श्री
श्री
Dyanala बरेच कंगोरे असू शकतात. एका प्रकारे dnyan
म्हणजे अस्तित्वच आहे, म्हणून अस्तित्वाचा अर्थ दृश्यात अनेक संबंधांच्या
रूपातून प्रस्थापित होतो. प्रत्येक जीवाचे dnyan संपादन होण्यामध्ये
प्रवास असतो, शोध असतो सत्याचा. शोध, ह्या भावनेला इथे मी
बौद्धिक हेतू लावत नाही, की त्यामुळे कोडी सुटतील. इथे शोध,
जो मला आवडतो अर्थ, तो असा आहे की ती नैसर्गिक सत्याकडे जाण्याची किंव्हा
होण्याची प्रगती म्हणायला हवी. ह्या शोधात अनेक समस्या,
प्रश्न, व्याकुळता येतील. त्यांचे उत्तरे कधी,
कधी मिळतील तर कधी, कधी सैय्यमाने कालांतराने उत्तरांची भूमिका स्पष्ट
होईल.
इथे बरोबरीने dnyan किंव्हा माहितीचे स्थान बघायला हवे..की वरील शोधाला
ते पूरक कसे ठरते. मला खूप वर्ष शंका, authetic idea, ह्यावर व्याकुळ होत
होतं. हे वाचू का ते वाचू, हे बघू की ते बघू, हे सत्य की त्याला
सत्य म्हणावे...असे काहीसे होत असे.
काही काळापासून असे जाणवायला लागले आहे, की "हे का
ते" ह्या बहिर्मुख भूमिकेत काहीही तथ्य नसते विशेष. त्यावर सत्य किंव्हा
शांती अवलंबून ठेवू नये. सत्य अंतर्मुख होण्यात आहे, आणि जी काही कृती
तसे घडवून आणेल, त्याला आपल्यासाठी तरी योग्य मार्ग म्हणावा. मग ह्या
तत्वावर माहितीचा प्रश्न निराळा उभा राहतो. तो असा, की "योग्य
मार्ग" पत्करावा आणि स्वस्थ असावं दृश्यात वावरताना.
हरि ओम.
श्री
अहं वृत्ती सर्व स्तरात (द्वैताचा अनुभव जो वासनेतून प्रस्थापित व्हायला
लागतो) स्थित असल्यामुळे, _स्मरण प्रकट होते दृश्याचे_.
त्यातून सिद्धत्व, तात्पुरतेपण, वेगळेपण,
असे सारे भाव वावरत असतात. थोडक्यात अस्तित्व शक्तीच्या कार्यामुळे,
जी क्रिया होते, त्यातून असे सारे भाव निर्माण होत राहतात. _मूळ कारण_
अस्तित्व शक्ती आहे....त्याच्या नुसत्या असण्यामुळे,
हे सारे होते, दृष्टीस येते, स्थळ आणि काळ होते
आणि परिणाम भोगला जातो! पण इथे प्रकरण संपत नाही, म्हणून हताश
होण्याची जरूरी मुळीच नाही. चक्र आहे. _ह्याचा अर्थ शांती
कुठल्याही स्थितीत प्रस्थापित होऊ शकते_. हे शक्य आहे,
शंका घेण्याची जरुरी नाही.
शांती प्रस्थापित होणे, म्हणजे सर्वांगीण परिवर्तन होणे,
विलीन होणे, सूक्ष्म होणे, विशाल होणे,
अमर्यादित होणे, स्वीकारणे, आपुलकी येणे,
स्थिर होणे...
ह्याचा तिसरा अर्थ असा, की परिस्थिती कशीही जरी असली,
तरी आपण आनंदी असू शकतो कारण सत्याचा आनंद हा परिस्थितीशी निगडित नसतो (म्हणजे
तो पलीकडे स्थित राहतो). म्हणजे खऱ्या आनंदाचा शोध आपल्याला पलीकडे स्थित करतो,
शांत करतो, सर्व काही सोडायला भाग पाडतो.
हरि ओम.
श्री
सत्य ओळखायला लागते आणि त्यासाठी शांत, सर्वांगीण भाव
प्रस्थापित होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही,
पण देवाची कृपा लागते. देवाचीबकृपा म्हणजे आपल्या आकलनाच्याही पलीकडे,
बुद्धीच्या पलीकडे योग्य कार्याचा परिणाम _ध्यानात येणे_.
म्हणजे इथे मी काहीतरी करण्यापेक्षा, आपोआप काही गोष्टी
ध्यानात येतात आणि योग्य परिवर्तन आणतात. त्याला *प्रतिभा* म्हणतात. त्यासाठी मन
शांत होणे गरजेचे असते.
मी काही करू किंव्हा न करू, हे महत्वाचे नसते.
मुळात "मी" ह्याने सत्यपणा गढूळ होऊ शकते, अहं वृत्ती मिसळू
शकते आणि त्यातून स्वार्थी संबंध प्रस्थापित होऊ शकतात. स्वार्थी वृत्ती खूप
सूक्ष्म स्तरातून प्रकट होऊ शकते.
म्हणून अंतःकरण शुद्ध होण्याची गरज असते. आजच्या जमान्यात त्याचा अर्थ काय
असावा, ते बघावे.
हरि ओम.
श्री
जाणीव नेणीव भगवंती नाही I
उच्चारणी पाही मोक्ष सदा II
वृत्ती किंव्हा वासना भगवंत भावाला देखील स्वार्थी करते किंव्हा त्याचा उपयोग
प्रपंचाचे समस्या सोडवण्यासाठी वापर केलेले जाते. आपली बुद्धी,
भावना, देह हे वासनेतून आले आहे..म्हणजे त्यात वासनेचे बीज
असते. म्हणून बुद्धीने, भावनेने समाधान आणि शांती भाव प्रस्थापित होईल का,
हे ओळखावे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण बुद्धीतून जो
स्वभाव होतो, त्यातही स्वार्थी हेतूचा परिणाम दिसून येतो आणि
त्यावरून परिणाम होत राहतो. म्हणजे परिणाम प्रकार गूढ आहे,
चक्र आहे...त्यात अनेक स्तर सामावलेले असतात. म्हणून परिणामाला रेषेसारखे बघू
नये.
तात्पर्य, भगवंत भाव ध्यानी येणे गूढ आहे. सातत्याने नामस्मरण
किंव्हा भगवंताचे चिंतन करत राहावे.
हरि ओम.
श्री
विघटित होण्याचा परिणाम खूप गंभीर असतो आणि आकलनाच्याही पलीकडे असतो. सिद्ध
होण्याचा अट्टाहास, व्याकुळता, बेचैनी वगैरे ह्या
विघटित क्रियेमुळे येत राहते. "मी" ह्या भावनेला प्रज्वलित ठेवणे देखील
विघटित रूपाचे प्रदर्शन आहे. म्हणून ते अयोग्य आहे.
तरीही वरील कार्याला भगवत इच्छा मानून शांतीकडे प्रवास थाटावा. म्हणजे वृत्तीत
"दोष" समजून घेऊन, ती शांत कशी होईल,
ह्यावर चिंतन करावे.
इथे प्रश्न "संवाद" ठेवण्याचा आहे. संवाद अनेक प्रकारचे असतात -
भगवंताशी, स्वतःशी, दुसऱ्यांशी.
भगवंताशी संवाद स्पष्टतेने साधणे...म्हणजे अंतःकरण शुद्ध करणे. त्यातून स्वतःशी
संवाद आणि इतरांशी देखील सुधारतो. Self talk. This
self talk is based on the foundation of Existence, then the Self and then with
the other.
बघण्यात, बोलण्यातही तेच आहे. पहिले भगवत भावाला बघतो/ बोलतो;
मग स्वतःला बघतो/ बोलतो आणि त्यातून इतरांशी बोलतो/बघतो.
हरि ओम.
