श्री
श्री
दृश्य, रूप, आकार,
स्वभाव, जाणीव, संबंध,
हालचाली, बदल, गती - ह्या गोष्टी
काय असतात आणि त्यांचा हेतू काय असतो, हे मनावर निर्भर
ठरते...जसे त्याकडे आपण बघू. ह्याचा अर्थ की अंतःकरण शुद्ध झाले,
तर हेतू शुद्ध जाणवेल, नाहीतर काहीही जाणवेल. त्या अर्थाने बाहेरील दृश्याशी
संबंध हे आतील स्थितीचे प्रतिबिंब मानावे. तलवार किंव्हा जाणीव *दुहेरी* आहे.
बाहेर जे काही बघू, त्याचे बीज आत स्थित असते. हे विसरून नाही चालणार आणि
त्यातूनच प्रयत्न, सैय्यम, श्रद्धेचे उगम होते
मनाचे....ज्यामुळे शुद्धता मनाला लाभते. To become sacred or
pure is a process that involves outside and inside reality.
ह्याचा असाही अर्थ निघतो की प्रत्येकाचा प्रवास असतो शुद्ध होण्याचा,
अंतर्मुख होण्याचा, भगवंत जाणून घेण्याचा. म्हणून द्वैताचे अनुभव टप्प्या
सारखे बघायला हवे. मला अनुभव असा का आणि त्याला तसा का,
ह्यात चिकित्सा करून उपयोगाचे नाही. मला अनुभव ह्या वेळेला असा का यावा,
किंव्हा पूर्वी होऊन गेलेले विचार आणि येऊ पाहणारे विचार,
ह्याचीही चिकित्सा करून उपयोगाचे नाही. विचार येतील आणि जातील...विचार निर्माण
होत राहतील, भावना येत राहतील, संबंध घडत राहतील,
हालचाली दिसून येतील. सर्व काही होत राहील.
म्हणून वास्तुकलेत कशी निर्मिती होऊ द्यावी, हे शुद्ध अंतःकरण
ठेऊन करावे. दुसऱ्यांना त्याचे महत्त्व पटो किंव्हा न पटो,
आपले ध्येय स्थिर असणे गरजेचे असते.
अजून एक गोष्ट ही की अंतर्मुख होण्याची क्रिया होत असतेच. Internalisation.
ही खूप महत्वाची क्रिया आहे आणि त्यातून खूप काही गोष्टी उफाळून येऊ शकतात.
त्याने घाबरून जाऊ नये किंव्हा सोडवण्याचीही गरज नाही. त्याकडे शांतीने बघावे आणि
कार्य करावे.
हरि ओम.
Shree
Influences, inspirations, conflicts, values, perceptions
of environment and humanity ...all make ingredients for design. Mind is always
full of these. Does design occur (as an action) to justify or prove anything?
Perhaps real action is something that is beyond any justification. Such an
action is not understood well by the public perhaps, but that doesn't diminish
the importance of its place in the making of things.
Values and the geometry that makes those _manifest_
aren't necessarily seen as a straight algorithm or a logical based idea.
"Ask the building what it wants to be?"...Louis Kahn summarises this
journey aptly. Any intangible nebulous idea would get an Order of geometry that
is bodily seen. We exist (also) as a body, therefore the ideas need some
"form".
We exist (also) as bodies, therefore the mysterious needs
to get established as an environment. There is a _need_ here to create a form.
Hari Om.
Shree
One can see architecture as a means to _express_
something. For me, it is a feeling of groundedness or comfort or relating to
things around me and giving me peace. That is...a stable feeling. In that
aspect, the elements and their compositions, proportions, scales require to
generate that feel. This feel probably goes beyond the self's limited
interests. Perhaps this feel also is dependent on the environment, sun, air or
breeze, rains, temperature, density. Is this feel universal for all cultures?
Yes. But the form evoking the feel can be highly contextual.
Therefore lightness, darkness, bigness, containment,
proportionate, appropriately scaled, intimate are universal requirements which
require unique expressions for each engagement.
In effect, all of us 'speak' the same language using
different words.
I am bothered if my feelings that require expression are
authentic or are they required to be justified? I am not sure of this answer,
although I am tempted to say a firm no. Perhaps justification is an inevitable
aspect of our experiences that keeps our innermost feelings subjected to some
tension as they come into contact with the outside (or the other).
And this is perhaps the most fundamental thing about us.
That engaging with this tension of inner and outer (or to synthesise) is
inevitable. I can neither confirm completely to inner voice nor the outer, but
perhaps strive to merge the two.
It is said philosophically, that only the inner voice
should matter, because it informs the outer voice. I am yet to comprehend the
full weight of that statement.
Hari Om.
Shree
Some roles can only be understood in a _distance_. Since
there exists a feeling of separation in all of us, there is relation,
connection and distance that is perceived amongst any two things (द्वैत).
द्वैत हा _अनुभव_ असतो ध्यानात. अनुभव, म्हणजे जे सत्य
वाटते...ते सत्यपण वासना, विचार, भावना,
देह, ह्या गोष्टींच्या _संबंधातून निर्माण_
होते. _द्वैताची निर्मिती भगवंताचे कार्य असते_. ह्याचा अर्थ हा की
प्रत्येक स्तरात गूढ संबंध असतो, पण नेमकं कसा,
हे सांगणे कठीण किंव्हा ह्याचा विचार करणेही अवघड असते. म्हणून त्या अर्थाने
तिला दैवी *इच्छा* म्हणावी, की ती फक्त स्वीकारावी लागते शंका न घेता आणि जो काही
प्रवास दिला गेलेला असतो, तो सामोरे जायला लागतो शांतीने. आणि जे सर्व द्यायला
लागते, ते द्यावे.
प्रश्न असा आहे, की द्वैत "खरे" असते का?
जे _अंतर_ आपल्याला वाटते, ते खरेच अस्तित्वात
असते का?! जीवाचा जन्म मुळातच द्वैतात निर्माण झाला असतो,
म्हणून त्याचे बंधने निश्चित असतात. इथे बंधन - द्वैत,
चक्र, भाव, कृती एकाच अर्थाने
वापरले गेलेले संकल्पना आहेत. _गरज_
आधाराची त्यामुळे निर्माण होते....sense of belonging.
असे म्हणतात की भगवंताला स्वतःच्या खेळाचा अनुभव घ्यायचा होता,
की "खेळ म्हणजे तोच", म्हणून त्या गरजेचे
स्थान दृश्यात उमटले आणि हालचाली निर्माण झाल्या.
हे वरील वाक्य सांगण्याचे तात्पर्य हे की गरज ही संकल्पना विश्लेषणाच्या रुपात
मांडायला लागते, बौद्धिक नाही. विश्लेषण म्हणजे ती संकल्पना शुद्ध
स्वीकारावी लागते, शंका घेता येत नाही.
स्वीकारणे सर्व काही, म्हणजे स्वतःकडे देखील विश्लेषण म्हणून बघणे. म्हणून
नामस्मरणेचे महत्व.
हरि ओम.
श्री
मी विश्लेषण आहे. अनुभव तर्काचा ठरतो की विश्लेषणात्मक,
हे प्रारब्ध किंव्हा योग ठरवतो. इथं पर्यंत असे होण्याचे प्रयोजन माझे होते की
भगवंताची इच्छा हा प्रश्न असतो माझ्या मनात. पण खूप सूक्ष्म प्रश्नांना विश्लेषण
सारखे स्वीकारावे लागते असे दिसत आहे. मग त्यात लिहिणे आले,
ऐकणे आले, शांत बसणे आले, चर्चा करणे आले,
शांतीने जगणे आले, शांती हा भाव सिद्ध होण्याच्या पलीकडे असून त्याला
आत्मसात करावे असा त्यात निश्चय आला, स्थळ आणि काळाकडे
विश्लेषण म्हणून बघणे, हे आले....
मी का सिद्ध होऊ? कुणासाठी? कशासाठी?
आणि ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायलाही मी बांधील नाही. गोष्टींचे वावर आणि
कुठल्याही रूपातील घडामोडी माझ्यावर अवलंबून नसतात. मग चिंता का करावी?!
प्रगती जर मनाला अधिक व्याकुळ करत असली, तर त्या प्रगतीचा
काय उपयोग?! काय मिळवायचे असते प्रत्येकाला कुणास ठाऊक! असू
द्यावे सगळे. आज इथे ऊन आहे, उद्या तिकडे असेल.
गोष्टींच्या हालचाली असणारच, नाही का?!
हरि ओम.
श्री
मनाला संस्कार लागतात पूर्णत्वाच्या अर्थाचे किंव्हा चक्र कसे आणि कधी पूर्ण
होईल त्याचे. त्यात "त्वरित होणे" आणि "अनंत काळाने होणे" हे
दोन भाग जाणिवेत येऊ पाहतात. सध्याचे जग असे काहीसे बनले आहे की विघटित क्रिया खूप
अधिक जाणवते, म्हणून सारखे त्वरित काहीतरी करत राहणे अशी मनोवृत्ती
होण्याची संभावना खूप आहे, आणि जी होत चालली आहे. त्याच्यामुळे विचार धारा,
भावना, स्मरण, अर्थ सगळं काहीसे
बदलते. त्याचा विपरीत परिणाम असा की आपण विभक्त वाटून घेतो,
एकलकोंडे होतो आणि एकटेपणा पदरी येतो.
ह्याच्या उलट, सूक्ष्म जाणीव होणे, म्हणजे कार्य
किंव्हा हालचालींना अनंत काळ लागणे, इतका की असे आत्मसात
होणे की गोष्टी एका शक्तीमुळे घडत राहतात, त्यात आपला हातभार
काहीही नाही!
जेव्हा असा विचार मांडला जातो, की सर्व भगवंताच्या
इच्छेने होते, त्याचा अर्थ असा की तिथे स्थळ आणि काळाला काहीही मर्यादा
राहिली नाही आणि अशा वेळीस स्मरण जे होते, ते शांती भाव प्रकट
करते. म्हणजे ज्या मनात असा शांत भाव प्रकट होतो, तो जीव देहात नसतो,
किंव्हा जरुरी पुरते देहाचे व्यवहार करतो. त्याचा दृश्याशी संबंध खूप थोडा
राहतो. म्हणजेच मन सूक्ष्म, विशाल आणि स्थिर होते. अशा जीवांना "संत"
असे संबोधले आहे. म्हणून संत लोक विषयात गुंतत नाही, त्याच्या पलीकडे
स्थित असतात. म्हणून त्यांच्याकडे आपण काही मागितले, तर आपली हाक मुळी
त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही, आणि त्यामुळे
अपरिहार्य पद्धतीने आपल्याला पूर्ण मोकळे व्हायला लागते,
शांत व्हायला लागते. ह्याला म्हणायचे सत्संगत. गती ती कोणती?
जी भगवंत देईल ती. भगवंताची जाणीव म्हणजेच खूप अनंत काळाचा परिणाम.
प्रारब्धाची मर्यादा देहा पर्यंत असते. आपले स्मरण,
भाव, मन हे देहाशी मर्यादित करण्याची गरज नाही. देह एका
प्रकारे जाणिवेची स्थिती करतो, त्याच्या
संस्कारांमुळे. आपण ह्या देहात राहून, देहातीत बनू शकतो,
सूक्ष्म होऊ शकतो आणि भगवंताचे होऊ शकतो. त्याची इच्छा जाणून घेऊ शकतो. त्याला
जाणुन घेणे हे जीवाचे अंतर्मुख कर्तव्य आहे, ते दुसऱ्यांना
सांगता येणे कठीण.
हरि ओम.
