जे होणार असते, ते होतेच त्या त्या वेळेला....आपण म्हणून शांत रहावे. 

आजच्या वाढत्या वेगात तीन गोष्टी दिसून येतात तात्पर्य म्हणून

१) मनाचा मार्ग ताबा मिळवण्याचा असतो म्हणजे विघटन करत राहावे. पण त्याने विखुरलेपण आणि वाढीव वेग पदरी येतो...म्हणजे अस्थिरता अधिक येते.

२) त्यातून मूळ प्रश्न जोपासताना असे दिसून येते की हा प्रश्न जाणिवेशी निगडित होऊ द्यावा. जे अस्तित्वाचे प्रश्न पूर्वीही होते, ते आत्ताही तेच आहेत आणि उद्याही ते राहतील. कितीही जरी विघटन केले, तरी त्यातून स्वस्थता लाभेल का, हे ओळखावे?

३) आपण स्वतःला शांती समजतो की संकल्पना की विचार की भावना की देह, ह्यावर सर्व ठरते. प्रत्येकाचा चक्रात गुंतून ठेवण्याचा स्वभाव आहे, जो मनाला स्थिरता देणे कठीण पडू शकतो. 
चक्र असते, म्हणून शांतीचा मार्ग पचनी होण्याची गरज असते मानवाला. 

हरि ओम.


श्री 

रूप किंव्हा आकार ह्यात प्रवाह, प्रवास, चक्र, साखळी आणि द्वैत संबंध असते. किंबहुना ह्या काही गुणातूनच रूप आणि आकार होत राहते, ते बदलत राहते, ते येते आणि जाते. तसेच आपले मन, जे होते, येते आणि जाते आणि त्यातून दृश्याचे स्तर ध्यानात येत राहतात आणि त्यात गुंतायला होते. 

थोडक्यात मनाचे कोडे मनाने सोडवणे कठीण, तसेच दृश्याचे कोडे मनाने सोडवणे कठीण. मनानी किंव्हा दृश्यांनी स्वतःला लेखू नये आणि त्यांचा स्वतःवर विपरीत परिणाम करून घेण्याची जरुरी नसते. 

ह्याचे ध्यान का करावे, कारण त्यातून मार्ग गवसतो, जो घेतल्यावर, शांती भाव संक्रांत होते. बदल, परिस्थिती, संबंध - हे निमित्त किंव्हा पाहुण्या सारखे असतात. ते स्वतःचे नाहीत, आणि त्यांना फक्त देणे आपण लागतो. स्थळ आणि काळ ध्यानात _निर्माण_ होत राहतात. 

सर्व भगवंताला द्यावे आणि कर्तव्य करावे. मागचा आणि पुढचा विचार करू नये...मुळात विचारही येण्याची जरूरी भासू नये आणि त्यात शुद्धतेने बघावे.

हरि ओम.
ReplyForward