श्री
श्री
Random thought patterns as we try to analyse everyday life
श्री
श्री
श्री
श्री
श्री
कशालाही स्पष्टीकरण देण्याची गरज भासू नये, स्वतःलाही नाही. स्पष्टीकरणात एकरस होऊ नये. सत्य भगवंत आहे, हे जाणून कार्य करत राहावे अस्तित्वात.
कार्य तो करतो आणि त्यातून आपण स्वतःची व्याख्या तैय्यार करतो. म्हणून त्याचे नाम सोडून इतर काहीच स्वतः सिद्ध नसते...इतर सर्व परावलंबित प्रकरण आहे. परावलंबनाचा स्वभाव असतो, परिणाम होतो, विचार आणि भावना येत राहतात आणि त्यातून आणखीन विघटित, तात्पुरते वाटत राहते.
म्हणून वरील सर्व शांत होऊ देणे अभिप्रेत आहे, निदान त्याची नितांत गरज जीवाला ओळखता येते. त्या मार्गावर लागावे.
हरि ओम.
श्री
आयुष्यात विघटन ध्यानात येत राहणार आहे आणि त्यातून होत राहणारा _गूढ परिणाम_. विघटित क्रिया थांबवणे कठीण. ती सामोरे येणे, ते ध्यानात येणे, त्यात निश्चय करणे, त्यात शांती भाव आत्मसात होणे सर्व काही वाट्याला येत राहणार आहे.
निश्चित हे जाणून घेताना भीती अनुभवात येईल/ निर्माण होईल. एखादी गोष्ट _निर्माण का होते_ आणि त्यात कुठल्या प्रकारे आपल्याला गुंतायला होते, हे खरच गूढ असते. निर्मितीच्या रूपाला अंत नाही, म्हणून सुरुवात संकल्पना ही नाही....म्हणून दोन्ही बिंदू ध्यानात न आल्यामुळे ह्या स्थितीला "स्वीकारणे" अभिप्रेत होते. स्वीकार बुद्धीने होत नाही, ती चिंतनाने श्रद्धा भाव वाढवत राहिल्यामुळे होते.
हरि ओम.
Shree
Interestingly memory operates through connections, relations, flows, patterns, objects. When one says "meaning", it could mean all above things that _create_ a meaning.
Critically, the experience of memory could form a source of inquiry and through that source, all things that get preferred to be acted upon.
The memory, therefore, seems fluid, evolving, transforming and finally becoming only pure living beyond any limited intent.
The problem perhaps is about identifying memory to lead to a _conclusion_ that can be evaluated, traced, justified, produced, made effecient and so on. It still suggests a more deeper question of who we are and why we are here.
Hari Om.
श्री
गजल किंव्हा तत्सम कलाकृती खूप आतील भावनांशी सतत संपर्कात असतात. ह्या कलाकृतीचा हेतू "काहीतरी सोडवणे" असा मुळीच नसतो, पण फक्त स्वतःला पूर्णपणे त्या भावनांच्या सागरात बुडून ठेवावे. त्या भावना किती अथांग, विशाल, गूढ आहे - कदाचित त्यातून जाणवत असावे.
म्हणून कुठल्याही भावना वाईट नाही, की ते निघायला हवे की पुसून टाकायला हवे की त्यातून निश्चित त्वरित निर्णय असायला हवा, वगैरे. हे गहन भावना स्वीकारा स्वतः मध्ये आणि हे ही स्वीकारा की ते फक्त असतात आणि त्यांचा "निर्णय" असा काहीही नसतो.
म्हणून त्यातून संगीत, लिखाण, कादंबरी आणि वास्तुशास्त्र हे ही घडू शकतं.
हरि ओम.
श्री
श्री
श्री
सगळ्यांना स्मरण, भाव, रूप,
आकार आणि त्या प्रमाणे प्रवाहात राहणारी बुद्धी आणि भावना ध्यानात येत राहतात
आणि संबंध जोडतात. त्यामुळे वेगळेपण किंव्हा तात्पुरतेपण,
हा भाव संक्रांत होतो आणि तो प्रत्येक जीवाला गुंतवून ठेवतो. म्हणून प्रत्येक
जीवाला बेचैनी, भीती, व्याकुळता ही येतेच.
प्रश्न असा आहे, की अशा स्थितीत शांत होणे म्हणजे काय आणि ते कसे
साधायचे? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा वाटल्या शिवाय मार्ग
पत्करणे कठीण आणि त्यामुळे परिवर्तन होणे कठीण.
रूपाचा एक परिणाम घडतो, त्याचा एक स्वभाव असतो, त्यामुळे चक्र
प्रस्थापित होते. ह्यात बदल काय, संबंध काय,
साखळी काय, पाहिले काय आणि शेवट काय - ह्यात चिकित्सा करण्यात
विशेष तथ्य नाही...कारण मुळात तसे काही नसते, म्हणजे सर्व रूपाला
मर्यादा असतात आणि त्यांना निमित्त मानून सत्य ओळखावे लागते.
तरीही हे लिहिण्यात किंव्हा व्यवहारातही स्वतःचा स्वभाव असतोच,
म्हणून लिहिण्यावरून काम संपत नाही आणि त्यावर शांती ठरत नाही पूर्णपणे.
म्हणजे भगवंताला शरण जाणे हाच मार्ग ओळखावा.
सर्व अस्तित्व भगवंताचे असते आणि त्यात आपण कुठेतरी निर्माण होत राहतो आणि
विलीन होतो. हे हालचाली विधिलिखित असतात, म्हणून ते वाट्याला
येत राहणार. त्या हालचालींच्या चक्राच्या निमित्ताने भगवंताला ओळखावे.
हरि ओम.
श्री
"जत्रा" हा शब्द एक प्रकाराचा अनुभव दर्शवतो
माझ्या मते...ह्या शब्दातून गोंधळ, गोंगाट,
चळवळ, अस्थिरता, बेचैनी,
कष्ट, त्रास, घालमेल,
धावपळ - अशा सर्व भावनांचे मिश्रण होत असावे.
आपण बहुतांश बाजार किंवा गर्दीच्या कुठल्याही ठिकाणी वरील "जत्रा"
शब्द लावू शकू.
पण मनातील विचारांचे अमाप गोंधळ देखील "जत्रा" दर्शवते,
नाही का? हे उघड आहे की वाढत्या लोक संख्येमुळे रस्त्यावर,
कुठल्याही वास्तूत, शाळेत, बँकेत,
पर्यटक स्थानात - कुठेही जा, जत्रा अनुभवात येतेच
येते. पण, खूप विघटित मानसिक क्रियांमुळे (fragmentation
and multitasking), जत्रा, हा अनुभव, मनात संक्रांत होऊ
शकतो. म्हणजे मनाचा मार्ग जत्रा निर्मितीचा आहे आणि अध्यात्माचा मार्ग शांत
होण्याचा.
जीव म्हणलं तर मुळातच जत्रा, असा अनुभव,
संक्रांत होत असतो अनेक रूप आणि आकार बघत राहताना. ह्या जत्र्यांमध्ये शांती
भाव कसा प्रस्थापित होऊ द्यावे - हा मुळातील प्रश्न आहे आपल्याला.
हरि ओम.
श्री
एकाच वेळेला स्वतःचे मन सैरबैर खूप ठिकाणी गुंतून राहत असतं - नात्यात,
परिस्थितीत, रुपात, आकारात,
वृत्तीत, विचारात, भावनेत,
स्थळात, काळात, कामात,
समस्यात, विषयात, चिंतेत,
काळजीत, तात्पुरतेपणात, वगैरे....ह्याला अंत
नाही अशा स्वभावाला - म्हणजेच सत्य ओळखले तर ह्या प्रवाहित असणाऱ्या अनुभवाच्या
उगमाला "माझे" कर्तेपण नसते किंव्हा मी जबाबदार नसतो. जीवाची ही वरील _संकल्पना प्रकट_
होत असते आणि ती अस्तित्व माध्यमामुळे होत राहते. ह्या अनुभवाला प्रारब्ध,
भोग, देहबुद्धी, अस्थिरता असेही
संबोधले जाते.
प्रश्न असा आहे, की हे कशातून शांत होतं आणि शांत होणे असा अनुभव
महत्वाचा आहे का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि मार्ग देखील त्याने
शोधणे गरजेचा आहे.
त्यासाठी "भगवंताचा" सत्यपणा पहिले मान्य करणे गरजेचा ठरतो आणि
त्यातून शांतीचा मार्ग पत्करला जातो. त्यातून श्रद्धा,
विलीन होणे, त्याग, अशा संस्कार मनाला
देत रहाणे ठरते.
हरि ओम.
श्री
"मी" हा भाव, क्षणाशी संबंध,
शक्तीचे कार्य, परिणाम, चक्र - ही सर्व
भगवंताची *इच्छा* ओळखावे.
*इच्छा* स्वतः सिद्ध आणि शांत माध्यम आहे,
ते अस्तित्व आहे, ते जिवंत आहे, त्याचे कार्य आहे.
इच्छे पोटी सर्व प्रकाराच्या हालचाली, सर्व स्तरात होत
राहतात. त्या इच्छेतून अनेकपणा किंव्हा विघटित कार्य होत राहते - पदार्थ घडल्या
जातात आणि मोडल्या जातात आणि हे कायम सुरू राहते.
कारण *अस्तित्व* असतेच, त्यावर निर्भर असलेल्या सर्व घटना स्थित राहतात
किंव्हा निर्माण होत राहतात. म्हणून अस्तित्वाला अंतर्मुख आणि बहिर्मुख असे दोन अंग
आहेत, आणि त्या प्रमाणे अनुभवाचे स्वरूपही.
"गगनाहूनी वाढ नाम आहे",
असा उद्गार हरि पाठात उल्लेख केलेला आढळतो. म्हणजे स्वतःच्या अनुभवाचा _विस्तार_
अमर्यादित होऊ शकतो. म्हणजे अनुभवात स्तर, परिणाम,
स्मरण, भाव, कार्य,
व्यवहार, संकल्पना - ह्या साऱ्या गोष्टी येतात आणि त्यांच्या
आपसात संबंधातून शांतीकडे वाटचाल होऊ पाहते.
हरि ओम.