Sunday, April 05, 2026

श्री

 श्री 


आपण दगडासारखे झालो आहोत... निगरगट्ट. करुणा जागी होण्यासाठी कितीतरी प्रयत्न दिसत आहेत social media वर होत असताना. मार्ग तसा खूप सोप्पा आहे, पण त्यासाठी आपण त्याग करायला शिकायला हवा. म्हणजे वेळ देणे, ऐकून घेणे, प्रोत्साहन देणे, प्रतिभा मनात संक्रांत करणे, हळुवार होणे, अट्टाहास सोडणे, घाई न करणे, शांत राहणे, समजून घेणे, श्रद्धा वाढवणे, मदत करणे, हेतू सोडून देणे, वगैरे. 

जर सध्याची जीवनशैली असे करण्यात असमर्थ ठरत असेल, तर काय उपयोग ह्या जीवनशैलीचा?! मग स्वतःवर ही जबाबदारी होते की अंतर्मुख करुणा संक्रांत करणे, बाहेर काहीही जरी घडामोडी होत असले तरीही...

हरि ओम.

श्री

 श्री 


मन, ही गोष्ट, काहीही निर्माण करू शकते आणि कशातही गुंतून राहू शकते. ह्याचा अर्थ हा, की मनाचा संबंध अस्तित्व शक्तीशी कायम स्थित असते. म्हणून त्या शक्तीचा परिणाम अर्थातच मनात स्थित राहणार. 

सांगण्याचे तात्पर्य हे, की खूप गूढ स्थितीतून विचारांचे निर्मिती ठरते आणि त्यात बऱ्याच भावना देखील निर्माण होत राहतात. ह्या प्रक्रियेत जीवाचे स्मरण कुठेतरी एक _भाव_ निर्माण होतो आणि त्यामुळे तो भाव चक्रात गुंतवून ठेवतो. त्या भावामुळे सर्व काही दिसते, अनुभवात येते, परिणाम भोगला जातो आणि नाना प्रकारच्या गोष्टीना _सामोरे जाणे भाग पडते_. 

काय करावे ह्या प्रक्रियेला?!! हा सवाल आहे आपल्यासाठी. ह्याला काही उत्तर आहे का? _मार्ग_ असतो.  त्या मार्गावर गेल्याने शांती भावात मन परिवर्तित होते. 

वेळ कसे घालवावे, फुकट घालवण्याची संकल्पना, जबाबदाऱ्या, खंत, राग, उतावळेपण, निवांतपणा, तोच तोच विचार परत आठवणे - ह्यात सर्व काही अभिप्रेत आहे. काही विचार खूप कठीण ठरतात पचवायला आणि ते पचवण्यासाठी कधी कधी परत परत तो विचार ध्यानात येऊन पचायला लागतो....रवंथ केल्या सारखे. असे म्हणतात की गायला ४ पोट तरी असतात रवंथ करायला. मनाला कितीतरी पोटे असतील असंख्य वेळा रवंथ करायला! म्हणजे आत जाऊन, बाहेर आणणे आणि परत आत नेणे, हे आपले मन करेल आणि ते त्याला करू द्यावे.  त्याचा परिणाम प्रत्येक जीवात वेग वेगळा होतो. ते ही होऊ द्यावे. त्यातून शांतीचा मार्ग स्थित असतो.

हरि ओम.

Shree

 Shree 


There is no need to doubt the _becoming and engaging_ of a relationship or a feeling or a form. It can appear as anything in the process and can take any position. _Should it_ lead somewhere and be something is a new question perhaps in today's times of urgency. Should it _imply_ anything?! Should it just be anything without a stance? Should it always start with an intent?!..

I think that there is an existence that _creates_ things in it. That requires perhaps no formal intent. Therefore, creation can span something unknowingly, mysterious to any intent defined within the process. And both are acceptable as triggers or as processes or as a combination. 

A judgement needn't be passed on creation. Thoughts may disagree on the meanings of things, but not for their becoming....! Becoming would happen nevertheless.

Hari Om.

Saturday, April 04, 2026

श्री

 श्री 


आधार भगवंत कार्याचा असावा नेहमी, म्हणजे अंतर्मुख अनुभव स्थित करावे. आपण दृश्याचा, भितीचा आधार घेतो, म्हणून तसे परिणाम होत राहतात आणि संबंध जोडले जातात. आपली हाव काही सुटत नाही, ह्याचे कारण म्हणजे भीती. ती हाव शिथील होण्यासाठी शांती भाव आतून प्रकट व्हायला हवे. 

कार्य खूप सूक्ष्म स्तरातून होत असते आणि आपण कितीही विचारातून बांध करायचा ठरवला, तरी ते कसेही आरपार आत येते आणि विचार चक्र फिरवते! ह्याचा अर्थ हा, की विचारही सूक्ष्म स्तरातून होत राहतात, आपणही. म्हणून सर्व घडामोडींची चालना भगवंत देतो, हे ओळखावे आणि शांतीने स्वीकारावे. 

होणे, वावरणे, बदलणे, संबंधित येणे, प्रवाहात राहणे, निघून जाणे - हे म्हणजे *कार्य*. ते होत राहणार आणि निरनिराळे रूप आणि आकार निदर्शनास येणार. ते होणारच. म्हणून शुद्ध आणि शांती भावनेतून सर्व बघावे आणि कार्य करावे. कार्य म्हणजेच शांती भाव स्थित होऊ देणे आणि त्याला कसलीही अट लावू नये.

हरि ओम.

Shree

Shree 

Freshness and newness or uniqueness is a quality of experience we create by existence. This is to be accepted with full gratitude and delight. 

As a person, there isn't any need to justify anything or prove anything or state a value. These will materialize automatically. Therefore the measure of quality is a given or created by inheritance. 

Secondly our thoughts will create expressions whenever a chance appears. Whether they should tie or relate to a context, to me, seems a feeble point nowadays. There would be an agreement or not - is immaterial for expression. Expression happens regardless of considerations of approvals of any kind. A thought has to come and create a response is *NOT* mandatory. Existence should create a thought, is also *NOT* a must. Thought's creation is God send. 

This is an important attitude for life and architecture because whose context are we referring to?!

Hari Om.

श्री

श्री 

 _अस्तित्व हा *भाव* असतो_. शुद्ध अस्तित्व पूर्णपणे अंतर्मुख, सूक्ष्म, विशाल, कायम, अक्षर अनुभव असतो किंव्हा कार्य असते. नाम घेत गेल्याने मनाची रचना तशी होत जाते. तशी होत असताना, त्या मार्गावर जात राहताना, प्रत्येक टप्प्यात द्वैताचा अर्थ आणि त्याच्याशी संबंध बदलत जातात. शेवटी आसक्ती पूर्ण विलीन होते आणि मनाची शक्ती पूर्ण सूक्ष्म होऊन स्थिरावते आणि शांती भाव संक्रांत होते. ह्याला बहिर्मुखापासून सुरुवात करून अंतर्मुख होणे असे म्हणतात. मन ही अस्तित्वाची स्थिती आहे. ती स्मरण प्रज्वलित ठेवते. ते स्मरण काहीतरी करण्यास परावृत्त करते. हा स्वभाव धर्म झाला मनाचा आणि त्यामुळे परिणाम होतात आणि मन कष्टी होते. 

वरील मनाचा स्वभाव स्वीकारायला लागतो. मनात येणारे विचार खूप गूढ अर्थाचे असतात, जसे की काल, आज, उद्या, विश्लेषण, संकल्पना, स्थळ, काळ, गेलेले लोकं, देवाची संकल्पना, प्रश्न, कोडी, शोध, स्वीकार, वगैरे. ह्या सर्वांगीण अर्थाने मन जिवंत राहतं आणि त्याचे कार्य चालू असते. एखाद्या घटकेचा विचार करू नये, हे सांगणे वेडेपणाचे असते, कारण विचार काय आणेल त्याच्या बरोबर हे सांगता येणे अवघड. म्हणून कुठलाही विचार स्वीकारायला लागतो. त्याला दाबून टाकू नये. 

विचारांची निर्मिती गूढ सूक्ष्म अशा स्तरातून होत असते, म्हणून विचारांची शैली, चक्र, संबंध, अर्थ, क्रियेचे स्वरूप त्या वासनेवर अवलंबून राहते. भलेही नंतर आपल्याला असे वाटले की क्षण वेगळ्या योग्य पद्धतीने घालवलेले चालू शकले असते (खंत), तरीही त्या क्षणाला *तोच* विचार येणे अभिप्रेत असतो, म्हणून तो येतो आणि परिणाम करतो. त्या अर्थानी, ती दैवी इच्छा ओळखावी. 

सावध होण्यासाठी आणि विपरीत परिणाम न होण्यासाठी, जे विचार येऊ पाहतात, त्यांना "पाहुणे" प्रमाणे बघणे, हाताळणे, स्वीकारणे आणि पुढे निरोप घेणे (हा संबंध) प्रचितीस आणायला लागतो (relationship *with* the thought itself). भगवंताच्या चिंतनाने असा संबंध साध्य होतो, असे सुचविणे आहे.

हरि ओम.


श्री 

उद्या मी विलीन होणार. जग त्याच्या रीतीने चालू राहणार. हाच नियम आहे आणि भगवंताची इच्छा आहे. जग असणे, वावरणे, हालचाली होणे, बदल होणे, गतिमान होणे हा सर्व भगवत इच्छेचा प्रकार असतो. आपल्याला त्या इच्छेची प्रतिभा मनात संक्रांत होऊ द्यायची असते. आपण स्थिर होणेच म्हणजे प्रतिभा आत्मसात केली गेली. स्थिर होणे आणि प्रपंचातील प्रसंग, विषय, अडचणी, समस्या, व्याकुळता, देहातील स्थिती ह्यांचा काहीही सरळ बौद्धिक संबंध नसतो आणि तो जोडूही नये. आपण काहीही घटकांना देणे लागत नाही सिद्ध होण्यासाठी. आपण फक्त भगवंताला देणे लागतो, म्हणून त्याचेच चिंतन करावे. स्वतः सिद्ध भाव आत्मसात होणे गरजेचा आहे.

प्रपंच आहे तसा असू द्यावे. प्रसंगे आणि परिस्थिती जश्या येत राहतील, तश्या येऊ द्यावे. त्यात भगवंताचे नामस्मरण कायम सुरू ठेवावे. न स्थळ, न काळ, न कृती - काहीही माझ्या हातात नसते आणि त्यांनी मी ठरत नसतो, हे पक्के ओळखावे. 

भगवंताचे चिंतन काय रूप दर्शनास आणेल, ही त्याची इच्छा. तो योग्य करेलच.

हरि ओम.


श्री 

सगळं गोल असते, म्हणजेच भगवंताचे कार्य असते आणि त्याचा विलास दर्शवते. 

लहानपण ते म्हातारपण म्हणजे परिवर्तित होणाऱ्या गोष्टी, ज्या गोल असतात. 

घर ते काम ते घर असा वेळ गोल असतो, कप्पा नाही. 

नाती, मित्र, मैत्रिणी, लोकं आणि त्यांच्याशी व्यवहार सर्व गोल असते, संबंधित असते. 

शिक्षणातील मुले, त्याचे प्रश्न, प्रतिक्रिया, कामाचे स्वरूप, विघ्न सर्व गोल असते...त्यांना लेखू नये. 

रात्र, पहाट, दिवस, दुपार, संध्याकाळ, रात्र - सर्व वासना गोल असतात. कुठलाही क्षण येतो आणि निघून जातो आणि इतर क्षणांना संबंधित आणतो. 

थंडी, उन्हाळा, पावसाळा हे ऋतू गोल असतात. ते येत राहतात आणि जात राहतात. 

आधीचे जन्म, आत्ताचा जन्म आणि नंतर येऊ पाहणारे जन्म गोल असतात, एकमेकात संबंधित असतात. आपण घाबरू नये. आज केलेले सत्कर्म कधीतरी उत्तम फळ देतेच. कर्म आणि फळ ही मर्यादित संकल्पना न बघता, सर्वांगीण प्रकार असते, हे ओळखावे. 

भगवंत भाव, जीवाचे स्मरण आणि भगवंत भाव हे गोल स्मरण असते. तो प्रवास पत्करायला लागतो. 

राग, दुःख, खंत, प्रेम हे परिवर्तन पावणारे गोल वृत्ती असतात. एकात गुंतून राहू नये...सर्वांचे रुपांतर प्रेमात होऊ द्यावे. 

मोकळा किंव्हा रिकामा वेळ, खूप धावपळ आणि परत मोकळा वेळ हे गोल असते. म्हणून जो क्षण येईल, तो मौल्यवान आहे, हे ओळखावे. 

शुद्ध स्मरण, विस्मरण आणि परत शुद्ध स्मरण हा गोल अस्तित्व भाव आहे. त्यात प्रत्येकाला जायचे असते आणि त्यातून मार्ग शोधायला लागतो.

हरि ओम.

Friday, April 03, 2026

श्री

 श्री 


आपले विचार, आपले रूप, आपली भावना शांत, सूक्ष्म आणि स्वावलंबित करावी. म्हणजे स्थळ आणि काळाशी त्याचे संबंध शांतीचे होऊ द्यावे. शांती हा एकमेव संबंध, एकमेव कार्य, एकमेव स्मरण, एकमेव अनुभव, एकमेव अस्तित्व *स्थित* व्हायला हवे. त्याला "स्वतः सिद्ध" अशीही उपमा दिलेली आहे. 

स्थिर होण्याचा प्रवासात, अगोदरच्या टप्प्यांना स्वीकारावे लागते. टप्प्यांची सुरुवात दृश्यातून होते आणि एक, एक करत ६ सूक्ष्म स्थितींचे अनुभव (संबंध) आत्मसात करावे लागतात. ह्या मार्गावर जाण्याचा किंव्हा आत्मसात करण्याचा निश्चय व्हावा लागतो. 

शांती स्थित होण्याच्या मार्गावर, दृश्याला निर्विश करणे असते. म्हणजे प्रवाह, हालचाली, बदल,  संबंधांचे रूप येऊ द्यावे आणि जाऊ द्यावे आणि हे सर्व हेतू न राखता त्याकडे नुसते शांतीने बघावे. प्रवाह येत राहणार आहे प्रत्येक क्षणी, हे ओळखावे आणि स्वीकारावे. मग मी कुठेही गेलो किंव्हा एकेठिकाणी असलो, प्रवाह येत राहणार आहे. म्हणजे कुठलाही क्षण स्थिर नसतो आणि तो एका साखळीचा किंव्हा चक्राचा घटक असतो. जो काही क्षण असतो, त्याचे लागेबांधे इतर असंख्य गोष्टींशी, स्तरांशी जुळलेले असतात, जे पूर्णपणे बुद्धीच्या ध्यानीही येत नाही. म्हणून एकंदरीत भगवंताच्या अस्तित्वामुळे क्षणाची निर्मिती होत असते. क्षणाची निर्मिती म्हणजे प्रवाहाची निर्मिती, संबंधांची निर्मिती, माझी निर्मिती...

ह्या सर्व घडामोडी मध्ये भगवंताचे अनुसंधान टिकवणे महत्त्वाचे ठरते.

हरि ओम.


श्री 

आजच्या जमान्यात क्षण स्थिर करावा, अशी अपेक्षा फोल ठरू शकते. ह्याचा अर्थ स्वार्थी हेतू किंव्हा अपेक्षातून किंव्हा अट्टाहासातून क्षणाचा अर्थ लावणे स्वतःला कष्टी करू शकते. 

जे होत असते, ते होऊ द्यावे. कशालाही अडवू नये. ह्याचा दुसरा अर्थ हा की सर्व भगवंताच्या इच्छेने गोष्टी स्थित होतात, हे ध्यानात आणावे आणि स्वीकारावे. असे केल्याने शांती भाव कायम आपल्या बरोबर स्थित राहतो. ह्याचा तिसरा अर्थ हा, की आपण सूक्ष्म स्थितीत पदार्पण करतो, शांत होतो, पलीकडे होतो, श्रद्धा वाढवतो, अंतर्मुख होतो. 

ह्याचा एक मार्ग म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

शुद्ध, स्वतःसाठी कर्तव्य करावे, आणि त्यातून देण्याची व्याख्या संपादन करणे ह्यातून शांती निश्चित मिळू शकेल. मी, तू, ही संकल्पना आहे. संबंध कार्य आहे. दृश्य काल्पनिक आहे. सत्य जे असते, ते आत्मसात करावे. मुख्यतः *सत्य*, असे काहीतरी असणार आहे आणि त्याचा संबंध आपल्या जीवनाच्या हालचालीत येत राहणार आहे, हे जीव ओळखू शकतो.  तिथून निश्चय होतो. शोधातूनच आणि परिणामांच्या प्रकारातून ह्या निश्चय पर्यंत आपण पोहोचतो. पुढे मार्ग असतोच. तिथेही निश्चय पदोपदी लागतो. 

सत्याचा स्वतःमध्ये परिणाम विलक्षण असतो. परिणाम दाखवण्याची किंवा सांगण्याची जरुरी नसते. परिणाम कुणावर अवलंबून राहण्याचीही गरज नसते. योग्य परिवर्तन होतेच. आणि शुद्ध होणे, ही शक्ती आहे, जी दृश्याशी आसक्ती बाळगत नाही किंव्हा दृश्याचा विपरीत परिणाम करून घेत नाही. त्यासाठी सतत भगवंताचे स्मरण प्रज्वलित ठेवत राहायला लागते. तेच स्मरण आत परिवर्तन आणते.

Wednesday, April 01, 2026

श्री

श्री 

अस्तित्व, ही स्थित गोष्ट आहे. तिच्यापासून होणाऱ्या गोष्टी, कार्य, रूप, आकार, प्रवाह हे स्थित असतात. भगवंताची _इच्छा_ म्हणून हे सर्व विश्व, त्यातील घडामोडी, त्यातील अनंत जीव जे संबंधित असतात, येतात आणि निघून जातात. 

भगवंताची इच्छा अनुभवात आणायला लागते. म्हणजेच आपण सूक्ष्म होणे आणि विलीन होणे येते. त्यावरून शांती भाव प्रस्थापित होते. 

आपण कुठला भाव प्रज्वलित ठेवतो, हा प्रश्न आहे. तो भाव सूक्ष्म स्तरातून येत असतो, म्हणून तो गूढ असतो किंवा त्याला भगवत इच्छा संबोधले गेले असते. भावाचा उगम, कार्य, संबंध हे गूढ आहे. गूढ म्हणजे ह्याला फक्त शुद्ध, निःस्वार्थी हेतू असतो. म्हणून एकातून अनेक अश्या गोष्टी घडत राहतात. 

ह्याचे आकलन होण्यासाठी नामस्मरण करावे.

हरि ओम.


श्री 

संबंध काही वाईट नसतात. त्यांना टप्पा म्हणून, कर्तव्य करत शांत होणे, हा मार्ग समजावा आपला. सत्यात जरी "मी" सर्व गोष्टींच्या पलीकडे असलो आणि त्यातून सर्व काही होत असलं, तरीही "माझ्या निर्माण झालेल्या संबंधातून" शांतीकडे वाटचाल करायला लागते. म्हणजे संबंध स्वीकारावे लागतात, स्थिती स्वीकारावी लागते, परावलंबित स्थिती आत्मसात करावी लागते, आपले देणे असते जे द्यायला लागते, भोग स्वीकारावे लागतात, दर्शन बघायला लागते, अनुभव स्वीकारावे लागतात, त्यातील सारे घटक विषय, शंका, प्रश्न स्वीकारावे लागतात, आणि कार्य करत राहायला लागतं.

हरि ओम.

Sunday, March 29, 2026

Shree

Shree 

Each of us has _inherited_ a state _for_ existing. Inherited is to be felt or realized and it ought not to be seen as a tool for application. Inheritance goes beyond application - it is what we are. No justification is required for this; no proof; no judgement; no evaluation. 

The question of 'why' is within a specified limit, which has been received through inheritance itself and therefore the mystery of inheritance will continue to exist. 

I don't think that there is any reason to be worried about this situation that we are into or what gets felt. I don't think that there is a purpose for a search...
Search happens _automatically_ because of inheritance. We craft a reason (for the satisfaction of the mind) to be here and that may also be an automatic undertaking to calm us. 

In this state there is always going to be an _imagination_ of things. As much as I consider myself real, so is imagination that creates this real - self. Therefore, the experience of being/ reality is a loaded and a mysterious idea. The mystery is approached or understood or realized through art, poetic imagination, analysis, decoding of the situation, breadth, work, relations, and so on. Each path can suggest something different while also be connected with other paths. So we have something in themselves and also as connections. 

We are of many moods, turmoils, dents, feelings, fears, annoyances, silences and those would come and go. We are unlimited in all such vibrations. 

Hari Om.

श्री

 श्री 


सूक्ष्मातून कार्य होणे ही बुद्धीच्याही पलीकडे स्थित असणारी क्रिया असते. बुद्धीची शक्ती देखील बऱ्याच स्तरातून *प्रकट* झाली असते म्हणून तिला देखील वेगळ्याच शक्ती कार्यरत करत राहतात! म्हणजे "मी" आणि जे काही मी संबंध जोडतो आणि व्यवहार करतो, त्या सर्वांचे बीज सूक्ष्म स्तरात असते, म्हणून तिथ पर्यंत शुद्ध व्हायला अभ्यास लागतो स्थिरतेचा. मुळात अभ्यास जो आहे, तो अहं वृत्ती किंव्हा बुद्धीच्या किंवा रूपाच्याही पलीकडे शांत होणे, सूक्ष्म होणे, सत्य होणे असा आहे. आपण समजतो, तसे अस्तित्व नसते. आपला भाव किंव्हा स्मरण वेगळेपण आणि तात्पुरतेपण _प्रज्वलित_ ठेवत राहते म्हणून त्या प्रकारच्या संकल्पना, विचार, भावना, संबंध प्रकट होत राहतात आणि गुंतून ठेवतात आपल्याला. एका भूमिकेतून (role play), व्यवहार आपल्या हातून घडतो, ज्याचा उगम विचारांना कळत नाही. हे गूढ असते, म्हणून निश्चय असा हवा की शांत होऊ शकू, नाही की अट्टाहासाने सिद्ध व्हावे किंव्हा राग राग करावा किंव्हा दुःख कुरवाळत बसावे. 

म्हणून स्वतःला आणि इतरांना माफ करावे. घडामोडीतून किंव्हा हालचालीतून कुणी ठरत नसते आणि कुणालाही लेखण्याची गरज नसते. आपण सर्वजण एका प्रवासात आहोत. त्या प्रवासात सत्य आपल्याला योग्य वेळ आल्यावर कळणारच आहे. तो पर्यंत सैय्यम ठेवावे आणि श्रद्धा वाढवावे. 

आपण कोण आहोत,कसे जगतो, कुठे जायचे आहे,काय हेतू हवा हे सर्व काल्पनिक आहे (idea diagram). म्हणजे कल्पना जिवंत असते, ज्यात स्वतःचा भाव संबंधित असतो आणि त्या प्रमाणे व्यवहार करतो! So the idea isn't the creation (only) of the mind; but it creates the mind itself! So the idea ought to come from more subtle states than the mind. Idea isn't an identity. It is an existence. Mind isn't everything. Idea is. 

श्री 

सूक्ष्मातून कार्य होणे ही बुद्धीच्याही पलीकडे स्थित असणारी क्रिया असते. बुद्धीची शक्ती देखील बऱ्याच स्तरातून *प्रकट* झाली असते म्हणून तिला देखील वेगळ्याच शक्ती कार्यरत करत राहतात! म्हणजे "मी" आणि जे काही मी संबंध जोडतो आणि व्यवहार करतो, त्या सर्वांचे बीज सूक्ष्म स्तरात असते, म्हणून तिथ पर्यंत शुद्ध व्हायला अभ्यास लागतो स्थिरतेचा. मुळात अभ्यास जो आहे, तो अहं वृत्ती किंव्हा बुद्धीच्या किंवा रूपाच्याही पलीकडे शांत होणे, सूक्ष्म होणे, सत्य होणे असा आहे. आपण समजतो, तसे अस्तित्व नसते. आपला भाव किंव्हा स्मरण वेगळेपण आणि तात्पुरतेपण _प्रज्वलित_ ठेवत राहते म्हणून त्या प्रकारच्या संकल्पना, विचार, भावना, संबंध प्रकट होत राहतात आणि गुंतून ठेवतात आपल्याला. एका भूमिकेतून (role play), व्यवहार आपल्या हातून घडतो, ज्याचा उगम विचारांना कळत नाही. हे गूढ असते, म्हणून निश्चय असा हवा की शांत होऊ शकू, नाही की अट्टाहासाने सिद्ध व्हावे किंव्हा राग राग करावा किंव्हा दुःख कुरवाळत बसावे. 

म्हणून स्वतःला आणि इतरांना माफ करावे. घडामोडीतून किंव्हा हालचालीतून कुणी ठरत नसते आणि कुणालाही लेखण्याची गरज नसते. आपण सर्वजण एका प्रवासात आहोत. त्या प्रवासात सत्य आपल्याला योग्य वेळ आल्यावर कळणारच आहे. तो पर्यंत सैय्यम ठेवावे आणि श्रद्धा वाढवावे. 

आपण कोण आहोत,कसे जगतो, कुठे जायचे आहे,काय हेतू हवा हे सर्व काल्पनिक आहे (idea diagram). म्हणजे कल्पना जिवंत असते, ज्यात स्वतःचा भाव संबंधित असतो आणि त्या प्रमाणे व्यवहार करतो! So the idea isn't the creation (only) of the mind; but it creates the mind itself! So the idea ought to come from more subtle states than the mind. Idea isn't an identity. It is an existence. Mind isn't everything. Idea is. 

हरि ओम.

Thursday, March 26, 2026

श्री

श्री 

 

अस्तित्व माध्यम "असते" आणि त्यावरून त्या माध्यमाचे "कार्य" स्थित असते. ते कार्य म्हणजे अनंत निर्माण क्षमता आणि dnyan क्षमता. तो अनंत अर्थाने वाहून भरलेला आहे. तो सगळीकडे असतो, सगळीकडे भरलेला आहे, सगळ्या काळात आणि सगळ्या रूपात असतो. 

 

त्याला ओळखण्यास, जाण्यास, जवळ होण्यास, त्याचे सतत चिंतन करावे लागते. जशी वासना सतत आपल्या बरोबर येते आणि त्यावरून परिस्थिती देत राहते (वासनेतूनच आपला जन्म झाला असतो आणि अनुभव ध्यानी येत राहतात), तसंच नामस्मरणाने भगवंताची जाणीव आणि कार्याची आठवण सतत आपल्या बरोबरीने येत राहतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीत (आतील किंव्हा बाहेरील), भगवंताचे स्मरण चालू राहू द्यावे. त्यांनीच मनाला स्वस्थता प्राप्त होईल. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

शंका घेत, चिकित्सा करत, कोडी सोडवत भगवंताचे चिंतन _बरोबरीने_ करावे. भगवंताचे चिंतन आपल्या रुपावर आधारलेले ठेऊ नये...म्हणजे रूप जे काही दाखवेल, _त्यावरून_ भगवंताला ठरवू नये (त्याला मर्यादेत जाणून घेऊ नये). त्यावरून असे ओळखावे की रूपाच्या किंव्हा बुद्धीच्या तर्काने भगवंत मांडणे कठीण...ह्या प्रयत्नाला टप्पा मानावे. टप्पा ह्याचा अर्थ की सर्वांगीण चिंतनाचा प्रभाव आणखीन खूप विशाल असतो जो कुठल्याही घटकेच्या पलीकडे जातो. म्हणून श्रद्धा ठेवावी. योग्य अनुभवातून भगवंताचे दर्शन होईल.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

भगवंताचे कार्य असते, आणि ते गूढ असते. म्हणून ते कसे, कधी प्रकट होते, हे स्वीकारावे शांतीने.

 

विविधता आपल्या अनुभवात राहणार. सर्व विविधता एका सत्य माध्यमातून प्रकट होतात आणि संबंधित राहतात. मग कुणी ओरडेल, रागावेल, व्यवहार करेल, गाणी गाईल, चित्र काढेल, खेळेल...सर्व एकाच माध्यमातून येत राहते. ही जाणीव प्रज्वलित ठेवण्यासाठी नामस्मरण करत राहावे. आपले वासना, पूर्वीच्या आठवणीत राहणाऱ्या गोष्टी, पुढच्या गोष्टी, संबंध, हे सर्व मान्य आहे मला...तरीही व्याकुळ होण्याची गरज नाही. अभ्यासासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत. आपण शांत रहावे. 

 

कशालाही धरून रहाण्याची गरज नसते. सर्व भगवंताचे आहे, म्हणून ध्यानी गोष्टी येतील आणि जातील प्रवाह सारखे, पण सर्व प्रवाह भगवंताचे असणे दर्शवते. म्हणून हालचालींवर चिंता करू नये. 

 

मी ही भगवंताकडून आलो आहे आणि त्यामुळे अनुभवांचे स्थान ध्यानी प्रकट होत राहते. अनुभवांमुळे संबंध येणार आणि त्याने विषय, कोडी प्रकट होतील. व्याकुळता येईल...हे सगळं होईल.

 

ह्या सर्व घडामोडींना महा कारण आहे, जे भगवंत ठरवतो. 

 

सुरू, शेवट, मध्य, साखळी, त्याचे स्वरूप, स्थळ, काळ ह्यावर टीका ठेवू नये किंव्हा दोष देऊ नये. 

 

मी, भाव,स्थळ, काळ, क्रिया माझ्या हाथी नसते...माझा हक्क त्यावर नसतो. म्हणून कर्तव्य करावे आणि शांत रहावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अस्तित्व अनुभव असतो ज्यात परिणाम होतात, संबंध येतात, जाणीव असते, कार्य असते. अस्तित्वात दोन पद्धतीने राहता येते - प्रपंच किंव्हा भगवंत. दोन्ही मनोरचनेमुळे स्थित करता येते. त्यासाठी प्रपंचाचा स्वभाव ओळखता आला हवा, मग त्यातून योग्य निश्चय, योग्य प्रयत्न, योग्य श्रद्धा असा मार्ग पत्करणे आले. आणि त्यातून शेवटी शांती भाव स्थित होते. थोडक्यात अस्तित्व ही खरी संकल्पना आहे सध्या... न देह, न भावना, न विचार, न वासना, न साखळी. खटपट जी असते, ती ह्या भावनेसाठी असावी, म्हणजे भगवंत भाव आत्मसात करण्यासाठी. 

 

प्रपंचाशी _संबंध_ वासनेतून जोडला जातो किंवा स्थित होतो, जे आपण घेऊन आलो असतो बरोबरीने. वासनेला शांत कसे करावे हे ओळखावे. हा बौद्धिक प्रश्र्नाशी फक्त सवाल मर्यादित नाही आहे. हा प्रश्न सर्वांगीण स्थितीशी निगडीत आहे, म्हणून बौद्धिक भाषेच्या/ संबंधाच्या/ क्रियेच्या/ परिणामांच्या व्यतिरिक्त, इतर सारे साखळीच्या घटकांमधून हे जाणून घ्यावे लागते. जाणून घेणे, हा अट्टाहासाचा विषय नसून, ती सहज साध्य क्रिया होणे गरजेचे असते. त्यासाठी चिंतन करत राहावे.

 

विषय शेवट पर्यंत नेणे, बुद्धी भेद ह्यात गुंतणे, सिद्ध होण्यात उगाचच खटपटीत जुटून राहणे, अपेक्षा धरणे, वासनेला पकडून राहणे, खूप चिकित्सा करणे - हे सर्व शांत होऊ द्यावे. 

 

परिस्थिती स्वीकारावी पूर्णपणे. मी चा अर्थ, क्रिया, व्यवहार, संबंध, नाती, वृत्ती, परिणाम - हे संपूर्ण शांतीने स्वीकारावे. सर्व युद्ध आपले नसतात. काय येते आणि काय जाते ह्याचा हिशोब मांडू नये. कसे रूप होते परिस्थितीचे, ह्या बद्दलही चिंता करू नये. हालचाली अशा का असतात, ह्याने व्याकुळ होऊ नये. 

 

मी तात्पुरता आणि अर्धवट आहे. मान्य करावे. त्याने काही ठरत नसते. पूर्ण होण्याचीही बौद्धिक धडपड करण्यात गरज नसते, तो मार्ग सोयीचा ठरतो असे नाही. प्रवाह स्वीकारावे. आतून स्पंदनांचा वावर कसा प्रकट होतो, हे शांतीने बघावे.

 

सर्व गोष्टी पूर्ण असतील, वाटतील, पटवता येतील अशी अपेक्षा सोडून द्यावी. लोकांनी आपल्याला सहकार्य करावे, ही अपेक्षाही सोडून द्यावी. आपली शांती कशावरही निर्भर करू नये. शांती म्हणजे सत्य भावना, जी प्रपंचाच्या कुठल्याही घटकावर _ठरत_ (logical) नाही.  दुसऱ्या अर्थाने, सर्व गूढ आहे. मी काय ऐकतो, काय बोलतो, काय सांगतो हा निव्वळ आनंदाचा भाग असावा.

 

हरि ओम.

 

 

Shree 

 

There is no need to seriously question one's worth that is inherited from Existence. That inheritance makes one experience or encounter or create many things in one's journey. All of this can be accepted as God's Will. One can call God as a Being or as an Action or as a Medium or as a Phenomenal Presence or within a Self. 

 

I am not sure why, where, how I am made and this creates its own inner dynamics. The real learning is to understand the connection of this uncertainty with dynamics and letting the Divine Will get established. Acceptance of this situation is a fundamental requirement to become steady amidst the experiences one feels. Acceptance isn't a decision...maybe it is a process of transformation. 

 

Does this inheritance have an advantage? I don't think it is necessary to come to a logical answer or an answer that expresses efficiency. If it is inheritance, why not just purely accept it and discharge a pure action? 

 

Hari Om.

 

 

श्री 

 

भगवंताचे चिंतन कुठल्याही परिस्थितीत करू शकतो आपण. चिंतनासाठी योग्य वेळ, स्थळ हवे, अशी कल्पना असू नये. कधीही चिंतन केले, की ते योग्यच ठरते. 

 

 _विघटित_ अस्तित्वाचे _स्वरूप_ आपल्यात पदार्पण झाल्यामुळे आपण असतो, अनुभव होतात, प्रवाह आणि बदल जाणवत राहतात, साखळी असते, संबंध प्रस्थापित होतात, व्यवहार होतो वगैरे. मग त्यात विचार आणि भावना आणि देह अशी संकल्पना _निर्माण_ होते. त्यात मग गुंतून राहणे, मर्यादा जाणवणे, त्याला धरून राहणे आणि त्याचे परिणाम भोगणे अशा गोष्टी होतात. 

 

मग काय आठवते आणि काय नाही, ह्याची चिंता लागते. म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्यामुळे जी वृत्ती होते, त्यातून आपण स्मरणेची व्याख्या करतो आणि अपेक्षा ठेवतो. _स्मरण स्थित असणे, ही आपली मालमत्ता नाही, हे मान्य करावे._

 

स्मरणेचे रूप भगवंताच्या कार्यातून प्रस्थापित होते. *कार्य*. हेच सत्य आहे.

 

हरि ओम.

 

 

Shree 

 

We have a purpose, "we" and "purpose" and realization from this understanding. Therefore it is going to be felt as a journey. No need to worry of existential role and the intensity of fragments and idea of perfection. Things of the mind crave for some answers to a begining, a middle and an inference. The search persists. The form of search takes many ways, tendencies, patterns, actions, engagements, connections and so on. 

 

I don't think that the answer is of resolving above situation as an intellectual idea. Which means that everything, all differences, all separations (and all effects because of this idea) have a rightful place in existence that only requires acceptance. 

 

The feelings of separation may be there, but that doesn't compel one to do anything as a compulsion. Place, time, movements are all incidental as a _flow of things_ but aren't things in themselves. What causes this flow?

 

Hari Om.

 

 

श्री 

 

आयुष्यभर चिंतन करणे भाग पडते कारण त्यात मन परिवर्तन होण्याचे प्रयत्न असते. परिवर्तन होण्यासाठी सर्वांगीण नाम आत जाणे, शुद्धी प्राप्त होणे गरजेचे आहे. ते नाम घेऊन, कर्तव्य करत, सैय्यम ठेवत, श्रद्धा वाढवत हाथी घ्यायला लागते. म्हणून परिवर्तनाचे स्वरूप गूढ असते, ज्यावर पूर्ण श्रद्धा लागते ठेवायला. 

 

ह्याचा अर्थ की रूपातून सिद्ध होणे, गुंतणे, शंका येणे, दृश्यांची बाधा होणे, परावलंबित सुख किंव्हा दुख होणे, तात्पुरते वाटणे, भोग येणे, हालचालींचा परिणाम करून घेणे, अस्थिर वाटणे, व्याकुळ वाटून घेणे, असे स्थित असणारच. तिथून सुरुवात करून, ही आसक्ती कमी होणे अभिप्रेत आहे. म्हणजेच सूक्ष्म आणि अंतर्मुख होत जाणे. 

 

हे कसे घडते, त्यासाठी भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवणे लागते, कारण त्याचे कार्य गूढ असते आणि ते योग्य पद्धतीने होतच असते. एखाद्या क्षणी आपण किंवा इतर मंडळी हालचालींमुळे खूप दुखावले जाऊ शकतो, पण त्याही परिस्थितीत नाम घेणे सोडू नये. गोष्टींचे वावर, हा भगवत इच्छेचा प्रांत आहे, म्हणून घडामोडी त्याच्या इच्छेने होत असतात, हे शांतीने स्वीकारणे. 

 

आपण नात्यांच्या केंद्रस्थानी किंव्हा एका मानसिक जाळ्यात गुंतले गेलो असतो. जाळ, हे संबंधांचे असते. पण प्रश्न असा आहे, की त्यातून व्याकुळ होणे का शांत होणे, हे मनावर निर्भर आहे. जाळ्यात वावरणे, हा काही दोष नाही की न्यूनतेचे लक्षण नाही की स्वतःची व्याख्या नाही की त्यातून सिद्ध होण्याचा अर्थ नाही. वस्तुस्थितीला तसे काही कारण नाही, की ते कोडे सारखे सोडवता येऊ शकू. हे एकदा ध्यानात घेतले की कर्तव्य भाव आचरणात यायला सुरू होतो.

 

हरि ओम.