Wednesday, June 17, 2026

Shree

Shree 

Is life logical or beyond logic? What is logic? Are there states of logic? Is the logical, part of holistic vibrations? 

Are questions meant to prove or justify or carry out a search for self? Should questions be expressed or should they get revealed as required? 

विचार कसेही येऊ द्यावे, कारण त्यांना प्रसाद मानावा किंव्हा अस्तित्व कार्याचा एक भाग. प्रश्न सिद्ध करण्यासाठी असतात का, की ते नुसते असतात, नुसते निर्माण होतात, कुठेतरी वेगळाच अनुभव देतात आणि त्यातून वेगळे घडत जाते? There is a problem to view the _mind_ with a _function_ to question things, as if it was its sole purpose. Then that would mean a tendency to view a question in only a particular way and to perceive existence only in a particular way. कदाचित ह्यालाच गुंतणे किंव्हा अडकणे असे म्हणत असावेत!..किंव्हा अट्टाहास, अपेक्षा, अहं भाव!

A question needn't be a botheration. Question exists. And that's enough to keep revealing something or to keep the flow going.

Hari Om.


श्री 

प्रत्येक क्षण नवा असतो. म्हणजे त्याला मागची धारा आणि पुढची धारा जरी संबंधित असली, तरीही ह्या दोघांचा परिणाम आपल्या *क्षणाच्या प्रत्यक्षातील अनुभवात होता कामा नये.* The moment should always be *fresh* in our minds.

ह्याला दुसऱ्या भाषेत असे म्हणतात की प्रत्येक क्षणी भगवंताचे अस्तित्व/ कर्तेपण/ कार्याची ओळख वर्धमान झाली पाहिजे. म्हणजेच की विचारांच्या धाराचा परिणाम शिथिल व्हायला हवा किंव्हा त्या धारात गुंतण्याची गरज भासता कामा नये किंव्हा जाणीव सूक्ष्म झाली हवी...सगळे तात्पर्य एकच आहे.

विचारांचे येणे, प्रवाह, परिणाम, स्वभाव, कर्म करण्याची इच्छा - सर्व ठिकाणी भगवंताची शक्ती कार्य करत आहे, असे जाणवले हवे. ह्याचाच अर्थ की भगवंताच्या सूक्ष्म शक्तीचे अनुसंधान टिकले हवे कुठल्याही विचारांच्या स्थितीत. म्हणजेच मन स्थिर झाले, असे समजावे.

हरि ओम.

Saturday, June 13, 2026

श्री

 श्री 


रूप, आकाराला स्मरण असते, जे खूप सूक्ष्म स्तरातून हालचाली निर्माण होत स्थुलात _प्रकट_ होते आणि त्या स्थूल स्थितीचे व्यवहार इतरांशी/ द्वैताशी/ दृश्याशी प्रस्थापित करते. कार्याचा परिणाम म्हणजे द्वैताची निर्मिती आणि त्यातून होणाऱ्या स्थूल किंव्हा वेगळेपणाने जाणवणाऱ्या _हालचाली_ स्थळात किंव्हा काळात किंव्हा कृतीत किंव्हा स्वतःतच. दुसऱ्या अर्थाने हालचाली म्हणजे सबंध/ व्यवहार जे खूप आतून प्रस्थापित होत राहतात, म्हणून त्याचे पाया मुळे सापडणे अवघड जाते बुद्धीला. 

जे काही विचार आणि भावना उद्भवतात, हे ह्या स्थितीत साजेसे असे उद्भवत राहतात. विचार आणि भावना सूक्ष्म झाले, तर स्थितीही सूक्ष्म जाणवते आणि संबंधांचे रूपही त्यानुसार होते. म्हणजे हे सर्व प्रकरण गुंतले गेलेले आहे. 

म्हणून असा अभ्यास स्थित होतो की मनाला शांत कसे करावे आणि त्यातील हा प्रश्न पहिले की मन म्हणजे काय? ह्या प्रश्नाला तीन भाग आहेत. हा प्रश्न बुद्धीतून समजून घ्यायला लागतो आणि प्रत्यक्षात नामाचा आधार घ्यायला लागतो. आणि तिसरं म्हणजे "मी" ह्या संकल्पनेचा संबंध वरील अभ्यासात काय असतो? 

मला काहीही माहित नाही (गृहीत धरू नये कशाला) हे जाणवायला हवे. मी कशावरही निर्भर असत नाही, सत्य जर पाहिले. स्थळाची आणि काळाची परिस्थिती कशीही जरी प्रस्थापित होत राहिली, तरीही त्याने आपण काही सिद्ध करण्याची गरज नसते. आतील शांतता आणि सिद्ध होत राहण्याची प्रक्रिया - ह्यात काहीही संबंध नसतो/ तसा तो जोडण्याचीही गरज नाही. प्रारब्ध असतात आणि ते स्वीकारावे लागतात शांतीने. प्रत्येकाला प्रवास असतो. तो श्रद्धेने हाथी घ्यावा.

हरि ओम.

Tuesday, June 09, 2026

श्री

श्री 

विचार कुठले येतील, कसे येतील, का येतील - ह्यावर आपला अधिकार नसतो. विचार एक प्रवाह दर्शवतो, त्यातून बऱ्याच काही संबंधित गोष्टी प्रस्थापित होऊ पाहतात, जर त्यांना धरून राहिलो तर किंव्हा तसे स्मरण होऊ दिले तर. म्हणजे विचार होण्याचे किंवा असण्याचे कार्य भगवंताला द्यावे, आपल्या मनाला नाही. आपले अस्तित्व म्हणजे "मन" नसते. 

म्हणून मनाने आणि मनातून जे काही निर्माण होत असले, तरी त्यात _गुंतण्याची गरज नसते_. हे अतिशय महत्वाचे निदान आहे, जे आत्मसात करून शांती भाव प्रस्थापित होऊ शकते. मनाची शक्ती सूक्ष्म, विशाल आणि शांत होऊ द्यावी. 

शांत राहिलो, तर मनात बरेच गूढ, सूक्ष्म विचार येत राहतात, ज्याचा अंदाजही केला गेला नसतो. ते नुसते बघावे आणि त्याला हेतू लावू नये (की कुठून आले, का आले, कसे आले, काय घडेल, वगैरे). त्यातून शांती भाव संक्रांत व्हायला लागते. 

त्यातून स्वतःला संपूर्ण स्वीकारणे घडते.

हरि ओम.

Shree

 Shree 


Liberation is about all the things that can cause involvement...be those thoughts, feelings, bodies, relations or any other concept. 

Not knowing the idea of birth or death can also create a fear of the Unknown and create entanglement. ह्याला भगवंताच्या भावाचे विस्मरण म्हणतात, म्हणून भीती येते आणि त्यात गुंतायला होते.

Therefore searching for a point of liberation might be an illusionary idea. It has got more to do with accepting an ambiguous, fluid existence and realization. 

Not knowing anything is a blessing in disguise, because that can generate the experience of trust.

Hari Om.

Shree

Shree 

Control is applied mostly as identifying variables, establishing connections among them, deciding priorities among them and managing their flow as per set priorities. 

This results in two things - absolute control, creation of escape and therefore creation of too many variables that get formed by this idea and then controlling new ones again! This means that every form of control (as an imagination) is going to also create a counter point of 'escape' and new variables in the process. Hence we need to accept what it is, we are creating and why. 

I think if we understand this cycle, another approach would emerge and that would probably mean to renounce control because of increased awareness of interdependence. If I control any variable "out there", it will cause some other form of control over me! Therefore, _I can't or shouldn't stop any flow of things._ But why start with the idea of control ?! This is a very difficult inquiry to understand. Because the answer isn't to be found in any situation. It is in the mindset that _seeks_ control.

वरील ताबा ह्याचे कार्य दुहेरी असते...म्हणजे "मी" ह्या भावनेचा परिणाम दृश्यावर होतो, स्वतःवर होतो आणि संबंध प्रस्थापित करण्यात होत राहतो. "मी" हा प्रकार मर्यादित असतो आणि त्यामुळे होत राहणारा परिणाम. मर्यादा, अहं भाव ह्याचे स्पंदने ताबा, भीती, राग, चिंता, काळजी - ह्या मध्ये प्रकट होत राहते. त्याचे उत्तरे मनाने दाखवलेल्या मार्गावर (म्हणजे विघटनांवर) आधारित नाही आहे, हे मान्य व्हायला हवे. म्हणून ह्या प्रकरणाला शांत करणे गूढ असते, ते सहज सहजी होणे कठीण, कारण आपली सवय मुळात कर्म, स्वार्थी राहण्याची आहे. 

आपण कुणावर किंव्हा कशावरही नियंत्रण घडले चुकीचे ठरते. वृत्ती बदलत नाही सांगण्यावरून. त्यांना स्वतः परिवर्तित होणे लागते. म्हणून त्यांच्यावर ताबा सोडावे. नात्यावर ताबा सोडावे. 

देहावर आपला ताबा असत नाही. प्रारब्ध कसेही येते. देह सरळ जातो, कधीतरी पडतो, खालती घसरतो...त्याला काहीही होते. मग त्यावर ताबा ठेवण्यात काय तथ्य आहे?! 

तसंच विचारांचे, भावनांचे असते. ते परावलंबित झाल्यामुळे, चक्रात वावरत राहतात. परावलंबित वृत्ती असल्यामुळे तिथे ताबा ठेवण्याचे बीज स्थित राहते, म्हणून सतत त्याचा त्रास होतो. 

कामाचे तसेच आहे. कामाचे स्वरूप कसे होईल, काय सांगितले जाईल, काय अपेक्षा असेल हे सांगणे कठीण. कामाला सेवा म्हणून बघावे, त्यातून काय मिळेल, असे बघू नये. 

मुळात आयुष्याकडून काय मिळेल मला, अशी अपेक्षा ठेवणे त्रासाला कारण ठरते. सर्व कार्य भगवंताचे असते, ज्याला आपण उगाचच ताबा मिळवण्याची अपेक्षा ठेवतो. हा अभ्यास आहे शांत राहण्याचा. प्रारब्ध कसेही जरी असले, तरी नामावर श्रद्धा कायम ठेवावे.

हरि ओम.

Monday, June 08, 2026

श्री

 श्री 


जाणिवेला सत्य पाहिले, तर ते अमर्यादित असते. शुद्ध अस्तित्व म्हणजे जाणीवच आहे, त्याला आपण _कार्य_ असेही संबोधले आहे. सर्व सृष्टी _जाणिवेनी_ भरलेली असते. त्याच्या स्तरांमुळे, सूक्ष्म आणि शांत असलेली सृष्टी जड, स्थूल अणि अस्थिर वाटते. म्हणजे रूप आणि आकार हे जाणिवेचे _प्रतीक_ आहे. जशी जाणीव, तसा संबंध, तश्या हालचालींचे स्वरूप, तसे स्मरण, तश्या भावना, तसे आकार, तशी परिस्थिती, तसा परिणाम, वगैरे.

प्रारब्ध म्हणजे असे ओळखणे की दृश्याचा स्वभाव अस्तित्वामुळे प्रस्थापित होत राहणार आहेच, ज्याच्यामुळे ध्यानात अनुभवांचा प्रवाह असणार, प्रवास असणार, शोध असणार, विविध घटक असतील, प्रश्न असतील, सामोरे जाणे भाग येईल, वगैरे. प्रत्येक जन्म - मरण ह्या हालचालीत/ गतीत हे असे दिसणारच आहे. 

जाणिवेला विचार आणि भावना (मन) मर्यादा तैय्यार करतात. त्यातून सारे संबंध येत राहतात, परिणाम भोगला जातो, परिस्थिती अनुभवली जाते. म्हणून जाणीव शुद्ध होऊ देणे महत्वाचे ठरते. प्रश्न जाणिवेचा आहे, कुठल्याही रूपाचा, आकाराचा, देहाचा, नात्यांचा, कामाचा नाही. आपण कोडी, बहिर्मुख असल्यामुळे, परिस्थितीत सोडवण्याचा प्रयत्न करतो - मग ते सर्व कोडी कामाशी, देहाशी, नात्यांशी, विचारांशी, भावनांशी निगडित असावीत असे आपण मानतो. हा अपुरेपणाच्या भावनांचा _परिणाम_ ओळखावा. 

मूळ प्रश्न मनातून आहे, कार्याच्या स्वरुपात असतो. नाम म्हणून निर्हेतूने, समर्पण करत घ्यायला लागते. नामाचा विस्तार, भाव, कार्य, अनुभव जाणवण्याला खूप महत्त्व आहे. त्या नामाच्या कृपेची प्रार्थना करावी.

हरि ओम.

श्री

श्री 

 _स्वतःच्या अपुरेपणाचे_ रूप असे का असते आणि कुठून येते आणि कसे प्रस्थापित होते आणि काय परिणाम दर्शवते, हा *स्वतःला स्वीकारण्याचा* भाग आहे. 

स्वतःला शांतीने स्वीकारावे आणि कुठलाही हेतू मांडण्याची जरुरी असू नये. सर्व भगवंताचे माध्यम करते, म्हणून माझ्या असण्याला देखील त्याची इच्छा कार्य करते. ही भावना आत स्थिर होऊ द्यावे, जाणीव तशी होऊ द्यावे. आपण अस्तित्वात आहोत. कुठल्यातरी इच्छेखातर दृश्याशी संबंध जोडला गेला आहे. आता ते स्वीकारून, अंतर्मुख होऊन भगवंताचे सानिध्य परत संक्रांत होऊ द्यावे.

हरि ओम.

श्री

 श्री 


आपले भवितव्य, मनस्थिती,  शांती भाव - परिस्थितीवर, नात्यावर, जबाबदाऱ्यांवर, कामावर *ठरण्याची अजिबात गरज नाही*. प्रवाह होत राहणार, त्यात स्वतः आपण कुठे हवे, असा विचार आणण्याची गरज नाही ध्यानात. विचार एका पद्धतीचे किंव्हा एका स्वरूपाचे असे का येऊ पाहतात, हे सांगणे अवघड किंव्हा नाही कळत. ते कळले नाही, तरीही त्यात गुंतण्याची आणि कोडी सोडवण्याची _गरज_ असते का?! विचारांचे संपूर्ण रूप कळले नाही, तरी त्यामुळे त्रास, कष्ट, व्याकुळ होण्याची गरज नाही. जे काही आहे, जे काही येत राहते, जे काही येणार असते, जे काही निर्माण होते, ते भगवंताच्या इच्छेने येते.  _गरज_ स्वतःची जाणीव प्रज्वलित ठेवते. ती शुद्ध झाली, की गरजही उरणार नाही, तरीही शांती भाव संक्रांत होईल. 

हरि ओम.

श्री

श्री 

स्पष्टीकरणाला जर खूप कारण लागले, तर समजावे की आपण खूप परावलंबित झालेले आहोत. मनाचा मार्ग स्पष्टीकरण देत राहण्याचा असतो, म्हणून ते नाहिसे करण्यास ते आणखीन विघटित मार्ग पत्करते, ज्यामुळे स्पष्टीकरणाची गरज क्षणो क्षणी प्रकट होत राहते! 

स्वस्थता ह्याचा मार्ग, वरील मार्गाच्या विरुद्ध आत्मसात होण्याचा आहे. म्हणजे कारण शोधण्याची गरज न उत्पन्न होणे, धरून न ठेवणे, देह बुद्धी विलीन होऊ देणे, प्रवाह दिसणे, कार्याची ओळख होणे, सूक्ष्म होणे, चिकित्सा सोडून देणे, शांत होणे, वगैरे. आपण कप्प्यात वावरत नसतो. म्हणजे एक कप्पा स्थळ, दुसरा कप्पा काळ, तिसरा कप्पा क्रिया, चौथा काम, पाचवा नाती, सहावा व्यवहार, सातवा स्मरण, आठवा आणखीन काही....कप्पा करण्याची हौस विलीन व्हायला हवी. कोडी, विषय, कप्पे, गती, मन, गुंतणे, सोडवणे, सिद्ध होऊ पाहणे - हे एकाच धाग्यात बांधल्या गेलेल्या संकल्पना आहेत. एक सोडवता सोडवता सगळा गोळा सोडवायला लागतो. त्यात मनाचे कष्ट आहेत. दुसरा मार्ग नामस्मरणाचा की त्यातून शांती भाव आत्मसात झाली म्हणजे समजावे की कप्पे विलीन झालेले आहेत.

हरि ओम.


श्री 

वरील लेखातून हे ही जाणवते की अहं भावामुळे किंव्हा जीवाच्या होण्यामध्ये सिद्ध करणे हा त्यात उपजत भाग येतो, म्हणून कप्प्यात संकल्पना मांडत राहणे आणि त्याला सोडवणे असे आपण गुंतत राहतो! हा अहं भावाचा परिणाम ओळखावा - किंव्हा प्रवाहाला सतत विघटन स्वरूपात मांडत राहणे आणि त्यामुळे अनंत रूप आणि आकाराना सामोरे जात राहणे! 

मन विशाल आणि सूक्ष्म होऊ देणे म्हणजे प्रवाहाची जाणं प्रज्वलित होणे आणि सर्व कर्तेपण भगवंत माध्यमाला सुपूर्त करणे. 

प्रवाह सत्य आहे, कप्प्यात गोष्टी होणे नाही.

हरि ओम.

Thursday, June 04, 2026

श्री

 श्री 


विचारांकडे "नुसते न गुंतता बघावे लागते". हा गूढ प्रकार आहे. आपण बऱ्याच सूक्ष्म गोष्टी शब्दात मांडू शकतो, पण त्यावरून लगेच व्यवहारात त्याचे नियोजन करावे अशी अपेक्षा असणे जरा कठीण आहे. _शब्द_ म्हणजे पूर्ण सत्य नाही किंव्हा पूर्ण ताबाही नाही. माझ्या मते, "मी", किंव्हा होणे, किंव्हा कुठल्याही दृश्यात घडामोडी ह्यावरून ताबा मिळवण्याची व्याख्या कदापि होत नसते. म्हणजे दुसऱ्या अर्थाने, कशानेही _हेतूची_ संकल्पना निर्माण होत नाही/ निर्माण करू नये. जिथे विचारांमध्ये कुठेही (कुठल्याही स्तरात किंव्हा रूपात) गुंतणे झाले (identification with _any_ form of thought), तिथे हेतू आला, भाव आला, स्मरण आले, तात्पुरतेपण आले, वगैरे. 

अस्तित्व भाव खूप गूढ आहे, की तिथे अनुभव हेतुला धरून किंव्हा हेतूशी संबंधित नसतो. जन्म, मरण, चक्र, स्मरण, भाव, हेतू, परिणाम, व्यवहार, इच्छा, गुंतणे, भीती, राग, सुख आणि दुःख, परावलंबन - हे _एकाच_ वेळेला प्रकट होतात. इथे स्तर अनेक, माध्यमे अनेक, कार्य अनेक - कुठे मूळ शोधावे आणि त्यावरून लेखावे स्वतःला किंव्हा इतरांना?!!

 *शोधाचा* अर्थ दोन प्रकारे ओळखता येतो. विचारांच्या पातळीवरून (म्हणजे त्याच्या सर्व स्वभावात गुंतून) शोध व्हावे. पण विचारांना अंत नाही, म्हणून ह्या मार्गावरून शोधाचा अंत नाही, किंव्हा सत्य पूर्णपणे कळणे अवघड. दुसरी पद्धत म्हणजे विचारांची मर्यादा आत्मसात होणे आणि त्यांना शांत होऊ देणे आणि स्थिर होणे/ सूक्ष्म होत राहणे/ श्रद्धा वाढवणे/ पलीकडे जात राहणे/ अंतर्मुख होणे. इथे पूर्णपणे स्थिर होणे, म्हणजे शोधाचा अंत होणे, असे आपण ओळखू शकतो. स्वतःला विलीन होऊ द्यावे लागते, की त्यातून शांती प्रस्थापित होते.

हरि ओम.

श्री

श्री 

सर्व हालचालींचा किंव्हा अस्तित्वाच्या कार्याचा *अवाका* ध्यानी यायला हवा. Scope.

तो अवाका येऊ घातला किंव्हा जाणिवेत आला, की मन स्थिरावते, कारण तो पर्यंत ते सूक्ष्म आणि विशाल आणि अमर्याद झालेले असते. 

ह्याचा सोप्पा अर्थ हा की मन,  ज्या स्वभावाचे बनले जाते, वासने पासून ते देह पर्यंत, त्यामुळे त्याचे स्मरण, भाव, क्रिया, व्यवहार, संबंध दृश्याशी ठरतो. _मनाचे अस्तित्व आणि त्यामुळे जाणवणाऱ्या हालचाली कोण निर्माण करते?_ उत्तर आहे - भगवंत माध्यम.  

ह्या भगवंत माध्यमाचे कार्य ध्यानी येणे अवघड, जिथे अहं भाव असेल. मनाला पूर्णपणे अर्पण करावे लागते आणि शांत होऊ द्यावे लागते, तरच भगवंताचा भाव आत्मसात होऊ शकतो. हा अभ्यास आहे, जो हाथी घ्यायला लागतो. 

परिस्थिती, होण्याची क्रिया, हालचाली, संबंध, परिणाम - हे अत्यंत गूढ प्रकरण आहे, जिला मनाच्या दृष्टीने बघितले तर सरळ सुरुवात किंव्हा शेवट नाही. *परिस्थिती आत्मसात* होणे महत्वाचे आहे, तिच्यावर ताबा मिळवणे नाही. सर्व कार्य भगवंताचे असल्यामुळे दृश्यात होणाऱ्या घडामोडी त्याच्या इच्छेने असतात, हे ओघाने आले. म्हणजे हालचालींचे स्वरूप गूढ असते, म्हणून ते शांतीने सामोरे जाऊन स्वीकारावे लागते. 

आपल्याला सध्या संकल्पना, अनुभव, परिणाम, चक्र एका मर्यादित पद्धतीने जाणवत राहतात आणि त्यालाच सर्व मूल्य देण्याची घाई करत राहतो. त्यामुळे कष्टी होतो. असे असून सुद्धा, भगवंताचे चिंतन सतत सुरू ठेवले तर वरील मनोरचनेत योग्य परिवर्तन होते आणि सत्य ध्यानी यायला लागते. 

राग कशासाठी आणि कुणावर आणि का? तसेच विचार किंव्हा भावनांचा योग्य वापर कसा असावा, हे जाणून घेणे. परिस्थिती आपल्यावर कशीही येईल...त्यावर आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त शांतीने द्यावे आणि चिंतन करावे भगवंताचे.

हरि ओम.

श्री

 श्री 


भगवंताचे चिंतन, किंव्हा नामस्मरण दर क्षणी आत्मसात करावे कारण, विचारांचा भाव अनेक स्वरूपात वावर होत असतो ज्यात मन तिथे गुंतले असते. म्हणजे कधीतरी विचार संकल्पना करेल, नुसते बसेल, कधीतरी ते प्रत्यक्ष गोष्टीना सामोरे जाण्यात मग्न असेल, तर कधीतरी ते परिमाण झाल्यावर त्यावर टीका करेल किंवा त्यात गुंतून राहील. सर्व _विचार परिस्थितीत_ भगवंताचे भान प्रस्थापित व्हायला हवे, कारण सर्व क्षणात त्याच्यातून सर्व हेतू प्रस्थापित होत असतात. म्हणजे "होण्याचे कारण" - मग ती इच्छा असो, की संकल्पना, का प्रत्यक्ष अनुभव, किंव्हा परिणाम - सर्वांना अस्तित्व भाव कारणीभूत ठरते. किंव्हा दुसऱ्या पद्धतीने सांगायचे तर सगळी साखळी, स्तर, स्मरणांचा प्रकार - सर्व भगवंतामध्ये सामावलेले असते. लाट कशीही असू द्यावी, भरती आणि ओहोटी कशीही येऊ द्यावी, चढ उतार कसाही असू द्यावा, प्रत्यक्षात भगवंताचे कार्य चालू असते...आणि म्हणून ह्या सर्व प्रकारच्या _हालचाली होत राहतात_. 

मनाचीही हालचाल असते, वस्तुंसारखी. ही हालचाल अदृश्य असते किंव्हा गूढ असते. त्या हालचालीला - *कार्य* - असेही संबोधले असते. म्हणून मन म्हणजे काय आणि ते कसे होते, हे अध्यात्मातील प्रश्न असतात. 

जीवाच्या पार्श्वभूमीवरुन बघितले, तर जाणीव शुद्ध आणि सूक्ष्म होत राहणे, म्हणजे सर्व हालचालींचा अवाका ध्यानात येणे आणि मन स्थिर होणे. 

हरि ओम.

Tuesday, June 02, 2026

श्री

 श्री 


कुणाला ठामपणे पूर्णतः माहित नसते की आपण इथे का आलो आणि कसे आलो. हा प्रश्न बौद्धिक पातळीच्या आणखीन पलीकडचा आहे, आतून येणारा आहे - जिथून सारे काही उगम पावते आणि चक्रा सारखे प्रस्थापित होते. 

आध्यात्मिक पातळीवरून विचारांचा अर्थ गूढ आहे, जो सूक्ष्मातून, अनेक कार्यांमुळे _उगम_ पावतो, ध्यानात येतो, स्तरातून येतो, साखळीत अवतरतो, बुद्धी, भावना, देह ह्या प्रकारे जाणवतो, भाव आणि स्मरण देतो, व्यवहार करायला लावतो, परिणाम दर्शवतो, चक्रात गुंतवून ठेवतो वगैरे. थोडक्यात तसे पाहिले, तर विचारांना देखील एक _स्वभाव_ आहे, जो भगवंत माध्यमामुळे रूपात साकार होतो. त्या स्वभावाला वेगळेपणाने बघणे, हे आध्यात्मिक मार्गातील महत्त्वाची कामगिरी ठरते जीवाची. 

वेगळेपणाने बघितल्यावर, आपण आणखीन सूक्ष्म असतो आणि मूळ शांती आहोत, हे जाणवते. मग विचारांच्या प्रभावाखाली (तात्पुरतेपण) आपण (जाणीव) राहत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने शांती लाभते. जाणिवेचे *शुद्ध* स्वरूप म्हणजे *शांती*. 

त्यासाठी भगवंत माध्यमाचे चिंतन जरुरीचे असते.

हरि ओम.


श्री 

लपवणे हा relative भाग झाला. जेवढी आपल्याला परावलंबिक आणि relative गोष्ट जाणवते हेतू न ठेवता, तेवढे शांत आपण होऊ शकतो. इथे relative, परावलंबन, संबंध, एकाच अर्थाने आहे. ह्या वरील विश्लेषणात आपण "गुंतलो", तर त्याचा प्रभाव मनावर होतो आणि सुख - दुःखाची बाधा होते. गुंतू नये, असे कुणी म्हणत नाही. किंबहुना जन्म आहे, तर गुंतणे होणार. 

सांगण्याचे तात्पर्य की आपल्या मनोरचने प्रमाणे _ठराविक गोष्टी_ (गुंतल्यामुळे, संकल्पनेत वावरल्यामुळे, संबंधित राहिल्यामुळे, परावलंबिक असल्यामुळे) ध्यानात येतात आणि तसे स्मरण प्रस्थापित होते. मुद्दा हा आहे, की त्या ठराविक गोष्टीवरून स्वतःला आणि इतरांना आणि अस्तित्वाला आपण पूर्ण अर्थ देण्याचा प्रयत्न करतो आणि इथे आपली चूक होते. 

वरील निर्मिती संपूर्णपणे तात्पुरती असते, म्हणून आपल्या समजुती देखील तात्पुरत्या ठरतात (बदलणाऱ्या, वेगळ्या, संबंधित वगैरे). _ह्यावरून लोकांचे मतभेद होण्यास कारण ठरते_. ज्या लोकांना हे कळते की सर्व निर्मितीची इच्छा आहे, त्यांना ह्या मतभेदात राहण्याची काडीमात्र इच्छा नसते, किंबहुना मतभेदाचे स्थान त्यांच्या लेखी नसते. 

म्हणून लपवण्याच्या प्रवृत्तीतून बरेच काही दर्शनास येते. इतरजण आपल्यापासून काहीतरी लपवतात - त्यावरून स्वतःला लेखण्याची गरज नाही. आपण जसे सूक्ष्म होऊ, तसे आपल्या ध्यानी असे दिसून येईल की खूप लोकं खूप गोष्टी लपवण्याचा आटापिटा करत राहतात आणि आपल्याला दोष देतात की त्यांचे मन आपल्याला ओळखता येत नाही! वास्तविक आपल्या ध्यानात सूक्ष्म स्थिती वावरत असल्यामुळे इतर स्थूल भावनांकडे लक्ष जात नाही. त्याचे काही वाटून घेण्याची गरज नाही आणि आपण उत्तर किंवा स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही, आणि त्या गोष्टी सांगताही येणार नाही.

हरि ओम.

Sunday, May 31, 2026

श्री

 श्री 


काही लोकांचे प्रश्न, माझ्या मते, गहन होतात आणि ते फक्त ऐकावे लागतात समोरच्याने. ते प्रश्न मांडता येतात त्या लोकांना असे नाही, पण त्याचा परिणाम त्यांच्या जाणिवेत खूप खोलवर झालेला दिसतो आणि त्या पद्धतीने व्यवहार ते इतरांन बरोबर करायला घेतात. 

प्रश्न मुळात विचारण्यासाठी नसावेत आणि त्यावरून इतरांनी सांत्वन करावे, ही अपेक्षा देखील कितपत योग्य आहे, हे बघावे. प्रश्न स्वतःला पडलेला असतो, अस्तित्वाचा, कार्याचा, संबंधाचा, परावलंबनाचा, भावनेचा, मर्यादेचा वगैरे. परिस्थिती प्रश्न सोडवते का? की काही त्यासाठी वेगळे प्रयास लागतात? हा असावा _शोध_. शोध हाती घेणे, हा स्वाभाविक गुण आहे जीवाचा आणि तसा तो केल्याशिवाय काही चैन पडत नसावे कुणालाही. पण त्यासाठी व्याकुळ व्हावे का? हा परत ज्याचा त्याचा प्रश्न आहे...तसे ठाम उत्तर त्या प्रश्नाला कदाचित नसावे. 

मानवी समाजामध्ये असे वयोमानाचे लोकं संपर्कात येतात - जसे की लहान मुले किंव्हा वृद्ध व्यक्ती - ज्यांचे म्हणणे फक्त ऐकून घ्यायला लागते. प्रश्न खूप विकट असावेत त्यांचे आणि काहीही केल्या त्यांचे उत्तरे कुठल्याही दृश्याच्या भाषेत/ व्यवहारात/ संबंधात सापडत नाही. त्यामुळे वृद्ध लोकांची व्याकुळता कायम राहण्याची शक्यता खूप वाढू शकते. लहान मुले काय की वृद्ध लोकं काय, त्यांना वेळ, स्थळ, नाती असल्या बंधनाशी विशेष व्यवहार अवलंबून करण्यात रस नसतो. त्यामुळे त्यांचा संवाद खूप निराळा होतो, विचार वेगळे असतात, भावना वेगळ्या असतात. 

काम करणाऱ्या मंडळींना हे पचनी पाडायला लागते. संवाद जर - तर ह्या भाषेतील नसते, धडपडीचे नसते, काहीतरी कोडे सुटण्याची अपेक्षा नसते, वेळेचा आभास असतो अशी जाणीव शिथिल झालेली असावी, कधी कधी त्यांच्याच पूर्वीच्या स्मरणात मन रममाण होत राहते, अट्टाहास कोडी सोडवण्याचा रहात नसावे, वगैरे.

एका बौद्धिक अर्थाने, वरील जाणीव खूप निराळी ठरते दररोजच्या व्यवहाराच्या तुलनेने. पण मानवी जाणीव आणि सत्याच्या पार्श्वभूमीवर, ह्या लोकांना समजून घेणे आणि स्वीकारणे शक्य होऊ शकते. 

खरे पाहिले तर आपले स्वतःचे अनुभव देखील ह्या सर्व रूपातून जात असतात/ जाणार असतात. कधीतरी आपण लहान असतो आणि प्रेमाशिवाय दुसरी कुठलीच भाषा त्यावेळी ध्यानात आलेली नसते. वृद्ध लोकांसाठी कदाचित सत्य आणखीन प्रखरतेने जाणवल्यामुळे त्यांचे मन कदाचित आणखीन मोकळे झालेले असते. काम करणाऱ्या लोकांना जरा व्यवहारात गुंतायला लागत असावे मात्र. 

पण प्रश्न असा उद्भवतो, की व्यवहारात गुंतताना स्वतःला इतके स्वार्थी का करावे आणि इतके कसे परावलंबी करावे, की कुणाचीही पर्वा असू नये?! मग ह्याला _प्रगती_ कुठल्या अंगाने म्हणावी?!! 

काही लोकांचे म्हणणे असे असते की हा नैसर्गिक क्रम आहे, तर स्वार्थीपणा कधी ना कधीतरी येणार प्रत्येकाला. मला माहित नाही ह्या बद्दल विचार करताना....म्हणजे स्वार्थी होणे, हे कदाचित तिथे मन खेचले जाऊ शकेल, पण मनुष्य मग कशाला म्हणायचे? की कुठल्याही प्रसंगी, शिस्त लावून, शांतीचे ध्यान करत व्यवहारात गुंतत राहावे.  आणि असा नक्कीच निश्चय करायला लागतो आणि तिथेच बुद्धीची कस लागते. There is going to be a struggle.

आता अजून एक मुद्दा असा की प्रश्न जर स्वतःचा शोध आहे, तर तो इतरांनी सोडवायला हवा का किंव्हा इतरांची त्यामागची भूमिका काय ठरते? तर उत्तर असे सुचविले आहे की इतर जण "निमित्त" ठरतात प्रश्न सोडवण्यासाठी. प्रश्नाचे उत्तरे इतरांनी द्यावे हे काही बंधनकारक नाही, कितीही स्वतःला वाटलं तरीही. प्रश्न खूप गूढ असतो आणि त्याचे उत्तर ज्याने त्यानेच आत्मसात करायचे असते/ करावे लागते.

हरि ओम.

श्री

श्री 

स्पष्टीकरण देणे आणि पारदर्शक असणे, ही एक संकल्पना आहे. ह्यात बरेच घटक आहेत, तरीही आपण प्रामुख्याने ह्याकडे काही अंगाने बघूया -

मनुष्य स्वभाव किंव्हा जीवाचा भाव, ह्याचा एक गुण धर्म प्रस्थापित झाला असतो अस्तित्व शक्तीतून. तो असा की त्यात बरेच स्तर, साखळी, संबंध, विचार, भावना, देह व्यवहार करत राहतात आणि त्यामुळे त्यांचा एकंदरीत ध्यानात परिणाम होत राहतो. त्यामुळे अपुरेपण, तात्पुरतेपण, वेगळेपण, भीती, राग, मर्यादित राहणे, ममत्व अशा भावना प्रस्थापित होतात. त्यांच्या प्रभावाखाली माणसाला दृश्य बद्दल आसक्ती निर्माण होते, त्यात तो गुंतून राहतो, कोडी सोडवण्याचा आटापिटा करत राहतो आणि *काहीतरी मोजके सांगू शकतो आणि काहीतरी लपवून ठेवतो (अर्ध सत्य)* . एका दृष्टीने हे नैसर्गिक आहे की माणूस काहीतरी लपवणार (त्याची गरज त्याला भासेल, इतकेच नव्हे तर ह्या स्वतःच्या मनोरचनेत तो सतत गुंतून राहील) आणि दुसऱ्या दृष्टीने हा दोष आहे शुद्ध होण्याच्या मार्गावर.

हा स्वभाव बरोबर करण्यासाठी एक पर्याय बुद्धीने शोधण्याचा प्रयत्न केला आहे की - सगळ्याच गोष्टींचे स्पष्टीकरण देत रहाणे - की संबंधांचे मूळ, साखळी, व्यवहार, निर्णय, वस्तू, परिणाम...सगळच. This is the modern way of defining transparency in communication. ह्यात इतर खूप घटक आहेत, जसे की विघटित होणारी क्रिया, भीती, बुद्धिवादीन स्वभाव, स्वावलंबी होण्याची सतत धडपड, effeciency, वगैरे. पण असे दिसून येते की एका मर्यादेच्या पलीकडे ही मागणी करत गेलो, तर त्याने मन दुखावते, कष्टी होते, त्रासिक होते, दुःखी होते. ह्याचा अर्थ की मनाची गरज आणि त्याचा योग्य पद्धतीने स्वीकार करण्याचा अभ्यास घेतलेला दिसत नाही आहे. 

आता दुसरा मार्ग म्हणजे आध्यात्मिक वाटचाल. ती अशी की मनुष्य मान्य करतो, की स्वतः मध्ये असे काही अवगुण असावेत, जेणेकरून मर्यादा प्रकट होत राहतात, गरज निर्माण होते, गुंतणे येते, आणि सर्व अनुभव संक्रांत होण्याची गरज निर्माण होते. त्याला "दोष" न मानता, ह्या अवगुणांना शांत कसे होऊ द्यावे, हा आध्यात्मिक प्रश्न निर्माण होतो. मग मार्ग आध्यात्मिक असणार साहजिकच...फक्त बौद्धिक नाही. दररोज विचार येतील, प्रभाव घालतील, आणि त्यातून परिणाम अनुभवात येतील. विचारांचे होणे, वावरणे, परिवर्तित होणे, ही शक्ती असावी, ज्यात अनेक स्तर असावेत आणि त्यांचे कार्य आपला भाव निर्माण करत असावेत. असे असल्यास, आध्यात्मिक शोध त्या सूक्ष्म स्तराचा होतो, ज्यावरून सत्याची प्रचिती येते.

हरि ओम.

श्री

 श्री 


मला वाटतं की स्पष्टीकरणाची गरज निर्माण केली गेली असावी... ती पहिल्यापासून नसावी. 

हा गूढ प्रश्न आहे, की स्पष्टीकरण कशी मनात संक्रांत झाली आणि त्यात सार्वजनिक आणि व्ययक्तिक दोन्ही घटक सामील असावेत. 

मन जसे बदलत गेले, तशी ही स्पष्टीकरणेची भूमिका (आणि त्यातून इतिहासाची गणना) झाली असावी. त्यातून _मूळ_ ह्या शब्दाची संकल्पना मांडली गेली असावी. 

एकंदरीत, इथे वाटचाल बौद्धिक शक्तीकडे दिसून येते, जी कदाचित परिस्थिती त्याच्या अगोदर वेगळी असावी, म्हणून बदल, स्मरण, इतिहास, मूळ - अशा संकल्पना मांडण्याचीही गरज नसेल का?! 

एक व्याख्या प्रगतीची म्हणजे _प्राचीन_ संकल्पना, _भविष्य_ संकल्पना आणि जोडणारे दुवे असा काहीसा दिसून येतो, आणि त्या प्रमाणे प्रवाहाकडे बघितले जाते.

पण प्रश्न असा आहे, की सत्य कदाचित ह्या पलीकडेही असेल (म्हणजे आपण मांडलेल्या संकल्पनेच्याही पलीकडे), आणि त्यात "चक्र", अदृश्य, दृश्य, परिवर्तन, गुढत्व, संबंध - अशा गोष्टींची जागा असावी! 

तसे असल्यास, अभ्यास गहन असावा मूळ जाणून घेण्याचा किंव्हा आत्मसात होण्याचा. आपण कशानेही ठरत नसतो - ना प्राचीन, ना भविष्य, ना आत्ताचा क्षण. आपण फक्त "असतो".

हरि ओम.