्याला विषय करतो, व्यवहारात लागू करतो आणि साहजिकच परिणाम भोगतो. म्हणजे कुठलीही संकल्पना तसे सत्याचे दर्शन त्वरित करून देऊ शकत नाही. 

 

संकल्पना सत्याची स्वतः मध्ये शोधायला लागते आणि त्यातून मार्ग प्रत्येकाचा ठरतो. तो सांगणे अवघड, फार तर फार लवचिक आराखडा किंव्हा विश्लेषण करून सांगू शकू आपण. खरे पहिले तर जीवन तसेच समजून घ्यायला लागते आणि इतरांना तसेच अनुभव मांडून द्यायला लागतात - विश्लेषण रूपातून. It isn't prescriptive. It is symbolic. 

 

त्या अर्थाने आयुष्य विश्लेषण रूपाचे कोड आहे. म्हणजे कोडी त्रास देणार नाहीत विशेष. आपले येणे, वावरणे, विलीन होणे - हे सर्व विश्लेषण आहे. म्हणजे कार्य आहे. कार्याचा परिणाम म्हणजे दृश्याचे स्थान. 

 

हरि ओम.

 

श्री 

 

बुद्धी जर - तर च्या भाषेत प्रस्थापित असते. म्हणजे साखळीचे स्वरूप काय, उगम कसा होतो, मार्ग कोणता, परिणाम कसा होईल वगैरे हे बुद्धीचे मुख्य प्रश्न. 

 

अध्यात्म मध्ये ह्याची जरूरी असते, पण त्याच्या व्यतिरिक्त श्रद्धा भाव वाढवण्याचीही असते. म्हणजे साखळी जरी कळली नाही, तरी अस्तित्व शक्तीचे कार्य स्वीकारू शकतो आपण. म्हणजे सूक्ष्म स्थिती आणि शांती भाव आणि आपुलकी प्रस्थापित होऊ शकते. त्यासाठी एखादा _मार्ग_ पत्करायचा असतो.

 

अर्थातच सर्व सत्य आत्ताच्या स्थितीत स्पष्ट होणे कठीण. मग आपल्याकडे दोन पर्याय असतात ह्याचे - कळले नाही तर "भीती" निर्माण करावी, ताबा मिळवावे, विषय करावे, ओरबाडून घेणे हे सर्व करावे की श्रद्धा वाढवून न  कळण्याचे स्वीकार करावे (कारण कळणे किंवा न कळणे हे अस्तित्वात घडते/ त्याने अस्तित्व माध्यम ठरत नाही वगैरे), सूक्ष्म माध्यम कार्याचे स्थान स्वीकारणे आणि आपल्या हातात प्रयत्न, सैय्यम, श्रद्धा अशा गोष्टी वाढवत राहणे. थोडक्यात दृश्याचा अनुभव जरी येत असला तरी त्याच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

आपण ह्या पद्धतीनेही प्रकार काय होतो हे समजून घेऊया...

 

शांती एकच सूक्ष्म, कायम आणि सत्य माध्यम अस्तित्वात असते. त्यात विघटन होऊन, क्रिया होऊन, स्पंदनेतून वासना, विचार, भावना चक्र निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणजे वेगळे स्मरण आणि द्वैत अनुभव त्या जीवाच्या (आपल्या) ध्यानी येतो. म्हणजे चौकट, मर्यादा अशी निर्माण होते स्वतःच्या भोवती आणि त्यात आपण गुंतून राहतो. 

 

सर्वांगीण विचार किंव्हा जाणीव असणे आणि फक्त वैयक्तिक जाणीव होणे ह्यात अवतरणे, विघटन, तात्पुरतेपण, स्वार्थ, अहं वृत्ती अशा गोष्टींचे फरक होते ह्या दोन स्थितीत. म्हणून वैयक्तिक होणे स्वतःलाच जास्त त्रास देते, भीती निर्माण करते, कष्ट देते, जास्त मर्यादित किंव्हा तात्पुरते बनवते आणि तसेच विचार चक्र आणि भावना चक्र प्रज्वलित ठेवते. 

 

अध्यात्माच्या पातळीवर, असे सांगतात की जीव इतका मर्यादित होतो, की विचार, भावना, देह ह्या वासनेमुळे तो कष्टी होतो. प्रारब्ध. त्याला दृश्याचे व्यसन लागते आणि कितीही सत्य त्याला सांगितले, तरीही त्याला पटत नाही , त्याला भीती वाटते आणि त्यापासून तो दूर जातो आणि खूप बडबड करून स्वतःचे समर्थन करतो. म्हणून सत्य सांगणे हा मुद्दा नाही. त्याचा योग्य परिणाम इतरांवर होईल का, हा आहे. त्यासाठी आपण कार्य करावे, प्रयत्न करावे आणि शांतीने सोडून द्यावे. 

 

तसंच , जाणीव जर सूक्ष्म झाल्या असतील, तर त्या सूक्ष्मपणांचे स्पंदने इतरां पर्यंत सांगणे कठीण. म्हणजे दृश्यात व्यवहार करताना, सैय्यम ठेवायला लागतो आणि आपण शांत राहायला लागते. त्या पद्धतीने शांत असण्याचा आणि दृश्यात व्यवहार करण्याचा संबंध सरळ नाही, गूढ आहे आणि हे गुढत्व देखील सांगणे कठीण. जर ते कविता सारखे किंव्हा विश्लेषण पद्धतीने सांगितले तर ठीक असते. थोडक्यात सर्व लवचिक आणि विश्लेषण पद्धतीने समजून घ्यावे, ऐकून घ्यावे, समजून देणे. 

 

विश्लेषण मध्ये प्रयत्न आणि सैय्यम आणि श्रद्धा आपली, परिणाम किंव्हा फळ भगवंताचे जे आपण शांतीने स्वीकारू. Because the connection or relationship of a cause with an effect is mysterious beyond any plain logic. Here "logic" is not math or the intellect, but a way of sequencing or relating things based on inner wisdom. More subtle is the state of mind, more profound is the logic of awareness of things. Logic after all, is a relationship of all things in different states of being. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

वरील लेखाचे बरेच अर्थ निघून येतात दृश्यात वावरताना...

 

गोष्टींचा हेतू काय असतो आणि कुठले हेतू ठेवून त्या केल्या जातात हे ओळखावे. जर अहं भाव असेल, ह्याचा अर्थ आपण कोषात आहोत. जर अहं भाव नसेल, त्याचा अर्थ की सर्वांगीण विचार मनात येऊ घातले आहेत. 

 

मनाच्या स्वभावामुळे आपण गोष्टींचे "अर्थ" लावतो. मुद्दामून त्रास होण्यासाठी जर गोष्टी वाट्याला येत असतील (असा समज करून घेतला असेल), तर आपण संकुचित आहोत. जर असे खरे वाटत असले की सर्व गोष्टी भगवंतामुळे, त्याच्या इच्छेमुळे आपल्या ध्यानी येत असतात, तर समजून घ्यावे की मन शांत झालं आहे. म्हणून अर्थाने भाव शांत किंव्हा अशांत ठरतो, त्या गोष्टीमुळे नाही. ह्याचा अर्थ हा की नातींचे स्वरूप, कामाचे स्वरूप, जीवनाचे स्वरूप कसेही जरी आले किंव्हा बदलत गेले, तरीही त्याच्या पाठीमागचा अर्थ असा आपण जाणिवेत आणू शकतो, की त्यातून शांती रस लाभू शकेल. 

 

देहबुद्धिशी संबंधित विचार आणले, तर खूप तात्पुरतेपण आणि भीती भावना निर्माण होईल. आत्मबुद्धीशी निगडित विचार ध्यानी आणले, तर शांती भाव संक्रांत होऊ शकेल. 

 

सत्याचे कार्य निश्चित असते. पण ते आपल्या मर्यादेच्या भूमिकेतून जाणिवेत आणायला लागते...इथे प्रयत्न, सैय्यम आणि परीवर्तन होण्याचा इशारा आहे.

 

जेवढी मर्यादा जास्त, तितके अनेक विषय, अनेक कोडे, अनेक प्रकारचे गुंतून राहणे दृश्यात, अनेक धावपळी, अनेक अपेक्षा, स्थळ आणि काळाची भीती वगैरे. जेवढी जाणीव विशाल, तितक्या कमी धावपळी, कमी कोडी, कमी अट्टाहास, कमी अपेक्षा, जास्ती तृप्तता, जास्त स्वीकार होण्याकडे प्रवृत्ती, जास्ती आपुलकी वगैरे. 

 

जेवढी जास्त मर्यादा, तेवढा बहिर्मुखपणा जास्ती, तेवढे इतरांमध्ये दोष शोधण्याचा अट्टाहास आणि इतरांना नावे ठेवण्याकडे कल. जेवढी विशाल मनोरचना, तितके अंतर्मुख होण्याकडे कल, अट्टाहास कमी, स्वतःचा दोष काढण्याकडे कल, इतरांचा स्वच्छ भावनेने स्वीकार वगैरे. 

 

तात्पर्य - आतील वृत्ती हा विषय समजू नये. सर्व स्थिती, स्तर, संबंध भगवंताने दिले आहे, हे ओळखणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही विचार....

 

क्रियेतून किंवा त्वरित करून किंव्हा प्रश्न विचारून सिद्यत्व होते का? जर मूळ सवाल काय आहे हे ओळखता आले, तर सर्व कार्य म्हणू शकू आपण. त्या कार्यात आपण होणे, शोध, प्रश्न - सर्व काही येते.

 

सारे गोष्टीना प्रवाह, परिवर्तन, अमर्याद, शांती भाव असे स्वरूपात बघणे शक्य असते. गोष्टी म्हणून त्या अर्थाने खऱ्या किंव्हा जीवाशी संबंधित नसतात, ते भगवंताच्या कार्यातून येत राहतात. गोष्टींच्या प्रवाहात मी आणि भगवत भाव ह्याचे मिश्रण असते. 

 

ह्याने असेही कळून येते, की मन काहीही निर्माण करू शकते. निर्मिती मध्ये प्रतिभा, प्रक्रिया, स्मरण, भाव, साखळी, गुंतून राहणे हे सर्व काही आले. स्वतःला निर्मिती पेक्षा वेगळ बघायला हवे. म्हणजे निर्मितीतून मी ठरत नसतो. _मी_ ही संकल्पना असते, जी होते आणि बदलत राहते. 

 

भगवंताच्या इच्छेपोटी, तो स्वतः द्वैत दृश्यात येतो, विघटित होतो, सर्वां मध्ये येतो आणि आपल्या रूपात मिसळतो. म्हणजे त्याला दृश्याचा अनुभव घ्यायचा असतो आणि म्हणून तसे अनुभव निर्माण करतो, त्याच्या लीला मधून. संसाराला त्या पद्धतीने किंव्हा त्या भावनेने ओळखावे. 

 

आपल्या कार्याला अमर्याद, निरहेतू, स्वच्छ रंग असावा. प्रत्येक क्षण कार्य आहे. त्यातील येणारे विचार, भावना, क्रिया, वस्तू, नाती, विषय - सर्वांना अमर्यादित भूमिकेतून बघावे, देहाच्या आणि रूपाच्याही पलीकडे जाऊन ओळखावे. 

 

Transcendence is a flow. It is not a proof or a stop point. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही विचार...

 

सर्व बदल, स्थळ, काळ, परिस्थिती अनुभवणे. ते थांबवण्याची गरज नाही आणि तिथे गुंतून राहण्याची गरज नाही. प्रत्येक क्षणात, स्थळात, काळात काहीतरी करायलाच हवे, असे नसते. नुसते ध्यान, चिंतन, स्वस्थ बसून राहिले, तरीही खूप फरक होतो अस्तित्वात, जो जीवातून सर्वांगीण दिशा पसरलेला असतो. That is, I am not bound to anything or by anything. I am beyond all constructs, beyond all barriers, all spaces, all times, all actions, all connections. None of these define me or I identify particularly with none. थोडक्यात, मर्यादित हेतूच्या पलीकडे भाव स्थिर असणे. 

 

स्वस्थता ह्या विचारातून किंव्हा जाणिवेतून येते. मला काहीही माहित नाही, आणि त्यात समाधान आहे. मनाच्या व्यतिरिक्त कार्य असते, हे असण्यात आणि ओळखण्यात आणि स्वीकारण्यात समाधान असते. 

 

आपण परिस्थितीला पुरून उरत नाही. कोण काय म्हणते आहे, कधी, का, कुठल्या हेतूने, हे माहित नसले तरी आपली शांती त्यावर निर्भर नसते. शांती कशावरही निर्भर नाही. मी विलीन होऊन शांती लाभते. म्हणून विलीन होण्याच्या मार्गात आलेल्या अवस्था ह्यांना शांतीने सामोरे जाणे.

 

हरि ओम.

 


Friday, March 06, 2026

श्री

श्री 

काही विचार...

सर्व सत्य विचारांपासून सुरुवात व्हायला लागते असे नाही. म्हणजे बऱ्याच रूपातून जाणीव शुद्ध होऊ शकते. फक्त त्याला विचाराची जोड मिळाली की त्यात संबंध, कार्य भाव, प्रयास, सैय्यम, श्रद्धा, विघटन, चक्राच्या सरुपाची जाणीव, बदल, परिणाम, भोग, सामोरे जाणे, शरण जाणे, स्वीकारणे - अशा गोष्टी ध्यानात येऊ शकतात. म्हणून त्या अर्थी विचार महत्वाचा, म्हणजे अनुभवांना योग्य दिशा मिळू शकते (thoughts need to be complimentary or supporting to the realization of Truth). 

त्या अर्थाने शंका किंव्हा प्रश्न ध्यानात येणे ह्याचे योग्य स्थान असते. विचार आणि शंका नको, असे म्हणणे वेडेपणा असते. फक्त शंकेने व्याकुळ होण्याची गरज नाही किंव्हा तात्पुरते व्याकुळ झाल्यावर, जो शोध होऊ पाहतो, त्यातून श्रद्धा भाव आणि शांती मध्ये परिवर्तित होणे गरजेचे आहे आणि जेवढा जास्ती जास्त शांती भावात स्थित होऊ शकू, तितके हिताचे ठरते. त्या अर्थाने सर्व अनुभव स्वीकारावे. स्वीकार त्वरित होईल की नाही, हे सांगणे अवघड असते. स्वीकार होण्यासाठीचा मार्ग असा की कर्तव्य करावे, श्रद्धा वाढवणे. कधी कधी कटू क्षण स्वीकार करायला वेळ लागू शकतो, म्हणून सैय्यम ठेवावा. सैय्यम वाढवायला नामाचे सतत चिंतन कायम ठेवावे. कायम. काहीही झालं तरी नाम घेणे सोडू नये. परिस्थिती बदलतच असते. प्रारब्ध असते अनुभवात. प्रारब्ध म्हणजे प्रकृतीच्या परिणामांना सामोरे जात राहणे. त्यात स्थिर राहणे अत्यंत गरजेचे असते. ह्यात दुमत नाही. 

विचारातून अस्तित्वाची व्याख्या आणि भावना स्थित होतात. देह भाव आणि भावना (तात्पुरतेपण, भीती, चिंता, कष्ट) अशा प्रकट होत राहतात. नजर मर्यादित राहते. अंतर्मुख होताना तोच भाव आत्मस्वरूपाचा होतो, सर्वांगीण होतो, सूक्ष्म होतो आणि म्हणून भावनेत परिवर्तन होत शांती भाव प्रस्थापित होते, स्मरण विलीन होते, अदृश्य माध्यमात स्थित व्हायला होते. 

हरि ओम.


श्री 

भावनेने गोष्टी कळतात. भावना एक रूप असते. कदाचित सर्व साखळीच्या कार्यातून, रूपातून, वृत्ती प्रामुख्याने भावनेला धरून राहते. त्यातून संबंधांचे स्वरूप, अपेक्षा, मर्यादा, भोग, परिणाम अशा गोष्टी झेलायला लागतात. मग हे टाळता येते का? जे चक्र भावना निर्माण करते, ते थांबवता येते का?..

माझ्या मते, प्रत्येक रूपाचे स्थान असते, आतील सर्व गोष्टींचे स्थान असते ज्यामुळे मी होतो. स्थान असते, म्हणजे तक्रार न करून घेता, जे आहे ते स्वीकारणे आणि देत रहाणे. हे सुद्धा सिद्ध होण्यासाठी नाही, तर शांती भाव प्रस्थापित होऊ देणे. सर्व देण्याने शांती भाव गवसत असेल, तर तसे का होऊ देऊ नये?!

हरि ओम.


श्री 

अंतर्मुख होण्याचे मार्ग विविध असावेत. ते सांगता येतील असेही नाही. पण ते सांगितले नाही, तरी ती प्रक्रिया होऊ देण्याची परवानगी स्वतःला द्यावी लागते निश्चित. 

अंतर्मुख होण्यासाठी स्वतःवर खूप श्रद्धा ठेवावी लागते, म्हणजे त्या ओघाने परिस्थितीवर, अस्तित्वाच्या कार्यावर. आपण कोण आहोत, ह्या प्रश्नावर श्रद्धा ठेवत, कर्तव्य करत राहायला लागते. 

हरि ओम.

श्री

 श्री 


रूप, स्मरण - ह्यांच्या _हालचाली_ असतात. हालचाली स्थित होणे आणि त्याचे कार्य काय असते आणि कसे होते, हे संपूर्ण भगवंताच्या शक्तीमुळे प्रस्थापित होते. त्याला विघटन, स्तर, चक्र, वासना, साखळी, प्रकृती, गुण असे निरनिराळे नावे दिलेली आहेत ज्यांच्यामुळे "आपण" हा भाव होतो आणि व्यवहार करतो. 

थोडक्यात जीवाचा भाव बहिर्मुख असतो आणि दृश्याच्या अनुभवाशी संपर्कात येतो. त्यामुळे होणारे परिणाम, विचार चक्र, भावना चक्र, भोग, वगैरे..

आपल्यासाठी भगवंताचे अस्तित्व स्वतःच्या अनुभवातून ओळखायचे असते. ते अस्तित्व एकदा ध्यानी येऊ घातले, की शांती रस स्थित होते, समाधान प्राप्त होते. हा विषय नाही, किंव्हा पळवाट नाही प्रपंचातून. प्रपंचाचा स्वभाव काय आहे, हे जाणून घेण्याचे माध्यम आहे. प्रपंच कोण करतो आणि त्यात माझा काय संबंध - ह्या प्रश्नांचा समाधानकारक उत्तरांचा शोध असतो. शोध होणे स्वतःच्या अस्तित्वाचा, हे जीवाच्या शक्तीतच रुजलेले असते म्हणून तसे अनुभवाचे स्वरूप असते ज्यात सगळ्यांना सामोरे जायला लागते आणि प्रत्येक क्षण स्वीकारावे लागतो.

हरि ओम.

Shree

Shree 

Loss of identity or the definition of identity perhaps seems to be the central theme of humanity. Is it fluid or changing or fixed or rooted or abstract or relative or connected or collective or individual?..

Inquiry is a fundamental part of this process and the search that follows is uniquely a human trait. 

The search may go to origins, fundamentals, truths, values, subtle things and so on. I think that "origin" doesn't mean to go backward or to any former roots, as much as it is to discover the fundamentals in any situation that one is encountering "at that moment". This may be a required learning process for us to evolve as something much more noble than to react as any ordinary human being. 

The "hut" is referred, at times, as the origin of architecture (among other types), from where everything else seems to have sprung up. Now the problem with this idea is when one links "origin" to a "formal idea or a form driven idea". That's an error.

I think the idea of a form of the hut is required to be understood as a way of perceiving and relating to life. The hut, may convey an approach of values, ideas, engagements, actions, relations, existence, and so on. Now if this relationship feels fascinating for our current situation, then one can reimagine this relationship in any new architectural situation, isn't it?...

Students use the word "reimagine" quite loosely. As if it were some sort of a switch or a magic wand of transformation. I beg to differ here. Reimagination could become a personally painful process to realize the fundamentals. The best reimagination probably occurs unknowingly by a person without any talk of the same. 

Therefore the situation is what it is. How one infers or ponders on it becomes crucial. 

Hari Om.


श्री 

मला प्रश्न असतात. प्रश्न येऊ नये, असे कदाचित इतरांना वाटू शकेल, पण त्या इतरांच्या अपेक्षाकडे कसे बघावे, हे माझ्या हातात असतेच असते. प्रश्न काही न्यूनगंड दर्शवत नाही, किंव्हा अर्धवटपणा किंव्हा त्रास. हे इतरांची समज असते. त्या समजुतीतून स्वतःला का जोडावे?! 

प्रश्न पाहिजे तेव्हा येतील, कुठल्याही स्वरूपात येतील, कुणालाही येतील, कधीही येतील, कुठेही येतील, केव्हाही येतील. हा नैसर्गिक परिवर्तन होण्याचा गुण आहे. 

प्रश्नांचे उत्तर कालांतराने मिळतील निश्चित. आपण सैय्यम ठेवावे. सैय्यम म्हणजे कोडी उलगडण्यावरील श्रद्धा. 

ह्यातून आणखीन काही गोष्टी उलगडतात, जसे की...

कुठलाही क्षण तात्पुरता असतो. म्हणजे तो येतो, बदलतो ani निघून जातो. आपण, आपले निर्णय हे सर्व काळाच्या ओघात विलीन होत राहतात आणि हे मान्य असावे. त्यामुळे आपण शांत होतो. 

सामोरे जाणे. कारण प्रत्येक क्षणातून एक गूढ संबंध कळून येतो. असे अनेक गूढ संबंध साठवले, तर संपूर्ण आयुष्य गूढ आहे, हे ओळखता येईल. 

कप्प्यांचा खूप घातक परिणाम होतो स्वतःवर. ते ओळखून, सतत संपर्कात राहणे हे कधीही हितकारक असते. हिताचे असले, तरीही त्याचे महत्व त्वरित कळतेच असे नाही. ते कालांतराने कळेल. संपर्कात किंवा सहवासात अडचणी यावेत. तरीही ते शांतीने सामोरे जाऊन मार्ग आत्मसात करत रहावा. त्यातून सर्व जीवांचा गूढ भाव (जो आपल्यातही असतो) हे ओळखता येईल आणि तोच खरा संबंधाचा रंग असतो. 

ह्या प्रवासात श्रद्धा बळवंत होणे अभिप्रेत आहे. श्रद्धा काही वेगळी वस्तू नाही. ती आत परिवर्तन घडवणारी क्रिया समजावी. 

हरि ओम.

Wednesday, March 04, 2026

Shree

 

Shree 

 

 *विचार* -  हे स्थळ, काळ, रूप, आकार ह्यांच्याशी मर्यादित *नसतात*. वरील गोष्टी निमित्त ठरतात विचाराला मर्यादित होण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी, हालचाली घडवण्यासाठी, परिणाम देण्यासाठी, परिस्थिती उद्भवण्यासाठी वगैरे. 

 

ह्याचा अर्थ, परिस्थितीतून स्वतःचे मुल्य ठरवू नये आणि अस्तित्वाचा भाव बदलण्याची शक्ती आपल्यात असते. थोडक्यात विचारातून आपण कुठल्याही रूपाचे संबंध निर्माण करू शकतो आणि निर्मिती करण्याचे मुख्य श्रेय भगवंताला सोपवावे. 

 

अजून एक अर्थ जो निघून येतो, तो हा की विचाराची साथ आपण ठरवू शकतो. म्हणजे चांगले विचार कुठल्याही स्थळ, काळातून स्वतःच्या देह बुद्धीत सामावून घेऊ शकतो आणि त्यामुळे स्मरणात परिवर्तन आणू शकतो. विचारातून आपण एका नव्या शिखरावर (imagination) अनुभव आपण घेऊ शकतो. 

 

विचारांवर श्रद्धा ठेवावी.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

 *मर्यादा* येणे, म्हणजे हालचाली जाणवणे, बदल जाणवणे, स्थळ, काळ, परिस्थिती, भाव, स्मरण, विचार, भावना जाणवणे. 

 

एकदा जन्म घेतला, म्हणजे मर्यादेत आपण आलो, असे ओळखावे. मर्यादेचा दुसरा अर्थ म्हणजे प्रकृतीचे गुण, परिणाम, चक्रात राहणारे व्यवहार आणि त्यातून घडणारे दृश्य. 

 

भगवंत मर्यादेच्या भाषेतून संक्रांत करायचा असतो. म्हणून वासनाविचार, भावना, देह - ह्या टप्प्यातून पलीकडे जायला लागतं, शांत व्हायला लागतं आणि भगवत भाव संक्रांत करायला लागतो. 

 

नात्यांचे नावे, काम, परिस्थिती हे निमित्त समजावे प्रवासातील असणारे. मी निमित्त आहे. काय सांगणे असते, ऐकणे असते, दिसणे असते, सुवास घेणे असते, चव घेणे असते ते फक्त _निमित्त_ म्हणून ओळखावे. बाकी सर्व आपण देणेच लागतो. 

 

बसणे, काहीही न बोलणे, कधी कधी सांगणे, जवळ येणे, एकांतात बसणे, बरोबरीने खाणे, हसणे, थांबणे, सैय्यम ठेवणे, बदल बघत राहणे, प्रतिक्रिया न देणे, अट्टाहास न धरणे, हेतू नसणे, फक्त असणे - हे सर्व गूढ असते. 

 

सर्व भगवंत करतो, ह्यात दुमत नाही. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अस्तित्वाचे कार्य आणि त्यातून होणाऱ्या गुंतलेल्या स्थिती, स्मरण, भाव, परिणाम असा एक अभ्यास आहे. त्यात प्रकृती, गुण, हालचाली, गती, बदल आणि त्यातून "मी" कसा होतो हे विषय आहेत. ह्या सर्व गोष्टींना अवतरणे असे म्हणतात किंव्हा भगवंताचे विस्मरण (आपल्या पार्श्वभूमीवरून) किंव्हा सिद्ध होत राहणे, अहं वृत्ती प्रज्वलित ठेवणे, कोडी सोडवण्यात गुंतून राहणे अशा गोष्टींचा उल्लेख सापडतो. मग त्यात अनुभव आणि द्वैताचा पसारा ह्या गोष्टींचा उल्लेख होतो. धडपड, काळजी, त्रास, राग, कष्ट अशा गोष्टी वाट्याला येत राहतात. 

 

मग प्रश्न पडायला लागतो की - ह्यातून "मार्ग" तो कोणता?!! हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे ओळखायला हवे की वरील कार्य जरी मनाला "कळून घेता आले", तरीही भगवंत होण्याचा "अनुभव" हा प्रकार गूढ आहे! If above things indicate additions or layering, then bliss is NOT the reverse...i.e. it is NOT subtraction or removal of layers. 

 

इथे मग, सुरुवात मानवी भूमिकेतून करायला लागते - म्हणजे प्रयत्न, सैय्यम आणि श्रद्धेची भाषा. त्याला *योग* म्हणतात. ते सातत्याने केल्याने अधिकाधिक सूक्ष्म स्थिती अनुभवास संक्रांत होत राहतात, ज्याला आत्मसात करणे, स्वीकार करणे, सामोरे जाणे आले. म्हणून निश्चय होणे महत्वाचा ठरतो. म्हणून प्रारब्ध कसेही आले, तरी त्यात दोष न शोधता, मार्गावर रहावे. त्याचा परिणाम म्हणजे शांती प्रस्थापित होणे...म्हणजेच भगवंताचे दर्शन होणे. ह्याला अंतर्मुख होणे असेही संबोधले आहे. 

 

एका वाक्यात सांगायचे झाले तर मानवी भूमिकेतून कर्तव्य करत राहावे किंव्हा देत रहाणे. फळ भगवंताच्या इच्छेने येते कारण ते अस्तित्वाचे कार्य आहे. जिथे कर्तव्य आणि फळ एकाच ठिकाणी मिळतात, त्याला भगवंताची कृपा म्हणायची. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

मनुष्य असा जीव आहे (रूप आणि आकार), की त्यात त्याला भगवंताची जाणीव आणि कार्याची व्याख्या कळून घेता येऊ शकते त्याच्या स्मरणेच्या रचनेतून. म्हणजेच अनुभव "दुहेरी" किंव्हा आतून ते बाहेर असे सर्वांगीण पसरत असते, प्रवाह असते, द्वैत असते, संबंधित असते, परिणाम करत राहते, हे तो ओळखून घेऊ शकतो....त्यातून *मार्ग* पत्करला जातो भगवंताचे दर्शन होण्यासाठी. 

 

मार्ग असा की त्यातून परिणाम आत आणि बाहेर होणे अभिप्रेत आहे. दोघांचीही भाषा आणि पार्श्वभूमी वेगळी असते, म्हणून मार्ग त्यातील संबंध स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. 

 

संबंध दोन प्रकारचे असतात. एक संबंध म्हणजे दृश्यात अनेक रूप, आकार आणि माझा संबंध जो गुणांमुळे होतो, वृत्तीमुळे प्रज्वलित राहतो, तशी परिस्थिती आणतो आणि त्यात गुंतवून ठेवतो. त्याला मूळ कारण प्रकृती आहे. दुसरा संबंध जो असतो, तो भगवंत अस्तित्वाचा आणि मनाचा असतो...म्हणजे जाणिवेच्या स्थितीचा आणि त्यातून शुद्ध कसे व्हावे हा मूळ प्रश्न असतो. मार्ग पत्करून ज्या स्थिती येऊ पाहतात, ते आत्मसात करून, सूक्ष्म होऊन शेवटी सत्यात विलीन होणे अभिप्रेत असते. तिथे स्वतःचेही भान राहत नाही, तर दृश्याचे काय राहणार?! 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

वरील लेखातून हा मर्म घ्यावा की भगवंताचे कार्य हा प्रकार गूढ असतो आणि त्यात शक्तीचा परिणाम असा असतो की सत्याला कायम ठेवून अनेकात शांती भाव विघटित केली गेली असते, म्हणून तसे स्मरण, स्वभाव, रूप, क्रिया, कोडी, प्रश्न, भावना वगैरे. 

 

जे _कार्य भगवंताच्या पार्श्वभूमीवरून आणि भावातून होत असते, तेच कार्य आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने जाणवते आणि परिणाम करत राहते._ हाच अस्तित्वाचा सवाल आहे आणि आलेले सर्व अनुभव ह्यातूनच घडत राहतात. 

 

म्हणून व्यवहारात प्रयत्न, सैय्यम आणि श्रद्धेचे स्थान खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे भगवत स्वरूप मन होत जाते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

विचारांचा प्रभाव बहिर्मुख पडतो, तात्पुरता असतो, वेगळेपण दाखवतो, सिद्ध करायला लावतो, अनंत रूप आणि आकार आणि त्यातील संबंध दर्शवतो, व्यवहार करायला लावतो, चक्रात गुंतून ठेवतो, भावनांचे प्रकार देतो, अस्थिर ठेवतो, परावलंबित ठेवतो, वगैरे. 

 

प्रश्न किंव्हा आतील स्थिती दृश्याला सांगून समाधान होत नाही. मुळात समाधान भाव परावलंबित राहून येत नाही. आपण किती परावलंबित असतो, ह्याचे ७ स्तर असतात आणि ते सर्व स्तर म्हणजे अंतर्मुख होण्याची क्रिया दर्शवतात. 

 

म्हणून परिस्थितीला खूप गूढ कारण असतं, जे अनेक स्तरात स्थित असतं आणि ते दृश्यात मिळेल असे काहीही नाही. म्हणून कारणांना अनेक अर्थ असतात...त्यातील काही अर्थ दृश्यात स्थित दिसतात आणि काही अर्थ अदृश्य स्थितीत वावरतात. 

 

अदृश्य स्थितीत नजर जाण्यासाठी, तसा स्वभाव व्हायला लागतो - त्यासाठी मार्ग निवडावा, जो दृश्य मागे टाकून अदृश्य याच्यात नेऊ शकेल. 

 

दररोजच्या अनुभवात याचा सरळ अर्थ हा की काहीही झालं, कितीही त्रासदायक भावना वाटले, तरीही त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू नये, कोडी सोडवू नये, विषय म्हणून त्याकडे बघू नये. आपली अपेक्षा असते की जो पर्यंत गुंतागुंतीचे कोडी सुटत नाही, तो पर्यंत सुख मिळणार नाही किंव्हा आपण स्वस्थ होणार नाही. हा बुद्धीचा स्वभाव झाला. तो मर्यादित असतो. कोडी सुटायला सूक्ष्म होणे गरजेचे आहे, म्हणजेच श्रद्धेने जगणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही लोकांना गोष्टी खूप systematic किंव्हा चिकित्सपूर्व पाहिजे असतात. खरं पाहिलं तर आपण सगळे कुठल्या ना कुठल्यातरी वृत्तीला पकडून असतो. 

 

त्यातून विचारांचे स्वरूप होते - ज्याला "गुण" ही परिभाषा दिली आहे. जे गुण आपण घेऊन येतो किंवा दिले गेलेले असतात, त्यातून विचारांचे स्वरूप स्थित होते, गोष्टींचा अर्थ निर्माण केला जातो, परिणाम त्या प्रमाणे भोगले जातात वगैरे. स्मरण त्या पद्धतीतून होते. कुठल्या गोष्टी आठवत राहतात आणि कुठल्या गोष्टी ध्यानात येत नाही हे ठरते. आठवणे किंव्हा न आठवणे - दोन्ही क्रिया आहेत, कारण त्यातून गोष्ट दिसणे, वावरणे, प्रतिक्रिया देणे, विचारांचे चक्र निर्माण करणे असे होते. 

 

म्हणून एखादी गोष्ट कशी आणि का आठवते, त्यात खोल अर्थ भरला असतो. आणि आठवण फक्त मागची नसून, पुढचीही असू शकते!  म्हणजे जीव म्हणालो तर *आठवण*, हा गुण त्या बरोबर येणार. 

 

म्हणजे आपण व्यक्ती आहोत की आठवण?!! हा गमतीशीर प्रश्न आहे, कारण _आठवण_ ही संकल्पना आहे... जिला मर्यादित स्थळ किंव्हा काळ असे काहीही नसते! आणि व्यक्ती म्हणालो तर वस्तू समजावी, जिला स्थळ आणि काळाचे बंधन आले! 

 

ह्यातून हे दिसून येते की अस्तित्वाच्या कुठल्याही गोष्टीला मर्यादित स्वरूप (आकार) असे असते आणि अमर्यादित स्वरूप (आठवण आणि जाणीव). असे म्हणतात की प्रारब्धाचा परिणाम आकारा पर्यंत चढतो, पण तो परिणाम जाणिवेत शिरू शकत नाही. म्हणून जर स्मरण शुद्ध केले, तर स्वतःवर कशाचाही परिणाम होणार नाही (स्मरण अमर्यादित ठेवणे).

 

आता प्रश्न असा आहे, की परिणाम म्हणजे नेमके काय? मला वाटते की परिणाम एक क्रियेमुळे घडतो, ज्यात विचार आणि भावना (वासने पासून सुरुवात) हातभार घालतात. म्हणजे परिणामांचे बीज विचारात असते...चिंता, त्रास, कष्ट, काळजी - हे म्हणजे परिणाम. 

 

तर विचार सूक्ष्म भावाचे करता आले, तर परिणाम सूक्ष्म स्वभावाचा होईल - म्हणजे शांती भाव स्थित होणे.

 

हरि ओम.

 

 

Shree 

 

 *विचार* -  हे स्थळ, काळ, रूप, आकार ह्यांच्याशी मर्यादित *नसतात*. वरील गोष्टी निमित्त ठरतात विचाराला मर्यादित होण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी, हालचाली घडवण्यासाठी, परिणाम देण्यासाठी, परिस्थिती उद्भवण्यासाठी वगैरे. 

 

ह्याचा अर्थ, परिस्थितीतून स्वतःचे मुल्य ठरवू नये आणि अस्तित्वाचा भाव बदलण्याची शक्ती आपल्यात असते. थोडक्यात विचारातून आपण कुठल्याही रूपाचे संबंध निर्माण करू शकतो आणि निर्मिती करण्याचे मुख्य श्रेय भगवंताला सोपवावे. 

 

अजून एक अर्थ जो निघून येतो, तो हा की विचाराची साथ आपण ठरवू शकतो. म्हणजे चांगले विचार कुठल्याही स्थळ, काळातून स्वतःच्या देह बुद्धीत सामावून घेऊ शकतो आणि त्यामुळे स्मरणात परिवर्तन आणू शकतो. विचारातून आपण एका नव्या शिखरावर (imagination) अनुभव आपण घेऊ शकतो. 

 

विचारांवर श्रद्धा ठेवावी.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

 *मर्यादा* येणे, म्हणजे हालचाली जाणवणे, बदल जाणवणे, स्थळ, काळ, परिस्थिती, भाव, स्मरण, विचार, भावना जाणवणे. 

 

एकदा जन्म घेतला, म्हणजे मर्यादेत आपण आलो, असे ओळखावे. मर्यादेचा दुसरा अर्थ म्हणजे प्रकृतीचे गुण, परिणाम, चक्रात राहणारे व्यवहार आणि त्यातून घडणारे दृश्य. 

 

भगवंत मर्यादेच्या भाषेतून संक्रांत करायचा असतो. म्हणून वासनाविचार, भावना, देह - ह्या टप्प्यातून पलीकडे जायला लागतं, शांत व्हायला लागतं आणि भगवत भाव संक्रांत करायला लागतो. 

 

नात्यांचे नावे, काम, परिस्थिती हे निमित्त समजावे प्रवासातील असणारे. मी निमित्त आहे. काय सांगणे असते, ऐकणे असते, दिसणे असते, सुवास घेणे असते, चव घेणे असते ते फक्त _निमित्त_ म्हणून ओळखावे. बाकी सर्व आपण देणेच लागतो. 

 

बसणे, काहीही न बोलणे, कधी कधी सांगणे, जवळ येणे, एकांतात बसणे, बरोबरीने खाणे, हसणे, थांबणे, सैय्यम ठेवणे, बदल बघत राहणे, प्रतिक्रिया न देणे, अट्टाहास न धरणे, हेतू नसणे, फक्त असणे - हे सर्व गूढ असते. 

 

सर्व भगवंत करतो, ह्यात दुमत नाही. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अस्तित्वाचे कार्य आणि त्यातून होणाऱ्या गुंतलेल्या स्थिती, स्मरण, भाव, परिणाम असा एक अभ्यास आहे. त्यात प्रकृती, गुण, हालचाली, गती, बदल आणि त्यातून "मी" कसा होतो हे विषय आहेत. ह्या सर्व गोष्टींना अवतरणे असे म्हणतात किंव्हा भगवंताचे विस्मरण (आपल्या पार्श्वभूमीवरून) किंव्हा सिद्ध होत राहणे, अहं वृत्ती प्रज्वलित ठेवणे, कोडी सोडवण्यात गुंतून राहणे अशा गोष्टींचा उल्लेख सापडतो. मग त्यात अनुभव आणि द्वैताचा पसारा ह्या गोष्टींचा उल्लेख होतो. धडपड, काळजी, त्रास, राग, कष्ट अशा गोष्टी वाट्याला येत राहतात. 

 

मग प्रश्न पडायला लागतो की - ह्यातून "मार्ग" तो कोणता?!! हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे ओळखायला हवे की वरील कार्य जरी मनाला "कळून घेता आले", तरीही भगवंत होण्याचा "अनुभव" हा प्रकार गूढ आहे! If above things indicate additions or layering, then bliss is NOT the reverse...i.e. it is NOT subtraction or removal of layers. 

 

इथे मग, सुरुवात मानवी भूमिकेतून करायला लागते - म्हणजे प्रयत्न, सैय्यम आणि श्रद्धेची भाषा. त्याला *योग* म्हणतात. ते सातत्याने केल्याने अधिकाधिक सूक्ष्म स्थिती अनुभवास संक्रांत होत राहतात, ज्याला आत्मसात करणे, स्वीकार करणे, सामोरे जाणे आले. म्हणून निश्चय होणे महत्वाचा ठरतो. म्हणून प्रारब्ध कसेही आले, तरी त्यात दोष न शोधता, मार्गावर रहावे. त्याचा परिणाम म्हणजे शांती प्रस्थापित होणे...म्हणजेच भगवंताचे दर्शन होणे. ह्याला अंतर्मुख होणे असेही संबोधले आहे. 

 

एका वाक्यात सांगायचे झाले तर मानवी भूमिकेतून कर्तव्य करत राहावे किंव्हा देत रहाणे. फळ भगवंताच्या इच्छेने येते कारण ते अस्तित्वाचे कार्य आहे. जिथे कर्तव्य आणि फळ एकाच ठिकाणी मिळतात, त्याला भगवंताची कृपा म्हणायची. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

मनुष्य असा जीव आहे (रूप आणि आकार), की त्यात त्याला भगवंताची जाणीव आणि कार्याची व्याख्या कळून घेता येऊ शकते त्याच्या स्मरणेच्या रचनेतून. म्हणजेच अनुभव "दुहेरी" किंव्हा आतून ते बाहेर असे सर्वांगीण पसरत असते, प्रवाह असते, द्वैत असते, संबंधित असते, परिणाम करत राहते, हे तो ओळखून घेऊ शकतो....त्यातून *मार्ग* पत्करला जातो भगवंताचे दर्शन होण्यासाठी. 

 

मार्ग असा की त्यातून परिणाम आत आणि बाहेर होणे अभिप्रेत आहे. दोघांचीही भाषा आणि पार्श्वभूमी वेगळी असते, म्हणून मार्ग त्यातील संबंध स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. 

 

संबंध दोन प्रकारचे असतात. एक संबंध म्हणजे दृश्यात अनेक रूप, आकार आणि माझा संबंध जो गुणांमुळे होतो, वृत्तीमुळे प्रज्वलित राहतो, तशी परिस्थिती आणतो आणि त्यात गुंतवून ठेवतो. त्याला मूळ कारण प्रकृती आहे. दुसरा संबंध जो असतो, तो भगवंत अस्तित्वाचा आणि मनाचा असतो...म्हणजे जाणिवेच्या स्थितीचा आणि त्यातून शुद्ध कसे व्हावे हा मूळ प्रश्न असतो. मार्ग पत्करून ज्या स्थिती येऊ पाहतात, ते आत्मसात करून, सूक्ष्म होऊन शेवटी सत्यात विलीन होणे अभिप्रेत असते. तिथे स्वतःचेही भान राहत नाही, तर दृश्याचे काय राहणार?! 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

वरील लेखातून हा मर्म घ्यावा की भगवंताचे कार्य हा प्रकार गूढ असतो आणि त्यात शक्तीचा परिणाम असा असतो की सत्याला कायम ठेवून अनेकात शांती भाव विघटित केली गेली असते, म्हणून तसे स्मरण, स्वभाव, रूप, क्रिया, कोडी, प्रश्न, भावना वगैरे. 

 

जे _कार्य भगवंताच्या पार्श्वभूमीवरून आणि भावातून होत असते, तेच कार्य आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने जाणवते आणि परिणाम करत राहते._ हाच अस्तित्वाचा सवाल आहे आणि आलेले सर्व अनुभव ह्यातूनच घडत राहतात. 

 

म्हणून व्यवहारात प्रयत्न, सैय्यम आणि श्रद्धेचे स्थान खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे भगवत स्वरूप मन होत जाते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

विचारांचा प्रभाव बहिर्मुख पडतो, तात्पुरता असतो, वेगळेपण दाखवतो, सिद्ध करायला लावतो, अनंत रूप आणि आकार आणि त्यातील संबंध दर्शवतो, व्यवहार करायला लावतो, चक्रात गुंतून ठेवतो, भावनांचे प्रकार देतो, अस्थिर ठेवतो, परावलंबित ठेवतो, वगैरे. 

 

प्रश्न किंव्हा आतील स्थिती दृश्याला सांगून समाधान होत नाही. मुळात समाधान भाव परावलंबित राहून येत नाही. आपण किती परावलंबित असतो, ह्याचे ७ स्तर असतात आणि ते सर्व स्तर म्हणजे अंतर्मुख होण्याची क्रिया दर्शवतात. 

 

म्हणून परिस्थितीला खूप गूढ कारण असतं, जे अनेक स्तरात स्थित असतं आणि ते दृश्यात मिळेल असे काहीही नाही. म्हणून कारणांना अनेक अर्थ असतात...त्यातील काही अर्थ दृश्यात स्थित दिसतात आणि काही अर्थ अदृश्य स्थितीत वावरतात. 

 

अदृश्य स्थितीत नजर जाण्यासाठी, तसा स्वभाव व्हायला लागतो - त्यासाठी मार्ग निवडावा, जो दृश्य मागे टाकून अदृश्य याच्यात नेऊ शकेल. 

 

दररोजच्या अनुभवात याचा सरळ अर्थ हा की काहीही झालं, कितीही त्रासदायक भावना वाटले, तरीही त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू नये, कोडी सोडवू नये, विषय म्हणून त्याकडे बघू नये. आपली अपेक्षा असते की जो पर्यंत गुंतागुंतीचे कोडी सुटत नाही, तो पर्यंत सुख मिळणार नाही किंव्हा आपण स्वस्थ होणार नाही. हा बुद्धीचा स्वभाव झाला. तो मर्यादित असतो. कोडी सुटायला सूक्ष्म होणे गरजेचे आहे, म्हणजेच श्रद्धेने जगणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही लोकांना गोष्टी खूप systematic किंव्हा चिकित्सपूर्व पाहिजे असतात. खरं पाहिलं तर आपण सगळे कुठल्या ना कुठल्यातरी वृत्तीला पकडून असतो. 

 

त्यातून विचारांचे स्वरूप होते - ज्याला "गुण" ही परिभाषा दिली आहे. जे गुण आपण घेऊन येतो किंवा दिले गेलेले असतात, त्यातून विचारांचे स्वरूप स्थित होते, गोष्टींचा अर्थ निर्माण केला जातो, परिणाम त्या प्रमाणे भोगले जातात वगैरे. स्मरण त्या पद्धतीतून होते. कुठल्या गोष्टी आठवत राहतात आणि कुठल्या गोष्टी ध्यानात येत नाही हे ठरते. आठवणे किंव्हा न आठवणे - दोन्ही क्रिया आहेत, कारण त्यातून गोष्ट दिसणे, वावरणे, प्रतिक्रिया देणे, विचारांचे चक्र निर्माण करणे असे होते. 

 

म्हणून एखादी गोष्ट कशी आणि का आठवते, त्यात खोल अर्थ भरला असतो. आणि आठवण फक्त मागची नसून, पुढचीही असू शकते!  म्हणजे जीव म्हणालो तर *आठवण*, हा गुण त्या बरोबर येणार. 

 

म्हणजे आपण व्यक्ती आहोत की आठवण?!! हा गमतीशीर प्रश्न आहे, कारण _आठवण_ ही संकल्पना आहे... जिला मर्यादित स्थळ किंव्हा काळ असे काहीही नसते! आणि व्यक्ती म्हणालो तर वस्तू समजावी, जिला स्थळ आणि काळाचे बंधन आले! 

 

ह्यातून हे दिसून येते की अस्तित्वाच्या कुठल्याही गोष्टीला मर्यादित स्वरूप (आकार) असे असते आणि अमर्यादित स्वरूप (आठवण आणि जाणीव). असे म्हणतात की प्रारब्धाचा परिणाम आकारा पर्यंत चढतो, पण तो परिणाम जाणिवेत शिरू शकत नाही. म्हणून जर स्मरण शुद्ध केले, तर स्वतःवर कशाचाही परिणाम होणार नाही (स्मरण अमर्यादित ठेवणे).

 

आता प्रश्न असा आहे, की परिणाम म्हणजे नेमके काय? मला वाटते की परिणाम एक क्रियेमुळे घडतो, ज्यात विचार आणि भावना (वासने पासून सुरुवात) हातभार घालतात. म्हणजे परिणामांचे बीज विचारात असते...चिंता, त्रास, कष्ट, काळजी - हे म्हणजे परिणाम. 

 

तर विचार सूक्ष्म भावाचे करता आले, तर परिणाम सूक्ष्म स्वभावाचा होईल - म्हणजे शांती भाव स्थित होणे.

 

हरि ओम.