श्री
श्री
Inheritance of things or situations is a Divine context. मी होत राहणे,
वावरणे, अनुभव येणे, अनुभवातील सर्व घटक
जाणिवेत येत राहणे, परिणाम होणे, स्मरण होणे,
बदल आणि परिवर्तन होत राहणे...हे अस्तित्वातील गोष्टी असतात. ते देवाच्या
इच्छेने येत राहतात आणि बदल पावतात. प्रवाह आणि प्रवास त्याने दिला आहे,
तर तो योग्यच असेल.
सुरुवात काय, मध्यम काय आणि शेवट काय,
ह्याने काहीही विशेष फरक पडू नये, हालचालींचे फरक पडू
नये, संबंधांच्या रूपाचे फरक पडू नये,
कारण ह्या गोष्टींचे प्रयोजन देवाने केलेच असते नेहमी. हालचालीतून किंव्हा
अनुभवातून "मी" ही संकल्पना अवलंबून असत नसते,
म्हणून जे होत राहते, ते मुळात योग्यच असते.
आतील कार्यांना घाबरू नये. त्या कार्याचे रूपांतर दृश्यात होत असते आणि
त्यावरून येणारे अनुभव, परिणाम, भाव,
स्मरण, हेतू वगैरे. आतील वस्तुस्थितीला पूर्ण स्वीकारावे आणि
दृश्याला त्या नजरेने बघावे, शांत रहावे आणि
संबंध ठेवावे. आपण अर्धवट नसतो. आपण पूर्णच असतो. हे जाणिवेत येऊ द्यावे.
हरि ओम.
श्री
प्रत्येक क्षण प्रवाह असतो, ज्याचे उगम
भगवंताकडून येत असते. प्रवाहात राहणे, ही *त्याची इच्छा
आहे,* ज्यामुळे आपण एक रूप घेतले असते. इंद्रियांच्या
स्थानातून आपण व्याकुळ न होणे. हा सर्व एक प्रकाराचा अस्तित्वातील खेळ आहे किंव्हा
घडामोडी आहेत.
त्या घडामोडींचे प्रयोजन देवाने केले आहेत, म्हणून कशानेही
व्याकुळ होऊ नये, गुंता जाणवला तरी सोडवण्याचा अट्टाहास धरू नये सिद्ध
करण्याची गरज निर्माण करू नये.
सर्व योग्यच होते.
हरि ओम.
श्री
गरज आपल्याला स्वतःच्या स्वभावामुळे उत्पन्न होते. ती कधीच संपत नाही...म्हणजे
समाधान देत नाही. जी गोष्ट संपत नाही, ती समाधान प्रकट
करणे कठीण. दृश्य एकंदरीत तसे आहे. आपण एकंदरीत तसे आहोत. आपले संबंधांचे रूप
एकंदरीत तसे आहे...म्हणून त्यात गुंतून राहण्याची क्रिया सदैव प्रज्वलित राहते
किंव्हा स्थित राहते.
एका दृष्टीने प्रज्वलित राहणे, हे _कार्य_,
ह्या भूमिकेतूनही म्हणू शकतो. कार्य म्हणजे जे भगवत इच्छेवर सुरू राहते आणि
त्यात माझे काहीही कर्तेपण असत नाही. म्हणून गोष्टी होणे,
वावरणे, गुंतून राहणे आणि निघून जाणे ह्याकडे
"कार्य" म्हणून बघावे. अर्थात ही संकल्पना वैचारिक आहे आणि जाणिवेशी
किंव्हा भावनांशीही सबंधित आहे. म्हणून पटले, तरी अनुभव होणे
महत्वाचे ठरते. म्हणून कार्य हा शब्द आहे, संकल्पना आहे,
विचार आहे, _भावना आहे आणि जाणीवही आहे_
. म्हणजे थोडक्यात कार्य हे सर्वांगीण प्रकरण आहे, नुसता विचार नाही.
लोकांना असे वाटते की मी विचार केला आणि प्रयत्न केले तरी तसे फळ का येत नाही?
कारण तो योग्य विचार सर्वांगीण झालेला नसतो, सर्वव्यापी आणि सर्व
स्तरात गेला नसतो आणि तो खूप आत पर्यंत पोहोचला नसतो.
ह्याचा तिसरा अर्थ हा की कुठलाही विचार बाहेरून जर निर्माण झाला (बाहेर म्हणजे
परिस्थितीशी निगडित), तर तो खूप आत न्यायला लागतो (आत्मसात होणे,
सूक्ष्मात परिवर्तन होणे, अंतर्मुख होणे,
स्वावलंबीत होणे).
सध्या विषय, समस्या, कोडी,
विचार, भावना आतूनच येत असतात म्हणून त्याचे कार्य दृश्य
जगाशी संबंध आणि परिणाम आणतात. नामस्मरण जर दृश्यात जाणले,
तर ते खूप आत आत नेत आपल्या अनुभवाला सूक्ष्म करायला लागते. ते केल्यावर
भगवंताचे दर्शन होऊ शकते.
हरि ओम.
श्री
देवाची कृपा गूढ पद्धतीने कार्य करत असते. ती शुभ शक्ती आहे,
म्हणून कुठल्या ना कुठल्यातरी प्रमाणात त्या शक्तीचे वावर सगळीकडे असणारच.
त्यामुळे त्याचे प्रकट होणारे स्वरूप म्हणजे स्तर, स्थिती,
संबंध, साखळी, गती,
हालचाली, परिणाम, चक्र,
भाव, स्मरण, अनुभव वगैरे. तीच एकमेव
शक्ती आहे, जिच्यातून सारे विश्व प्रकट होते.
अर्थात तर्काच्या पद्धतीने विचार केला तर असे जाणवेल की *प्रकट* होत असताना
स्मरणाची भूमिका अशी काहीशी होते की त्या शुद्ध अस्तित्वाला "आपण"
*विसरतो*!! म्हणजे शुद्ध शक्तीचा भाव बदलतो आणि त्यामुळे व्यवहार होत राहतो,
दृश्य जाणवते,अनुभव येत राहतात आणि प्रक्रियेत राहण्याची गरज प्रज्वलित राहते.
इच्छेचे अनेक अर्थ आहेत. जीवाची इच्छा आणि प्रतिक्रिया आणि त्यातून होणारे
परिणाम, हे एक चक्र दर्शवते. तिथे आपल्याला निश्चित बदल
आणायचा असतो.
प्रकृतीची इच्छा आणि त्यामुळे सतत होणाऱ्या घडामोडी,
ज्याला हेतू गूढ असतो, त्याला खेळाची उपमा देणे योग्य ठरते,
जिथे भगवंत संकल्पना मांडायला लागते. प्रकृतीचे गुण धर्म स्वीकारणे हे हिताचे
ठरते.
सर्वात शुद्ध भाव, जो स्वतः भगवंत आहे, त्याची शक्ती आहे,
त्याच्या असण्याला कार्याची उपमा दिलेली आहे. हे कार्य मूलतः निर्गुण,
निराकार, अनाहत, अनाकलनीय,
आचित्य, निरहेतू, अमर्यादित,
पलीकडील, सूक्ष्म प्रकृतीचे, शुद्ध भावाचे असे
काहीसे असते. त्याला *सत्य स्थिती* म्हणतात अस्तित्वात.
म्हणजे स्मरण ह्या टप्प्यातून चढत्या क्रमावर *भाव किंव्हा इच्छेचे* स्वरूप
जाणून घ्यायचे आहे.
म्हणून त्या टप्प्यातून योग्य परिणाम होण्यासाठी आणि त्या मार्गावर जात
राहण्यासाठी नामस्मरण करण्याचे सुचविले आहे. दृढ श्रद्धा नामावर ठेवावी. योग्य
परिणाम होत राहील आतून. परिणाम गूढ असल्यामुळे त्याचे पर्यवसान दररोजच्या
व्यवहारात कसे होतील, ह्याची चिंता किंव्हा साखळीच्या रूपावर जास्त
चिकित्सा ठेवू नये. परिस्थिती अशी का, अनुभव असे का,
नाती असे का, हे शुद्ध भाव वाढवत स्वीकारावे.
योग्य परिणाम होणार, ह्यावर श्रद्धा ठेवावी कारण ती शक्ती आपल्या बरोबर
असतेच.
हरि ओम.
श्री
स्वतःसाठी वेळ देणे आणि खूप आतील विचार जाणून घेणे म्हणजे एका अर्थी स्वतःच्या
रुपाला स्वीकारणे आणि भगवंताशी संबंध कसा प्रस्थापित होतो,
असे ओळखत जाणे. _Present continuous_ tense. एका प्रकाराचा शोध
असावा हा.
स्थिरता येण्यास आणि स्वतःचे मूळ भगवंतच आहे, असा सत्याचा अनुभव
येण्यास - ह्याला प्रवास असेल, प्रयत्न असतील,
श्रद्धा असेल, चिंतन असेल, सर्वांगीण विचार
असेल, कैक परिस्थिती येत राहतील आणि जातील,
हालचालींचे प्रकार असतील, अनेक अवस्था आणि
स्थिती असावेत - तरीही शोध राहणार आणि तो करत रहावा. त्या प्रवासात काही जण
साथीदार असतील, काहीजण नसतील. ह्या शोधा बरोबर भावनांचा उद्रेकही होत
असावा, शंका असेल, वृत्ती असतील. ते
स्वीकारण्याची शक्ती आत्मसात करत राहणे.
कुणी दोषी नसते. आपण स्वतःही नसतो. हे असे का असते परिस्थिती तर त्यास
भगवंताचे कार्य किंव्हा इच्छा असे स्वीकारावे. कुठल्या काळातला परिणाम आज आणि
उद्या कसा पडेल, ह्यावर खूप गुंतून राहून आणि कोडी सोडवण्यात विशेष
समाधान नसावं.
भगवंत, हे सत्य अस्तित्वाचे माध्यम आहे,
ज्याच्या कार्यातून किंव्हा असण्यामुळे अनेक स्तर,
साखळी, चक्र, भाव,
अनुभव, रूप, आकार,
त्यांच्यातील संबंध, विघटन, बदल,
घटक अशा गोष्टी साकार होत राहतात. Vibrations.
ही संकल्पना म्हणून दररोज मनात सांगत रहावे, त्याचे चिंतन करावे,
तसे कार्य करण्याचा प्रयत्न करत रहावा, मार्ग शोधावा,
त्यावर श्रद्धा वाढवत राहावी आणि प्रवासात राहावं. त्याचा शेवट (रूपांतर अथवा
परिवर्तन अथवा स्थिती) सत्य होण्यातच आहे.
हरि ओम.
Shree
Separation is a kind of memory and an action. It
perceives existence in its own terms through various subtle to gross
connections. In this perception, there is an urge to act and expect something
out of it and it then keeps engaging with this cycle of doing and receiving. To
understand or realize the Truth in a state of separation requires effort and
fundamentally this becomes a struggle of forces of division and
synthesis.
We are a _force_ of a particular kind dawning a form and
responding to a phenomenon surrounding this form. The form isn't embedded in a
phenomenon or a phenomenon any separate from the form. It is a continuous link
of action that creates some _effect_ of separation. This is our
inheritance.
Now the journey in this situation is of dissolving any
separation if it is thought to exist or should have any validity.
Why so? Reasons are mysterious. And in this journey an
inner peace is promised if one's memory gets transformed.
आपण विचार करतो. असे म्हणतात की माणूस विवेकशील प्राणी आहे. म्हणजे
आत्मकेंद्रित विचार करण्याची देणगी त्याला दिलेली आहे. असे जर आहे,
तर शोध असणार, प्रश्न येणार, कष्ट होणार,
मार्गावर जाणे असणार, अंतर्मुख होणे येणार. त्या अर्थी,
कृपा असतेच आपल्या अनुभवात भगवंताची. भगवंताचे अस्तित्व अनुभव करते. त्याचे
कार्य सदैव असते. आलेली परिस्थिती त्यावरून येत राहते.
"भगवंत परिस्थिती देतो",
ह्यात खूप गूढ अर्थ आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचे उगम (मनाची आणि दृश्यांची
आणि व्यवहाराची), त्याचीच संकल्पना असते किंव्हा इच्छा किंव्हा कार्य
किंव्हा भाव. ह्याची सतत आठवण मनाला द्यायला लागते म्हणजे मनाचे संस्कार
भगवंताच्या दर्शनाला पोषक ठरतात.
दर्शन म्हणजे अंतर्मुख होण्याचा अनुभव आत्मसात होणे. ती काही जबाबदारी नाही
किंव्हा हेतू किंव्हा विषय. ती एक नैसर्गिक प्रक्रिया व्हायला हवी.
हरि ओम.
श्री
शांत बसायला काही न्यून वाटून घेण्याची गरज नाही आणि त्यातून त्रासदायक विचार
येऊ नये, अशीही अपेक्षा करू नये.
विचारांचा प्रवाह राहणार आणि ती कुठलीतरी _हालचाल दाखवणार_
(संबंध जोडणार) आणि प्रतिक्रिया द्यायला परावृत्त करणार. मग त्याला आपण
"राग, खंत, द्वेष,
उत्साह, सुख, दुःख,
गूढ" अशी नावे ठेवतो. नाव दिले किंव्हा त्याबद्दल रूप दर्शवले,
म्हणजे ते मर्यादित असणार, हे उघड आहे. बाळ
जन्माला आला, तर एक दिवस त्याचा मृत्यू असणार आहेच आणि हे एकाच
तराजूचे घटक आहेत.
गोष्ट कायम नसते, हा ही त्याचा गुण आहे. सर्व प्रवाहात असते आणि ते
कार्यातून प्रकट होते आणि परिणाम करत राहते. आपल्याला असे वाटते की सुख किंव्हा
दुख गोष्टीत अवलंबून असते...आणि ही झाली आपली चूक.
सत्य भाव व्हायला कशाचीही आडकाठी लागत नाही, कुठलीही परावलंबित
स्थिती लागत नाही. सुख आणि दुःख आपणच निर्माण करतो आणि आपणच त्यांना शांत करू
शकतो.
एकंदरीत शांत का रहावे किंव्हा बसावे? कारण त्यातून येणारे
कठोर प्रश्न आणि जाणिवा सत्याला जवळ जाण्यासाठी खुणावतात. त्याला स्वीकारावे.
हरि ओम.
