Monday, April 13, 2026

Shree

Shree 

There are two thoughts, I feel, that can inform architecture...

Idea or a concept can have different meanings in different fields. In architecture, it has a particular meaning. But, even as architecture, a concept may be born from other ideas or values or inquiries that an architect would be carrying in a nebulous state throughout his/ her life. Those would come together when an opportunity would present itself. In that sense, architecture bears a stamp of ideas which could basically suggest a _relationship_ or a _connection_. Therefore by looking at a building, is it required to understand all ideas behind its making? Or the onlooker infuses new ideas in the building itself, even if they wouldn't perhaps have been in the consciousness of the designer?! Or this possibility itself means it hardly matters what sort of ideas come to whom while designing and seeing?...i.e. the building appears just an incidence?!!

Secondly, as pieces of objects sitting on separate plots in a city, perhaps what one is seeing in the city, is a collage of relationships within the objects and between the objects. Now those relationships expressed by each object (and between the objects) can become architectonic, environmental, social, cultural, philosophical or a combination of all. That is to say, those inform an experience. 

Hari Om.

Shree

Shree 

Problematic means to _internalise_ the dilemma and create architecture. Therefore problematic should mean synthesis. All good architecture could be an honest attempt to problematise issues. Should it _explicitly_ convey synthesis? I don't think so. Internalisation occurs nevertheless and in that process, unique or mysterious relationships get revealed. 

Experience of space, history, context, continuity, analysis, decision - may or may not converge at a point and may not be even possible to justify their relationships. Above layers form a critique of architecture. But design may refer to one of above, or all or even more than above, who knows?!!

Hari Om.

श्री

श्री 

विचार शांत झाल्याशिवाय भगवंताची जाणीव ध्यानात येणे अवघड. अस्तित्व भाव पूर्णपणे सगळीकडे भरलेले आहे आणि ते सूक्ष्म, स्थिर, शांत असते. अनंत रूप आणि आकार समजून घेण्यापेक्षा (ज्यांची निर्मिती कधीही संपत नाही), अंतर्मुख होऊन शांतीत स्थित होणे, हे हिताचे ठरते...कारण शांती भाव कायम राहते आणि ते अक्षर आहे, सत्य आहे. त्याला स्थळ, काळ, कार्य - कुठलीही चौकट लागत नाही...म्हणजे ते पूर्णपणे स्वतंत्र असते आणि पलीकडे राहते. हाच आपल्या असण्याचा *आधार* म्हणून होतो. सारे दृश्य जग, रूप, आकार, स्मरण, कार्य - ह्यांचा आधार हा अस्तित्व भाव आहे. 

विचार, भावना, देह - हे संबंध जोडतात...म्हणजे ते परावलंबित असतात, बदलत राहतात, ध्यानी बऱ्याच गोष्टी आणत राहतात. _चक्र कायम राहते_. चक्र मी करत नसतो, पण ते शक्तीमुळे *प्रस्थापित* होते. आणि त्यामुळे "मी" होतो आणि जग अनुभवतो आणि त्यात _गुंतून_ राहतो. शंकेचे मूळ इथे असते, की सत्य विचारातून किंव्हा रूपातून जाणून घेणे अवघड. भरभर गोष्टी करत राहणे, सतत गुंतून घेणे, अट्टाहास धरणे, सिद्ध होण्याचा खटपटीत राहणे, अस्वस्थ वाटणे - ह्याचे मूळ आहे की सत्य अजून आत्मसात झालेले नाही. 

संबंध प्रस्थापित होणे, ही भगवंताची इच्छा मानावी किंव्हा ओळखावी, _म्हणून हा अनुभव कुणालाही टाळता येणार नसतो_. ह्याचा अर्थ असा की ह्याच अनुभवातून शांती प्रस्थापित होऊ द्यायची असते. मार्ग इथूनच आहे. संबंधातून वृत्ती प्रज्वलित ठेवली किंव्हा हेतू ठेवला, तर व्याकुळता पदरी पडते. संबंध भगवत इच्छेने आले आहे, अशी जाणीव आत्मसात केली, तर मनाला स्वस्थता लाभते. ह्याचा अर्थ की मनाची तळमळ भगवत भाव प्रस्थापित झाल्याशिवाय, शांत होणे अवघड. भगवंताचे अस्तित्व म्हणजे शांती भाव.

हरि ओम.

Sunday, April 12, 2026

श्री

श्री 

न्यूनगंड निर्माण होतो, कारण आपली जाणीव आपल्याला सांगत असते की आपण अपुरे आहोत, तात्पुरते आहोत वगैरे. हा भाव गूढ आहे आणि एकात कुठेतरी बदल केला तरी सर्वांगीण शांती मिळेल का, हे ओळखावे. त्याच्या उलट अट्टाहासाला पेटून अडथळे दुरुस्त करायला गेलो, तरही नुकसान होण्याची शक्यता असते. 

तात्पर्य, खूप आतून संबंधांचे स्वरूप शांतीकडे परिवर्तित व्हायला लागते. त्याला प्रयास आहेत, प्रयत्न आहेत, सैय्यम आहे, श्रद्धेची जरुरी आहे. 

काळजी, कष्ट, त्रास, न्यूनपणा कुठून येतो, हे सापडणे मुश्किल असते. मानवी जीव तसा संबंध निर्माण करतो, म्हणून त्या संबंधातून हे भावना निर्माण केल्या गेल्या असतात. 

म्हणून हे ओळखावे लागते, की नेमकं आत काय होत आहे ते? आपण कुणालाही बांधील नाही. स्पष्टीकरण देण्याचीही गरज नाही. बहिर्मुख राहण्याची किंव्हा असण्याची गरज नाही. 

आपण भगवंताच्या कार्यातून होतो. तो भाव आत्मसात होऊ द्यावे.

हरि ओम.


 श्री 

मनात खूप काही भावना दाटून येऊ शकतात, कुठल्याही काळातील, कुठल्याही स्थळाचे, कुठल्याही पद्धतीने, कुठल्याही रूपाने. तसे झाले, तरी शांत रहावे आणि स्वतःला वरील क्रियेच्या पार्श्वभूमीवर लेखू नये. ज्या वेळेला जे भावना निर्माण होणार असतील, ते त्याच येतील प्रवाह सारखे. त्यांना अडवण्याची गरज नाही किंव्हा विषय म्हणून गाठ सोडवण्याची गरज नाही. प्रवाहातून आपण ठरत नाही आणि त्यावरून क्रियेचा हेतू ठरवण्याची गरज नाही. 

आपण स्थिर रहावे, श्रद्धा वाढवावी, कर्तव्य करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, स्वतःवर आपुलकी प्रकट करत राहावी. परिवर्तन व्हायला वेळ लागतो. सैय्यम ठेवावा. वेळ लागतो, म्हणून व्याकुळ होऊ नये. सत्याचे दर्शन होईलच.

संबंधांचे गुढत्व अजब असते. ते एका पद्धतीने विचार निर्माण करते. त्या निर्मितीमुळे अहं वृत्ती उदयास येते. त्यातून परिणाम भोगला जातो. काहीही असू द्यावे. आपण भगवंत सारखे शांत व्हावे.

हरि ओम.



 श्री 

स्मरण, ही संकल्पना, खूप गूढ आहे. परिस्थितीतून, नात्यातून, स्थळातून, काळातून, प्रवाहातून, प्रवासातून, संबंधातून आपण दोषी असतो का?!! अनुभव वाट्याला येतात, जी भगवंताची इच्छा असते. अनुभव आपल्याला स्वीकारावे लागतात. ते असे का, आणि तसे का, हे विचारणे फुकट कष्ट देते. त्याचा अर्थ हा, की आपल्याला फक्त कर्तव्य करण्याचे हाथी घेणे आहे आणि ते केल्याने जे काही फळ प्रकट होते, ते स्वीकारावे लागते. 

म्हणजे कर्तव्य करणे ह्यात गूढ भाव आहे. फळ निर्माण होणे, हे देखील गूढ कार्य आहे, ते स्वीकारणे हे देखील गूढ असते. म्हणजे प्रत्येक टप्प्यातील भाव गूढ असतो.

हे शांतीचे लक्षण.

हरि ओम.

श्री

 श्री 


सूक्ष्म माध्यमाच्या अस्तित्वाचे परिणाम असतात. ते कार्य करते. त्या कार्यातून निर्मिती होते स्तरांची, चक्रांची, साखळीची, संबंधांची, वासनेची, विचारांची, भावनांची, रुपाची, देहाची, स्मरणेची...त्यावरून _जग_ _अनुभवास_ येते आणि तसे व्यवहार प्रस्थापित केले जातात जीवाकडून. Phenomenal world. 

विचारांची मर्यादा जाणून घेऊन, सत्य आत्मसात व्हायला प्रयत्न, श्रद्धा ह्यांची जोड लागते. विचारांचे स्वरूप विश्लेषण घेते आणि त्यातून विश्वाची रचना विश्लेषणात्मक कळते. Symbolic. Therefore symbolism is a _transformative_ behaviour of the intellect. बुद्धीचा _स्वभाव_ बदलणे अपेक्षित आहे इथे. म्हणजे पूर्वीच्या सवई ज्या बुद्धीशी निगडित असतात (रेष, भाव, संबंधांचे स्वरूप, जर आणि तर, मागे आणि पुढे, आधी आणि नंतर, हे का ते), ह्यात परिवर्तन होते, ते स्वभाव सूक्ष्म होत असताना शांत होतो. शांत होऊ पाहणे म्हणजे परिवर्तित होणे (आणि परिवर्तनाची क्रिया बुद्धीच्या स्वभावाशी निगडित नसते). 

इथे हे ही ओळखायला हवे, की _स्वभाव_ संकल्पना धारण झाले असते (inherited/ it is _given_), आणि म्हणून त्याची सुरुवात किंव्हा शेवट समजणे अवघड. इथे कसा भाव असायला ह्या संकल्पनाकडे हे ओळखावे. स्वभावाला विषय म्हणून बघू नये किंव्हा कोड म्हणून. त्याला _स्वीकार_ म्हणून बघायला लागते आणि दोष न देता किंवा न मानता ते शांतीकडे नेण्याचे साधन मानायला हवे. त्यासाठी _शरण जाणे_, ही भूमिका पदार्पण करायला लागते. 

आपल्या पद्धतीतून विचार असा दिसतो की वेग वेगळे अनंत रूप आणि आकार ध्यानात येतात. (परत, आपण आणि विचार सारखे नाही. तसे मानल्यामुळे, विचार जे दाखवतील, त्यावरून परिणाम आपण भोगतो...चक्र). विचार शक्ती कामाला लावली, की त्यावरून आणखीन विभिन्न, विघटित गोष्टी _निर्माण_ होत राहतात, जसे की स्वतः रंग भरत जाणे किंव्हा चित्र काढत जाणे आणि त्याचा परिणाम भावनेशी, देहाशी, परिस्थितीशी संबंधित राहतो (त्या गोष्टीही निर्माण करतो).  
त्या अर्थाने विचार, भावना, देह, परिस्थिती एकच गोष्ट नमूद करतात. म्हणून परिस्थितीचा विपरीत परिणाम करून घ्यायचा नसेल, तर विचारांचे परिवर्तन होणे गरजेचे ठरते. विचारांवरून काय निर्माण होईल, हे सांगणे अवघड आणि त्यामुळे सतत तात्पुरते, वेगळे, अर्धवट असे भावना देखील निर्माण होत राहतील. म्हणजे विचारांच्या स्वभावातून व्याकुळता असणार आणि समाधान मिळणे कठीण. 

हे एकदा ध्यानात आले, की सूक्ष्म माध्यमात समाधान (शांतीचा अनुभव) आहे, असे आपले मन खुणावते आणि मग मार्ग पत्करला जाऊ शकतो. 

हरि ओम.

Sunday, April 05, 2026

श्री

 श्री 


आपण दगडासारखे झालो आहोत... निगरगट्ट. करुणा जागी होण्यासाठी कितीतरी प्रयत्न दिसत आहेत social media वर होत असताना. मार्ग तसा खूप सोप्पा आहे, पण त्यासाठी आपण त्याग करायला शिकायला हवा. म्हणजे वेळ देणे, ऐकून घेणे, प्रोत्साहन देणे, प्रतिभा मनात संक्रांत करणे, हळुवार होणे, अट्टाहास सोडणे, घाई न करणे, शांत राहणे, समजून घेणे, श्रद्धा वाढवणे, मदत करणे, हेतू सोडून देणे, वगैरे. 

जर सध्याची जीवनशैली असे करण्यात असमर्थ ठरत असेल, तर काय उपयोग ह्या जीवनशैलीचा?! मग स्वतःवर ही जबाबदारी होते की अंतर्मुख करुणा संक्रांत करणे, बाहेर काहीही जरी घडामोडी होत असले तरीही...

हरि ओम.

श्री

 श्री 


मन, ही गोष्ट, काहीही निर्माण करू शकते आणि कशातही गुंतून राहू शकते. ह्याचा अर्थ हा, की मनाचा संबंध अस्तित्व शक्तीशी कायम स्थित असते. म्हणून त्या शक्तीचा परिणाम अर्थातच मनात स्थित राहणार. 

सांगण्याचे तात्पर्य हे, की खूप गूढ स्थितीतून विचारांचे निर्मिती ठरते आणि त्यात बऱ्याच भावना देखील निर्माण होत राहतात. ह्या प्रक्रियेत जीवाचे स्मरण कुठेतरी एक _भाव_ निर्माण होतो आणि त्यामुळे तो भाव चक्रात गुंतवून ठेवतो. त्या भावामुळे सर्व काही दिसते, अनुभवात येते, परिणाम भोगला जातो आणि नाना प्रकारच्या गोष्टीना _सामोरे जाणे भाग पडते_. 

काय करावे ह्या प्रक्रियेला?!! हा सवाल आहे आपल्यासाठी. ह्याला काही उत्तर आहे का? _मार्ग_ असतो.  त्या मार्गावर गेल्याने शांती भावात मन परिवर्तित होते. 

वेळ कसे घालवावे, फुकट घालवण्याची संकल्पना, जबाबदाऱ्या, खंत, राग, उतावळेपण, निवांतपणा, तोच तोच विचार परत आठवणे - ह्यात सर्व काही अभिप्रेत आहे. काही विचार खूप कठीण ठरतात पचवायला आणि ते पचवण्यासाठी कधी कधी परत परत तो विचार ध्यानात येऊन पचायला लागतो....रवंथ केल्या सारखे. असे म्हणतात की गायला ४ पोट तरी असतात रवंथ करायला. मनाला कितीतरी पोटे असतील असंख्य वेळा रवंथ करायला! म्हणजे आत जाऊन, बाहेर आणणे आणि परत आत नेणे, हे आपले मन करेल आणि ते त्याला करू द्यावे.  त्याचा परिणाम प्रत्येक जीवात वेग वेगळा होतो. ते ही होऊ द्यावे. त्यातून शांतीचा मार्ग स्थित असतो.

हरि ओम.

Shree

 Shree 


There is no need to doubt the _becoming and engaging_ of a relationship or a feeling or a form. It can appear as anything in the process and can take any position. _Should it_ lead somewhere and be something is a new question perhaps in today's times of urgency. Should it _imply_ anything?! Should it just be anything without a stance? Should it always start with an intent?!..

I think that there is an existence that _creates_ things in it. That requires perhaps no formal intent. Therefore, creation can span something unknowingly, mysterious to any intent defined within the process. And both are acceptable as triggers or as processes or as a combination. 

A judgement needn't be passed on creation. Thoughts may disagree on the meanings of things, but not for their becoming....! Becoming would happen nevertheless.

Hari Om.

Saturday, April 04, 2026

श्री

 श्री 


आधार भगवंत कार्याचा असावा नेहमी, म्हणजे अंतर्मुख अनुभव स्थित करावे. आपण दृश्याचा, भितीचा आधार घेतो, म्हणून तसे परिणाम होत राहतात आणि संबंध जोडले जातात. आपली हाव काही सुटत नाही, ह्याचे कारण म्हणजे भीती. ती हाव शिथील होण्यासाठी शांती भाव आतून प्रकट व्हायला हवे. 

कार्य खूप सूक्ष्म स्तरातून होत असते आणि आपण कितीही विचारातून बांध करायचा ठरवला, तरी ते कसेही आरपार आत येते आणि विचार चक्र फिरवते! ह्याचा अर्थ हा, की विचारही सूक्ष्म स्तरातून होत राहतात, आपणही. म्हणून सर्व घडामोडींची चालना भगवंत देतो, हे ओळखावे आणि शांतीने स्वीकारावे. 

होणे, वावरणे, बदलणे, संबंधित येणे, प्रवाहात राहणे, निघून जाणे - हे म्हणजे *कार्य*. ते होत राहणार आणि निरनिराळे रूप आणि आकार निदर्शनास येणार. ते होणारच. म्हणून शुद्ध आणि शांती भावनेतून सर्व बघावे आणि कार्य करावे. कार्य म्हणजेच शांती भाव स्थित होऊ देणे आणि त्याला कसलीही अट लावू नये.

हरि ओम.

Shree

Shree 

Freshness and newness or uniqueness is a quality of experience we create by existence. This is to be accepted with full gratitude and delight. 

As a person, there isn't any need to justify anything or prove anything or state a value. These will materialize automatically. Therefore the measure of quality is a given or created by inheritance. 

Secondly our thoughts will create expressions whenever a chance appears. Whether they should tie or relate to a context, to me, seems a feeble point nowadays. There would be an agreement or not - is immaterial for expression. Expression happens regardless of considerations of approvals of any kind. A thought has to come and create a response is *NOT* mandatory. Existence should create a thought, is also *NOT* a must. Thought's creation is God send. 

This is an important attitude for life and architecture because whose context are we referring to?!

Hari Om.

श्री

श्री 

 _अस्तित्व हा *भाव* असतो_. शुद्ध अस्तित्व पूर्णपणे अंतर्मुख, सूक्ष्म, विशाल, कायम, अक्षर अनुभव असतो किंव्हा कार्य असते. नाम घेत गेल्याने मनाची रचना तशी होत जाते. तशी होत असताना, त्या मार्गावर जात राहताना, प्रत्येक टप्प्यात द्वैताचा अर्थ आणि त्याच्याशी संबंध बदलत जातात. शेवटी आसक्ती पूर्ण विलीन होते आणि मनाची शक्ती पूर्ण सूक्ष्म होऊन स्थिरावते आणि शांती भाव संक्रांत होते. ह्याला बहिर्मुखापासून सुरुवात करून अंतर्मुख होणे असे म्हणतात. मन ही अस्तित्वाची स्थिती आहे. ती स्मरण प्रज्वलित ठेवते. ते स्मरण काहीतरी करण्यास परावृत्त करते. हा स्वभाव धर्म झाला मनाचा आणि त्यामुळे परिणाम होतात आणि मन कष्टी होते. 

वरील मनाचा स्वभाव स्वीकारायला लागतो. मनात येणारे विचार खूप गूढ अर्थाचे असतात, जसे की काल, आज, उद्या, विश्लेषण, संकल्पना, स्थळ, काळ, गेलेले लोकं, देवाची संकल्पना, प्रश्न, कोडी, शोध, स्वीकार, वगैरे. ह्या सर्वांगीण अर्थाने मन जिवंत राहतं आणि त्याचे कार्य चालू असते. एखाद्या घटकेचा विचार करू नये, हे सांगणे वेडेपणाचे असते, कारण विचार काय आणेल त्याच्या बरोबर हे सांगता येणे अवघड. म्हणून कुठलाही विचार स्वीकारायला लागतो. त्याला दाबून टाकू नये. 

विचारांची निर्मिती गूढ सूक्ष्म अशा स्तरातून होत असते, म्हणून विचारांची शैली, चक्र, संबंध, अर्थ, क्रियेचे स्वरूप त्या वासनेवर अवलंबून राहते. भलेही नंतर आपल्याला असे वाटले की क्षण वेगळ्या योग्य पद्धतीने घालवलेले चालू शकले असते (खंत), तरीही त्या क्षणाला *तोच* विचार येणे अभिप्रेत असतो, म्हणून तो येतो आणि परिणाम करतो. त्या अर्थानी, ती दैवी इच्छा ओळखावी. 

सावध होण्यासाठी आणि विपरीत परिणाम न होण्यासाठी, जे विचार येऊ पाहतात, त्यांना "पाहुणे" प्रमाणे बघणे, हाताळणे, स्वीकारणे आणि पुढे निरोप घेणे (हा संबंध) प्रचितीस आणायला लागतो (relationship *with* the thought itself). भगवंताच्या चिंतनाने असा संबंध साध्य होतो, असे सुचविणे आहे.

हरि ओम.


श्री 

उद्या मी विलीन होणार. जग त्याच्या रीतीने चालू राहणार. हाच नियम आहे आणि भगवंताची इच्छा आहे. जग असणे, वावरणे, हालचाली होणे, बदल होणे, गतिमान होणे हा सर्व भगवत इच्छेचा प्रकार असतो. आपल्याला त्या इच्छेची प्रतिभा मनात संक्रांत होऊ द्यायची असते. आपण स्थिर होणेच म्हणजे प्रतिभा आत्मसात केली गेली. स्थिर होणे आणि प्रपंचातील प्रसंग, विषय, अडचणी, समस्या, व्याकुळता, देहातील स्थिती ह्यांचा काहीही सरळ बौद्धिक संबंध नसतो आणि तो जोडूही नये. आपण काहीही घटकांना देणे लागत नाही सिद्ध होण्यासाठी. आपण फक्त भगवंताला देणे लागतो, म्हणून त्याचेच चिंतन करावे. स्वतः सिद्ध भाव आत्मसात होणे गरजेचा आहे.

प्रपंच आहे तसा असू द्यावे. प्रसंगे आणि परिस्थिती जश्या येत राहतील, तश्या येऊ द्यावे. त्यात भगवंताचे नामस्मरण कायम सुरू ठेवावे. न स्थळ, न काळ, न कृती - काहीही माझ्या हातात नसते आणि त्यांनी मी ठरत नसतो, हे पक्के ओळखावे. 

भगवंताचे चिंतन काय रूप दर्शनास आणेल, ही त्याची इच्छा. तो योग्य करेलच.

हरि ओम.


श्री 

सगळं गोल असते, म्हणजेच भगवंताचे कार्य असते आणि त्याचा विलास दर्शवते. 

लहानपण ते म्हातारपण म्हणजे परिवर्तित होणाऱ्या गोष्टी, ज्या गोल असतात. 

घर ते काम ते घर असा वेळ गोल असतो, कप्पा नाही. 

नाती, मित्र, मैत्रिणी, लोकं आणि त्यांच्याशी व्यवहार सर्व गोल असते, संबंधित असते. 

शिक्षणातील मुले, त्याचे प्रश्न, प्रतिक्रिया, कामाचे स्वरूप, विघ्न सर्व गोल असते...त्यांना लेखू नये. 

रात्र, पहाट, दिवस, दुपार, संध्याकाळ, रात्र - सर्व वासना गोल असतात. कुठलाही क्षण येतो आणि निघून जातो आणि इतर क्षणांना संबंधित आणतो. 

थंडी, उन्हाळा, पावसाळा हे ऋतू गोल असतात. ते येत राहतात आणि जात राहतात. 

आधीचे जन्म, आत्ताचा जन्म आणि नंतर येऊ पाहणारे जन्म गोल असतात, एकमेकात संबंधित असतात. आपण घाबरू नये. आज केलेले सत्कर्म कधीतरी उत्तम फळ देतेच. कर्म आणि फळ ही मर्यादित संकल्पना न बघता, सर्वांगीण प्रकार असते, हे ओळखावे. 

भगवंत भाव, जीवाचे स्मरण आणि भगवंत भाव हे गोल स्मरण असते. तो प्रवास पत्करायला लागतो. 

राग, दुःख, खंत, प्रेम हे परिवर्तन पावणारे गोल वृत्ती असतात. एकात गुंतून राहू नये...सर्वांचे रुपांतर प्रेमात होऊ द्यावे. 

मोकळा किंव्हा रिकामा वेळ, खूप धावपळ आणि परत मोकळा वेळ हे गोल असते. म्हणून जो क्षण येईल, तो मौल्यवान आहे, हे ओळखावे. 

शुद्ध स्मरण, विस्मरण आणि परत शुद्ध स्मरण हा गोल अस्तित्व भाव आहे. त्यात प्रत्येकाला जायचे असते आणि त्यातून मार्ग शोधायला लागतो.

हरि ओम.

Friday, April 03, 2026

श्री

 श्री 


आपले विचार, आपले रूप, आपली भावना शांत, सूक्ष्म आणि स्वावलंबित करावी. म्हणजे स्थळ आणि काळाशी त्याचे संबंध शांतीचे होऊ द्यावे. शांती हा एकमेव संबंध, एकमेव कार्य, एकमेव स्मरण, एकमेव अनुभव, एकमेव अस्तित्व *स्थित* व्हायला हवे. त्याला "स्वतः सिद्ध" अशीही उपमा दिलेली आहे. 

स्थिर होण्याचा प्रवासात, अगोदरच्या टप्प्यांना स्वीकारावे लागते. टप्प्यांची सुरुवात दृश्यातून होते आणि एक, एक करत ६ सूक्ष्म स्थितींचे अनुभव (संबंध) आत्मसात करावे लागतात. ह्या मार्गावर जाण्याचा किंव्हा आत्मसात करण्याचा निश्चय व्हावा लागतो. 

शांती स्थित होण्याच्या मार्गावर, दृश्याला निर्विश करणे असते. म्हणजे प्रवाह, हालचाली, बदल,  संबंधांचे रूप येऊ द्यावे आणि जाऊ द्यावे आणि हे सर्व हेतू न राखता त्याकडे नुसते शांतीने बघावे. प्रवाह येत राहणार आहे प्रत्येक क्षणी, हे ओळखावे आणि स्वीकारावे. मग मी कुठेही गेलो किंव्हा एकेठिकाणी असलो, प्रवाह येत राहणार आहे. म्हणजे कुठलाही क्षण स्थिर नसतो आणि तो एका साखळीचा किंव्हा चक्राचा घटक असतो. जो काही क्षण असतो, त्याचे लागेबांधे इतर असंख्य गोष्टींशी, स्तरांशी जुळलेले असतात, जे पूर्णपणे बुद्धीच्या ध्यानीही येत नाही. म्हणून एकंदरीत भगवंताच्या अस्तित्वामुळे क्षणाची निर्मिती होत असते. क्षणाची निर्मिती म्हणजे प्रवाहाची निर्मिती, संबंधांची निर्मिती, माझी निर्मिती...

ह्या सर्व घडामोडी मध्ये भगवंताचे अनुसंधान टिकवणे महत्त्वाचे ठरते.

हरि ओम.


श्री 

आजच्या जमान्यात क्षण स्थिर करावा, अशी अपेक्षा फोल ठरू शकते. ह्याचा अर्थ स्वार्थी हेतू किंव्हा अपेक्षातून किंव्हा अट्टाहासातून क्षणाचा अर्थ लावणे स्वतःला कष्टी करू शकते. 

जे होत असते, ते होऊ द्यावे. कशालाही अडवू नये. ह्याचा दुसरा अर्थ हा की सर्व भगवंताच्या इच्छेने गोष्टी स्थित होतात, हे ध्यानात आणावे आणि स्वीकारावे. असे केल्याने शांती भाव कायम आपल्या बरोबर स्थित राहतो. ह्याचा तिसरा अर्थ हा, की आपण सूक्ष्म स्थितीत पदार्पण करतो, शांत होतो, पलीकडे होतो, श्रद्धा वाढवतो, अंतर्मुख होतो. 

ह्याचा एक मार्ग म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

शुद्ध, स्वतःसाठी कर्तव्य करावे, आणि त्यातून देण्याची व्याख्या संपादन करणे ह्यातून शांती निश्चित मिळू शकेल. मी, तू, ही संकल्पना आहे. संबंध कार्य आहे. दृश्य काल्पनिक आहे. सत्य जे असते, ते आत्मसात करावे. मुख्यतः *सत्य*, असे काहीतरी असणार आहे आणि त्याचा संबंध आपल्या जीवनाच्या हालचालीत येत राहणार आहे, हे जीव ओळखू शकतो.  तिथून निश्चय होतो. शोधातूनच आणि परिणामांच्या प्रकारातून ह्या निश्चय पर्यंत आपण पोहोचतो. पुढे मार्ग असतोच. तिथेही निश्चय पदोपदी लागतो. 

सत्याचा स्वतःमध्ये परिणाम विलक्षण असतो. परिणाम दाखवण्याची किंवा सांगण्याची जरुरी नसते. परिणाम कुणावर अवलंबून राहण्याचीही गरज नसते. योग्य परिवर्तन होतेच. आणि शुद्ध होणे, ही शक्ती आहे, जी दृश्याशी आसक्ती बाळगत नाही किंव्हा दृश्याचा विपरीत परिणाम करून घेत नाही. त्यासाठी सतत भगवंताचे स्मरण प्रज्वलित ठेवत राहायला लागते. तेच स्मरण आत परिवर्तन आणते.

Wednesday, April 01, 2026

श्री

श्री 

अस्तित्व, ही स्थित गोष्ट आहे. तिच्यापासून होणाऱ्या गोष्टी, कार्य, रूप, आकार, प्रवाह हे स्थित असतात. भगवंताची _इच्छा_ म्हणून हे सर्व विश्व, त्यातील घडामोडी, त्यातील अनंत जीव जे संबंधित असतात, येतात आणि निघून जातात. 

भगवंताची इच्छा अनुभवात आणायला लागते. म्हणजेच आपण सूक्ष्म होणे आणि विलीन होणे येते. त्यावरून शांती भाव प्रस्थापित होते. 

आपण कुठला भाव प्रज्वलित ठेवतो, हा प्रश्न आहे. तो भाव सूक्ष्म स्तरातून येत असतो, म्हणून तो गूढ असतो किंवा त्याला भगवत इच्छा संबोधले गेले असते. भावाचा उगम, कार्य, संबंध हे गूढ आहे. गूढ म्हणजे ह्याला फक्त शुद्ध, निःस्वार्थी हेतू असतो. म्हणून एकातून अनेक अश्या गोष्टी घडत राहतात. 

ह्याचे आकलन होण्यासाठी नामस्मरण करावे.

हरि ओम.


श्री 

संबंध काही वाईट नसतात. त्यांना टप्पा म्हणून, कर्तव्य करत शांत होणे, हा मार्ग समजावा आपला. सत्यात जरी "मी" सर्व गोष्टींच्या पलीकडे असलो आणि त्यातून सर्व काही होत असलं, तरीही "माझ्या निर्माण झालेल्या संबंधातून" शांतीकडे वाटचाल करायला लागते. म्हणजे संबंध स्वीकारावे लागतात, स्थिती स्वीकारावी लागते, परावलंबित स्थिती आत्मसात करावी लागते, आपले देणे असते जे द्यायला लागते, भोग स्वीकारावे लागतात, दर्शन बघायला लागते, अनुभव स्वीकारावे लागतात, त्यातील सारे घटक विषय, शंका, प्रश्न स्वीकारावे लागतात, आणि कार्य करत राहायला लागतं.

हरि ओम.

Sunday, March 29, 2026

Shree

Shree 

Each of us has _inherited_ a state _for_ existing. Inherited is to be felt or realized and it ought not to be seen as a tool for application. Inheritance goes beyond application - it is what we are. No justification is required for this; no proof; no judgement; no evaluation. 

The question of 'why' is within a specified limit, which has been received through inheritance itself and therefore the mystery of inheritance will continue to exist. 

I don't think that there is any reason to be worried about this situation that we are into or what gets felt. I don't think that there is a purpose for a search...
Search happens _automatically_ because of inheritance. We craft a reason (for the satisfaction of the mind) to be here and that may also be an automatic undertaking to calm us. 

In this state there is always going to be an _imagination_ of things. As much as I consider myself real, so is imagination that creates this real - self. Therefore, the experience of being/ reality is a loaded and a mysterious idea. The mystery is approached or understood or realized through art, poetic imagination, analysis, decoding of the situation, breadth, work, relations, and so on. Each path can suggest something different while also be connected with other paths. So we have something in themselves and also as connections. 

We are of many moods, turmoils, dents, feelings, fears, annoyances, silences and those would come and go. We are unlimited in all such vibrations. 

Hari Om.

श्री

 श्री 


सूक्ष्मातून कार्य होणे ही बुद्धीच्याही पलीकडे स्थित असणारी क्रिया असते. बुद्धीची शक्ती देखील बऱ्याच स्तरातून *प्रकट* झाली असते म्हणून तिला देखील वेगळ्याच शक्ती कार्यरत करत राहतात! म्हणजे "मी" आणि जे काही मी संबंध जोडतो आणि व्यवहार करतो, त्या सर्वांचे बीज सूक्ष्म स्तरात असते, म्हणून तिथ पर्यंत शुद्ध व्हायला अभ्यास लागतो स्थिरतेचा. मुळात अभ्यास जो आहे, तो अहं वृत्ती किंव्हा बुद्धीच्या किंवा रूपाच्याही पलीकडे शांत होणे, सूक्ष्म होणे, सत्य होणे असा आहे. आपण समजतो, तसे अस्तित्व नसते. आपला भाव किंव्हा स्मरण वेगळेपण आणि तात्पुरतेपण _प्रज्वलित_ ठेवत राहते म्हणून त्या प्रकारच्या संकल्पना, विचार, भावना, संबंध प्रकट होत राहतात आणि गुंतून ठेवतात आपल्याला. एका भूमिकेतून (role play), व्यवहार आपल्या हातून घडतो, ज्याचा उगम विचारांना कळत नाही. हे गूढ असते, म्हणून निश्चय असा हवा की शांत होऊ शकू, नाही की अट्टाहासाने सिद्ध व्हावे किंव्हा राग राग करावा किंव्हा दुःख कुरवाळत बसावे. 

म्हणून स्वतःला आणि इतरांना माफ करावे. घडामोडीतून किंव्हा हालचालीतून कुणी ठरत नसते आणि कुणालाही लेखण्याची गरज नसते. आपण सर्वजण एका प्रवासात आहोत. त्या प्रवासात सत्य आपल्याला योग्य वेळ आल्यावर कळणारच आहे. तो पर्यंत सैय्यम ठेवावे आणि श्रद्धा वाढवावे. 

आपण कोण आहोत,कसे जगतो, कुठे जायचे आहे,काय हेतू हवा हे सर्व काल्पनिक आहे (idea diagram). म्हणजे कल्पना जिवंत असते, ज्यात स्वतःचा भाव संबंधित असतो आणि त्या प्रमाणे व्यवहार करतो! So the idea isn't the creation (only) of the mind; but it creates the mind itself! So the idea ought to come from more subtle states than the mind. Idea isn't an identity. It is an existence. Mind isn't everything. Idea is. 

श्री 

सूक्ष्मातून कार्य होणे ही बुद्धीच्याही पलीकडे स्थित असणारी क्रिया असते. बुद्धीची शक्ती देखील बऱ्याच स्तरातून *प्रकट* झाली असते म्हणून तिला देखील वेगळ्याच शक्ती कार्यरत करत राहतात! म्हणजे "मी" आणि जे काही मी संबंध जोडतो आणि व्यवहार करतो, त्या सर्वांचे बीज सूक्ष्म स्तरात असते, म्हणून तिथ पर्यंत शुद्ध व्हायला अभ्यास लागतो स्थिरतेचा. मुळात अभ्यास जो आहे, तो अहं वृत्ती किंव्हा बुद्धीच्या किंवा रूपाच्याही पलीकडे शांत होणे, सूक्ष्म होणे, सत्य होणे असा आहे. आपण समजतो, तसे अस्तित्व नसते. आपला भाव किंव्हा स्मरण वेगळेपण आणि तात्पुरतेपण _प्रज्वलित_ ठेवत राहते म्हणून त्या प्रकारच्या संकल्पना, विचार, भावना, संबंध प्रकट होत राहतात आणि गुंतून ठेवतात आपल्याला. एका भूमिकेतून (role play), व्यवहार आपल्या हातून घडतो, ज्याचा उगम विचारांना कळत नाही. हे गूढ असते, म्हणून निश्चय असा हवा की शांत होऊ शकू, नाही की अट्टाहासाने सिद्ध व्हावे किंव्हा राग राग करावा किंव्हा दुःख कुरवाळत बसावे. 

म्हणून स्वतःला आणि इतरांना माफ करावे. घडामोडीतून किंव्हा हालचालीतून कुणी ठरत नसते आणि कुणालाही लेखण्याची गरज नसते. आपण सर्वजण एका प्रवासात आहोत. त्या प्रवासात सत्य आपल्याला योग्य वेळ आल्यावर कळणारच आहे. तो पर्यंत सैय्यम ठेवावे आणि श्रद्धा वाढवावे. 

आपण कोण आहोत,कसे जगतो, कुठे जायचे आहे,काय हेतू हवा हे सर्व काल्पनिक आहे (idea diagram). म्हणजे कल्पना जिवंत असते, ज्यात स्वतःचा भाव संबंधित असतो आणि त्या प्रमाणे व्यवहार करतो! So the idea isn't the creation (only) of the mind; but it creates the mind itself! So the idea ought to come from more subtle states than the mind. Idea isn't an identity. It is an existence. Mind isn't everything. Idea is. 

हरि ओम.