Thursday, September 10, 2026

Shree

 

Shree 

 It is, at times, not necessary to express the sanctity and existence of things as a sequence of thoughts. That the influence and presence of a thing, can be prior to a thought itself! 

 Therefore, I think, that we need to be comfortable in a situation of non verbal or non thought idea/ existence. This existence is very real and very important to have it realised. 

 In order for this to get realized, take all the "time" and any kind of "journey" in the world. You owe yourself this much. 

 Hari Om.

 

 Shree 

 To me, perhaps, the self talk creates unnecessary stress to hold on to some perception that I choose to believe in. 

 It should be in a state of non fixation, i feel. 

 I don't know who I am or where I am going or what would get engaged with. 

 That means I may be confused. Which is ok. I may not prefer to do some sort of immediate action...which is also ok. I don't exist for any action to take place. It's not a compulsion or a requirement. The world doesn't depend on me or i depend on the world for anything...at least that's required to be realised.

 It is perhaps a mistake to think that action is something that should cause a visible output and should get evaluated and be made more efficient. One track of thought could continue like that. However the other track can realize that action is profoundly invisible and it doesn't suggest a direct output immediately. 

 It is so stupid when someone approaches with the expectation of a tangible output immediately and the graver part is we allow ourselves to be affected by this expectation! 

 Saying "no" is not a problem of self. It is actually a truthful way of admission of one's being.

 Hari Om.

 

 Shree 

 Many things seem to have a place in existence...purposes, beyond purposes, tendencies, patterns, changes and so on. The learning is, despite the apparent presence of such things, there are no qualms about them...some of which create us too. 

  _Reason_ can be seen in different perspectives...from the immediately obvious ones to very mysterious and fluid and perhaps all such perspectives ought to exist. 

 A movement can create or receive or encounter _anything_. There exist places for young and old temperament and those create the sort of action required for things to exist. 

 That brings us to the question of _action_. What are the ways in which action gets created, is perceived and engaged with? This is important to understand, for its discovery, can hold a promise to peace.

 Hari Om.

 

 Shree 

 Everything comes, appears, arrives and goes. From invisible to visible (transformation) and dissolving again (transformation) to invisible is a continuous _journey_ in existence. 

 Therefore how things seem to happen and go, could be an inquiry of our human form. This is more than a question...it is to _realize_ this process. 

 Hari Om.


श्री 

 अस्तित्वात असणेम्हणजे जीवाला संपूर्ण सत्य माहित नसते त्या अवस्थेत आणि त्याचे काहीही वाटून घेण्याची जरुरी नसते स्वतःला किंव्हा न्यूनगंड वाटून घेण्याचीही किंव्हा व्याकुळ होण्याची. 

 मुद्दा आहे श्रद्धेने त्या सत्याचा शोध आत्मसात होण्याचा...जबरदस्तीने नाही किंव्हा जबाबदारी म्हणून नाही किंव्हा सिद्ध होण्यासाठी नाही.

 श्रद्धेतून अनुभवात प्रवास घडतोपरिवर्तन होते आणि शांती रस गवसते. _"मला काहीही माहित नाही"_ , ह्यात समाधान मानावे आणि माहित नसण्याचे किंव्हा किती माहिती असते ह्याचेही स्पष्टीकरण देण्याची जरुरी नसते.

 प्रत्येकाच्या वाट्याला सर्व काही येतेप्रत्येकजणाकडे अनुभव होत असतातप्रत्येकजण संबंधात असतोप्रत्येकाकडे प्रश्न असतात. आपण व्याकुळ का असावे?!! आज नाही तर उद्यासर्व स्पष्ट होणार असते.

 हरि ओम.

Monday, September 07, 2026

श्री

श्री 

विलीन जरी व्हायचे असले, तरीही मार्ग अहं भावनेतून _गवसायला_ लागतो. हा अहं भाव कसा निर्माण होतो, हे जाणून घ्यावे आणि त्यातून एक भले मोठ्ठे प्रपंचाचे वटवृक्ष कसे होते, हे बघावे. 

अस्तित्वात असताना, वासना आणि त्यातून विचार खूप शक्तिमान प्रकरण आहे, जी ती कुठून येते हे कळत नाही, त्यात गुंतायला होते, त्यातून द्वैताचा अनुभव होतो, त्यातून व्यवहार करण्याची गरज भासते आणि त्यात गुंतायला होते. ही _शक्ती_ आहे, हे ओळखावे आणि त्यातून बऱ्याच गोष्टी येत राहतात, वावरत राहतात आणि निघून जातात - किंबहुना असे दर्शन तरी होते मनाला! वेगळेपण आणि तात्पुरत्या भावना ह्यांना धरून ठेवल्यामुळे, हे वरील प्रकरण मनात भीती निर्माण करते आणि सिद्ध होण्याचा अर्थ बाहेर प्रस्थापित करत राहते. 

स्वतःच्या रूपाला सत्य मानून सुरुवात करायला लागते आणि ते शिथिल होऊ द्यावे लागते. त्यातून भगवंताचे दर्शन होते. म्हणून स्वतःचे प्रश्न, शोध, दुःख, सुख, परिस्थिती ह्यांना शांतीने सामोरे जाणे येते, कारण तो एक टप्पा ठरतो शांतीकडे जाण्याचा.

हरि ओम.

Sunday, September 06, 2026

श्री

 श्री 


आपले होणे, वावरणे, प्रवास घडणे, प्रवाहात राहणे, संबंधित असणे, अनुभव येणे, स्मरण असणे, हालचाली जाणवणे, कृती मध्ये राहणे - ही सर्व भगवत इच्छा म्हणून ओळखावी आणि निश्चित पूर्णपणे स्वीकारावी. 

 _स्वीकारणे_, ही क्रिया,  सध्याच्या परिस्थितीतून ते शांतीकडे जात राहताना घडत असते. किंव्हा विलीन होण्याचा प्रवास घडतो आणि तो गूढ असतो आणि श्रद्धेने आत्मसात व्हायला लागतो. 

त्याचे दुसरे नाव म्हणजे *समाधान*. आणि तात्विक भाग सांगायचा झाला तर ह्याला *स्थिर होणे*, असे संबोधले आहे. किंव्हा वासना विलीन होणे आणि भगवंताकडे केंद्रित होणे, असेही संबोधले जाते. 

सर्व प्रकाराच्या वासना, बुद्धी, भावना, देह, इंद्रिये, विघटन, अर्थ, हेतू, प्रश्न, नाती, काम, व्यवहार, दृश्य - भगवत भाव प्रस्थापित होण्यासाठीच वापरावे. सर्वांच्या केंद्रस्थानी भगवंत असतो, म्हणून तेच सत्य ठरते. त्या केंद्रस्थानीचा अनुभव येण्यासाठी, स्वतः विलीन होणे आवश्यक आहे. विलीन होणे, म्हणजे शिथिल होणे, आसक्ती कमी होत जाणे, वगैरे. 

त्या सर्व गोष्टी आत्मसात होऊ द्यावे.

हरि ओम.

Shree

Shree 

Visibility is an aspect of existence. There are signs, maps, navigation that assist in this endeavour. 

Therefore the mind wants to make _itself_ (it's form, process, intentions, patterns)  visible. Now herein the question is where does the mind come from? This is the map of Truth and how this map leads to the mind. 

Knowing this map depends on cultivation of faith. And as faith gets nourished, the mind itself gets transformed and finally dissolved into the map itself. 

Hari Om.

श्री

श्री 

अस्तित्व माध्यम किंवा *शक्ती*, हे *कार्य* आहे. त्याचा प्रत्यय प्रकृतीच्या स्तरातून, साखळीतून, भावनेतून, स्मरणेरून, परिणामातून, आसक्तीतून, गुंतून, दृश्य ह्या रूपातून, हालचालीतून, बदलातून, परावलंबी असे राहून, आकारात राहून, अनेकपणातून, मनातून असा होत राहतो. 

कार्य स्थित असते. जशी शक्ती आहेच, तसे कार्य असणार. म्हणून सर्व परिणाम स्थित असतात. निर्गुण काय, सगुण काय - दोन्ही अस्तित्वाचे रंग आहेत. जीवाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेतले तर दोघांचे स्वभाव निराळे असतात आणि त्यांच्यातील गूढ संबंध असतो. आपले ध्येय किंव्हा खरा शोध हा भगवत स्वरूप होण्याचा आहे. 

कृती का करावीशी वाटते, हा गूढ भाव असतो. भाव खूप आतून प्रकट होत असतो, म्हणून अनुभवाचे स्वरूप तसे असतात, ज्याला _प्रवास_,अशी उपमा दिली गेली आहे.  

ह्या आपल्या प्रवासात, जे भगवंताने योजिले असते, त्यात बऱ्याच हालचाली होत राहतात आणि त्यांना सामोरे जाणे येते, त्याचा परिणाम असतो, त्यात गुंतायला होते, त्यात प्रश्न येत राहतात, त्यात विषय दिसतात, त्याच्या मागे जाणे होते, स्थळ आणि काळाचे रूप दिसून येते, वगैरे. 

वरील परिस्थितीतून _जागे होणे_, असा भाव पचनी पाडायला लागतो. परत भाव हा एक शब्द नाही की घटक नाही. भाव सर्वांगीण आहे, म्हणून त्याच्यातून "भाव - विश्व" अशी उपमा दिलेली असते. भावात योग्य परिवर्तन झाले की त्याच्यामुळे विश्वातही होते.

हरि ओम.

Friday, September 04, 2026

श्री

 श्री 


मन, संबंध, परिस्थिती, धारा कोण करते आणि ते कसे होते? 

माहीत नाही, आणि तसे असून देखील श्रद्धेचे निश्चित ह्या एकंदरीत परिस्थितीत स्थान असले पाहिजे. Total surrender. Or total faith in other words. 

जसे इतर व्यवहार वासना, बुद्धी, भावना, देह ह्यातून घडत राहतात, तसेच श्रद्धेनेही परिणाम होतो. 

मी, असा भाव, कशातरी गुंतल्यामुळे उद्भवतो किंव्हा प्रस्थापित होतो. म्हणून मूळ विचार धारा त्रस्त होऊन बघायला लागतात. ही खूप सूक्ष्म स्थिती आहे. 

Why should data be created? And isn't data an indicator of our own state of mind and the need to control? 

हरि ओम.

Thursday, September 03, 2026

श्री

 श्री 


मनाचा स्वभाव गूढ असतो आणि कुठेतरी सतत गुंतून राहण्याचा भाग दर्शवतो. त्यातून होणारे स्मरण, कृती, हेतू, बदल, भावना, वगैरे. 

 _प्रस्थापित होणे_ हा अस्तित्वाचा गुण आहे म्हणून सत्य ओळखायला दर क्षणी मार्गावर जायला लागतं जीवाला अनुभव ध्यानात येत राहताना. 

गोष्टी येतील, जातील, वावरतील, सुटतील आणि खूप कष्ट मनात निर्माण करत राहतील.जो काही बदल होईल, त्यातून स्वतःची व्याख्या ठरवू नये, स्वतःला लेखू नये, न्यूनपणा वाटून घेऊ नये. 

परिस्थितीची स्थापना भगवंत करतो आणि तोच तारून नेतो. म्हणून तसे घडत राहताना आपण श्रद्धा आत्मसात होऊ द्यावी आणि शांती वाढवावे.

हरि ओम.

श्री

 श्री 


आपल्याला उगाचच वाटतं की आपला ताबा असतो काहीतरी कृती केल्यावर. सध्या _ताबा_ ही भावना हेतू, स्मरण, चक्र, भोग, परिणाम, अनुभव, द्वैत, सिद्ध होणे - ह्या बरोबरीने प्रस्थापित होते...म्हणून त्यातून भीती, राग, कष्ट अशाही गोष्टी निर्माण होतात आणि विचार चक्राना गुंतवून ठेवतात...

म्हणून ताबा ह्या भावनेचे मूळ कुठे असते, ते ओळखावे. आणि मूळ ओळखले, की त्याला शांत कसे होऊ द्यावे ह्याचे चिंतन करावे. ह्या प्रक्रियेला शांत होणे असे म्हणतात. 

शांत होण्याचा प्रवास असावा, जो कृपेमुळे होतो, भगवत इच्छेने साकार होतो, शोध घडतो, योग्य पाऊल घेतले जाते आणि शांती भाव प्रस्थापित होते. 

प्रवास आणि प्रवाह ते राहणार अस्तित्वात वावरताना. तो आपल्याला काहीही दाखवेल, काहीही सामोरे आणेल, कसेही संबंध जोडेल, कशीही परिस्थिती निर्माण होत राहील. ह्या घडामोडी जरी होत गेल्या, तरी शांती भंग होता कामा नये, हे ध्यानात राहू द्यावे.

हरि ओम.

श्री

 श्री 


भगवंत भाव होण्याचे मार्ग गूढ असतात. ते कदाचित केवळ श्रद्धेने आत्मसात होत असावे. श्रद्धेला बौद्धिक कारणाची तशी जरूरी नसते. संबंध दोघांमध्ये असतो खरा, पण तो नेमका कसा असतो, हे विश्लेषणातून मांडता येऊ शकते. _बुद्धी ही एक दृष्टी आहे विश्व भाव निर्माण करण्याची._

तसंच गूढ भावना वेगळी दृष्टी ठरते आणि तसंच भगवंत भाव निराळी दृष्टी ठरते. दृष्टी, ह्या शब्दात मूळ माध्यम, वासना, साखळी, चक्र, स्मरण, भाव, परिणाम, भोग - हे सर्व येतं (फक्त डोळे नाही). म्हणजे इंद्रियांशी सबंध कसे प्रस्थापित होतात, ही आतील दृष्टी ठरवते (खुद्द इंद्रिये नाही). आणि म्हणून वास्तुकलेचे अनेक _रूप_ निर्माण होतात. 

आतील दृष्टी कोण दाखवते आणि ती कशी ओळखावी? हा अभ्यास असतो. 

हरि ओम.

Wednesday, September 02, 2026

Shree

Shree 

Why does a person analyse? Perhaps there are certain tendencies that trigger this 

1) one wants to _solve_ something so it doesn't bother him/ her for a prolonged time. This is an immediate action.

2) the deeper inquiry is what is it that one feels *compelled* to solve? And why? That leads to the trigger of tendencies, patterns, perceptions, inferences, human condition. Somewhere the answer points to a pattern of _fear_ or ego. 

3) finally the inquiry goes still deeper to search where does this fear exist, how does it operate and how to transcend this?

4) that, then leads to a Path, which is required to be engaged throughout one's life. 

Hari Om.

श्री

श्री 

चिंता, काळजीचे महत्व - मी म्हणजे कोण ह्याचा शोध प्रस्थापित होणे, प्रश्न पडणे, मनाचा स्वभावाचा स्वीकार होणे, कृपेचा अर्थ उमगणे, विचार आणि भावना चक्राचा स्वीकार होणे, हेतूचा अर्थ ओळखणे, मार्ग गवसणे, स्थिरतेकडे वाटचाल करणे, अवस्थांना सामोरे जात राहणे, श्रद्धा वाढणे....अशा सर्व गोष्टी सामावल्या असतात. 

म्हणून चिंता आणि काळजीना टप्पा मानावा, त्यांना पुसून टाकण्याची गरज नसावी. 

दररोजच्या जीवनात प्रवाह असा असतो की त्यात खूप विघटित स्वरूप जाणवत राहते आणि मन बऱ्याच ठिकाणी किंव्हा अवस्थेत जात राहते...ह्या स्वभावाला स्वीकारावे लागते. हालचाली, बदल, परावलंबन काही दोष नाही. ते मानण्यावर असते. भगवंत सर्व कार्य प्रस्थापित करतो, असा भाव आत्मसात झाला (वावर सुरू असताना देखील), तर _दोष_ तो कसला?! 

आपण _वेगळे_ मानतो स्वतःला, म्हणून हा अखंड दृश्याचा अनुभव मनात संक्रांत होत असतो. ह्याला निर्मिती म्हणून ओळखावे. स्मरण देखील तसेच प्रस्थापित होते. 

प्रस्थापित होत राहणे ही भगवत इच्छा ओळखावी. भगवंत सत्य आहे, मी निमित्त.

हरि ओम

श्री

श्री 

सर्व देत रहावे किंव्हा विलीनतेकडे जात रहावे किंव्हा विलीन होण्याचा भाव आत्मसात करावे किंव्हा शरण जावे किंव्हा कर्तव्य करावे किंवा सूक्ष्म व्हावे किंव्हा शुद्ध व्हावे...हा मार्ग आहे शांती संक्रांत होण्याचा आणि तो कुठल्याही परिस्थितीतून जोपासता येतो, कारण सर्व परिस्थिती किंव्हा स्तराच्या किंव्हा संबंधांच्या गाभाऱ्यात भगवंताची शक्ती स्थित असते. 

जसे आपण बऱ्याच घटकेचे रूप धारण केलेले असते (किंव्हा जाणिवेत येत राहते प्रवाह सारखे किंव्हा प्रवास सारखे), तसे हे सर्व रूप आपण संपूर्ण अर्पण करू शकतो, त्यास शांत करू शकतो. 

महत्वाची गोष्ट ही की शांत होऊ पाहणे म्हणजे *तरीही अस्तित्व राहणे आणि अस्तित्वात असणे*. अस्तित्व कायम असते आणि ते काही कमी किंव्हा जास्त होत नाही, हालचाली करत नाही, बदलत नाही, वेगळ होत नाही, तात्पुरते असत नाही - ह्या सर्व अस्थिर भावना शांतीत असत नाही. 

एकदा हे ओळखले की शुद्ध अस्तित्व भाव कायम राहतेच आपल्यापाशी किंव्हा आपल्या आत, की मग त्याचा शोध श्रद्धेने होत राहतो. 

हरि ओम.

Saturday, August 29, 2026

श्री

 श्री 


वासना, मी, force, बहिर्मुख शक्ती, गुंतण्याचा स्वभाव, कृतीचा अट्टाहास, घातक ठरणे - हे एकच असते. त्याला अहं भाव संबोधले आहे.

तीच शक्ती शांती मध्ये परिवर्तित होऊ द्यावी लागते आणि त्यासाठी तिच्यावर उचित संस्कार करावे लागतात. 

शक्तीने जे सध्या रूप घेतले आहे, ते विलीन होऊ द्यावे लागते, म्हणजे सूक्ष्म, विशाल आणि शांत होऊ द्यावे लागते. त्यासाठी नामस्मरण करावे.

हरि ओम.

Shree

 Shree 


Fruitful connections happen at various levels, not just visual, not just logical. 

 It is not necessary to visually ensure and logically ensure that things fall into place and an aim is achieved. If that's the case, then the architecture seems to become limited only to a narrow definition of function and efficiency. 

Not all things can be stated or shown or justified. And even if they can't, that doesn't diminish their _value_ in existence. Things which are invisible, generally tend to be fundamental and peaceful. 

The choice is what should humanity prefer? And is this choice only rational and temporal? 

Hari Om.

श्री

 श्री 


प्रत्येक क्षण अस्तित्वाचा तो भगवंताचा आहे, त्याच्या कार्याचा आहे, असे ओळखावे आणि जाणून घ्यावे. जे विचार, भावना, स्मरण, गुंतणे, चक्र, अनुभव, मनोरचना, संबंध, दृश्य वस्तू होऊ पाहते, ते सर्व वरील कार्यामुळे होत असते. 

 _होऊ पाहणे_, हा अस्तित्वाचा गुण आहे - म्हणून प्रवाह तो ध्यानी येणार आणि प्रवास तो घडणार. त्यातून सूक्ष्म स्थितीचा मार्ग मोकळा होऊ द्यावा लागतो आणि शांती स्थित होऊ द्यावी लागते. त्या अर्थाने दृश्य जग किंव्हा मी हे _निमित्त_ मानावे भगवंत होण्यासाठीचे. कुणी सांगितले की दृश्यात होणाऱ्या घडामोडी ते _खऱ्या_ असतात किंव्हा त्यांच्या परिणामांची चिकित्सा करावी आणि त्यातच गुंतावे?! 

अहं भाव आपल्याला _गुंतायला_ उतावळा करत राहतो. गुंतायला काहीही कारण लागत नाही, किंबहुना कुठल्याही स्तरातील कारण पुरे ठरते! हेच गुढत्व पचनी होणे गरजेचे ठरते. स्वतःचे भाव विश्व खूप मर्यादित असते आणि त्या प्रकारे भोग झेलत राहते आणि त्यात आसक्तीने गुंतून राहते. मला तर अशी शंका आहे, की एका पद्धतीने खूप विघटन झाले, तर स्वतःला आणखीनच मर्यादित होण्याची जाणीव वाढत जाऊ शकते आणि त्यातून व्याकुळता अधिक होऊ शकते! Increase in dependence or variables may lead to further anxiety or feelings of limitations or loss of meaningful agency of control. 

वरील गोष्ट प्रवचन मध्ये सुचविले आहे की मनाने दाखवलेला मार्ग (आत्ताच्या काळात AI), म्हणून टीकेच्या स्वरूपात बघायला लागतो आणि उचित मार्ग हा कोणता, ह्याचा शोध सुरू होऊ द्यावा लागतो.

हरि ओम.