Thursday, April 30, 2026

Shree

 

 

Shree 

 

Almost everyone of us thinks that "a job is required to be done"... म्हणजे काहीही होऊ द्यावे, ही गोष्ट व्हायलाच पाहिजे!

 

काही काळा पूर्वी, मलाही तसेच वाटायचे की काम होणे गरजेचे आहे. बहुतेक लहानपणी हेतू सोप्पा असावा, म्हणून खूप प्रश्न येत नसावे!

 

आता जसा हेतू क्लिष्ट होतो, तसे अनेक प्रश्न येतात आणि खूप विचार निर्माण करत राहतात, की हे का, आत्ता का, असेच का, इथेच का, नंतर का नाही, असे का नाही, वगैरे. 

 

मूळ प्रश्न असा आहे, की सिद्ध होण्यासाठी हेतू असतो का? की _गोष्टी एका पद्धतीने असायला हवे, किंव्हा हालचाली अश्याच असायला हव्या_ अशी जाणीव झाली असते का आपली

 

दररोजच्या अनुभवात असे सरळ दिसते की वरची अपेक्षा ठेवून गोष्टींचे वावर तसे असत नाही. इथे मग सरळ निष्कर्ष होतो की गोष्टी, हालचाली, संबंध, ध्यान हे अद्भुत असते किंव्हा _गूढ कार्यातून प्रस्थापित होते_. आपले होणे, असणे, बदलणे, निघून जाणे - हे ही त्या गुढतेत होत राहते. मग एखाद्या वासनेला का धरून रहावे? आणि "धरणे" अशी वृत्ती तरी का उदयास येते? त्यावरून अनुभव, भोग, परिणाम का झेलायला लागतात? आणि ही वृत्ती मनाला लावून घ्यायची असते का, की त्याला नैसर्गिक मानायचे असते की तटस्थपणे बघायचे असते?

 

काहीही बोलण्यात किंव्हा स्पष्टीकरण देण्यात तथ्य नसावा! असा प्रश्न आला, की ओळखावा की हा खूप मोठ्ठा क्षण असतो पचवण्यासाठी. ह्या प्रश्नाने व्याकुळता येऊ शकते आणि सर्व प्रकारे शंकाने घेरून जाऊ शकते. 

 

तिथे सत्याच्या शोधाचा निश्चय होतो. कोण आहे "मी"? हा भाव कसा होतो, कुठून येतो, काय करतो, कुठे जातो, का होतो

 

ह्या प्रश्नाकडे पोहोचायला, खूप जन्मो जन्मीच्या अनुभवातून जाणे होते. तसा प्रवास अटळ समजावा. मग पुढेही प्रवासावर श्रद्धा ठेवून सत्याकडे पोहोचू, नाही का?

 

लोकांची चूक अशी होते, की शांत होणे म्हणजे काहीच प्रतिकार करू नये किंव्हा इच्छा बाळगू नये. तसा तो अर्थ नाही. देह असल्यामुळे, अर्थातच त्याच्या काही मागण्या असतील. मग त्यात प्रतिकार, इच्छा सर्व आल्या. त्यात फक्त वाहून जाण्याची गरज नाही किंव्हा त्याचे संस्कार मनाला चिटकवण्याची गरज नाही. रूप आहे, देह आहे तर अनुभवाचे स्थान असणार. त्याला टप्पा मानून कर्तव्य करावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

सर्व विचारात, भावनेत, संबंधात गुंतून राहण्यात आणि त्यातून सिद्ध होण्यात काहीही गरज नसते. लोकं काहीही बोलत राहतील, हालचाली कसेही होतील, पण त्याने आपण ठरत नसतो. रूपाचे आणि आकाराचा स्वभाव असतो, म्हणून त्या पद्धतीने प्रारब्ध होणार. प्रारब्ध म्हणजे "मी" नाही. आणि म्हणून मन सूक्ष्म स्तरात _परिवर्तित_ होऊन सत्य आत्मसात करू शकते.

 

इथे परिवर्तन सर्वांगीण अभिप्रेत आहे आणि साखळी सारखे नाही, किंव्हा जर - तर नाही, किंव्हा फक्त बौद्धिक नाही. म्हणून सत्य आणि त्यातून वासनेचे स्थान गूढ असते आणि त्यासाठी भगवंताचे चिंतन सतत जागृत ठेवायला लागते. चिंतन आणि दृश्यात होणाऱ्या हालचाली - _ह्याचे संबंध जोडू नये_. 

 

भगवंत कार्य करत दृश्य अनुभवात आणतो. आपण नाम घेत भगवंताकडे पोहोचावे. दोन्ही एकाच वेळेला स्वतंत्र होणाऱ्या गोष्टी मानाव्या.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

दृश्य, हे आपल्या रूपातून _संबंधित_ येते किंव्हा ध्यानात येते. There is an idea of subjectivity here. त्याला टप्पा मानून स्थिर होण्याची गरज आहे जीवाला. हे होण्यास "मार्ग निवडण्याचे" महत्व सुचविले आहे. आपल्या मनाला दोन गोष्टींची खेच असणार आहे - दृश्य किंव्हा बहिर्मुख स्वभाव/ तसे स्मरण/ तशी कृती/ तसा भाव/ तशी साखळी/ तसे चक्र....आणि भगवंताची शक्ती/ शांती भाव/ सूक्ष्म स्तर/ सत्य/ स्थिर/ अद्वैत/ अदृश्य...

 

विचार आणि भावना हे बहिर्मुख छटा दर्शवतात किंव्हा त्या प्रमाणे दृश्यात बांधले जातात आणि तसे हालचाली करत राहतात आणि परिणाम भोगायला लावतात. एकंदरीत, ह्याला "विघटित" अस्तित्व म्हणू. ह्यात वासनेचे स्थान प्रस्थापित असते. भगवंताचे विस्मरण झालेले असते आणि त्या सूक्ष्माचा परिणाम दृश्यात कसा होतो, हे विचारांना ओळखणे कठीण जाते, म्हणून भीती निर्माण होते. जो पर्यंत आपण परावलंबित वावरतो, तो पर्यंत तसे परिणाम भोगायला लागतात.

 

ह्यातूनच भगवंताचे सतत नामस्मरण करत राहायला लागते, म्हणजे तसे संस्कार मनात रुजू होऊ पाहतात आणि मन स्थिर आणि सूक्ष्म व्हायला लागते. _संस्कार संक्रांत_ होऊ देणे इथे अभिप्रेत आहे. म्हणजे गूढ पद्धतीने परिवर्तन होणे. ते अट्टाहासाने फक्त होणे अवघड. म्हणून इथे प्रयत्न, श्रद्धा आणि कृपा ह्यांची गरज लागते. कृपा म्हणजे योग्य परिवर्तन होणे भगवंताच्या इच्छेतून. 

 

श्रद्धा ह्याचे स्थान दृश्यात अवलंबून नसते. म्हणून काहीही होऊ द्यावे, भगवंताचे चिंतन सोडू नये. त्यावरून श्रद्धेचे उगम होते.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

निवांतपणा किंव्हा स्वस्थता आपल्या आकलनाच्याही पलीकडे होऊ शकते, काही सांगता येत नाही. आणि ते सांगणे कठीण, हेच हिताचे असते (म्हणजे त्यावर कुणाचाही ताबा नाही)!...

 

माझ्या मते, परावलंबित भाव विलीन होऊ देणे आणि त्या प्रमाणे विचारही, हे मोलाचे ठरेल. म्हणजे "विचार करण्याची गरज न उदयास येणे". ह्यातून हे कळेल की जीव म्हणलं तर _त्या स्वरूपाचे विचार आणि स्मरण होते_. अस्तित्व माध्यमात वासना टाकली गेली की रूप आणि देह आलेच म्हणून समजा! म्हणून शुद्ध होणे ह्याचा अर्थ की वासना पूर्ण विलीन होणे आणि केवळ अस्तित्व माध्यम स्थित असणे. 

 

अस्तित्व भाव, जो आपण जाणतो, तो मर्यादित आणि परावलंबित असतो. त्यावरून विचार, भावना, प्रश्न, कोडी मांडले जात राहतात आणि त्यावरून व्यवहार होतो आणि परिणाम _भोगला_ जातो. 

 

म्हणून विचार विलीन होऊ द्यावे लागतात, किंव्हा जाणीव शुद्ध आणि सत्य होऊ द्यावी लागते. मूळ प्रकार जाणिवेचा आहे, विचारांचा "नाही". 

 

येत्या काळात खूप काही गोष्टी, खूप प्रमाणात विघटित होणाऱ्या दिसत आहेत....इतके की आपण बाहेरही फेकले जाऊ शकू किंवा आपली हाक इतरांना ऐकू तरी येईल का, हा प्रश्न निर्माण व्हावा. अध्यात्म मध्ये असे म्हणतात की एका म्यानात दोन तलवारी राहणे कठीण (शांती भाव किंवा विघटित अहं वृत्ती). तसेच येणारा काळ तेच सांगतो की अजून विघटित व्हावे का सत्यात विलीन होणे?! 

 

विघटन सोडावे लागणार आहे, आणि हे तेव्हा शक्य होईल, जेव्हा समाधान शांती भाव स्थित होईल आपल्या ध्यानात.

 

हरि ओम.

 

 

Shree 

 

The question or anything for that matter, always appears a "dot" that represents a fixed form in space and time (रूप आणि देह). आपल्या दृष्टीने सध्या "संबंध" तसेच होऊ पाहतात, म्हणून त्याची बाधा होते, हालचालींचे परिणाम होतात. एकंदरीत, ह्याला "घट्ट धरून राहणे" असे म्हणतात. 

 

As things or any question is taken deeper within, more connections, relations, and subjectivity are revealed embedded in the question itself. So therefore one suspends labelling a question, because while engaging with it, more things get revealed in subtle states. 

 

Hence decoding, analysis and synthesis are to reveal such states. The ability to engage intensely with a problem to an extent that it "dissolves" is a human capacity. 

 

Hence a problem is a state of human mind that has chosen to latch onto it. The problem as an experience of Truth, *doesn't really exist*. It has been brought to existence by the mind....

 

If i am able to "see" a problem as a state of mind (rather than feelings compelled to solve it), then maybe a different approach to engage with it, may begin. The problem may not be a dot, but a flow or a web or subjective or highly malleable. 

 

Also as the problem changes its shape or nature, ourconnections with all intangible and tangible things also _change_ at the same time. This means a problem that is properly decoded or dissolved may also dissolve connected knots of the past and the future. In essence, it can turn out to be a healing process.

 

Hari Om.

 

Friday, April 24, 2026

श्री

श्री 

 

चांगले काम करावे. म्हणजे शुद्ध भावनेने, सर्वांगीण अर्थाने, सूक्ष्म पद्धतीने, शांतीने, आपुलकीने कार्य करावे. त्याचा परिणाम निश्चित मनात संक्रांत होतो आणि तसे साऱ्या वासनांचे परिवर्तन शांती भावनेत होतं, बुद्धीच्या नकळत. म्हणून अशा कार्याला खूप महत्व असते आणि ते घडले, तर देवाची कृपा कार्य करत आहे आपल्या ध्यानात, असे ओळखावे. 

 

कृपा ह्याचा अर्थ की परिस्थितीशी काहीही संबंध जरी असला, तरीही शांती भावनेत मन स्थिर असते. भगवंताची आठवण नेहमी ध्यानात असावी, कारण कृपेचे स्थान सगळीकडे, सर्वव्यापी, सर्व स्तरात, सर्व काळात आणि सर्व स्थळात होत असते. म्हणून ते स्वतःच्या स्मरणेच्याही पलीकडे स्थित असते आणि सूक्ष्म असते. 

 

कार्य कसे काम करते, ह्याची चिंता नसावी. ते करते, अशीच श्रद्धा ठेवावी म्हणजे त्यात आपले परिवर्तन होते. बुद्धी शंका घेते, कारण तो त्याचा _स्वभाव_ आहे. स्वभाव देवाने प्रस्थापित केला असतो, म्हणून त्याची कृपा असल्या शिवाय तो विलीन होणे कठीण. उगाचच गुंतून, बडबड करून, विषयात रमून हिताचे होत नाही. सर्व मनाचे स्वभाव बाजूला सारून श्रद्धा भाव प्रस्थापित होऊ द्यावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

जीवाच्या पार्श्वभूमीवरुन प्रयत्नाच्या फळात *टप्पे* असतात. ते ह्या प्रमाणे ओळखावे...

 

  १) एका परिस्थितीचा भाव सतत ध्यानी असणे, त्यात गुंग राहणे आणि परिणाम भोगणे.

२) वरील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले की "शंका" स्वतः बद्दल उत्पन्न होणे आणि त्या प्रमाणे शोध हाती घेणे. त्यात द्वैत आणि अद्वैत ह्या दोन्ही संकल्पनांची माहिती असणे, पण द्वैताच्या अनुभवाशी जास्ती समरस असणे. 

३) प्रयत्न सारखे सुरू ठेवणे आणि सैय्यम ठेवणे. शंकेचे रुपांतर हळू हळू श्रद्धेत होणे.

४) श्रद्धा जशी वाढते, तशी स्वस्थता लाभणे. 

५) श्रद्धा वाढत राहताना देखील द्वैताचा अनुभव येत राहणे आणि अधून मधून मन व्याकुळ होणे. तरीही निश्चयाने नामस्मरण करणे. 

६) मन सूक्ष्मात विलीन होत राहणे आणि अद्वैताचा अनुभवाच्या जवळ जवळ जाणे.

७) सत्यात स्थिर होणे, शांत होणे. मग सर्व ठिकाणी भगवंताचीच शक्ती कार्य करताना दिसणे. 

 

हा अनुभव प्रस्थापित होण्यासाठी सातत्याने मार्ग पत्करायला लागतो. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

रूप जे प्रस्थापित आणि ध्यानात येऊ घातले आहे, आणि जो काही प्रवाह ध्यानी येत राहतो, त्यातून मन होते, परिणाम होतो, संबंध येतात, दृश्यात गुंतणे होते, वगैरे. *वस्तुस्थिती* अस्तित्वाची ही आहे, की सर्व गोलाकार आहे आणि सुरुवात किंव्हा शेवट, दोन्ही स्पष्ट बुद्धीच्या भाषेत सांगणे अवघड. म्हणजे सत्य कळणे म्हणजेच जाणीव शुद्ध होणे, भगवंत भावात स्वतःचे स्मरण पूर्ण विलीन होऊ देणे. 

 

वरील अनुभव आत्मसात होऊ देण्याचा निश्चय व्हावा लागतो. माझ्या मते, निश्चय इथे बौद्धिक भावनेच्या पलीकडे असणारा अर्थ आहे - *म्हणजे श्रद्धा*. श्रद्धेने निश्चय अनुस्वरूप होईल. 

 

Phenomenologically we make a mistake when someone like Heidegger suggests what is a "Being" and we tend to _pounce_ on his idea for fixing problems. That is precisely a trap we set out for ourselves because of our own intellect. 

 

वरील प्रकार बुद्धीचा गूढ आहे आणि तिच्या ह्या स्वभावामुळे आपण सगळीकडे वेगळेपणा सारखे बघतो, म्हणून विषय दिसतात, म्हणून ते सोडवण्याचा अट्टाहास, म्हणून त्याचे परिणाम, म्हणून त्यात गुंतत राहणे...बुद्धीचे चक्र, दुसरे काय?!!

 

अर्थात वरील मर्यादा ओळखणे देखील विवेक बुद्धीचे कौशल्य असते आणि त्यातून योग्य मार्ग प्रस्थापित व्हायला लागतो. संबंध देवाने दिले आहेत, म्हणून ते स्वीकारून पुढे जाणे आले.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

गुंतण्याची इच्छा प्रज्वलित असणे हे वृत्तीचे लक्षण समजावे आणि भगवंताची इच्छा. जीवाच्या पार्श्वभूमीवरुन बघितले, तर असे दिसेल की गुंतण्याची हाव सुटण्यास खूप प्रयास लागतात आणि त्याचे कारणही गूढ आहे. आपण कर्म करण्याच्या खटपटीत राहतो...कर्म केल्याशिवाय चैन पडत नाही कारण त्यात सूक्ष्मातून अपेक्षा निर्माण होतात. म्हणून व्यवहार करत राहण्याची सतत धडपड सुरू असते. 

 

ह्यात खूप विरोधाभासिक गोष्टी उफाळून येतात, जे अर्थातच शोध घेण्यात प्रवृत्त करतात. म्हणजे जे काही विचार येऊ पाहतात, त्यातून शांती प्रस्थापित होण्याची संभावना असतेच. प्रयत्न, सैय्यम, श्रद्धा, कृपा त्यासाठी रसायन ओळखावे. 

 

भगवंत सर्व ठिकाणी आहे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

जो प्रवास, प्रवाह, विचार धारा येऊ पाहतात (व्याकुळता, शोध, प्रश्न, निश्चय, अनुभव, शांती...) हे होणार आणि ह्याला अत्यंत नैसर्गिक मानावे.... This is our destiny as a _human_ being. 

 

इच्छा होणे, न होणे, समाधानी होणे, ह्याचा प्रवास असतो आणि प्रत्येक क्षणात तो कधी कधी प्रश्न आणेल, कधी कधी उत्तरे, कधी कधी आणखीन वेगळे. प्रवाह, हा काही विषय किंव्हा कोडे नाही. भगवंताची इच्छा, म्हणून तसा हा प्रवाह, तसा हा जन्म, तसे हे अनुभव, तशी ही व्याकुळता, तसा तो शोध...

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अस्तित्वाचे अर्थ आपल्याला स्वतःच्या अनुभवातून जाणवायच्या असतात. जाणीव शुद्ध होण्याची क्रिया अभिप्रेत आहे, जिथे सर्व रूप स्वतःचे शांत होणे असते आणि परम तत्व भगवंता मध्ये विलीन होते. 

 

म्हणून त्या अर्थाने अनुभवाकडे बघावे, विचारांकडे बघावे, भावनांकडे तसे बघावे, देहाकडे तसे बघावे, जीवनाकडे तसे बघावे. कार्यातून वासना/ परिणाम/ स्मरण/ वेगळेपण/ तात्पुरतेपण/ संबंध असे प्रस्थापित होते, म्हणून "मी" होतो, स्थळ आणि काळ होते आणि प्रकृतीचे _परिणाम_ ध्यानी उमटते. 

 

म्हणून व्यवहार, खटपट, व्याकुळता, भीती, प्रश्न, अट्टाहास, सिद्धत्व ह्या गोष्टी दररोज जाणवत राहतात, किंव्हा त्या भूमिकेत सतत वावरायला होते. जीवनात विषय किंव्हा कोडी सोडवण्यात कुठले शहाणपण आले?! विषय म्हणजे मनाने निर्माण केलेला गुंता, ज्यात त्या चक्रात ते राहते. स्वतःसाठी विषय निर्माण करतो आणि त्यातच आपण सर्व दंग होऊन जातो! ह्याचे बीज अंतःकरणात असते, म्हणून त्याची क्रिया _त्या स्तरात शांत होऊ द्यावी लागते_. 

 

वरील प्रकरण गूढ ओळखायला हवे, की सुरुवात माहित नाही, शेवट माहीत नाही, प्रवास माहित नाही, प्रवाहाचे स्वरूप माहित नाही.  म्हणजे सतत ह्या बदलत राहणाऱ्या गोष्टींचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न मन करत राहते. त्यातून अनेक जन्म, पूर्वीचा काळ, उद्याचे क्षण असे काहीसे अनुभवात संक्रांत होते आणि ह्या सर्वांकडे कोडे सारखे बघणे होते.  ह्याचा अर्थ असा की "निर्मितीच्या प्रक्रियेत" मन होते जिच्यामुळे _गुंतण्याची_ गरज/ आसक्ती प्रस्थापित होते. हे चक्र आहे, असे ओळखता यायला हवे. 

 

वरील धारणा शांत होण्यासाठी नामस्मरण स्वतःकडून घडवायला लागते आणि शांत होण्याचा अनुभव आत्मसात होऊ द्यावा लागतो. त्यासाठी भगवंताची कृपा लागते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

शांत होण्यात कदाचित उगाचच कर्म करण्याची इच्छा विरघळून जाईल. सूक्ष्म स्तराचे संस्कार, कार्य ध्यानी यायला लागतील. आपण कदाचित खूप काही गोष्टीत अरसिकता दाखवू, ज्यात पूर्वी जोमाने गुंतत राहायचो. पूर्वीचे कोडी सोडवण्याची इच्छा विरघळून जाईल कदाचित...त्या कोडींचे महत्त्व राहणार नाही. 

 

ह्याचा अर्थ असा की कोडी आणि मनोरचना संबंधित असतात. मन जसे शुद्ध होते, तसे कोडी विरघळून जातात...त्याची गरज असण्याची रहात नाही. म्हणून अस्तित्वाला कशाची गरज असते का?....तर नाही! ह्याला _स्वतः सिद्ध_ म्हणावे. 

 

आपल्या जीवनात विघटित स्मरण असल्यामुळे, असंख्य कोडी ह्यांचे स्थान प्रस्थापित झालेले आढळते. ह्या सर्व कोडीना "चिंता" म्हणुया किंव्हा द्वैत किंव्हा परावलंबन. *माहित नाही* की असे का असते आणि काही गोष्टींचा त्रास का होतो. ही परिस्थिती स्वीकारावी लागते आणि शांत होण्याचे प्रयत्न हाथी घ्यायला लागतात. त्यासाठी नामस्मरण.

 

हरि ओम.