Wednesday, March 04, 2026

Shree

 

Shree 

 

 *विचार* -  हे स्थळ, काळ, रूप, आकार ह्यांच्याशी मर्यादित *नसतात*. वरील गोष्टी निमित्त ठरतात विचाराला मर्यादित होण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी, हालचाली घडवण्यासाठी, परिणाम देण्यासाठी, परिस्थिती उद्भवण्यासाठी वगैरे. 

 

ह्याचा अर्थ, परिस्थितीतून स्वतःचे मुल्य ठरवू नये आणि अस्तित्वाचा भाव बदलण्याची शक्ती आपल्यात असते. थोडक्यात विचारातून आपण कुठल्याही रूपाचे संबंध निर्माण करू शकतो आणि निर्मिती करण्याचे मुख्य श्रेय भगवंताला सोपवावे. 

 

अजून एक अर्थ जो निघून येतो, तो हा की विचाराची साथ आपण ठरवू शकतो. म्हणजे चांगले विचार कुठल्याही स्थळ, काळातून स्वतःच्या देह बुद्धीत सामावून घेऊ शकतो आणि त्यामुळे स्मरणात परिवर्तन आणू शकतो. विचारातून आपण एका नव्या शिखरावर (imagination) अनुभव आपण घेऊ शकतो. 

 

विचारांवर श्रद्धा ठेवावी.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

 *मर्यादा* येणे, म्हणजे हालचाली जाणवणे, बदल जाणवणे, स्थळ, काळ, परिस्थिती, भाव, स्मरण, विचार, भावना जाणवणे. 

 

एकदा जन्म घेतला, म्हणजे मर्यादेत आपण आलो, असे ओळखावे. मर्यादेचा दुसरा अर्थ म्हणजे प्रकृतीचे गुण, परिणाम, चक्रात राहणारे व्यवहार आणि त्यातून घडणारे दृश्य. 

 

भगवंत मर्यादेच्या भाषेतून संक्रांत करायचा असतो. म्हणून वासनाविचार, भावना, देह - ह्या टप्प्यातून पलीकडे जायला लागतं, शांत व्हायला लागतं आणि भगवत भाव संक्रांत करायला लागतो. 

 

नात्यांचे नावे, काम, परिस्थिती हे निमित्त समजावे प्रवासातील असणारे. मी निमित्त आहे. काय सांगणे असते, ऐकणे असते, दिसणे असते, सुवास घेणे असते, चव घेणे असते ते फक्त _निमित्त_ म्हणून ओळखावे. बाकी सर्व आपण देणेच लागतो. 

 

बसणे, काहीही न बोलणे, कधी कधी सांगणे, जवळ येणे, एकांतात बसणे, बरोबरीने खाणे, हसणे, थांबणे, सैय्यम ठेवणे, बदल बघत राहणे, प्रतिक्रिया न देणे, अट्टाहास न धरणे, हेतू नसणे, फक्त असणे - हे सर्व गूढ असते. 

 

सर्व भगवंत करतो, ह्यात दुमत नाही. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अस्तित्वाचे कार्य आणि त्यातून होणाऱ्या गुंतलेल्या स्थिती, स्मरण, भाव, परिणाम असा एक अभ्यास आहे. त्यात प्रकृती, गुण, हालचाली, गती, बदल आणि त्यातून "मी" कसा होतो हे विषय आहेत. ह्या सर्व गोष्टींना अवतरणे असे म्हणतात किंव्हा भगवंताचे विस्मरण (आपल्या पार्श्वभूमीवरून) किंव्हा सिद्ध होत राहणे, अहं वृत्ती प्रज्वलित ठेवणे, कोडी सोडवण्यात गुंतून राहणे अशा गोष्टींचा उल्लेख सापडतो. मग त्यात अनुभव आणि द्वैताचा पसारा ह्या गोष्टींचा उल्लेख होतो. धडपड, काळजी, त्रास, राग, कष्ट अशा गोष्टी वाट्याला येत राहतात. 

 

मग प्रश्न पडायला लागतो की - ह्यातून "मार्ग" तो कोणता?!! हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे ओळखायला हवे की वरील कार्य जरी मनाला "कळून घेता आले", तरीही भगवंत होण्याचा "अनुभव" हा प्रकार गूढ आहे! If above things indicate additions or layering, then bliss is NOT the reverse...i.e. it is NOT subtraction or removal of layers. 

 

इथे मग, सुरुवात मानवी भूमिकेतून करायला लागते - म्हणजे प्रयत्न, सैय्यम आणि श्रद्धेची भाषा. त्याला *योग* म्हणतात. ते सातत्याने केल्याने अधिकाधिक सूक्ष्म स्थिती अनुभवास संक्रांत होत राहतात, ज्याला आत्मसात करणे, स्वीकार करणे, सामोरे जाणे आले. म्हणून निश्चय होणे महत्वाचा ठरतो. म्हणून प्रारब्ध कसेही आले, तरी त्यात दोष न शोधता, मार्गावर रहावे. त्याचा परिणाम म्हणजे शांती प्रस्थापित होणे...म्हणजेच भगवंताचे दर्शन होणे. ह्याला अंतर्मुख होणे असेही संबोधले आहे. 

 

एका वाक्यात सांगायचे झाले तर मानवी भूमिकेतून कर्तव्य करत राहावे किंव्हा देत रहाणे. फळ भगवंताच्या इच्छेने येते कारण ते अस्तित्वाचे कार्य आहे. जिथे कर्तव्य आणि फळ एकाच ठिकाणी मिळतात, त्याला भगवंताची कृपा म्हणायची. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

मनुष्य असा जीव आहे (रूप आणि आकार), की त्यात त्याला भगवंताची जाणीव आणि कार्याची व्याख्या कळून घेता येऊ शकते त्याच्या स्मरणेच्या रचनेतून. म्हणजेच अनुभव "दुहेरी" किंव्हा आतून ते बाहेर असे सर्वांगीण पसरत असते, प्रवाह असते, द्वैत असते, संबंधित असते, परिणाम करत राहते, हे तो ओळखून घेऊ शकतो....त्यातून *मार्ग* पत्करला जातो भगवंताचे दर्शन होण्यासाठी. 

 

मार्ग असा की त्यातून परिणाम आत आणि बाहेर होणे अभिप्रेत आहे. दोघांचीही भाषा आणि पार्श्वभूमी वेगळी असते, म्हणून मार्ग त्यातील संबंध स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. 

 

संबंध दोन प्रकारचे असतात. एक संबंध म्हणजे दृश्यात अनेक रूप, आकार आणि माझा संबंध जो गुणांमुळे होतो, वृत्तीमुळे प्रज्वलित राहतो, तशी परिस्थिती आणतो आणि त्यात गुंतवून ठेवतो. त्याला मूळ कारण प्रकृती आहे. दुसरा संबंध जो असतो, तो भगवंत अस्तित्वाचा आणि मनाचा असतो...म्हणजे जाणिवेच्या स्थितीचा आणि त्यातून शुद्ध कसे व्हावे हा मूळ प्रश्न असतो. मार्ग पत्करून ज्या स्थिती येऊ पाहतात, ते आत्मसात करून, सूक्ष्म होऊन शेवटी सत्यात विलीन होणे अभिप्रेत असते. तिथे स्वतःचेही भान राहत नाही, तर दृश्याचे काय राहणार?! 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

वरील लेखातून हा मर्म घ्यावा की भगवंताचे कार्य हा प्रकार गूढ असतो आणि त्यात शक्तीचा परिणाम असा असतो की सत्याला कायम ठेवून अनेकात शांती भाव विघटित केली गेली असते, म्हणून तसे स्मरण, स्वभाव, रूप, क्रिया, कोडी, प्रश्न, भावना वगैरे. 

 

जे _कार्य भगवंताच्या पार्श्वभूमीवरून आणि भावातून होत असते, तेच कार्य आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने जाणवते आणि परिणाम करत राहते._ हाच अस्तित्वाचा सवाल आहे आणि आलेले सर्व अनुभव ह्यातूनच घडत राहतात. 

 

म्हणून व्यवहारात प्रयत्न, सैय्यम आणि श्रद्धेचे स्थान खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे भगवत स्वरूप मन होत जाते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

विचारांचा प्रभाव बहिर्मुख पडतो, तात्पुरता असतो, वेगळेपण दाखवतो, सिद्ध करायला लावतो, अनंत रूप आणि आकार आणि त्यातील संबंध दर्शवतो, व्यवहार करायला लावतो, चक्रात गुंतून ठेवतो, भावनांचे प्रकार देतो, अस्थिर ठेवतो, परावलंबित ठेवतो, वगैरे. 

 

प्रश्न किंव्हा आतील स्थिती दृश्याला सांगून समाधान होत नाही. मुळात समाधान भाव परावलंबित राहून येत नाही. आपण किती परावलंबित असतो, ह्याचे ७ स्तर असतात आणि ते सर्व स्तर म्हणजे अंतर्मुख होण्याची क्रिया दर्शवतात. 

 

म्हणून परिस्थितीला खूप गूढ कारण असतं, जे अनेक स्तरात स्थित असतं आणि ते दृश्यात मिळेल असे काहीही नाही. म्हणून कारणांना अनेक अर्थ असतात...त्यातील काही अर्थ दृश्यात स्थित दिसतात आणि काही अर्थ अदृश्य स्थितीत वावरतात. 

 

अदृश्य स्थितीत नजर जाण्यासाठी, तसा स्वभाव व्हायला लागतो - त्यासाठी मार्ग निवडावा, जो दृश्य मागे टाकून अदृश्य याच्यात नेऊ शकेल. 

 

दररोजच्या अनुभवात याचा सरळ अर्थ हा की काहीही झालं, कितीही त्रासदायक भावना वाटले, तरीही त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू नये, कोडी सोडवू नये, विषय म्हणून त्याकडे बघू नये. आपली अपेक्षा असते की जो पर्यंत गुंतागुंतीचे कोडी सुटत नाही, तो पर्यंत सुख मिळणार नाही किंव्हा आपण स्वस्थ होणार नाही. हा बुद्धीचा स्वभाव झाला. तो मर्यादित असतो. कोडी सुटायला सूक्ष्म होणे गरजेचे आहे, म्हणजेच श्रद्धेने जगणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही लोकांना गोष्टी खूप systematic किंव्हा चिकित्सपूर्व पाहिजे असतात. खरं पाहिलं तर आपण सगळे कुठल्या ना कुठल्यातरी वृत्तीला पकडून असतो. 

 

त्यातून विचारांचे स्वरूप होते - ज्याला "गुण" ही परिभाषा दिली आहे. जे गुण आपण घेऊन येतो किंवा दिले गेलेले असतात, त्यातून विचारांचे स्वरूप स्थित होते, गोष्टींचा अर्थ निर्माण केला जातो, परिणाम त्या प्रमाणे भोगले जातात वगैरे. स्मरण त्या पद्धतीतून होते. कुठल्या गोष्टी आठवत राहतात आणि कुठल्या गोष्टी ध्यानात येत नाही हे ठरते. आठवणे किंव्हा न आठवणे - दोन्ही क्रिया आहेत, कारण त्यातून गोष्ट दिसणे, वावरणे, प्रतिक्रिया देणे, विचारांचे चक्र निर्माण करणे असे होते. 

 

म्हणून एखादी गोष्ट कशी आणि का आठवते, त्यात खोल अर्थ भरला असतो. आणि आठवण फक्त मागची नसून, पुढचीही असू शकते!  म्हणजे जीव म्हणालो तर *आठवण*, हा गुण त्या बरोबर येणार. 

 

म्हणजे आपण व्यक्ती आहोत की आठवण?!! हा गमतीशीर प्रश्न आहे, कारण _आठवण_ ही संकल्पना आहे... जिला मर्यादित स्थळ किंव्हा काळ असे काहीही नसते! आणि व्यक्ती म्हणालो तर वस्तू समजावी, जिला स्थळ आणि काळाचे बंधन आले! 

 

ह्यातून हे दिसून येते की अस्तित्वाच्या कुठल्याही गोष्टीला मर्यादित स्वरूप (आकार) असे असते आणि अमर्यादित स्वरूप (आठवण आणि जाणीव). असे म्हणतात की प्रारब्धाचा परिणाम आकारा पर्यंत चढतो, पण तो परिणाम जाणिवेत शिरू शकत नाही. म्हणून जर स्मरण शुद्ध केले, तर स्वतःवर कशाचाही परिणाम होणार नाही (स्मरण अमर्यादित ठेवणे).

 

आता प्रश्न असा आहे, की परिणाम म्हणजे नेमके काय? मला वाटते की परिणाम एक क्रियेमुळे घडतो, ज्यात विचार आणि भावना (वासने पासून सुरुवात) हातभार घालतात. म्हणजे परिणामांचे बीज विचारात असते...चिंता, त्रास, कष्ट, काळजी - हे म्हणजे परिणाम. 

 

तर विचार सूक्ष्म भावाचे करता आले, तर परिणाम सूक्ष्म स्वभावाचा होईल - म्हणजे शांती भाव स्थित होणे.

 

हरि ओम.

 

 

Shree 

 

 *विचार* -  हे स्थळ, काळ, रूप, आकार ह्यांच्याशी मर्यादित *नसतात*. वरील गोष्टी निमित्त ठरतात विचाराला मर्यादित होण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी, हालचाली घडवण्यासाठी, परिणाम देण्यासाठी, परिस्थिती उद्भवण्यासाठी वगैरे. 

 

ह्याचा अर्थ, परिस्थितीतून स्वतःचे मुल्य ठरवू नये आणि अस्तित्वाचा भाव बदलण्याची शक्ती आपल्यात असते. थोडक्यात विचारातून आपण कुठल्याही रूपाचे संबंध निर्माण करू शकतो आणि निर्मिती करण्याचे मुख्य श्रेय भगवंताला सोपवावे. 

 

अजून एक अर्थ जो निघून येतो, तो हा की विचाराची साथ आपण ठरवू शकतो. म्हणजे चांगले विचार कुठल्याही स्थळ, काळातून स्वतःच्या देह बुद्धीत सामावून घेऊ शकतो आणि त्यामुळे स्मरणात परिवर्तन आणू शकतो. विचारातून आपण एका नव्या शिखरावर (imagination) अनुभव आपण घेऊ शकतो. 

 

विचारांवर श्रद्धा ठेवावी.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

 *मर्यादा* येणे, म्हणजे हालचाली जाणवणे, बदल जाणवणे, स्थळ, काळ, परिस्थिती, भाव, स्मरण, विचार, भावना जाणवणे. 

 

एकदा जन्म घेतला, म्हणजे मर्यादेत आपण आलो, असे ओळखावे. मर्यादेचा दुसरा अर्थ म्हणजे प्रकृतीचे गुण, परिणाम, चक्रात राहणारे व्यवहार आणि त्यातून घडणारे दृश्य. 

 

भगवंत मर्यादेच्या भाषेतून संक्रांत करायचा असतो. म्हणून वासनाविचार, भावना, देह - ह्या टप्प्यातून पलीकडे जायला लागतं, शांत व्हायला लागतं आणि भगवत भाव संक्रांत करायला लागतो. 

 

नात्यांचे नावे, काम, परिस्थिती हे निमित्त समजावे प्रवासातील असणारे. मी निमित्त आहे. काय सांगणे असते, ऐकणे असते, दिसणे असते, सुवास घेणे असते, चव घेणे असते ते फक्त _निमित्त_ म्हणून ओळखावे. बाकी सर्व आपण देणेच लागतो. 

 

बसणे, काहीही न बोलणे, कधी कधी सांगणे, जवळ येणे, एकांतात बसणे, बरोबरीने खाणे, हसणे, थांबणे, सैय्यम ठेवणे, बदल बघत राहणे, प्रतिक्रिया न देणे, अट्टाहास न धरणे, हेतू नसणे, फक्त असणे - हे सर्व गूढ असते. 

 

सर्व भगवंत करतो, ह्यात दुमत नाही. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अस्तित्वाचे कार्य आणि त्यातून होणाऱ्या गुंतलेल्या स्थिती, स्मरण, भाव, परिणाम असा एक अभ्यास आहे. त्यात प्रकृती, गुण, हालचाली, गती, बदल आणि त्यातून "मी" कसा होतो हे विषय आहेत. ह्या सर्व गोष्टींना अवतरणे असे म्हणतात किंव्हा भगवंताचे विस्मरण (आपल्या पार्श्वभूमीवरून) किंव्हा सिद्ध होत राहणे, अहं वृत्ती प्रज्वलित ठेवणे, कोडी सोडवण्यात गुंतून राहणे अशा गोष्टींचा उल्लेख सापडतो. मग त्यात अनुभव आणि द्वैताचा पसारा ह्या गोष्टींचा उल्लेख होतो. धडपड, काळजी, त्रास, राग, कष्ट अशा गोष्टी वाट्याला येत राहतात. 

 

मग प्रश्न पडायला लागतो की - ह्यातून "मार्ग" तो कोणता?!! हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे ओळखायला हवे की वरील कार्य जरी मनाला "कळून घेता आले", तरीही भगवंत होण्याचा "अनुभव" हा प्रकार गूढ आहे! If above things indicate additions or layering, then bliss is NOT the reverse...i.e. it is NOT subtraction or removal of layers. 

 

इथे मग, सुरुवात मानवी भूमिकेतून करायला लागते - म्हणजे प्रयत्न, सैय्यम आणि श्रद्धेची भाषा. त्याला *योग* म्हणतात. ते सातत्याने केल्याने अधिकाधिक सूक्ष्म स्थिती अनुभवास संक्रांत होत राहतात, ज्याला आत्मसात करणे, स्वीकार करणे, सामोरे जाणे आले. म्हणून निश्चय होणे महत्वाचा ठरतो. म्हणून प्रारब्ध कसेही आले, तरी त्यात दोष न शोधता, मार्गावर रहावे. त्याचा परिणाम म्हणजे शांती प्रस्थापित होणे...म्हणजेच भगवंताचे दर्शन होणे. ह्याला अंतर्मुख होणे असेही संबोधले आहे. 

 

एका वाक्यात सांगायचे झाले तर मानवी भूमिकेतून कर्तव्य करत राहावे किंव्हा देत रहाणे. फळ भगवंताच्या इच्छेने येते कारण ते अस्तित्वाचे कार्य आहे. जिथे कर्तव्य आणि फळ एकाच ठिकाणी मिळतात, त्याला भगवंताची कृपा म्हणायची. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

मनुष्य असा जीव आहे (रूप आणि आकार), की त्यात त्याला भगवंताची जाणीव आणि कार्याची व्याख्या कळून घेता येऊ शकते त्याच्या स्मरणेच्या रचनेतून. म्हणजेच अनुभव "दुहेरी" किंव्हा आतून ते बाहेर असे सर्वांगीण पसरत असते, प्रवाह असते, द्वैत असते, संबंधित असते, परिणाम करत राहते, हे तो ओळखून घेऊ शकतो....त्यातून *मार्ग* पत्करला जातो भगवंताचे दर्शन होण्यासाठी. 

 

मार्ग असा की त्यातून परिणाम आत आणि बाहेर होणे अभिप्रेत आहे. दोघांचीही भाषा आणि पार्श्वभूमी वेगळी असते, म्हणून मार्ग त्यातील संबंध स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. 

 

संबंध दोन प्रकारचे असतात. एक संबंध म्हणजे दृश्यात अनेक रूप, आकार आणि माझा संबंध जो गुणांमुळे होतो, वृत्तीमुळे प्रज्वलित राहतो, तशी परिस्थिती आणतो आणि त्यात गुंतवून ठेवतो. त्याला मूळ कारण प्रकृती आहे. दुसरा संबंध जो असतो, तो भगवंत अस्तित्वाचा आणि मनाचा असतो...म्हणजे जाणिवेच्या स्थितीचा आणि त्यातून शुद्ध कसे व्हावे हा मूळ प्रश्न असतो. मार्ग पत्करून ज्या स्थिती येऊ पाहतात, ते आत्मसात करून, सूक्ष्म होऊन शेवटी सत्यात विलीन होणे अभिप्रेत असते. तिथे स्वतःचेही भान राहत नाही, तर दृश्याचे काय राहणार?! 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

वरील लेखातून हा मर्म घ्यावा की भगवंताचे कार्य हा प्रकार गूढ असतो आणि त्यात शक्तीचा परिणाम असा असतो की सत्याला कायम ठेवून अनेकात शांती भाव विघटित केली गेली असते, म्हणून तसे स्मरण, स्वभाव, रूप, क्रिया, कोडी, प्रश्न, भावना वगैरे. 

 

जे _कार्य भगवंताच्या पार्श्वभूमीवरून आणि भावातून होत असते, तेच कार्य आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने जाणवते आणि परिणाम करत राहते._ हाच अस्तित्वाचा सवाल आहे आणि आलेले सर्व अनुभव ह्यातूनच घडत राहतात. 

 

म्हणून व्यवहारात प्रयत्न, सैय्यम आणि श्रद्धेचे स्थान खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे भगवत स्वरूप मन होत जाते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

विचारांचा प्रभाव बहिर्मुख पडतो, तात्पुरता असतो, वेगळेपण दाखवतो, सिद्ध करायला लावतो, अनंत रूप आणि आकार आणि त्यातील संबंध दर्शवतो, व्यवहार करायला लावतो, चक्रात गुंतून ठेवतो, भावनांचे प्रकार देतो, अस्थिर ठेवतो, परावलंबित ठेवतो, वगैरे. 

 

प्रश्न किंव्हा आतील स्थिती दृश्याला सांगून समाधान होत नाही. मुळात समाधान भाव परावलंबित राहून येत नाही. आपण किती परावलंबित असतो, ह्याचे ७ स्तर असतात आणि ते सर्व स्तर म्हणजे अंतर्मुख होण्याची क्रिया दर्शवतात. 

 

म्हणून परिस्थितीला खूप गूढ कारण असतं, जे अनेक स्तरात स्थित असतं आणि ते दृश्यात मिळेल असे काहीही नाही. म्हणून कारणांना अनेक अर्थ असतात...त्यातील काही अर्थ दृश्यात स्थित दिसतात आणि काही अर्थ अदृश्य स्थितीत वावरतात. 

 

अदृश्य स्थितीत नजर जाण्यासाठी, तसा स्वभाव व्हायला लागतो - त्यासाठी मार्ग निवडावा, जो दृश्य मागे टाकून अदृश्य याच्यात नेऊ शकेल. 

 

दररोजच्या अनुभवात याचा सरळ अर्थ हा की काहीही झालं, कितीही त्रासदायक भावना वाटले, तरीही त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू नये, कोडी सोडवू नये, विषय म्हणून त्याकडे बघू नये. आपली अपेक्षा असते की जो पर्यंत गुंतागुंतीचे कोडी सुटत नाही, तो पर्यंत सुख मिळणार नाही किंव्हा आपण स्वस्थ होणार नाही. हा बुद्धीचा स्वभाव झाला. तो मर्यादित असतो. कोडी सुटायला सूक्ष्म होणे गरजेचे आहे, म्हणजेच श्रद्धेने जगणे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

काही लोकांना गोष्टी खूप systematic किंव्हा चिकित्सपूर्व पाहिजे असतात. खरं पाहिलं तर आपण सगळे कुठल्या ना कुठल्यातरी वृत्तीला पकडून असतो. 

 

त्यातून विचारांचे स्वरूप होते - ज्याला "गुण" ही परिभाषा दिली आहे. जे गुण आपण घेऊन येतो किंवा दिले गेलेले असतात, त्यातून विचारांचे स्वरूप स्थित होते, गोष्टींचा अर्थ निर्माण केला जातो, परिणाम त्या प्रमाणे भोगले जातात वगैरे. स्मरण त्या पद्धतीतून होते. कुठल्या गोष्टी आठवत राहतात आणि कुठल्या गोष्टी ध्यानात येत नाही हे ठरते. आठवणे किंव्हा न आठवणे - दोन्ही क्रिया आहेत, कारण त्यातून गोष्ट दिसणे, वावरणे, प्रतिक्रिया देणे, विचारांचे चक्र निर्माण करणे असे होते. 

 

म्हणून एखादी गोष्ट कशी आणि का आठवते, त्यात खोल अर्थ भरला असतो. आणि आठवण फक्त मागची नसून, पुढचीही असू शकते!  म्हणजे जीव म्हणालो तर *आठवण*, हा गुण त्या बरोबर येणार. 

 

म्हणजे आपण व्यक्ती आहोत की आठवण?!! हा गमतीशीर प्रश्न आहे, कारण _आठवण_ ही संकल्पना आहे... जिला मर्यादित स्थळ किंव्हा काळ असे काहीही नसते! आणि व्यक्ती म्हणालो तर वस्तू समजावी, जिला स्थळ आणि काळाचे बंधन आले! 

 

ह्यातून हे दिसून येते की अस्तित्वाच्या कुठल्याही गोष्टीला मर्यादित स्वरूप (आकार) असे असते आणि अमर्यादित स्वरूप (आठवण आणि जाणीव). असे म्हणतात की प्रारब्धाचा परिणाम आकारा पर्यंत चढतो, पण तो परिणाम जाणिवेत शिरू शकत नाही. म्हणून जर स्मरण शुद्ध केले, तर स्वतःवर कशाचाही परिणाम होणार नाही (स्मरण अमर्यादित ठेवणे).

 

आता प्रश्न असा आहे, की परिणाम म्हणजे नेमके काय? मला वाटते की परिणाम एक क्रियेमुळे घडतो, ज्यात विचार आणि भावना (वासने पासून सुरुवात) हातभार घालतात. म्हणजे परिणामांचे बीज विचारात असते...चिंता, त्रास, कष्ट, काळजी - हे म्हणजे परिणाम. 

 

तर विचार सूक्ष्म भावाचे करता आले, तर परिणाम सूक्ष्म स्वभावाचा होईल - म्हणजे शांती भाव स्थित होणे.

 

हरि ओम.