श्री
श्री
गोष्टी होत राहतात. तो अस्तित्वाचा गुण आहे. ते कसे,
कधी, कुठे, का होतात - ती
भगवंताची इच्छा असते. गोष्टींच्या स्वभावावरून अणि होण्यावरून किंव्हा
कुठल्याही हालचालीतून (मग ते आतील असू किंव्हा बाहेरील) आपण ठरत नाही किंव्हा
सिद्ध होत नाही (संपूर्ण बौद्धिक अर्थ लावण्याची गरज नसते). अशा अनेक स्तर आहेत,जे बौद्धिक भाषेत
ओळखता येत नाहीत, तरीही त्यांचा शांत मनाने स्वीकार होऊ शकतो. थोडक्यात
सर्व निर्मितीचा प्रकार आणि परिणाम अस्तित्व शक्तीतून उद्भवते,
त्यात आपण एक निमित्त/ घटक/ स्मरण/ भाव/ जाणीव ठरतो.
हे लिहिणे देखील आपल्या रूपातून निर्माण होते, अर्थातच त्याची
प्रतिभा भगवंताने दिलेली असते. आपल्यातून सुरुवात करून शांती पर्यंत स्थित व्हायचे
असते. हा मार्ग. आपण इथे कसे आलो, का आलो,
कधी आलो, कुठून आलो हे सर्व प्रश्न भगवंताला सोपवा,
म्हणजे संपूर्ण परिस्थितीचा स्वीकार करावा. हाच आपला मार्ग.
हरि ओम.
श्री
_हालचाली_ होत असतात दृश्यात.
ती भगवंत शक्तीची इच्छा असते, म्हणून कार्य होते
आणि अनेक स्तर प्रस्थापित होत राहतात आणि हालचालींचे अनेक रूप आणि आकार दर्शवत
राहतात.
भगवंताच्या स्मरणात कुठलाही क्षण वाया जात नसतो, कारण कुठल्या ना
कुठल्यातरी स्तरात त्याचा योग्य परिणाम होत असतो. तो योग्य परिणाम शंका देईल,
त्रास देईल, श्रद्धेचे महत्वही दर्शवून देईल. म्हणजे अंतर्मुख
होण्याच्या प्रक्रियेत वाट्टेल ते उफाळून येण्याची संभावना असते,
जे शांतीने आत्मसात करावे लागते. हीच शक्ती संचय होण्याची संकल्पना.
जसं दृश्यात शक्ती वावरताना इंद्रियांच्या द्वारे परावलंबित प्रक्रियेत मग्न
असते आणि त्यातून विचारांची धारा प्रस्थापित होते, तसंच अंतर्मुख
होण्याच्या प्रक्रियेत मनात उलाढाल होत असते आणि त्यातून निराळी विचार धारा
प्रस्थापित होत असते, ज्यावरून सत्य आत्मसात होते.
म्हणून तसा निश्चय व्हायला लागतो की अंतर्मुख मार्ग निवडण्याचा. हा मार्ग
पत्करल्यावर कुणाचे काय बिघडणार आहे?! सारे तर भगवंताचे
असते, आपण उगाचच काळजी करतो की कुठे कमी पडले तर आणि कुठे
फुगा फुटला तर!
म्हणून राग गिळायला लागतो. कारण तो मर्यादा दर्शवतो. गोष्टी आपल्या अपेक्षा
प्रमाणे होतीलच असे काहीही नाही. हे मान्य असावे. गोष्टी अशा पद्धतीने,
कुठे, कधी, का घडतात...ह्यात
व्याकुळ होण्याची गरज नाही.
एकंदरीत वरील आपली (जीवाची) परिस्थिती बघता, ह्यात तारून शांती
अनुभवण्याचा मार्ग म्हणजे तीन गोष्टी ध्यानात आणाव्यात: प्रयत्न (कर्तव्य),
सैय्यम आणि श्रद्धा. हाच दृश्यात राहण्याचा उचित मार्ग आहे.
योग्य वेळ आली की भगवंत दर्शन देणार.
हरि ओम.
श्री
आपण शांत रहावे. सध्या इतके बदल सर्व पातळींवर होत असतात की त्यातून आपण ठरून
घेण्याची चूक न करावी, कारण काहीच ठरणार नसते आणि त्यातून व्याकुळता का
निर्माण करावी? आपल्याला प्रामुख्याने पाच गोष्टी शिकायच्या आहेत
१) कार्य आपल्या नकळत, सूक्ष्म माध्यमातही स्थित राहतं,
म्हणून _करण्याला_ बरेच कंगोरे असतात, जे कळतात,
नाही कळत, अर्धवट कळतात वगैरे. ह्या सर्व रूपाच्या प्रकारात _स्थिर_
राहण्याचा प्रयत्न करावे.
२) काहीही अनुभवात येऊ घातले, तरीही सिद्ध
होण्याची व्याख्या दृश्याच्या भाषेत मांडण्याची गरज नसते...कारण सिद्ध होण्याचा
प्रकार _परावलंबित_ असतो. जिथे आजूबाजूच्या गोष्टीच खूप अस्थिर होत जात
आहेत, तिथे त्यांच्यावरून सिद्ध होण्याची संकल्पना का
अवलंबून करत राहावे?! आणि खरे सिद्धत्व भगवंताच्या शक्तित असते,
त्यात आपण फक्त देणे लागतो.
३) आपण मग कोण आहोत? इथे का आलो, काय करतोय,
कशासाठी गुंतून राहतो, काय पाहिजे, कुठे जाणार आहोत- हे
खूप महत्वाचे प्रश्न असतात स्वतःसाठी. त्यासाठी मार्ग आत्मसात करण्याचा शोध सुरू
होतो.
४) दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आपली नसते. त्यांच्या वृत्ती कशा शांत
होतील, त्यासाठी आपण व्याकुळ न व्हावे. असे केल्याने असेही
समजून घेऊ नये, की आपल्याला काहीच फरक पडत नाही. संसार सगळ्यांना
मर्यादा शिकवतो. त्याच्यामुळे जे विचार आणि भावना उमटत राहतात,
त्यातूनच शांतीकडे वाटचाल करावी लागते. म्हणून परिस्थिती पूर्णपणे स्वीकारावी
लागते. आपण ह्या परिस्थितीत कर्तव्याची भाषा आत्मसात करावी.
५) सतत काहीतरी करत राहावे, गुंतून रहावे,
खंत बाळगावे, रागाला धरावे - हे हिताचे ठरत नाही. स्वस्थ बसून
राहिले, तरीही ते महत्त्वाचे असते आणि वेळ फुकट जात आहे,
असे बिलकुल समजून घेण्याची गरज नाही. सर्व भगवंत योग्यच करतो. श्रद्धा
वाढवावी.
हरि ओम.
श्री
सर्व काही आपल्यात असते. आपण रिकामे नसतो. कुठे ना कुठेतरी आपल्या असण्याचा,
वावरण्याचा योग्य परिणाम अस्तित्वात होत असतोच आणि आपले स्मरण कधीही वाया जात
नाही. त्या अर्थी, आपण फक्त कर्तव्य करावे आणि संपूर्ण देत रहावे.
देण्यासाठीही अंतःकरणात शुद्ध भाव स्थित होणे गरजेचा असतो,
म्हणून देण्याने हे साधायला होते. ज्याला मी असे म्हणतो,
ती देखील भगवंताची इच्छा आणि कार्य दर्शवते म्हणून तो सर्व काही योग्य करतोच,
मग काळजी ती कसली?!
प्रश्नांचे उत्तरे ओळखण्यासाठी वेळ द्यावा आणि श्रद्धा शक्ती वाढवावी. श्रद्धा
बुद्धीने कळत नाही. बुद्धी अशी वापरून बघितली तर श्रद्धा यावी,
हा तर्क झाला. श्रद्धा येण्यासाठी भगवत कृपा लागते.
म्हणून बुद्धी परिवर्तित होण्यासाठी प्रयत्न, सैय्यम आणि कर्तव्य
करावे. बुद्धीला कार्य केल्याशिवाय स्वस्थता (भगवंताची जाणीव) मिळणार नाही. म्हणून
कार्यातून तिला शांत करावे. त्या कार्याचे रूप म्हणजे प्रयत्न,
कर्तव्य, सैय्यम असे आहे.
हरि ओम.
श्री
काही अवघड विचार किंव्हा शब्द मांडण्यासाठी काही अनुभवातून जाणे येते. ते
आपल्या हातात नाही; कधी ते अवघड क्लिष्ट वेदनादायक भावना मांडावे,
हे सांगणे अत्यंत कठीण. घाई करून नाही चालत; आणि दुर्लक्ष
करूनही. अशा परिस्थितीत काय करावे, असा प्रश्न पडावा
स्वतःला.
मला वाटते की भोग असतात, ते स्वीकारायला
लागतात. त्यातून कोण चूक किंव्हा बरोबर असे बघू नये. आत्ता मुद्दा सांगणे कठीण का
वाटते ह्याचे कुणी स्पष्टीकरण जरी विचारले तरीही अंतःकरण जाणून घेऊन निर्णय
घ्यावे. निर्णय निमित्त झाले. त्याचे फळ काय यावे, ते श्रद्धेवर सोडावे.
असा विचार करावा सतत. काही विचार आणि भावना आत खूप आघात देत असावेत. विचार जरी
त्रासदायक वाटले, तरी शांत राहण्याचा (म्हणजे सैय्यम,
श्रद्धा, कर्तव्य) सतत निश्चय करावा.
एक घाव दोन तुकडे कुणालाही त्वरित करणे शक्य असते पण मुद्दा हा आहे की त्याचा
प्रभाव खूप खोलवर आणि खूप काळासाठी तरंगत राहतो. वृत्तीचेही तेच आहे. वृत्ती शांत
कालांतराने होणार...त्यासाठी अनेक अनुभव, स्तर,
चक्र आत्मसात करावे लागणार. कारण अस्तित्वाच्या अनुभवात भगवंत भाव आणि जीवाचा
भाव अशा दोन गोष्टींचा परिणाम होत असतो, आपल्याला मार्ग तो
पत्करणे आलेच.
वेदनांसाठी स्वतःला दोष देणे त्वरित बंद करावे. गूढ भाव ओळखण्यात श्रद्धा
ठेवावी. कशालाही घट्ट पकडण्याची गरज नसते. आणि तसे जरी होत असले,
तरीही भगवंताचे चिंतन करत राहावे म्हणजे कालांतराने दृश्यांची पकड सुट्टी
होते.
असा विचारही येऊ शकतो, की थेट कोड सोडवणे अपेक्षित नसते का,
इतर बाजूचे प्रयत्न करण्यापेक्षा? हा विचार तसा जरी
सरळ वाटत असला, तरी प्रत्यक्षात नेहमी ते शक्य होईल असे काही सांगता
येत नाही. बाजूचे प्रयत्न देखील कालांतराने तेच कोडे थेट सोडवतील! आणि थेट
कोड्यामध्ये हात जर घातला तर प्रकरण चिघळूही शकते! तात्पर्य,
कोडे कधी आणि कसे सुटेल हे आपल्या हातात असत नसते...ते श्रद्धेने भगवंताकडे
सोपवावे. ह्याचा परत अर्थ असा निघतो की कोडी सुटण्या पर्यंत आपले कार्य करत राहावे
- कर्तव्य, सैय्यम, श्रद्धा.
हरि ओम.
