Thursday, July 23, 2026

श्री

 

श्री 

 कशालाही स्पष्टीकरण देण्याची गरज भासू नयेस्वतःलाही नाही. स्पष्टीकरणात एकरस होऊ नये. सत्य भगवंत आहेहे जाणून कार्य करत राहावे अस्तित्वात. 

 कार्य तो करतो आणि त्यातून आपण स्वतःची व्याख्या तैय्यार करतो. म्हणून त्याचे नाम सोडून इतर काहीच स्वतः सिद्ध नसते...इतर सर्व परावलंबित प्रकरण आहे. परावलंबनाचा स्वभाव असतोपरिणाम होतोविचार आणि भावना येत राहतात आणि त्यातून आणखीन विघटिततात्पुरते वाटत राहते. 

 म्हणून वरील सर्व शांत होऊ देणे अभिप्रेत आहेनिदान त्याची नितांत गरज जीवाला ओळखता येते. त्या मार्गावर लागावे.

 हरि ओम.

 

 श्री 

 आयुष्यात विघटन ध्यानात येत राहणार आहे आणि त्यातून होत राहणारा _गूढ परिणाम_. विघटित क्रिया थांबवणे कठीण. ती सामोरे येणेते ध्यानात येणेत्यात निश्चय करणेत्यात शांती भाव आत्मसात होणे सर्व काही वाट्याला येत राहणार आहे. 

 निश्चित हे जाणून घेताना भीती अनुभवात येईल/ निर्माण होईल. एखादी गोष्ट _निर्माण का होतेआणि त्यात कुठल्या प्रकारे आपल्याला गुंतायला होतेहे खरच गूढ असते. निर्मितीच्या रूपाला अंत नाहीम्हणून सुरुवात संकल्पना ही नाही....म्हणून दोन्ही बिंदू ध्यानात न आल्यामुळे ह्या स्थितीला "स्वीकारणे" अभिप्रेत होते. स्वीकार बुद्धीने होत नाहीती चिंतनाने श्रद्धा भाव वाढवत राहिल्यामुळे होते.

 हरि ओम.

  

Shree 

 Interestingly memory operates through connections, relations, flows, patterns, objects. When one says "meaning", it could mean all above things that _create_ a meaning. 

 Critically, the experience of memory could form a source of inquiry and through that source, all things that get preferred to be acted upon. 

 The memory, therefore, seems fluid, evolving, transforming and finally becoming only pure living beyond any limited intent. 

 The problem perhaps is about identifying memory to lead to a _conclusion_ that can be evaluated, traced, justified, produced, made effecient and so on. It still suggests a more deeper question of who we are and why we are here.

 Hari Om.

   

श्री 

 गजल किंव्हा तत्सम कलाकृती खूप आतील भावनांशी सतत संपर्कात असतात. ह्या कलाकृतीचा हेतू "काहीतरी सोडवणे" असा मुळीच नसतोपण फक्त स्वतःला पूर्णपणे त्या भावनांच्या सागरात बुडून ठेवावे. त्या भावना किती अथांगविशालगूढ आहे - कदाचित त्यातून जाणवत असावे. 

 म्हणून कुठल्याही भावना वाईट नाहीकी ते निघायला हवे की पुसून टाकायला हवे की त्यातून निश्चित त्वरित निर्णय असायला हवावगैरे. हे गहन भावना स्वीकारा स्वतः मध्ये आणि हे ही स्वीकारा की ते फक्त असतात आणि त्यांचा "निर्णय" असा काहीही नसतो. 

 म्हणून त्यातून संगीतलिखाणकादंबरी आणि वास्तुशास्त्र हे ही घडू शकतं.

 हरि ओम.

 

Saturday, July 18, 2026

श्री

श्री 

भगवंताचे चिंतन आणि कर्तव्य अनेक प्रकारे आपण करत असतो/ करू शकतो. 

ह्यातील मुख्य भाग आहे चांगले कर्म होण्याचे. हा अर्थ गूढ आहे, म्हणून त्याला अमर्यादित अर्थ आहे, किंव्हा सर्व स्तरात, काळात, स्थळात पसरला गेलेला अर्थ आहे. विस्तार बौद्धिक असावा का, हे सांगणे कठीण. विस्तार जाणिवेच्या पार्श्वभूमीवर झाला तर योग्य आहे. त्याचा मुख्य परिणाम म्हणजे सर्वांगीण शांती भाव प्रस्थापित होणे. 

म्हणून बुद्धी, चिकित्सा, चिंता, काळजी - ह्या गोष्टी चांगल्या कर्माना मर्यादा घालतात किंव्हा मर्यादित चक्र प्रस्थापित करतात. चक्र असणे स्वाभाविक आहे आणि त्याला महत्वाचा टप्पा समजावा विस्तारण्यासाठीचा. 

दुसरी गोष्ट अशी की स्थळ आणि काळावर चांगल्या कर्माचा अर्थ अवलंबून ठेवू नये. चांगले कर्म हातातून घडणे हा उस्फुर्त आणि स्थायी भाव बनायला हवा. सगळीकडे तेच स्पंदने पसरायला हवे. 

तिसरी गोष्ट की आपुलकी आणि स्वीकारण्याचा भाव देखील अमर्यादित असायला हवा. कुणी काहीही म्हणो, काहीही असो, कसेही हालचाली होऊ देवो...त्याच्याही पलीकडे आपुलकी पोहोचायला हवी. ह्याचा अर्थ हा की आपण दृश्यावर निर्णय आधारत नाही. 

चौथी गोष्ट ही, की सूक्ष्म भावना सांगण्याची गरज न भासू देणे. श्रद्धेने ओळखणे की सूक्ष्म होणे हे हिताचेच असते आणि त्याला कुठलाही वेगळा आधार किंव्हा स्पष्टीकरण लागू नये. 

पाचवी गोष्ट अशी की लोकांचे स्वभाव गूढ असतात आणि ते तशे का वागत राहतात, हे मांडणे कठीण असते बोली भाषेत. स्वीकार आणि आपुलकी त्यांच्यासाठी - ह्याला काळ द्यायला लागतो.

सहावी गोष्ट ही की ह्या प्रवासात जात राहताना वाचन, लिखाण, ऐकणे, बोलणे, शांत राहणे, निर्णय घेणे, मत देणे, स्वतःला सुरक्षित ठेवणे, मदत देणे - ह्या सर्व गोष्टींचा आधार त्या त्या वेळेला घेणे होते. तर तसे करावे आणि सर्व परिणाम भगवंताच्या शक्तीवर सोपवून द्यावे.

हरि ओम.

श्री

श्री 

चांगले कर्म करत राहणे, कारण ते कसे उपयोगी येत राहतील/ _परिणाम_ देतील येणाऱ्या काळात हे आज सांगणे कठीण. त्यालाच श्रद्धा म्हणायची, की आज आणि त्याचे फळ कसे असेल उद्यासाठी - हे चक्र शिथिल होऊ देणे. ते चक्र विचारात स्थित असते, म्हणून त्यातून परिस्थितीतील गोष्टींशी संबंध प्रस्थापित होत राहतात. काय असते विचारात की काल, आज आणि उद्या हे गुंतले गेलेले असते कुठल्यातरी आतील भावनेमुळे. मुळात कार्य करणारे माध्यम शांतीच असते. फक्त त्यात परिवर्तन होत, आपण एका वेगळ्या भावनेशी समरस झालेलो असतो आणि त्या प्रमाणे गोष्टी ध्यानात येत राहतात आणि परिणाम देत राहतात. त्या वेगळ्या भावनेमुळे आपण काल, आज आणि उद्याचे संबंध जोडतो. 

म्हणजे हा वेगळा भाव जो प्रकट होतो, तो शांतीतूनच आला असतो. ह्याचा अर्थ की काहीही अनुभवताना लक्ष शांतीकडे हवे/ सत्याकडे हवे. जशी सूर्याची किरणे सर्व व्यवहार उज्वलीत करतात, तसेच दृश्यात घडामोडी भगवंताची शक्ती चालवते. 

हा सत्य अनुभव स्थिरावण्यास, वेगळा असलेला भाव विलीन होणे गरजेचा ठरतो. विलीन होणे म्हणजे कुठल्याही परिस्थितीची आसक्ती कमी होणे आणि शांती भाव प्रस्थापित होऊ देणे.

हरि ओम.

Thursday, July 16, 2026

श्री

 श्री 


अस्तित्व ह्याचा मूळ असण्याचे चिन्ह म्हणजे शांती भाव आणि त्यातून घडत राहणे कार्य. 

आपण शांतीचे प्रतीक आहोत, कुठल्यातरी स्थितीत कार्य घडत राहते. मूळ कार्य भगवंताची शक्ती कारणीभूत असते, जिच्यामुळे आपला व्यवहार स्थित होतो, विचार येत राहतात, भावना येत राहतात, गुंतणे होते, स्मरण होते वगैरे. कुठल्याही रूपाला आणि आकाराला भगवंताची शक्ती _कारण_ ठरते. 

आपण त्या शक्तीला बऱ्याच उपमा देतो. पण काहीही झाले, तरी ते शांती असते, ज्याला आपले रूप आणि आकार मागे टाकायला लागते. आपण संबंधात का येतो, हा गूढ प्रश्न आहे. त्याने व्याकुळ होण्याचे कारण नाही. तो प्रश्न शांती भाव आत्मसात करूनच पूर्ण ओळखता येईल. 

मी - ह्या संकल्पनेला महत्त्व नाही. तरीही निमित्त म्हणून मार्गावर राहणे. तेवढा अधिकार दिला असतो. काय दिसते, त्यातून तर्क मांडू नये आणि कुणाला काहीही लेखू नये. इथे भगवंतच विराजमान आहे. त्याला ओळखावे.

हरि ओम.


श्री 

प्रत्येक गोष्टीत, वस्तूत, प्रवाहात, चक्रात, भावात, जीवात शांत स्थिती किंव्हा भगवंत विराजमान असतो. त्याच्यामुळे हालचाली, कार्य, दृश्य जग, संबंध, विचार आणि भावना _घडत_ राहतात किंव्हा _निर्माण_ होत राहतात. Imagination. 

तो आहे, म्हणून हे सर्व आहे. संबंध आत्मसात होण्यासाठी त्याचे सतत चिंतन करावे लागते, म्हणजे स्वतःत _परिवर्तन_ घडावे लागते. 

त्याच्यामुळे _मी_ होत राहतो. मी, ह्या रूपाच्या पलीकडे त्याचे कार्य किंव्हा अस्तित्व असते, त्यामुळे बुद्धी किंव्हा भावना ह्यांना टप्पा मानायला लागते त्याला आत्मसात होऊ देण्यासाठी. टप्पा अर्थात विघटित किंव्हा आणखीन स्पष्टीकरण देण्याची साखळी नसते. स्पष्टीकरण दिल्याने सध्या काहीही फरक पडत नसतो, उलट वायफळ बडबड होण्याची शक्यता असते. ह्याला कारणही आहे. अहं भाव सतत सिद्ध होण्याचा प्रयत्न करत राहतो, म्हणून तो काहीही संकल्पना निर्माण करत राहतो, गोष्टी असो वा नसो. चिकित्सा करणे, विघटन करणे, बिंदू शोधत राहणे - ह्याने अहं भाव शांत होणे अवघड, कारण तोच तर त्याचा स्वभाव आहे! ह्यातून अपेक्षा, परिणाम, भोग, गुंतून राहणे - अश्या गोष्टी प्रस्थापित होत राहतात. 

शांत होण्याचा एकच मार्ग हा की शांती भावनेचे संस्कार मनाला देत रहाणे. त्यासाठी भगवंताचे चिंतन करावे.

जाणीव नेणीव भगवंती नाही I 
उच्चारणी पाही मोक्ष सदा II 

हरि ओम.

श्री

 श्री 


जीव खूप _परावलंबन_ , अशा संबंधात गुंतला गेला असतो - इतके की त्याचा ठाम पत्ता त्याला ओळखणे कठीण जाते. ह्याचा दुसरा अर्थ की भगवंताची शक्तीच कार्य करत असते, जिच्या अस्तित्वामुळे _जीव_ , हा भाव, प्रस्थापित होतो. हा सोप्पा अर्थ, खूप सोप्प झाल्या शिवाय ओळखणे कठीण जाते, कारण त्यात स्वतःचा अहं भाव मिसळून गोष्टी क्लिष्ट केल्या जातात. तरीही, स्वतः विघटित, परावलंबित आणि क्लिष्ट असून सुद्धा, परिस्थितीला टप्पा मानून मार्ग पत्करला जाऊ शकतो, ज्यामुळे सोपेपणा आत्मसात होऊ शकतो. स्वतःला सोपे करायचे असते. 

अहं भावाचे परिणाम अनंत. सत्व, रज, तम - अशा कुठल्याही स्वभावाचे जीव होतात त्यातून आणि त्यामुळे न्यूनपणा तैय्यार होतो. इथे प्रश्न आहे जीवाला. की ह्या भावनेतून सुटका असते का? असते, पण ती बुद्धीच्या मार्गातून बघण्यापेक्षा, तो मार्ग श्रद्धेचा असतो. श्रद्धेने आपण सूक्ष्म, अमर्यादित, स्थिर होतो. म्हणून ती भावना, जी कशावरही अवलंबून नाही, ती जागृत होऊ द्यावी. 

बुद्धीची शक्ती अजब प्रकरण आहे! त्यावर हक्क गाजवता येत नाही. सर्व घटक भगवंताकडून येतात, म्हणून त्या भावनेने बुद्धीकडे बघणे जरुरीचे ठरते. म्हणजेच की बुद्धीने वेगळेपण, गोष्टीना स्वरूप देणे, आकार देणे, प्रवाहाची मांडणी करू शकणे, प्रश्न निर्माण करणे, अपूर्ण असण्याचा अर्थ शोधणे, विश्लेषण तैय्यार करणे, कार्य प्रस्थापित होऊ देणे - अशा प्रवृत्ती असतात बुद्धीच्या.  "करणे" - हा _स्वभाव_ असतो/ बनतो बुद्धीचा. म्हणून कर्म तर होणार. 

हा स्वभाव जीवाने _धारण_ केला असतो...तो दिला गेला असतो. तोच स्वभाव परत भगवंताला द्यायचा असतो अपेक्षा न ठेवता. 

हरि ओम.

Saturday, July 11, 2026

श्री

 

श्री 

 

सगळ्यांना स्मरण, भाव, रूप, आकार आणि त्या प्रमाणे प्रवाहात राहणारी बुद्धी आणि भावना ध्यानात येत राहतात आणि संबंध जोडतात. त्यामुळे वेगळेपण किंव्हा तात्पुरतेपण, हा भाव संक्रांत होतो आणि तो प्रत्येक जीवाला गुंतवून ठेवतो. म्हणून प्रत्येक जीवाला बेचैनी, भीती, व्याकुळता ही येतेच. 

 

प्रश्न असा आहे, की अशा स्थितीत शांत होणे म्हणजे काय आणि ते कसे साधायचे? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा वाटल्या शिवाय मार्ग पत्करणे कठीण आणि त्यामुळे परिवर्तन होणे कठीण. 

 

रूपाचा एक परिणाम घडतो, त्याचा एक स्वभाव असतो, त्यामुळे चक्र प्रस्थापित होते. ह्यात बदल काय, संबंध काय, साखळी काय, पाहिले काय आणि शेवट काय - ह्यात चिकित्सा करण्यात विशेष तथ्य नाही...कारण मुळात तसे काही नसते, म्हणजे सर्व रूपाला मर्यादा असतात आणि त्यांना निमित्त मानून सत्य ओळखावे लागते. 

 

तरीही हे लिहिण्यात किंव्हा व्यवहारातही स्वतःचा स्वभाव असतोच, म्हणून लिहिण्यावरून काम संपत नाही आणि त्यावर शांती ठरत नाही पूर्णपणे. म्हणजे भगवंताला शरण जाणे हाच मार्ग ओळखावा. 

 

सर्व अस्तित्व भगवंताचे असते आणि त्यात आपण कुठेतरी निर्माण होत राहतो आणि विलीन होतो. हे हालचाली विधिलिखित असतात, म्हणून ते वाट्याला येत राहणार. त्या हालचालींच्या चक्राच्या निमित्ताने भगवंताला ओळखावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

"जत्रा" हा शब्द एक प्रकाराचा अनुभव दर्शवतो माझ्या मते...ह्या शब्दातून गोंधळ, गोंगाट, चळवळ, अस्थिरता, बेचैनी, कष्ट, त्रास, घालमेल, धावपळ - अशा सर्व भावनांचे मिश्रण होत असावे. 

 

आपण बहुतांश बाजार किंवा गर्दीच्या कुठल्याही ठिकाणी वरील "जत्रा" शब्द लावू शकू. 

 

पण मनातील विचारांचे अमाप गोंधळ देखील "जत्रा" दर्शवते, नाही का? हे उघड आहे की वाढत्या लोक संख्येमुळे रस्त्यावर, कुठल्याही वास्तूत, शाळेत, बँकेत, पर्यटक स्थानात - कुठेही जा, जत्रा अनुभवात येतेच येते. पण, खूप विघटित मानसिक क्रियांमुळे (fragmentation and multitasking), जत्रा, हा अनुभव, मनात संक्रांत होऊ शकतो. म्हणजे मनाचा मार्ग जत्रा निर्मितीचा आहे आणि अध्यात्माचा मार्ग शांत होण्याचा. 

 

जीव म्हणलं तर मुळातच जत्रा, असा अनुभव, संक्रांत होत असतो अनेक रूप आणि आकार बघत राहताना. ह्या जत्र्यांमध्ये शांती भाव कसा प्रस्थापित होऊ द्यावे - हा मुळातील प्रश्न आहे आपल्याला. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

एकाच वेळेला स्वतःचे मन सैरबैर खूप ठिकाणी गुंतून राहत असतं - नात्यात, परिस्थितीत, रुपात, आकारात, वृत्तीत, विचारात, भावनेत, स्थळात, काळात, कामात, समस्यात, विषयात, चिंतेत, काळजीत, तात्पुरतेपणात, वगैरे....ह्याला अंत नाही अशा स्वभावाला - म्हणजेच सत्य ओळखले तर ह्या प्रवाहित असणाऱ्या अनुभवाच्या उगमाला "माझे" कर्तेपण नसते किंव्हा मी जबाबदार नसतो. जीवाची ही वरील _संकल्पना प्रकट_ होत असते आणि ती अस्तित्व माध्यमामुळे होत राहते. ह्या अनुभवाला प्रारब्ध, भोग, देहबुद्धी, अस्थिरता असेही संबोधले जाते. 

 

प्रश्न असा आहे, की हे कशातून शांत होतं आणि शांत होणे असा अनुभव महत्वाचा आहे का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि मार्ग देखील त्याने शोधणे गरजेचा आहे. 

 

त्यासाठी "भगवंताचा" सत्यपणा पहिले मान्य करणे गरजेचा ठरतो आणि त्यातून शांतीचा मार्ग पत्करला जातो. त्यातून श्रद्धा, विलीन होणे, त्याग, अशा संस्कार मनाला देत रहाणे ठरते. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

"मी" हा भाव, क्षणाशी संबंध, शक्तीचे कार्य, परिणाम, चक्र - ही सर्व भगवंताची *इच्छा* ओळखावे. 

 

 *इच्छा* स्वतः सिद्ध आणि शांत माध्यम आहे, ते अस्तित्व आहे, ते जिवंत आहे, त्याचे कार्य आहे. इच्छे पोटी सर्व प्रकाराच्या हालचाली, सर्व स्तरात होत राहतात. त्या इच्छेतून अनेकपणा किंव्हा विघटित कार्य होत राहते - पदार्थ घडल्या जातात आणि मोडल्या जातात आणि हे कायम सुरू राहते. 

 

कारण *अस्तित्व* असतेच, त्यावर निर्भर असलेल्या सर्व घटना स्थित राहतात किंव्हा निर्माण होत राहतात. म्हणून अस्तित्वाला अंतर्मुख आणि बहिर्मुख असे दोन अंग आहेत, आणि त्या प्रमाणे अनुभवाचे स्वरूपही. 

 

"गगनाहूनी वाढ नाम आहे", असा उद्गार हरि पाठात उल्लेख केलेला आढळतो. म्हणजे स्वतःच्या अनुभवाचा _विस्तार_ अमर्यादित होऊ शकतो. म्हणजे अनुभवात स्तर, परिणाम, स्मरण, भाव, कार्य, व्यवहार, संकल्पना - ह्या साऱ्या गोष्टी येतात आणि त्यांच्या आपसात संबंधातून शांतीकडे वाटचाल होऊ पाहते.

 

हरि ओम.


Tuesday, July 07, 2026

श्री

श्री 

कदाचित माझ्यासाठी _त्याग_ भावना आत्मसात करणे अभिप्रेत असावे आणि ते सुद्धा शंका आणि श्रद्धेतून. Critical thinking. 

विचारांचे स्थान, भावनांचे स्थान आणि त्यातून संबंधांचे स्वरूप, स्मरण, परिणाम - हा अनुभव "जीव" झाल्यामुळे/ त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे "प्रस्थापित होतो". ह्या होण्याच्या गोष्टीला शांत केले/ शांत होऊ दिले की जो अनुभव उरतो, तो असतो शांतीचाच. म्हणजे रूप आणि आकार गेले तरीही अस्तित्व असतेच.  

हे जाणल्यावर सुद्धा त्या विलीन होण्याच्या क्रियेला सामोरे जायला लागते आणि खूप साऱ्या भावनांना स्वीकारावे लागते. विचार, भावना - एकंदरीत "पाहुण्या सारखे" त्याकडे बघावे. ते मुळात थोडे दिवस असतात आणि नंतर निघून जातात आणि हा प्रवाह सुरू राहतो. 

ह्याचा अर्थ की पाहुण्यात गुंतून राहणे योग्य ठरत नाही, कर्तव्य करावे लागते, आपुलकी प्रस्थापित व्हावी लागते आणि देणे करावे लागते. 

हरि ओम.