Sunday, March 15, 2026

श्री

श्री 

 

गोष्टी होत राहतात. तो अस्तित्वाचा गुण आहे. ते कसे, कधी, कुठे, का होतात - ती भगवंताची इच्छा असते.   गोष्टींच्या स्वभावावरून अणि होण्यावरून किंव्हा कुठल्याही हालचालीतून (मग ते आतील असू किंव्हा बाहेरील) आपण ठरत नाही किंव्हा सिद्ध होत नाही (संपूर्ण बौद्धिक अर्थ लावण्याची गरज नसते). अशा अनेक स्तर आहेत,जे बौद्धिक भाषेत ओळखता येत नाहीत, तरीही त्यांचा शांत मनाने स्वीकार होऊ शकतो. थोडक्यात सर्व निर्मितीचा प्रकार आणि परिणाम अस्तित्व शक्तीतून उद्भवते, त्यात आपण एक निमित्त/ घटक/ स्मरण/ भाव/ जाणीव  ठरतो. 

 

हे लिहिणे देखील आपल्या रूपातून निर्माण होते, अर्थातच त्याची प्रतिभा भगवंताने दिलेली असते. आपल्यातून सुरुवात करून शांती पर्यंत स्थित व्हायचे असते. हा मार्ग. आपण इथे कसे आलो, का आलो, कधी आलो, कुठून आलो हे सर्व प्रश्न भगवंताला सोपवा, म्हणजे संपूर्ण परिस्थितीचा स्वीकार करावा. हाच आपला मार्ग.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

 _हालचाली_ होत असतात दृश्यात. ती भगवंत शक्तीची इच्छा असते, म्हणून कार्य होते आणि अनेक स्तर प्रस्थापित होत राहतात आणि हालचालींचे अनेक रूप आणि आकार दर्शवत राहतात. 

 

भगवंताच्या स्मरणात कुठलाही क्षण वाया जात नसतो, कारण कुठल्या ना कुठल्यातरी स्तरात त्याचा योग्य परिणाम होत असतो. तो योग्य परिणाम शंका देईल, त्रास देईल, श्रद्धेचे महत्वही दर्शवून देईल. म्हणजे अंतर्मुख होण्याच्या प्रक्रियेत वाट्टेल ते उफाळून येण्याची संभावना असते, जे शांतीने आत्मसात करावे लागते. हीच शक्ती संचय होण्याची संकल्पना. 

 

जसं दृश्यात शक्ती वावरताना इंद्रियांच्या द्वारे परावलंबित प्रक्रियेत मग्न असते आणि त्यातून विचारांची धारा प्रस्थापित होते, तसंच अंतर्मुख होण्याच्या प्रक्रियेत मनात उलाढाल होत असते आणि त्यातून निराळी विचार धारा प्रस्थापित होत असते, ज्यावरून सत्य आत्मसात होते. 

 

म्हणून तसा निश्चय व्हायला लागतो की अंतर्मुख मार्ग निवडण्याचा. हा मार्ग पत्करल्यावर कुणाचे काय बिघडणार आहे?! सारे तर भगवंताचे असते, आपण उगाचच काळजी करतो की कुठे कमी पडले तर आणि कुठे फुगा फुटला तर! 

 

म्हणून राग गिळायला लागतो. कारण तो मर्यादा दर्शवतो. गोष्टी आपल्या अपेक्षा प्रमाणे होतीलच असे काहीही नाही. हे मान्य असावे. गोष्टी अशा पद्धतीने, कुठे, कधी, का घडतात...ह्यात व्याकुळ होण्याची गरज नाही. 

 

एकंदरीत वरील आपली (जीवाची) परिस्थिती बघता, ह्यात तारून शांती अनुभवण्याचा मार्ग म्हणजे तीन गोष्टी ध्यानात आणाव्यात: प्रयत्न (कर्तव्य), सैय्यम आणि श्रद्धा.  हाच दृश्यात राहण्याचा उचित मार्ग आहे.

 

योग्य वेळ आली की भगवंत दर्शन देणार. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

आपण शांत रहावे. सध्या इतके बदल सर्व पातळींवर होत असतात की त्यातून आपण ठरून घेण्याची चूक न करावी, कारण काहीच ठरणार नसते आणि त्यातून व्याकुळता का निर्माण करावी? आपल्याला प्रामुख्याने पाच गोष्टी शिकायच्या आहेत

 

१) कार्य आपल्या नकळत, सूक्ष्म माध्यमातही स्थित राहतं, म्हणून _करण्याला_ बरेच कंगोरे असतात, जे कळतात, नाही कळत, अर्धवट कळतात वगैरे. ह्या सर्व रूपाच्या प्रकारात _स्थिर_ राहण्याचा प्रयत्न करावे. 

 

२) काहीही अनुभवात येऊ घातले, तरीही सिद्ध होण्याची व्याख्या दृश्याच्या भाषेत मांडण्याची गरज नसते...कारण सिद्ध होण्याचा प्रकार _परावलंबित_ असतो. जिथे आजूबाजूच्या गोष्टीच खूप अस्थिर होत जात आहेत, तिथे त्यांच्यावरून सिद्ध होण्याची संकल्पना का अवलंबून करत राहावे?! आणि खरे सिद्धत्व भगवंताच्या शक्तित असते, त्यात आपण फक्त देणे लागतो. 

 

३) आपण मग कोण आहोत? इथे का आलो, काय करतोय, कशासाठी गुंतून राहतो, काय पाहिजे, कुठे जाणार आहोत- हे खूप महत्वाचे प्रश्न असतात स्वतःसाठी. त्यासाठी मार्ग आत्मसात करण्याचा शोध सुरू होतो. 

 

४) दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आपली नसते. त्यांच्या वृत्ती कशा शांत होतील, त्यासाठी आपण व्याकुळ न व्हावे. असे केल्याने असेही समजून घेऊ नये, की आपल्याला काहीच फरक पडत नाही. संसार सगळ्यांना मर्यादा शिकवतो. त्याच्यामुळे जे विचार आणि भावना उमटत राहतात, त्यातूनच शांतीकडे वाटचाल करावी लागते. म्हणून परिस्थिती पूर्णपणे स्वीकारावी लागते. आपण ह्या परिस्थितीत कर्तव्याची भाषा आत्मसात करावी.

 

५) सतत काहीतरी करत राहावे, गुंतून रहावे, खंत बाळगावे, रागाला धरावे - हे हिताचे ठरत नाही. स्वस्थ बसून राहिले, तरीही ते महत्त्वाचे असते आणि वेळ फुकट जात आहे, असे बिलकुल समजून घेण्याची गरज नाही. सर्व भगवंत योग्यच करतो. श्रद्धा वाढवावी.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

सर्व काही आपल्यात असते. आपण रिकामे नसतो. कुठे ना कुठेतरी आपल्या असण्याचा, वावरण्याचा योग्य परिणाम अस्तित्वात होत असतोच आणि आपले स्मरण कधीही वाया जात नाही. त्या अर्थी, आपण फक्त कर्तव्य करावे आणि संपूर्ण देत रहावे. देण्यासाठीही अंतःकरणात शुद्ध भाव स्थित होणे गरजेचा असतो, म्हणून देण्याने हे साधायला होते. ज्याला मी असे म्हणतो, ती देखील भगवंताची इच्छा आणि कार्य दर्शवते म्हणून तो सर्व काही योग्य करतोच, मग काळजी ती कसली?! 

 

प्रश्नांचे उत्तरे ओळखण्यासाठी वेळ द्यावा आणि श्रद्धा शक्ती वाढवावी. श्रद्धा बुद्धीने कळत नाही. बुद्धी अशी वापरून बघितली तर श्रद्धा यावी, हा तर्क झाला. श्रद्धा येण्यासाठी भगवत कृपा लागते. 

 

म्हणून बुद्धी परिवर्तित होण्यासाठी प्रयत्न, सैय्यम आणि कर्तव्य करावे. बुद्धीला कार्य केल्याशिवाय स्वस्थता (भगवंताची जाणीव) मिळणार नाही. म्हणून कार्यातून तिला शांत करावे. त्या कार्याचे रूप म्हणजे प्रयत्न, कर्तव्य, सैय्यम असे आहे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही अवघड विचार किंव्हा शब्द मांडण्यासाठी काही अनुभवातून जाणे येते. ते आपल्या हातात नाही; कधी ते अवघड क्लिष्ट वेदनादायक भावना मांडावे, हे सांगणे अत्यंत कठीण. घाई करून नाही चालत; आणि दुर्लक्ष करूनही. अशा परिस्थितीत काय करावे, असा प्रश्न पडावा स्वतःला. 

 

मला वाटते की भोग असतात, ते स्वीकारायला लागतात. त्यातून कोण चूक किंव्हा बरोबर असे बघू नये. आत्ता मुद्दा सांगणे कठीण का वाटते ह्याचे कुणी स्पष्टीकरण जरी विचारले तरीही अंतःकरण जाणून घेऊन निर्णय घ्यावे. निर्णय निमित्त झाले. त्याचे फळ काय यावे, ते श्रद्धेवर सोडावे. 

 

असा विचार करावा सतत. काही विचार आणि भावना आत खूप आघात देत असावेत. विचार जरी त्रासदायक वाटले, तरी शांत राहण्याचा (म्हणजे सैय्यम, श्रद्धा, कर्तव्य) सतत निश्चय करावा. 

 

एक घाव दोन तुकडे कुणालाही त्वरित करणे शक्य असते पण मुद्दा हा आहे की त्याचा प्रभाव खूप खोलवर आणि खूप काळासाठी तरंगत राहतो. वृत्तीचेही तेच आहे. वृत्ती शांत कालांतराने होणार...त्यासाठी अनेक अनुभव, स्तर, चक्र आत्मसात करावे लागणार. कारण अस्तित्वाच्या अनुभवात भगवंत भाव आणि जीवाचा भाव अशा दोन गोष्टींचा परिणाम होत असतो, आपल्याला मार्ग तो पत्करणे आलेच. 

 

वेदनांसाठी स्वतःला दोष देणे त्वरित बंद करावे. गूढ भाव ओळखण्यात श्रद्धा ठेवावी. कशालाही घट्ट पकडण्याची गरज नसते. आणि तसे जरी होत असले, तरीही भगवंताचे चिंतन करत राहावे म्हणजे कालांतराने दृश्यांची पकड सुट्टी होते.

 

असा विचारही येऊ शकतो, की थेट कोड सोडवणे अपेक्षित नसते का, इतर बाजूचे प्रयत्न करण्यापेक्षा? हा विचार तसा जरी सरळ वाटत असला, तरी प्रत्यक्षात नेहमी ते शक्य होईल असे काही सांगता येत नाही. बाजूचे प्रयत्न देखील कालांतराने तेच कोडे थेट सोडवतील! आणि थेट कोड्यामध्ये हात जर घातला तर प्रकरण चिघळूही शकते! तात्पर्य, कोडे कधी आणि कसे सुटेल हे आपल्या हातात असत नसते...ते श्रद्धेने भगवंताकडे सोपवावे. ह्याचा परत अर्थ असा निघतो की कोडी सुटण्या पर्यंत आपले कार्य करत राहावे - कर्तव्य, सैय्यम, श्रद्धा. 

 

हरि ओम.

 


श्री

श्री 

त्याग म्हणजे सर्व वासना आणि त्यांच्यातून होणाऱ्या साखळीना विलीन करणे. त्याग बौद्धिक प्रयत्नातून सुरू होऊ शकतो (निश्चय), पण त्याला सर्वव्यापी किंव्हा सर्वांगीण स्वरूप येणे गरजेचे असते...म्हणजे तो भाव खूप आतून प्रकट होणे गरजेचे असते. हे दृश्य जग कुणालाही सुटलेले नाही. त्यात आपला जन्म झाला आहे, ह्याचा अर्थ की त्याचे स्थान असणार भगवंताच्या इच्छेत. 

जन्म म्हणाल्यावर संबंधांचे कार्य निर्माण झाले आणि चक्र प्रस्थापित झाले आणि द्वैताचा अनुभव स्थित झाला. हे अस्तित्वाचे कार्य म्हणायचे. असे का असते, हे कुणालाही ठाऊक नाही. आपण फक्त शुद्ध भावनेने स्वीकार करण्याची शक्ती संपादन करावी आणि शांत व्हावे. गोष्टी अशा का असतात, परिस्थिती अशी का उद्भवते, हालचाली असे का होत राहतात, हे प्रश्न जरी वारंवार येत गेले, तरी त्यांना विलीन होऊ द्यावे ह्यातच आपले हित असते. विलीन होणे कुठलीही गोष्ट म्हणजे स्वतः आपण सूक्ष्म होत जाणे, अंतर्मुख होणे आणि ते साध्य प्रस्थापित होण्यासाठी नामस्मरण सतत करावे. त्याचा योग्य तो परिणाम होतो.

हरि ओम.


श्री 

गोष्टी होत राहतात. तो अस्तित्वाचा गुण आहे. ते कसे, कधी, कुठे, का होतात - ती भगवंताची इच्छा असते.   गोष्टींच्या स्वभावावरून अणि होण्यावरून किंव्हा कुठल्याही हालचालीतून (मग ते आतील असू किंव्हा बाहेरील) आपण ठरत नाही किंव्हा सिद्ध होत नाही (संपूर्ण बौद्धिक अर्थ लावण्याची गरज नसते). अशा अनेक स्तर आहेत,जे बौद्धिक भाषेत ओळखता येत नाहीत, तरीही त्यांचा शांत मनाने स्वीकार होऊ शकतो. थोडक्यात सर्व निर्मितीचा प्रकार आणि परिणाम अस्तित्व शक्तीतून उद्भवते, त्यात आपण एक निमित्त/ घटक/ स्मरण/ भाव/ जाणीव  ठरतो. 

हे लिहिणे देखील आपल्या रूपातून निर्माण होते, अर्थातच त्याची प्रतिभा भगवंताने दिलेली असते. आपल्यातून सुरुवात करून शांती पर्यंत स्थित व्हायचे असते. हा मार्ग. आपण इथे कसे आलो, का आलो, कधी आलो, कुठून आलो हे सर्व प्रश्न भगवंताला सोपवा, म्हणजे संपूर्ण परिस्थितीचा स्वीकार करावा. हाच आपला मार्ग.

हरि ओम.

Thursday, March 12, 2026

श्री

 

श्री 

 

बदल...हा भाव असतो अनुभवात निर्माण होणारा...जो प्रकट होतो, साखळी दर्शवतो, संबंध जोडतो, परिवर्तित होतो, चक्रात राहतो. 

 

ह्या भावनेला शांतपणे स्वीकारावे. म्हणजेच की ह्या हालचालींचे बीज कुठे असते आणि कसे कार्य करते, हे स्वीकारावे शांतीने. 

 

त्या सूक्ष्म हालचालींचे बीज मोठे झाल्यावर "प्रपंच" नावाचे झाड होते ज्याचे फळे स्वतःला पचनी करायला लागतात. थोडक्यात जसे बीज, तसे झाड, तशी फळे, तसा परिणाम. 

 

सांगण्याचे तात्पर्य एवढेच की बदल हा गूढ भाव अस्तित्वाच्या कार्यात आढळून येतो. तो का असतो माहीत नाही मला. तो स्वीकारणे एवढेच आपल्या हातात असते. _माहीत नसल्या गोष्टी तरीही गोष्टींचा स्वभाव संपूर्ण स्वीकारण्याची ताकद आपल्यात असते_. ही जाणीव अत्यंत महत्त्वाची आहे असे मला वाटते विचार करत असताना. आपण इथे कसे आलो, का आलो, कुठे जाणार, का जाणार, कसे जाणार, संबंध कसे होतात, नाती का होतात, ह्याचे उत्तरे मिळाले नसले तरीही माणूस समाधानी राहू शकतो. हे शक्य आहे. विचार करावे, पण मनाची वळवळ करून घेण्याची गरज नाही. विचार कुतुहलपोटी करावे, त्यातून सिद्ध होण्याची भावना प्रकट होऊ देऊ नये...त्या भावनेशी संपर्कात असू नये. 

 

इथे असे जाणवते की विचार शक्ती ही भावना ही प्रकट करते आणि प्रज्वलित ठेवते. विचारातून भावना चक्र आणि भावनेतून विचार चक्र असा संबंध असतो. पाहिले कोण आणि नंतर कोण अशा कोड्यात पडण्याची जरुरी नाही. त्यात आपण पडतो कारण अशी अपेक्षा असते की मूळ कळले, तर त्यातून सर्व गोष्टींचा ताबा मिळवणे सोपे जाईल. ही अपेक्षा चुकीची असते असे म्हणत नाही मी, पण ती सदोष असते, त्या अपेक्षेला मर्यादा येते. 

 

समजून घेण्यापुरती सूक्ष्म काय आणि स्थूल काय असे विश्लेषण असते. पण ती रेघ नाही हुकूम सोडवण्यासाठी. तिला संपूर्ण स्वीकारून मार्ग पत्करला जातो. ह्यातून शांती भाव संक्रांत होऊ पाहते. 

 

मनुष्याने प्रगतीचा अर्थ म्हणजे वासनेवर ताबा मिळवणे असा केला आहे. त्यातून भली मोठी भीती भावना निर्माण होते. विघटित झाल्यामुळे, खूप वेगात गेल्या मुळे आणि एकलकोंडी झाल्यामुळे, जे निर्माण झालेले दिसते, ते म्हणजे exploitation of every moment to an unimaginable extreme level. कितीही केले तरी पूर्ण समाधान मिळणार नाही, जो पर्यंत आपण संपूर्ण स्वतःला भगवंताला शरण जाणार नाही. 

 

भगवंत गूढ आहे आणि तो रूप, आकार, संबंध ह्या सर्व हालचालींच्या पलीकडे त्याचे कार्य असते. कार्याचा निश्चित परिणाम प्रपंचात होतो. तो आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण चिंतेत राहतो. भगवंत आहे, तर हालचाली होणारच आणि वाट्याला प्रपंच तो येणारच आणि त्यातील सर्व प्रश्न ओघाने निर्माण होणारच आणि त्यातून शोध आणि पुढे मार्ग आणि शेवटी शांती भाव असे संक्रांत होणारच. ह्या सर्व गोष्टीला "अंतर्मुख होणे" असे म्हणतात. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अनुभव प्रत्येकाचा निराळा असतो. भगवंत त्यातून शोधायचा असतो. पूर्वी ह्या पद्धतीने भगवंत किंव्हा कुठलीही शुद्ध संकल्पना कळली, तरीही आता तशीच कळून घ्यायला हवी, हे कितपत योग्य असते? संकल्पना हा संबंध दर्शवतो. आपल्या मनोरचने प्रमाणे त्याच्या संबंधात आपण येतो, त्याला विषय करतो, व्यवहारात लागू करतो आणि साहजिकच परिणाम भोगतो. म्हणजे कुठलीही संकल्पना तसे सत्याचे दर्शन त्वरित करून देऊ शकत नाही. 

 

संकल्पना सत्याची स्वतः मध्ये शोधायला लागते आणि त्यातून मार्ग प्रत्येकाचा ठरतो. तो सांगणे अवघड, फार तर फार लवचिक आराखडा किंव्हा विश्लेषण करून सांगू शकू आपण. खरे पहिले तर जीवन तसेच समजून घ्यायला लागते आणि इतरांना तसेच अनुभव मांडून द्यायला लागतात - विश्लेषण रूपातून. It isn't prescriptive. It is symbolic. 

 

त्या अर्थाने आयुष्य विश्लेषण रूपाचे कोड आहे. म्हणजे कोडी त्रास देणार नाहीत विशेष. आपले येणे, वावरणे, विलीन होणे - हे सर्व विश्लेषण आहे. म्हणजे कार्य आहे. कार्याचा परिणाम म्हणजे दृश्याचे स्थान. 

 

हरि ओम.

 

श्री 

 

बुद्धी जर - तर च्या भाषेत प्रस्थापित असते. म्हणजे साखळीचे स्वरूप काय, उगम कसा होतो, मार्ग कोणता, परिणाम कसा होईल वगैरे हे बुद्धीचे मुख्य प्रश्न. 

 

अध्यात्म मध्ये ह्याची जरूरी असते, पण त्याच्या व्यतिरिक्त श्रद्धा भाव वाढवण्याचीही असते. म्हणजे साखळी जरी कळली नाही, तरी अस्तित्व शक्तीचे कार्य स्वीकारू शकतो आपण. म्हणजे सूक्ष्म स्थिती आणि शांती भाव आणि आपुलकी प्रस्थापित होऊ शकते. त्यासाठी एखादा _मार्ग_ पत्करायचा असतो.

 

अर्थातच सर्व सत्य आत्ताच्या स्थितीत स्पष्ट होणे कठीण. मग आपल्याकडे दोन पर्याय असतात ह्याचे - कळले नाही तर "भीती" निर्माण करावी, ताबा मिळवावे, विषय करावे, ओरबाडून घेणे हे सर्व करावे की श्रद्धा वाढवून न  कळण्याचे स्वीकार करावे (कारण कळणे किंवा न कळणे हे अस्तित्वात घडते/ त्याने अस्तित्व माध्यम ठरत नाही वगैरे), सूक्ष्म माध्यम कार्याचे स्थान स्वीकारणे आणि आपल्या हातात प्रयत्न, सैय्यम, श्रद्धा अशा गोष्टी वाढवत राहणे. थोडक्यात दृश्याचा अनुभव जरी येत असला तरी त्याच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

आपण ह्या पद्धतीनेही प्रकार काय होतो हे समजून घेऊया...

 

शांती एकच सूक्ष्म, कायम आणि सत्य माध्यम अस्तित्वात असते. त्यात विघटन होऊन, क्रिया होऊन, स्पंदनेतून वासना, विचार, भावना चक्र निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणजे वेगळे स्मरण आणि द्वैत अनुभव त्या जीवाच्या (आपल्या) ध्यानी येतो. म्हणजे चौकट, मर्यादा अशी निर्माण होते स्वतःच्या भोवती आणि त्यात आपण गुंतून राहतो. 

 

सर्वांगीण विचार किंव्हा जाणीव असणे आणि फक्त वैयक्तिक जाणीव होणे ह्यात अवतरणे, विघटन, तात्पुरतेपण, स्वार्थ, अहं वृत्ती अशा गोष्टींचे फरक होते ह्या दोन स्थितीत. म्हणून वैयक्तिक होणे स्वतःलाच जास्त त्रास देते, भीती निर्माण करते, कष्ट देते, जास्त मर्यादित किंव्हा तात्पुरते बनवते आणि तसेच विचार चक्र आणि भावना चक्र प्रज्वलित ठेवते. 

 

अध्यात्माच्या पातळीवर, असे सांगतात की जीव इतका मर्यादित होतो, की विचार, भावना, देह ह्या वासनेमुळे तो कष्टी होतो. प्रारब्ध. त्याला दृश्याचे व्यसन लागते आणि कितीही सत्य त्याला सांगितले, तरीही त्याला पटत नाही , त्याला भीती वाटते आणि त्यापासून तो दूर जातो आणि खूप बडबड करून स्वतःचे समर्थन करतो. म्हणून सत्य सांगणे हा मुद्दा नाही. त्याचा योग्य परिणाम इतरांवर होईल का, हा आहे. त्यासाठी आपण कार्य करावे, प्रयत्न करावे आणि शांतीने सोडून द्यावे. 

 

तसंच , जाणीव जर सूक्ष्म झाल्या असतील, तर त्या सूक्ष्मपणांचे स्पंदने इतरां पर्यंत सांगणे कठीण. म्हणजे दृश्यात व्यवहार करताना, सैय्यम ठेवायला लागतो आणि आपण शांत राहायला लागते. त्या पद्धतीने शांत असण्याचा आणि दृश्यात व्यवहार करण्याचा संबंध सरळ नाही, गूढ आहे आणि हे गुढत्व देखील सांगणे कठीण. जर ते कविता सारखे किंव्हा विश्लेषण पद्धतीने सांगितले तर ठीक असते. थोडक्यात सर्व लवचिक आणि विश्लेषण पद्धतीने समजून घ्यावे, ऐकून घ्यावे, समजून देणे. 

 

विश्लेषण मध्ये प्रयत्न आणि सैय्यम आणि श्रद्धा आपली, परिणाम किंव्हा फळ भगवंताचे जे आपण शांतीने स्वीकारू. Because the connection or relationship of a cause with an effect is mysterious beyond any plain logic. Here "logic" is not math or the intellect, but a way of sequencing or relating things based on inner wisdom. More subtle is the state of mind, more profound is the logic of awareness of things. Logic after all, is a relationship of all things in different states of being. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

वरील लेखाचे बरेच अर्थ निघून येतात दृश्यात वावरताना...

 

गोष्टींचा हेतू काय असतो आणि कुठले हेतू ठेवून त्या केल्या जातात हे ओळखावे. जर अहं भाव असेल, ह्याचा अर्थ आपण कोषात आहोत. जर अहं भाव नसेल, त्याचा अर्थ की सर्वांगीण विचार मनात येऊ घातले आहेत. 

 

मनाच्या स्वभावामुळे आपण गोष्टींचे "अर्थ" लावतो. मुद्दामून त्रास होण्यासाठी जर गोष्टी वाट्याला येत असतील (असा समज करून घेतला असेल), तर आपण संकुचित आहोत. जर असे खरे वाटत असले की सर्व गोष्टी भगवंतामुळे, त्याच्या इच्छेमुळे आपल्या ध्यानी येत असतात, तर समजून घ्यावे की मन शांत झालं आहे. म्हणून अर्थाने भाव शांत किंव्हा अशांत ठरतो, त्या गोष्टीमुळे नाही. ह्याचा अर्थ हा की नातींचे स्वरूप, कामाचे स्वरूप, जीवनाचे स्वरूप कसेही जरी आले किंव्हा बदलत गेले, तरीही त्याच्या पाठीमागचा अर्थ असा आपण जाणिवेत आणू शकतो, की त्यातून शांती रस लाभू शकेल. 

 

देहबुद्धिशी संबंधित विचार आणले, तर खूप तात्पुरतेपण आणि भीती भावना निर्माण होईल. आत्मबुद्धीशी निगडित विचार ध्यानी आणले, तर शांती भाव संक्रांत होऊ शकेल. 

 

सत्याचे कार्य निश्चित असते. पण ते आपल्या मर्यादेच्या भूमिकेतून जाणिवेत आणायला लागते...इथे प्रयत्न, सैय्यम आणि परीवर्तन होण्याचा इशारा आहे.

 

जेवढी मर्यादा जास्त, तितके अनेक विषय, अनेक कोडे, अनेक प्रकारचे गुंतून राहणे दृश्यात, अनेक धावपळी, अनेक अपेक्षा, स्थळ आणि काळाची भीती वगैरे. जेवढी जाणीव विशाल, तितक्या कमी धावपळी, कमी कोडी, कमी अट्टाहास, कमी अपेक्षा, जास्ती तृप्तता, जास्त स्वीकार होण्याकडे प्रवृत्ती, जास्ती आपुलकी वगैरे. 

 

जेवढी जास्त मर्यादा, तेवढा बहिर्मुखपणा जास्ती, तेवढे इतरांमध्ये दोष शोधण्याचा अट्टाहास आणि इतरांना नावे ठेवण्याकडे कल. जेवढी विशाल मनोरचना, तितके अंतर्मुख होण्याकडे कल, अट्टाहास कमी, स्वतःचा दोष काढण्याकडे कल, इतरांचा स्वच्छ भावनेने स्वीकार वगैरे. 

 

तात्पर्य - आतील वृत्ती हा विषय समजू नये. सर्व स्थिती, स्तर, संबंध भगवंताने दिले आहे, हे ओळखणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही विचार....

 

क्रियेतून किंवा त्वरित करून किंव्हा प्रश्न विचारून सिद्यत्व होते का? जर मूळ सवाल काय आहे हे ओळखता आले, तर सर्व कार्य म्हणू शकू आपण. त्या कार्यात आपण होणे, शोध, प्रश्न - सर्व काही येते.

 

सारे गोष्टीना प्रवाह, परिवर्तन, अमर्याद, शांती भाव असे स्वरूपात बघणे शक्य असते. गोष्टी म्हणून त्या अर्थाने खऱ्या किंव्हा जीवाशी संबंधित नसतात, ते भगवंताच्या कार्यातून येत राहतात. गोष्टींच्या प्रवाहात मी आणि भगवत भाव ह्याचे मिश्रण असते. 

 

ह्याने असेही कळून येते, की मन काहीही निर्माण करू शकते. निर्मिती मध्ये प्रतिभा, प्रक्रिया, स्मरण, भाव, साखळी, गुंतून राहणे हे सर्व काही आले. स्वतःला निर्मिती पेक्षा वेगळ बघायला हवे. म्हणजे निर्मितीतून मी ठरत नसतो. _मी_ ही संकल्पना असते, जी होते आणि बदलत राहते. 

 

भगवंताच्या इच्छेपोटी, तो स्वतः द्वैत दृश्यात येतो, विघटित होतो, सर्वां मध्ये येतो आणि आपल्या रूपात मिसळतो. म्हणजे त्याला दृश्याचा अनुभव घ्यायचा असतो आणि म्हणून तसे अनुभव निर्माण करतो, त्याच्या लीला मधून. संसाराला त्या पद्धतीने किंव्हा त्या भावनेने ओळखावे. 

 

आपल्या कार्याला अमर्याद, निरहेतू, स्वच्छ रंग असावा. प्रत्येक क्षण कार्य आहे. त्यातील येणारे विचार, भावना, क्रिया, वस्तू, नाती, विषय - सर्वांना अमर्यादित भूमिकेतून बघावे, देहाच्या आणि रूपाच्याही पलीकडे जाऊन ओळखावे. 

 

Transcendence is a flow. It is not a proof or a stop point. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही विचार...

 

सर्व बदल, स्थळ, काळ, परिस्थिती अनुभवणे. ते थांबवण्याची गरज नाही आणि तिथे गुंतून राहण्याची गरज नाही. प्रत्येक क्षणात, स्थळात, काळात काहीतरी करायलाच हवे, असे नसते. नुसते ध्यान, चिंतन, स्वस्थ बसून राहिले, तरीही खूप फरक होतो अस्तित्वात, जो जीवातून सर्वांगीण दिशा पसरलेला असतो. That is, I am not bound to anything or by anything. I am beyond all constructs, beyond all barriers, all spaces, all times, all actions, all connections. None of these define me or I identify particularly with none. थोडक्यात, मर्यादित हेतूच्या पलीकडे भाव स्थिर असणे. 

 

स्वस्थता ह्या विचारातून किंव्हा जाणिवेतून येते. मला काहीही माहित नाही, आणि त्यात समाधान आहे. मनाच्या व्यतिरिक्त कार्य असते, हे असण्यात आणि ओळखण्यात आणि स्वीकारण्यात समाधान असते. 

 

आपण परिस्थितीला पुरून उरत नाही. कोण काय म्हणते आहे, कधी, का, कुठल्या हेतूने, हे माहित नसले तरी आपली शांती त्यावर निर्भर नसते. शांती कशावरही निर्भर नाही. मी विलीन होऊन शांती लाभते. म्हणून विलीन होण्याच्या मार्गात आलेल्या अवस्था ह्यांना शांतीने सामोरे जाणे.

 

हरि ओम.