Tuesday, February 03, 2026
Thursday, January 29, 2026
श्री
श्री
स्वतः बद्दल आपण किती अस्थिर आहोत, ही जाणीव होणे आणि
स्वीकारणे आले. ते कोडी सोडवण्यासाठी नाही किंव्हा स्पष्टीकरणासाठीही नाही,
किंव्हा सिद्ध होण्यासाठीही नाही. म्हणजे अस्थिर समजून घेण्याला
"हेतू" असू नये किंव्हा त्यातून काहीतरी "दुरुस्ती" होऊ शकेल
ह्या अर्थानेही आपण त्याकडे बघू नये. अस्थिर असणे काही दोष नाही. हा गुण साक्षात
अस्तित्व शक्तीतून आलेला असतो आणि तिच्या कार्यातून हा गुण एखादा रूप आणि आकार
घेतो - म्हणजे _आपण_ होणे. त्यामुळे सारे काही बरोबरीने अनुभवात गोष्टी
उमटायला लागतात आणि "मी" अशी _संकल्पना_
उदयास येते आणि तसे _स्मरण_ संपादन करते.
ह्या वरील सर्व कार्य ह्यास भगवत इच्छा मानावी, म्हणजे त्रास होणार
नाही. ह्याला प्रारब्ध म्हणून शकतो - की असे होणार. आपल्याला वाटतं की आपण विचार
केला एखाद्या वेळेला, पण सत्य असेही असू शकते की प्रारब्धामुळे या
प्रकाराचे विचार ध्यानात प्रकट झाले आणि तसे क्रिया करायला भाग पाडले गेले. म्हणजे
माझ्या ध्यानाच्याही पलीकडे आणखीन सूक्ष्म कार्य अस्तित्वाचे चालू असते,
जिच्यामुळे मला विचार करणे भाग पडते किंव्हा त्या कार्याचा _न कळत_
समावेश केला जातो. म्हणजे "मी" ही _संकल्पना_
झाली, जी अस्तित्वात _प्रकट_
होते, एक स्वभाव घेते, काही गुण घेते,
दृश्यात वावरते आणि निघून जाते.
हा प्रवास असतो स्वतःच्या अनुभवांचा. प्रवाह ह्यासाठी की अनुभव येत राहतात आणि
निघून जातात. प्रवास ह्यासाठी की अनुभवांचे स्वरूप सूक्ष्म होऊ शकते. प्रारब्ध आहे,
त्यासाठी स्वतःला क्षमा करावी आणि त्या कार्याचे पूर्ण स्वीकार करावा.
गोष्टींचे स्वभाव होणे, वावरणे (किंव्हा संबंधात येणे) आणि निघून जाणे,
हे भगवत इच्छेने स्थित होते.
हरि ओम.
श्री
स्थिर हे गूढ प्रकरण आहे. म्हणजे त्यावरून गूढ आणि सूक्ष्म स्मरण जाणवते,
प्रतिक्रिया देण्याची इच्छा नमवते, आपुलकी सर्व
गोष्टींची येते, स्वीकारण्याची शक्ती येते,
विषय विलीन होतात, सैय्यम वाढतो, तक्रार नाहीशी होते,
श्रद्धा वाढते वगैरे.
हा गुण आत्मसात (realize) करायला लागतो. इथे हेतू ठेवून बुद्धीने विषयाच्या
मागे धावणे किंव्हा एखादे सत्य आत्मसात होणे, ह्यात फरक आहे. सत्य
आत्मसात होण्याची क्रिया रेषेसारखी सरळ असेल असे नाही,
सोप्पी असेल असेही नाही, त्याला स्थळ आणि काळ
योग्य कधी ठरू शकेल हे ही सांगणे अवघड...म्हणजे थोडक्यात सर्व भाषा जी हेतूवरून
ठरली जाते, ती पूर्ण बाजूला सारायला लागते,
किंबहुना तिला शांत होऊ द्यायला लागते.
म्हणून सत्य आत्मसात होण्याची क्रिया आहे अनुभवातून.
हरि ओम.
Shree
Wednesday, January 28, 2026
श्री
श्री
काही विचार...
विचार आले जरी नाही, तरी कार्य सुरू असतेच, परिणाम होत असतोच.
म्हणून विचार येऊ द्यायचे नाही मनात, असे करण्यापेक्षा,
विचार "प्रकट" होण्याची इच्छा शांत होऊ देणे जास्ती हितकारक आहे.
तशी जाणीव किंव्हा भाव होणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी
समाधानी भाव आत्मसात होणे आले. म्हणजे आपण सूक्ष्म स्थिती बद्दल बोलत आहोत इथे.
समाधान दृश्यात का नसते? हा प्रश्न
महत्त्वाचा आहे. दृश्याचा अनुभव अनेक स्तरांच्या क्रियेतून किंव्हा कार्यातून होते
आणि त्या प्रमाणे दृश्याचा स्वभाव प्रकट होतो. आपणही दृश्यात होतो,
म्हणून दृश्याचे गुण धर्म आपल्यातही प्रकट होतात आणि त्यामुळे
"गुंतणे" ही क्रिया होते आणि "परिणाम भोगणे" हे देखील त्यातून
घडते. सारांश, आपला स्वभाव _अस्थिर_
राहतो. _आकार_, ही स्थिती सतत बदलणारी आहे,
उगवणारी, वाढणारी आणि झीज होणारी. त्यावर मन गुंतले की तसेच
गुण आपण धारण करतो - म्हणजे काळजी, त्रास,
कष्ट, भीती, खंत वगैरे. देह
बदलणार, हे अटळ आहे. मन अस्थिर का ठेवावे?!!
जे जाणार त्याला थांबवण्यात काय अर्थ आहे किंव्हा अट्टाहास ठेवावा?!
हे मनाने ओळखायचे असते. ते आत्मसात केल्यावर मन स्थिर होते,
शांत होते. हे होण्यासाठी नामाच्या शक्तीचे चिंतन करावे.
एक स्वभाव धारण केल्यामुळे आपली विचारांची साखळी होते,
शब्द त्या प्रमाणे ऐकले जातात, प्रतिक्रिया त्या
प्रमाणे दिली जाते, हेतू त्या प्रमाणे ठेवला जातो,
परिणाम त्या प्रमाणे सामोरे येत राहतात, स्मरण त्या प्रमाणे
प्रज्वलित राहते. तात्पर्य हे, की ह्या प्रक्रियेत
साहजिकच तात्पुरतेपण भावना वाट्याला येते. त्यात आपण आणखीनच चक्रात गुंतत राहतो
आणि त्या गोष्टीशी किंव्हा कल्पनेशी एकरस होतो. दुसऱ्या भाषेत ह्याला संस्कार
म्हणतात किंव्हा "संगत होणे".
ह्यातील मर्म हे, की संगत खूप खोल वरून आलेली असते. त्यामुळे कुणाशी
बोलावे, किंव्हा न बोलावे, कधी बोलावे,
का बोलावे, काय बोलावे, कसे ऐकावे,
कधी प्रतिक्रिया मांडावे, कशी मांडावे ह्या
गोष्टी निर्भर असतात. म्हणून प्रत्येकाची ऐकण्याची, बोलण्याची,
सांगण्याची पद्धत वेगळी असते आणि त्यावरून आपली संगत तशी असावी की नाही
किंव्हा प्रतिक्रिया ठरवावी की नाही हे पूर्णपणे स्वातंत्र्य असते प्रत्येकाला. हे
ओळखणे खूप गूढ कार्य आहे. त्याचा अभ्यास करावा लागतो.
तिसरी गोष्ट ही की विचार येऊ द्यावे आणि जाऊ द्यावे. त्यात गुंतण्याची गरज
नसते...इतके की गुंतू की नको असाही विचार उमटता कामा नये! अशी मनोभावना झाली,
तर विचारांचे रूपांतर कर्मात आणि हालचालीत आणि परिमाणात होत नाही. म्हणजे
शांती भाव कायम राहते.
विचार यायलाच हवे आणि त्यातून सिद्ध व्हायला हवे - अशी भूमिका आपल्याला अशांत
ठेवते. त्या भूमिकेला काहीही अंत नाही आणि त्यातून अधिकाधिक विघटित अनुभव पदरी येत
राहतात. विघटन म्हणाल तर त्या बरोबर असंख्य भावना आणि बेफिकीर वागणूक. त्यात मग
वेग, खूप अट्टाहास, उर्मठपणा,
आगाऊ वागणूक, दुसऱ्यांना हिडीस फिडीस करत राहणे,
खूप बडबड करत राहणे, खूप आवाज करत राहणे, खूप वैतागणे,
खूप चिंतेत राहणे असा "रोग" स्वतःला पछाडतो.
इथे आपण भोग संकल्पना मांडूया आता. वरील विवेक बुद्धी वापरत असताना देखील काही
गोष्टी दुःख भाव निर्माण करतील आणि मनाला व्याकुळ करतील. हे अपरिहार्य आहे. त्यात
सैय्यम ठेवून कार्य करत राहावे, भगवंताचे चिंतन
करावे आणि काहीही झालं तरी शांती भाव सोडू नये. दुःख देणे हे दृश्याचा स्वभावामुळे
होणार, त्यात गुंतावे की नाही, हे आपल्या मनाच्या
शक्तीवर निर्भर आहे.
हरि ओम.
Shree
Revelation...
Noone can force anyone's emotions and how those have
formed _onto us_ so as to manage those for the people who vent out those. We
can't change people and our responsibility isn't that nor are we required to
despise ourselves for being quite aloof on those matters.
We can empathize with such changes and mysterious
journeys of emotions, not trying to label or judge them...but that doesn't mean
we shouldn't deserve respect.
Therefore a need for healing is essential for all of us.
I forgive my own emotional journeys and how they seem to interact with the
world at large, which may not be proper but I haven't a clue where it requires
improvement.
I choose to heal and forgive myself, so all relationships
are healed and what gets created is only love and peace.
I choose to heal myself for things that couldn't be
controlled, for some errors caused perhaps, for some decisions that may have
played havoc on others. None of it was intentional, but nevertheless I seem to
have internalised the imagined hurt. So I choose to _release_ all hurts.
I choose to be free. I choose to just let things be
without anything of colouring because of self imposed judgments.
Hari Om.
श्री
Tuesday, January 27, 2026
श्री
श्री
रूप स्थित असणे दृश्यात, हा अस्तित्वाचा गुण
आहे. म्हणून स्मरण, भाव, क्रिया,
साखळी, स्तर, स्थिती,
संबंध, परिणाम - अशा गोष्टी उदयास येते राहतात. कार्य.
रूप निमित्त आहे दृश्यात वावरण्यासाठीचे. तसे पाहिले तर दृश्याचे स्थान
किंव्हा अनुभव देखील निमित्त आहे भगवंताचे कार्य ओळखण्यासाठी किंव्हा जाणून
घेण्यासाठीचे. ओळखणे किंव्हा जाणणे हा अनुभव जीव संपादन करतो. वास्तविक अस्तित्व
शक्तीला त्याचाही आधार लागत नाही.
पण आपण रूपातून आल्यामुळे, त्याच्या आधारे
शांतीकडे वाटचाल करायला लागते. थोडक्यात रूपाच्या निमित्ताने,
सर्व घटक अनुभवास येत राहणार, ज्यांना निमित्त
ओळखून पुढे जात रहावे. _हालचाली_, जे रुपामुळे जाणवत राहतात,
त्यांना सोडवण्याचा अट्टाहास करू नये किंव्हा त्यातून सिद्ध होण्याचा किंवा
काळजीत राहण्याचा किंव्हा व्याकुळ होण्याचा किंव्हा त्यातून सतत काहीतरी अर्थ
सांगण्यासाठीचा.
भगवंताचे कार्य ओळखल्यामुळे, त्या कार्याच्या
सारे परिणामांना तसेच राहू द्यावे, चक्राना तसेच वावरू
द्यावे, रूप आणि आकार तसेच राहू द्यावे.
त्याची आठवण राहण्यासाठी नामस्मरण करत राहावे.
हरि ओम.
श्री
रूपाचे किंव्हा दृश्याचे _स्वभाव_
दिसून येतात. ते स्वभाव _विषय_
सोडवण्यासाठी नसावे, पण स्वीकारून शांत होण्यासाठी असावे.
म्हणजे विषय स्वभावातून येतात आणि शांत होणे, हे देखील स्वभावातून
साकार होते. ठरवणे आले की स्वभाव कुठल्या नजरेने बघितले जाणार आहे...
असो, आपल्याला असे दिसून येईल की dnyan
किंव्हा अभ्यास देखील वरील दोन पद्धतीने व्यवहारात आणता येतो. एक प्रकाराचा
अभ्यास असा झाला आहे की प्रगती, स्मरण,
पर्यावरण, समाज, मनुष्य जीव,
जीवन, नाती, मनाचे प्रश्न,
ध्यान, अध्यात्म ह्या सर्व गोष्टींना "विषयाचा"
रंग चढवलेला दिसतो - म्हणजे की प्रश्न सोडवण्याचे साधन/ गुरू किल्ली/ हेतू/
व्यवहारात उपयोग वगैरे. इथे मूळ प्रकार आहे तो अहं वृत्तीचा आहे,
जो कुठल्याही गोष्टीला विषय करतो, कुठल्याही गोष्टीकडे
त्या नजरेने बघतो, तसा उपयोग करून घेतो, आणि तसे परिणाम
भोगतो. म्हणजे शेवटी अहं वृत्ती प्रज्वलित राहते आणि कष्ट,
दुःख, त्रास देते. "चक्र" ही संकल्पना देखील तशीच
बघितली जाते की "आपण त्यातून बाहेर कसे येऊ"...?
ह्यातून होते असे की स्वतःच्या सर्व छटा ह्यांना आपण स्वीकारत नाही (किंव्हा
अवघड जाते) आणि त्यातून सतत पळून जाण्याची भूमिका आपण घेतो. किंव्हा पुर्वी होऊन
गेलेल्या गोष्टीनं बद्दल खंत आणि येणाऱ्या गोष्टीनं बद्दल काळजी. किंव्हा रेषे
सारखे सगळीकडे बघणे, मर्यादित बघणे, वेगळे बघणे,
सिद्ध होण्याचा अट्टाहास धरणे वगैरे.
जाणीव गोष्ट अशी समजून घ्यायला हवी की ती सूक्ष्म स्थिती अस्तित्वात असते,
जिच्यामुळे सर्व घटक, स्तर, स्थिती
"स्वीकारल्या" जातात...ते आपल्यातच आहे, हे ओळखता येते आणि
आपण स्थिरावतो किंव्हा रेषे सारखे संबंध जोडण्याचा अट्टाहास धरत नाही,
किंवा गुढत्व जाणवतं, कार्याची ओळख स्पष्ट होते,
ध्यान एकाग्र होते, न खंत न काळजी कसलीच, दृश्याचा प्रभाव
शीथिल होतो, विषय म्हणून प्रश्नांकडे बघितले जात नाही,
सर्व भगवंत करतो अशी श्रद्धा वाढत राहते, सत्य दिसून येते,
स्थळ आणि काळ ह्या गोष्टी सूक्ष्म होतात आणि विलीन होतात,
वासना शांत होते, आपल्यात आतून परिवर्तन होते वगैरे....इथे चक्र,
संबंध, पूर्वीच्या गोष्टी किंव्हा पुढच्या गोष्टी "एकच
सत्य" दर्शवतात असे स्वीकारले जाते म्हणून सर्वांची विभागणी किंव्हा विघटन
किंव्हा साचा असे होत नाही.
हरि ओम.
श्री
तात्पुरतेपण, हालचाली, बदल हा विषय असू शकतो
का? आपण येतो, वावरतो,
जातो... हे तात्पुरते का मानावे? स्तर बदलतील,
पण *अस्तित्व राहणार*.
तरपूरतेपणात विषयाची, हेतूची, वृत्तीची,
कोडी ह्यांची, अट्टाहासाची, सिद्ध होण्याची
संकल्पना मांडली जाते - त्या स्वभावाला आपण धरून राहतो का?
प्रवाहात, स्तरात, शांती भावात वरील
संकल्पना गळून जातात. कार्य भाव, सूक्ष्म स्थिती,
स्थिरता, विशालता, पलीकडे स्थित असणे -
हे सर्व भाव प्रकट होतात आणि स्थिरावतात. म्हणजे जाणीव किंव्हा स्मरण सूक्ष्म
होते.
दर रोजच्या क्रियेत विचार, भावना,
शब्द, व्यक्त होणे, हेतू,
कार्य ह्या सर्वांचा सतत मनावर परिणाम होत राहतो... जसं की शक्ती स्वतःशी बोलत
आहे. त्या परिणामातून परिवर्तन घडते. म्हणून वावर दृश्यात असा हवा की सतत
क्रियांचा प्रभाव स्वतःवर काय होईल, ह्याची जाण हवी.
थोडक्यात अंतर्मुख ते बहिर्मुख प्रकरण चक्राचे आणि गूढ संबंधाचे असते,
हे ओळखावे आणि स्वीकारावे.
हरि ओम.
श्री
तात्पुरतेपण, ह्या भावनेत आपण होतो. पण त्या भावनेला आपण धरून
ठेवले आहे. तो भाव कधीही परिवर्तित करून शांत करता येईल.
त्यासाठी नामाचे चिंतन करावे, काहीही जरी झाले
तरीही. दृश्यात घडामोडी, हालचाली, बदल ह्यांचा आपल्या
आतील शांततेशी काहीही संबंध नसतो, हे जाणून घ्यावे.
त्याला बुद्धीची पूर्ण जोड देऊ नये. सर्वांगीण स्थितींची जोड किंव्हा संबंध लागतो.
जाणीव अंतर्मुख स्थितीशी स्थिर व्हावी लागते.
हरि ओम.
श्री
विषय खूप आतून येत राहतात. त्यांचा उगम वासनेतून होतो (शांतीत विघटन). ते
आणखीन इतर स्तरात रूपांतर होऊन विचार आणि भावना जागृत करत आणि दृश्य ध्यानात आणत. _रूपांतर होणे_
हे अपरिहार्य आहे, असे वाटते. म्हणून त्यातून उर्ध्व अवस्थेत येणे हा
मार्ग ओळखावा.
म्हणजे विषय ह्याचा अर्थ किंवा निर्मिती शांती मध्ये _परिवर्तन_
होण्यात स्थित असते. त्या परिवर्तन क्रियेत खूप गूढ पद्धतीने स्मरण प्रकट होते,
ज्यात संबंध असतात, बदल होतात, प्रतिक्रिया होते,
चक्र येतं वगैरे. ह्यालाच *भगवंताचे कार्य* म्हणावे.
थोडक्यात शांत भाव स्वतः सिद्ध असते आणि ते कायम आणि स्थिर असते. ते सर्व
रूपाच्या पलीकडे असते आणि एक सत्य असते.
त्याची ओळख होण्यासाठी नामाचे चिंतन करावे असे सुचविले आहे.
हरि ओम.
