श्री
श्री
चांगले काम करावे. म्हणजे शुद्ध भावनेने, सर्वांगीण अर्थाने,
सूक्ष्म पद्धतीने, शांतीने, आपुलकीने कार्य
करावे. त्याचा परिणाम निश्चित मनात संक्रांत होतो आणि तसे साऱ्या वासनांचे
परिवर्तन शांती भावनेत होतं, बुद्धीच्या नकळत.
म्हणून अशा कार्याला खूप महत्व असते आणि ते घडले, तर देवाची कृपा
कार्य करत आहे आपल्या ध्यानात, असे ओळखावे.
कृपा ह्याचा अर्थ की परिस्थितीशी काहीही संबंध जरी असला,
तरीही शांती भावनेत मन स्थिर असते. भगवंताची आठवण नेहमी ध्यानात असावी,
कारण कृपेचे स्थान सगळीकडे, सर्वव्यापी,
सर्व स्तरात, सर्व काळात आणि सर्व स्थळात होत असते. म्हणून ते
स्वतःच्या स्मरणेच्याही पलीकडे स्थित असते आणि सूक्ष्म असते.
कार्य कसे काम करते, ह्याची चिंता नसावी. ते करते,
अशीच श्रद्धा ठेवावी म्हणजे त्यात आपले परिवर्तन होते. बुद्धी शंका घेते,
कारण तो त्याचा _स्वभाव_ आहे. स्वभाव देवाने प्रस्थापित केला असतो,
म्हणून त्याची कृपा असल्या शिवाय तो विलीन होणे कठीण. उगाचच गुंतून,
बडबड करून, विषयात रमून हिताचे होत नाही. सर्व मनाचे स्वभाव
बाजूला सारून श्रद्धा भाव प्रस्थापित होऊ द्यावे.
हरि ओम.
श्री
जीवाच्या पार्श्वभूमीवरुन प्रयत्नाच्या फळात *टप्पे* असतात. ते ह्या प्रमाणे
ओळखावे...
१) एका परिस्थितीचा भाव सतत ध्यानी असणे,
त्यात गुंग राहणे आणि परिणाम भोगणे.
२) वरील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले की "शंका" स्वतः बद्दल
उत्पन्न होणे आणि त्या प्रमाणे शोध हाती घेणे. त्यात द्वैत आणि अद्वैत ह्या दोन्ही
संकल्पनांची माहिती असणे, पण द्वैताच्या अनुभवाशी जास्ती समरस असणे.
३) प्रयत्न सारखे सुरू ठेवणे आणि सैय्यम ठेवणे. शंकेचे रुपांतर हळू हळू
श्रद्धेत होणे.
४) श्रद्धा जशी वाढते, तशी स्वस्थता लाभणे.
५) श्रद्धा वाढत राहताना देखील द्वैताचा अनुभव येत राहणे आणि अधून मधून मन
व्याकुळ होणे. तरीही निश्चयाने नामस्मरण करणे.
६) मन सूक्ष्मात विलीन होत राहणे आणि अद्वैताचा अनुभवाच्या जवळ जवळ जाणे.
७) सत्यात स्थिर होणे, शांत होणे. मग सर्व ठिकाणी भगवंताचीच शक्ती कार्य
करताना दिसणे.
हा अनुभव प्रस्थापित होण्यासाठी सातत्याने मार्ग पत्करायला लागतो.
हरि ओम.
श्री
रूप जे प्रस्थापित आणि ध्यानात येऊ घातले आहे, आणि जो काही प्रवाह
ध्यानी येत राहतो, त्यातून मन होते, परिणाम होतो,
संबंध येतात, दृश्यात गुंतणे होते, वगैरे.
*वस्तुस्थिती* अस्तित्वाची ही आहे, की सर्व गोलाकार आहे
आणि सुरुवात किंव्हा शेवट, दोन्ही स्पष्ट बुद्धीच्या भाषेत सांगणे अवघड. म्हणजे
सत्य कळणे म्हणजेच जाणीव शुद्ध होणे, भगवंत भावात स्वतःचे
स्मरण पूर्ण विलीन होऊ देणे.
वरील अनुभव आत्मसात होऊ देण्याचा निश्चय व्हावा लागतो. माझ्या मते,
निश्चय इथे बौद्धिक भावनेच्या पलीकडे असणारा अर्थ आहे - *म्हणजे श्रद्धा*.
श्रद्धेने निश्चय अनुस्वरूप होईल.
Phenomenologically we make a mistake when someone like
Heidegger suggests what is a "Being" and we tend to _pounce_ on his
idea for fixing problems. That is precisely a trap we set out for ourselves
because of our own intellect.
वरील प्रकार बुद्धीचा गूढ आहे आणि तिच्या ह्या स्वभावामुळे आपण सगळीकडे
वेगळेपणा सारखे बघतो, म्हणून विषय दिसतात, म्हणून ते
सोडवण्याचा अट्टाहास, म्हणून त्याचे परिणाम, म्हणून त्यात गुंतत
राहणे...बुद्धीचे चक्र, दुसरे काय?!!
अर्थात वरील मर्यादा ओळखणे देखील विवेक बुद्धीचे कौशल्य असते आणि त्यातून
योग्य मार्ग प्रस्थापित व्हायला लागतो. संबंध देवाने दिले आहेत,
म्हणून ते स्वीकारून पुढे जाणे आले.
हरि ओम.
श्री
गुंतण्याची इच्छा प्रज्वलित असणे हे वृत्तीचे लक्षण समजावे आणि भगवंताची
इच्छा. जीवाच्या पार्श्वभूमीवरुन बघितले, तर असे दिसेल की
गुंतण्याची हाव सुटण्यास खूप प्रयास लागतात आणि त्याचे कारणही गूढ आहे. आपण कर्म
करण्याच्या खटपटीत राहतो...कर्म केल्याशिवाय चैन पडत नाही कारण त्यात सूक्ष्मातून
अपेक्षा निर्माण होतात. म्हणून व्यवहार करत राहण्याची सतत धडपड सुरू असते.
ह्यात खूप विरोधाभासिक गोष्टी उफाळून येतात, जे अर्थातच शोध
घेण्यात प्रवृत्त करतात. म्हणजे जे काही विचार येऊ पाहतात,
त्यातून शांती प्रस्थापित होण्याची संभावना असतेच. प्रयत्न,
सैय्यम, श्रद्धा, कृपा त्यासाठी रसायन
ओळखावे.
भगवंत सर्व ठिकाणी आहे.
हरि ओम.
श्री
जो प्रवास, प्रवाह, विचार धारा येऊ
पाहतात (व्याकुळता, शोध, प्रश्न,
निश्चय, अनुभव, शांती...) हे होणार
आणि ह्याला अत्यंत नैसर्गिक मानावे.... This is our destiny
as a _human_ being.
इच्छा होणे, न होणे, समाधानी होणे,
ह्याचा प्रवास असतो आणि प्रत्येक क्षणात तो कधी कधी प्रश्न आणेल,
कधी कधी उत्तरे, कधी कधी आणखीन वेगळे. प्रवाह,
हा काही विषय किंव्हा कोडे नाही. भगवंताची इच्छा,
म्हणून तसा हा प्रवाह, तसा हा जन्म, तसे हे अनुभव,
तशी ही व्याकुळता, तसा तो शोध...
हरि ओम.
श्री
अस्तित्वाचे अर्थ आपल्याला स्वतःच्या अनुभवातून जाणवायच्या असतात. जाणीव शुद्ध
होण्याची क्रिया अभिप्रेत आहे, जिथे सर्व रूप
स्वतःचे शांत होणे असते आणि परम तत्व भगवंता मध्ये विलीन होते.
म्हणून त्या अर्थाने अनुभवाकडे बघावे, विचारांकडे बघावे,
भावनांकडे तसे बघावे, देहाकडे तसे बघावे, जीवनाकडे तसे बघावे.
कार्यातून वासना/ परिणाम/ स्मरण/ वेगळेपण/ तात्पुरतेपण/ संबंध असे प्रस्थापित होते,
म्हणून "मी" होतो, स्थळ आणि काळ होते
आणि प्रकृतीचे _परिणाम_ ध्यानी उमटते.
म्हणून व्यवहार, खटपट, व्याकुळता,
भीती, प्रश्न, अट्टाहास,
सिद्धत्व ह्या गोष्टी दररोज जाणवत राहतात, किंव्हा त्या
भूमिकेत सतत वावरायला होते. जीवनात विषय किंव्हा कोडी सोडवण्यात कुठले शहाणपण आले?!
विषय म्हणजे मनाने निर्माण केलेला गुंता, ज्यात त्या चक्रात
ते राहते. स्वतःसाठी विषय निर्माण करतो आणि त्यातच आपण सर्व दंग होऊन जातो! ह्याचे
बीज अंतःकरणात असते, म्हणून त्याची क्रिया _त्या स्तरात शांत
होऊ द्यावी लागते_.
वरील प्रकरण गूढ ओळखायला हवे, की सुरुवात माहित
नाही, शेवट माहीत नाही, प्रवास माहित नाही,
प्रवाहाचे स्वरूप माहित नाही. म्हणजे सतत ह्या
बदलत राहणाऱ्या गोष्टींचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न मन करत राहते. त्यातून अनेक
जन्म, पूर्वीचा काळ, उद्याचे क्षण असे
काहीसे अनुभवात संक्रांत होते आणि ह्या सर्वांकडे कोडे सारखे बघणे होते.
ह्याचा अर्थ असा की "निर्मितीच्या प्रक्रियेत" मन होते जिच्यामुळे _गुंतण्याची_
गरज/ आसक्ती प्रस्थापित होते. हे चक्र आहे, असे ओळखता यायला
हवे.
वरील धारणा शांत होण्यासाठी नामस्मरण स्वतःकडून घडवायला लागते आणि शांत
होण्याचा अनुभव आत्मसात होऊ द्यावा लागतो. त्यासाठी भगवंताची कृपा लागते.
हरि ओम.
श्री
शांत होण्यात कदाचित उगाचच कर्म करण्याची इच्छा विरघळून जाईल. सूक्ष्म स्तराचे
संस्कार, कार्य ध्यानी यायला लागतील. आपण कदाचित खूप काही
गोष्टीत अरसिकता दाखवू, ज्यात पूर्वी जोमाने गुंतत राहायचो. पूर्वीचे कोडी
सोडवण्याची इच्छा विरघळून जाईल कदाचित...त्या कोडींचे महत्त्व राहणार नाही.
ह्याचा अर्थ असा की कोडी आणि मनोरचना संबंधित असतात. मन जसे शुद्ध होते,
तसे कोडी विरघळून जातात...त्याची गरज असण्याची रहात नाही. म्हणून अस्तित्वाला
कशाची गरज असते का?....तर नाही! ह्याला _स्वतः सिद्ध_
म्हणावे.
आपल्या जीवनात विघटित स्मरण असल्यामुळे, असंख्य कोडी ह्यांचे
स्थान प्रस्थापित झालेले आढळते. ह्या सर्व कोडीना "चिंता" म्हणुया
किंव्हा द्वैत किंव्हा परावलंबन. *माहित नाही* की असे का असते आणि काही गोष्टींचा
त्रास का होतो. ही परिस्थिती स्वीकारावी लागते आणि शांत होण्याचे प्रयत्न हाथी
घ्यायला लागतात. त्यासाठी नामस्मरण.
हरि ओम.
