Monday, September 07, 2026
श्री
विलीन जरी व्हायचे असले, तरीही मार्ग अहं भावनेतून _गवसायला_ लागतो. हा अहं भाव कसा निर्माण होतो, हे जाणून घ्यावे आणि त्यातून एक भले मोठ्ठे प्रपंचाचे वटवृक्ष कसे होते, हे बघावे.
अस्तित्वात असताना, वासना आणि त्यातून विचार खूप शक्तिमान प्रकरण आहे, जी ती कुठून येते हे कळत नाही, त्यात गुंतायला होते, त्यातून द्वैताचा अनुभव होतो, त्यातून व्यवहार करण्याची गरज भासते आणि त्यात गुंतायला होते. ही _शक्ती_ आहे, हे ओळखावे आणि त्यातून बऱ्याच गोष्टी येत राहतात, वावरत राहतात आणि निघून जातात - किंबहुना असे दर्शन तरी होते मनाला! वेगळेपण आणि तात्पुरत्या भावना ह्यांना धरून ठेवल्यामुळे, हे वरील प्रकरण मनात भीती निर्माण करते आणि सिद्ध होण्याचा अर्थ बाहेर प्रस्थापित करत राहते.
स्वतःच्या रूपाला सत्य मानून सुरुवात करायला लागते आणि ते शिथिल होऊ द्यावे लागते. त्यातून भगवंताचे दर्शन होते. म्हणून स्वतःचे प्रश्न, शोध, दुःख, सुख, परिस्थिती ह्यांना शांतीने सामोरे जाणे येते, कारण तो एक टप्पा ठरतो शांतीकडे जाण्याचा.
हरि ओम.
Sunday, September 06, 2026
श्री
श्री
आपले होणे, वावरणे, प्रवास घडणे, प्रवाहात राहणे, संबंधित असणे, अनुभव येणे, स्मरण असणे, हालचाली जाणवणे, कृती मध्ये राहणे - ही सर्व भगवत इच्छा म्हणून ओळखावी आणि निश्चित पूर्णपणे स्वीकारावी.
_स्वीकारणे_, ही क्रिया, सध्याच्या परिस्थितीतून ते शांतीकडे जात राहताना घडत असते. किंव्हा विलीन होण्याचा प्रवास घडतो आणि तो गूढ असतो आणि श्रद्धेने आत्मसात व्हायला लागतो.
त्याचे दुसरे नाव म्हणजे *समाधान*. आणि तात्विक भाग सांगायचा झाला तर ह्याला *स्थिर होणे*, असे संबोधले आहे. किंव्हा वासना विलीन होणे आणि भगवंताकडे केंद्रित होणे, असेही संबोधले जाते.
सर्व प्रकाराच्या वासना, बुद्धी, भावना, देह, इंद्रिये, विघटन, अर्थ, हेतू, प्रश्न, नाती, काम, व्यवहार, दृश्य - भगवत भाव प्रस्थापित होण्यासाठीच वापरावे. सर्वांच्या केंद्रस्थानी भगवंत असतो, म्हणून तेच सत्य ठरते. त्या केंद्रस्थानीचा अनुभव येण्यासाठी, स्वतः विलीन होणे आवश्यक आहे. विलीन होणे, म्हणजे शिथिल होणे, आसक्ती कमी होत जाणे, वगैरे.
त्या सर्व गोष्टी आत्मसात होऊ द्यावे.
हरि ओम.
Shree
Shree
Visibility is an aspect of existence. There are signs, maps, navigation that assist in this endeavour.
Therefore the mind wants to make _itself_ (it's form, process, intentions, patterns) visible. Now herein the question is where does the mind come from? This is the map of Truth and how this map leads to the mind.
Knowing this map depends on cultivation of faith. And as faith gets nourished, the mind itself gets transformed and finally dissolved into the map itself.
Hari Om.
श्री
श्री
अस्तित्व माध्यम किंवा *शक्ती*, हे *कार्य* आहे. त्याचा प्रत्यय प्रकृतीच्या स्तरातून, साखळीतून, भावनेतून, स्मरणेरून, परिणामातून, आसक्तीतून, गुंतून, दृश्य ह्या रूपातून, हालचालीतून, बदलातून, परावलंबी असे राहून, आकारात राहून, अनेकपणातून, मनातून असा होत राहतो.
कार्य स्थित असते. जशी शक्ती आहेच, तसे कार्य असणार. म्हणून सर्व परिणाम स्थित असतात. निर्गुण काय, सगुण काय - दोन्ही अस्तित्वाचे रंग आहेत. जीवाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेतले तर दोघांचे स्वभाव निराळे असतात आणि त्यांच्यातील गूढ संबंध असतो. आपले ध्येय किंव्हा खरा शोध हा भगवत स्वरूप होण्याचा आहे.
कृती का करावीशी वाटते, हा गूढ भाव असतो. भाव खूप आतून प्रकट होत असतो, म्हणून अनुभवाचे स्वरूप तसे असतात, ज्याला _प्रवास_,अशी उपमा दिली गेली आहे.
ह्या आपल्या प्रवासात, जे भगवंताने योजिले असते, त्यात बऱ्याच हालचाली होत राहतात आणि त्यांना सामोरे जाणे येते, त्याचा परिणाम असतो, त्यात गुंतायला होते, त्यात प्रश्न येत राहतात, त्यात विषय दिसतात, त्याच्या मागे जाणे होते, स्थळ आणि काळाचे रूप दिसून येते, वगैरे.
वरील परिस्थितीतून _जागे होणे_, असा भाव पचनी पाडायला लागतो. परत भाव हा एक शब्द नाही की घटक नाही. भाव सर्वांगीण आहे, म्हणून त्याच्यातून "भाव - विश्व" अशी उपमा दिलेली असते. भावात योग्य परिवर्तन झाले की त्याच्यामुळे विश्वातही होते.
हरि ओम.
Friday, September 04, 2026
श्री
श्री
मन, संबंध, परिस्थिती, धारा कोण करते आणि ते कसे होते?
माहीत नाही, आणि तसे असून देखील श्रद्धेचे निश्चित ह्या एकंदरीत परिस्थितीत स्थान असले पाहिजे. Total surrender. Or total faith in other words.
जसे इतर व्यवहार वासना, बुद्धी, भावना, देह ह्यातून घडत राहतात, तसेच श्रद्धेनेही परिणाम होतो.
मी, असा भाव, कशातरी गुंतल्यामुळे उद्भवतो किंव्हा प्रस्थापित होतो. म्हणून मूळ विचार धारा त्रस्त होऊन बघायला लागतात. ही खूप सूक्ष्म स्थिती आहे.
Why should data be created? And isn't data an indicator of our own state of mind and the need to control?
हरि ओम.
Thursday, September 03, 2026
श्री
श्री
मनाचा स्वभाव गूढ असतो आणि कुठेतरी सतत गुंतून राहण्याचा भाग दर्शवतो. त्यातून होणारे स्मरण, कृती, हेतू, बदल, भावना, वगैरे.
_प्रस्थापित होणे_ हा अस्तित्वाचा गुण आहे म्हणून सत्य ओळखायला दर क्षणी मार्गावर जायला लागतं जीवाला अनुभव ध्यानात येत राहताना.
गोष्टी येतील, जातील, वावरतील, सुटतील आणि खूप कष्ट मनात निर्माण करत राहतील.जो काही बदल होईल, त्यातून स्वतःची व्याख्या ठरवू नये, स्वतःला लेखू नये, न्यूनपणा वाटून घेऊ नये.
परिस्थितीची स्थापना भगवंत करतो आणि तोच तारून नेतो. म्हणून तसे घडत राहताना आपण श्रद्धा आत्मसात होऊ द्यावी आणि शांती वाढवावे.
हरि ओम.
श्री
श्री
आपल्याला उगाचच वाटतं की आपला ताबा असतो काहीतरी कृती केल्यावर. सध्या _ताबा_ ही भावना हेतू, स्मरण, चक्र, भोग, परिणाम, अनुभव, द्वैत, सिद्ध होणे - ह्या बरोबरीने प्रस्थापित होते...म्हणून त्यातून भीती, राग, कष्ट अशाही गोष्टी निर्माण होतात आणि विचार चक्राना गुंतवून ठेवतात...
म्हणून ताबा ह्या भावनेचे मूळ कुठे असते, ते ओळखावे. आणि मूळ ओळखले, की त्याला शांत कसे होऊ द्यावे ह्याचे चिंतन करावे. ह्या प्रक्रियेला शांत होणे असे म्हणतात.
शांत होण्याचा प्रवास असावा, जो कृपेमुळे होतो, भगवत इच्छेने साकार होतो, शोध घडतो, योग्य पाऊल घेतले जाते आणि शांती भाव प्रस्थापित होते.
प्रवास आणि प्रवाह ते राहणार अस्तित्वात वावरताना. तो आपल्याला काहीही दाखवेल, काहीही सामोरे आणेल, कसेही संबंध जोडेल, कशीही परिस्थिती निर्माण होत राहील. ह्या घडामोडी जरी होत गेल्या, तरी शांती भंग होता कामा नये, हे ध्यानात राहू द्यावे.
हरि ओम.
श्री
श्री
भगवंत भाव होण्याचे मार्ग गूढ असतात. ते कदाचित केवळ श्रद्धेने आत्मसात होत असावे. श्रद्धेला बौद्धिक कारणाची तशी जरूरी नसते. संबंध दोघांमध्ये असतो खरा, पण तो नेमका कसा असतो, हे विश्लेषणातून मांडता येऊ शकते. _बुद्धी ही एक दृष्टी आहे विश्व भाव निर्माण करण्याची._
तसंच गूढ भावना वेगळी दृष्टी ठरते आणि तसंच भगवंत भाव निराळी दृष्टी ठरते. दृष्टी, ह्या शब्दात मूळ माध्यम, वासना, साखळी, चक्र, स्मरण, भाव, परिणाम, भोग - हे सर्व येतं (फक्त डोळे नाही). म्हणजे इंद्रियांशी सबंध कसे प्रस्थापित होतात, ही आतील दृष्टी ठरवते (खुद्द इंद्रिये नाही). आणि म्हणून वास्तुकलेचे अनेक _रूप_ निर्माण होतात.
आतील दृष्टी कोण दाखवते आणि ती कशी ओळखावी? हा अभ्यास असतो.
हरि ओम.
Wednesday, September 02, 2026
Shree
Shree
Why does a person analyse? Perhaps there are certain tendencies that trigger this
1) one wants to _solve_ something so it doesn't bother him/ her for a prolonged time. This is an immediate action.
2) the deeper inquiry is what is it that one feels *compelled* to solve? And why? That leads to the trigger of tendencies, patterns, perceptions, inferences, human condition. Somewhere the answer points to a pattern of _fear_ or ego.
3) finally the inquiry goes still deeper to search where does this fear exist, how does it operate and how to transcend this?
4) that, then leads to a Path, which is required to be engaged throughout one's life.
Hari Om.
श्री
श्री
चिंता, काळजीचे महत्व - मी म्हणजे कोण ह्याचा शोध प्रस्थापित होणे, प्रश्न पडणे, मनाचा स्वभावाचा स्वीकार होणे, कृपेचा अर्थ उमगणे, विचार आणि भावना चक्राचा स्वीकार होणे, हेतूचा अर्थ ओळखणे, मार्ग गवसणे, स्थिरतेकडे वाटचाल करणे, अवस्थांना सामोरे जात राहणे, श्रद्धा वाढणे....अशा सर्व गोष्टी सामावल्या असतात.
म्हणून चिंता आणि काळजीना टप्पा मानावा, त्यांना पुसून टाकण्याची गरज नसावी.
दररोजच्या जीवनात प्रवाह असा असतो की त्यात खूप विघटित स्वरूप जाणवत राहते आणि मन बऱ्याच ठिकाणी किंव्हा अवस्थेत जात राहते...ह्या स्वभावाला स्वीकारावे लागते. हालचाली, बदल, परावलंबन काही दोष नाही. ते मानण्यावर असते. भगवंत सर्व कार्य प्रस्थापित करतो, असा भाव आत्मसात झाला (वावर सुरू असताना देखील), तर _दोष_ तो कसला?!
आपण _वेगळे_ मानतो स्वतःला, म्हणून हा अखंड दृश्याचा अनुभव मनात संक्रांत होत असतो. ह्याला निर्मिती म्हणून ओळखावे. स्मरण देखील तसेच प्रस्थापित होते.
प्रस्थापित होत राहणे ही भगवत इच्छा ओळखावी. भगवंत सत्य आहे, मी निमित्त.
हरि ओम
श्री
श्री
सर्व देत रहावे किंव्हा विलीनतेकडे जात रहावे किंव्हा विलीन होण्याचा भाव आत्मसात करावे किंव्हा शरण जावे किंव्हा कर्तव्य करावे किंवा सूक्ष्म व्हावे किंव्हा शुद्ध व्हावे...हा मार्ग आहे शांती संक्रांत होण्याचा आणि तो कुठल्याही परिस्थितीतून जोपासता येतो, कारण सर्व परिस्थिती किंव्हा स्तराच्या किंव्हा संबंधांच्या गाभाऱ्यात भगवंताची शक्ती स्थित असते.
जसे आपण बऱ्याच घटकेचे रूप धारण केलेले असते (किंव्हा जाणिवेत येत राहते प्रवाह सारखे किंव्हा प्रवास सारखे), तसे हे सर्व रूप आपण संपूर्ण अर्पण करू शकतो, त्यास शांत करू शकतो.
महत्वाची गोष्ट ही की शांत होऊ पाहणे म्हणजे *तरीही अस्तित्व राहणे आणि अस्तित्वात असणे*. अस्तित्व कायम असते आणि ते काही कमी किंव्हा जास्त होत नाही, हालचाली करत नाही, बदलत नाही, वेगळ होत नाही, तात्पुरते असत नाही - ह्या सर्व अस्थिर भावना शांतीत असत नाही.
एकदा हे ओळखले की शुद्ध अस्तित्व भाव कायम राहतेच आपल्यापाशी किंव्हा आपल्या आत, की मग त्याचा शोध श्रद्धेने होत राहतो.
हरि ओम.
Saturday, August 29, 2026
श्री
श्री
वासना, मी, force, बहिर्मुख शक्ती, गुंतण्याचा स्वभाव, कृतीचा अट्टाहास, घातक ठरणे - हे एकच असते. त्याला अहं भाव संबोधले आहे.
तीच शक्ती शांती मध्ये परिवर्तित होऊ द्यावी लागते आणि त्यासाठी तिच्यावर उचित संस्कार करावे लागतात.
शक्तीने जे सध्या रूप घेतले आहे, ते विलीन होऊ द्यावे लागते, म्हणजे सूक्ष्म, विशाल आणि शांत होऊ द्यावे लागते. त्यासाठी नामस्मरण करावे.
हरि ओम.
Shree
Shree
Fruitful connections happen at various levels, not just visual, not just logical.
It is not necessary to visually ensure and logically ensure that things fall into place and an aim is achieved. If that's the case, then the architecture seems to become limited only to a narrow definition of function and efficiency.
Not all things can be stated or shown or justified. And even if they can't, that doesn't diminish their _value_ in existence. Things which are invisible, generally tend to be fundamental and peaceful.
The choice is what should humanity prefer? And is this choice only rational and temporal?
Hari Om.
श्री
श्री
प्रत्येक क्षण अस्तित्वाचा तो भगवंताचा आहे, त्याच्या कार्याचा आहे, असे ओळखावे आणि जाणून घ्यावे. जे विचार, भावना, स्मरण, गुंतणे, चक्र, अनुभव, मनोरचना, संबंध, दृश्य वस्तू होऊ पाहते, ते सर्व वरील कार्यामुळे होत असते.
_होऊ पाहणे_, हा अस्तित्वाचा गुण आहे - म्हणून प्रवाह तो ध्यानी येणार आणि प्रवास तो घडणार. त्यातून सूक्ष्म स्थितीचा मार्ग मोकळा होऊ द्यावा लागतो आणि शांती स्थित होऊ द्यावी लागते. त्या अर्थाने दृश्य जग किंव्हा मी हे _निमित्त_ मानावे भगवंत होण्यासाठीचे. कुणी सांगितले की दृश्यात होणाऱ्या घडामोडी ते _खऱ्या_ असतात किंव्हा त्यांच्या परिणामांची चिकित्सा करावी आणि त्यातच गुंतावे?!
अहं भाव आपल्याला _गुंतायला_ उतावळा करत राहतो. गुंतायला काहीही कारण लागत नाही, किंबहुना कुठल्याही स्तरातील कारण पुरे ठरते! हेच गुढत्व पचनी होणे गरजेचे ठरते. स्वतःचे भाव विश्व खूप मर्यादित असते आणि त्या प्रकारे भोग झेलत राहते आणि त्यात आसक्तीने गुंतून राहते. मला तर अशी शंका आहे, की एका पद्धतीने खूप विघटन झाले, तर स्वतःला आणखीनच मर्यादित होण्याची जाणीव वाढत जाऊ शकते आणि त्यातून व्याकुळता अधिक होऊ शकते! Increase in dependence or variables may lead to further anxiety or feelings of limitations or loss of meaningful agency of control.
वरील गोष्ट प्रवचन मध्ये सुचविले आहे की मनाने दाखवलेला मार्ग (आत्ताच्या काळात AI), म्हणून टीकेच्या स्वरूपात बघायला लागतो आणि उचित मार्ग हा कोणता, ह्याचा शोध सुरू होऊ द्यावा लागतो.
हरि ओम.
Thursday, August 27, 2026
श्री
श्री : _कदाचित_
देव सगळं बघतो. त्याच्या ध्यानी मनी सर्व काही असते, म्हणून आपले विघ्न, काळज्या, त्रास त्याला "सांगावे" आणि सोडून द्यावे. त्रासिक भावना का असतात, ह्याची काळजी नसावी. ते बुद्धीने सोडवू पाहणे, म्हणजे स्वतःला गृहीत धरणे, अहं भावात मग्न असणे, विषय तैय्यार करणे, त्यात गुंतून राहणे वगैरे.
अस्तित्वातील सर्व व्यवहार एकमेकांना पुरक ठरत असतात...the coming, changing, becoming, going etc. आपल्या छोट्याशा प्रपंच्या मध्ये हे त्वरित कळणे अवघड असते, स्वतःच्या रुपामुळे. म्हणून त्यासाठी कदाचित, श्रद्धा वाढवायला लागते.
आलेले अनुभव शांतीचे दर्शन होण्यासाठीच असतात आणि त्यांना सामोरे जाऊन कुठेतरी अस्तित्वाच्या हालचालीत पूर्णतः येत असते.
भगवंत भाव खूप गूढ आहे. त्याची इच्छा जीवाला कळणे कठीण जाऊ शकते...पण ती नक्की कार्य करत असते. भगवंताची इच्छा, आपल्यासाठी अनेक रूप आणि आकार - असे दिसून येते.
त्या रूप आणि आकाराचे प्रयोजन काय, ते का येतात, ते असेच का असतात, त्यात गुंतायला का होते, ते का जातात - माहीत नाही. कदाचित माहीत नसणे हा इच्छेचा भाग असावा आणि श्रद्धा ठेवण्याचा. कदाचित त्यातून अस्तित्वाला काहीतरी साध्य होत असावे. त्यातून कदाचित भगवंताची इच्छा पूर्ण होत असेल. कितीही किंव्हा काहीही झाले, तरी भगवंताची इच्छा पूर्ण होते. त्यावर श्रद्धा ठेवावी.
हरि ओम.
श्री
श्री
अस्तित्व भाव आपल्याला मनोरचने प्रमाणे जाणवतो. आपल्यासाठी गती, रूप, आकार, संबंध, हेतू, चक्र, परिणाम अशा काहीश्या गोष्टी जाणिवेत येत राहतात - ज्याला सगुण दर्शन - अशी उपमा दिली गेली आहे.
ह्या वेगळ्या पद्धतीने अस्तित्व भाव जाणिवेत आल्यामुळे, _स्थिरतेकडे_ प्रवास पचनी व्हायला लागतो. स्थिर होणे, हा _प्रवास_ होतो, तो गूढ असावा, त्याला श्रद्धेची जरुरी असावी, त्याला धीमेपणा लागु शकतो, त्याला सर्व हालचालींना सामोरे जाणे येत असावे, त्याला शरण जाणे येत असावे, त्याला सर्व काही देणे येत असावे, _वगैरे_.
आपल्याला स्वतःच्या रुपावर खूप _अभिमान_ असतो. खूप हुशारी, पैसा, विद्वत्ता, भावना प्रधान, वगैरे. ह्यांचे योग्य स्थान ओळखून वावर करावे आणि त्या रूपातून भगवंताचे चिंतन करत राहावे. तात्पुरतेपण, हे येणार ध्यानात. कार्य होत राहणार अस्तित्वात. परिणाम येत राहणार.
काल, आज, उद्या अशी मर्यादित साखळी आपण करतो आणि त्याच्या वेळखात अडकत राहतो. क्षण भगवंताचे आहेत, त्याची इच्छा आहे. म्हणून काळाचे स्पंदने सर्व ठिकाणी, सर्व वेळास, सर्व स्थळात पसरत राहते किंव्हा उपस्थित असते. त्या अर्थाने जाणीव शुद्ध होणे ही गूढ प्रक्रिया समजून घ्यावी.
आहे ते असे आहे. हे कोड नाही की विषय नाही जे समजून घ्यायला लागते की सोडवायचे असते. ते आत्मसात होणे अभिप्रेत आहे.
हरि ओम.
श्री
श्री
स्वतःचा प्रवास कसा असतो शांतीकडे, आपुलकीकडे, सत्याकडे - हे गूढ आहे. तो अभ्यासातून होईल, बोलण्यातून होईल, संबंधातून होईल, कामातून होईल, स्मरणेतून होईल....कशातूनही _होत राहील._
आणि तसे ओळखले गेले, तर कसली घाई आणि का विघटित रहावे?! असा का विचार करावा की किती विघटित गोष्टींची बेरीज करून पूर्णतः मिळू शकेल?! तसे नसते जीवन.
बेरीज किंव्हा वजा बाकी हा मुद्दा येऊ नये. आपण जसे आहोत, तिथून सुरुवात होत पूर्णतः प्राप्त होते, कारण तो आत्म्याचा नैसर्गिक गुण असतो. म्हणजे आपण व्याकुळ होण्याची गरज नाही, अपुरेपण ह्यात गुंतून राहण्याची गरज नाही, विषय मांडण्याची गरज नाही, चिकित्सा करण्याची गरज नाही, घाई करण्याची गरज नाही.
विघटित असणे, हे *निमित्त* असते पूर्ण होण्याचे. म्हणजे सर्व विघटित गोष्टी हितासाठी येत राहतात, त्यात दैवी इच्छा कार्य करत असते आणि सर्व विलीन होऊन सत्य आत्मसात होते.
हरि ओम.
Shree
Shree
In reading _The Search for the Form, The Fall of Public Space, The City in History and The Eyes of the Skin_ it seems to emerge that the _experience of being_ seems to change over the centuries...
Rootedness or local had an experiential meaning...it hardly mattered where one lived, because to create a rooted feeling seems to have been a fundamental need of a human being that seems to include self, environment, existential, consciousness dimensions - space, time and beyond. There wasn't a theory for this - just a deep experience of self.
Fast track to crusaders, colonial times, industrial revolution, world wars and rebuilding....one seems to have an uprooted feelings of self and environment implying a change in our own understanding of self, senses, environment, objects, technique, relations, space, time, work and conclusively - imagination. There has been a rainfall of enormous change even if one chooses to be 'stationed' or be in 'movement'.i.e. there's just too much fragmentation happening of the mind with a new set of problems, new noise, new plans, new solutions and so on. This seems crazy.
The latest analysis of AI is a step in the long evolution of human history done till date. The history of human being could be understood as a history of mind or a history of perception. Our place has changed on intellectual terms but the real search is to come again to where the _place_ is.
Hari Om.
श्री
श्री
दररोजचे संबंध/ परिणाम/ स्मरण, मनाच्या क्रियेमुळे प्रस्थापित होत राहतात. त्या होण्यावर प्रश्न येऊ शकतात, कष्टी व्हायला होते, त्रास होऊ शकतो, दुःख होऊ शकते. त्यातून कृती करण्याचा अट्टाहास निर्माण होऊ शकतो. हे कदाचित होणार. हे कदाचित विधिलिखित असावे. हे सर्व शांतीने स्वीकारावे, असेही हिताचे असते आपल्याला.
प्रश्नांचे उत्तरे जीवाला संपूर्णपणे माहित नसतात, पण तरीही स्वस्थता टिकू शकते मनाला. त्यासाठी मार्ग पत्करायला लागतो. त्यातील एक मार्ग आहे नामस्मरण.
हरि ओम.
श्री
प्रश्न _विश्लेषण_ ह्यावरही येऊ शकतात. ते खूप अवघड असावेत दिशा दाखवायला. पण तसे प्रश्न बऱ्याच काळ आपल्या बरोबर असतात, म्हणून काही व्याकुळ वाटून घेण्याची गरज नसते. गोष्टी येणार आणि जाणार. हा प्रवाह ध्यानात शांतीने स्वीकारावा लागतो आणि तसा प्रवास होऊन द्यावा लागतो.
आपले काहीही म्हणणे असू नये की हे असेच का असते आणि ते तसेच का असते. सर्व "तो" जाणतो.
हरि ओम.
श्री
श्री
भगवंताचे कार्य किंव्हा अस्तित्व माध्यम, हे जाणीव शुद्ध होण्याशी निगडीत असावे. गती, हालचाली ध्यानात येणे, आपण हा भाव प्रस्थापित होणे, संबंधित राहणे, स्थळ आणि काळ दिसून येणे, क्रिया करणे, स्मरण होणे - ही सर्व त्याची इच्छा ओळखावी.
म्हणजे परिस्थिती आणि त्यातील घडामोडींना आकार देणारी शक्ती सूक्ष्म, विशाल, शांत आणि सत्य असावी, जी संतुलन राखत असावी.
अस्तित्व गूढ आहे, आणि ते अवतरून विचार, भावना, संबंध, स्थळ, काळ अशा गोष्टी येत राहतात आणि त्यातून "मी" अशी भावना उदयास येते. त्या प्रवाहाच्या आसक्ती मध्ये राहून, त्यात मिसळून, त्यात हेतू घालून "मी" अशी जाणीव उदयास येत राहते. ह्याचा प्रश्न असा आहे मग - की प्रवाह कोण करतो, ते कसे होते, ते का होते आणि त्याच्या परिणामातून मी का होतो?
वरील प्रश्न निर्माण होणे ह्यातून जीवाचा गुण धर्म कळत असावा. त्यातून शोध, मार्ग, सैय्यम, श्रद्धा अशा गोष्टी जीवनात/ ध्यानात/ अनुभवात संक्रांत होऊ द्यावे लागतात. त्यातून कृपेचे फळ येत असावे. त्यातून शांती साकार होत असावी.
हरि ओम.
