Thursday, March 26, 2026

श्री

श्री 

 

अस्तित्व माध्यम "असते" आणि त्यावरून त्या माध्यमाचे "कार्य" स्थित असते. ते कार्य म्हणजे अनंत निर्माण क्षमता आणि dnyan क्षमता. तो अनंत अर्थाने वाहून भरलेला आहे. तो सगळीकडे असतो, सगळीकडे भरलेला आहे, सगळ्या काळात आणि सगळ्या रूपात असतो. 

 

त्याला ओळखण्यास, जाण्यास, जवळ होण्यास, त्याचे सतत चिंतन करावे लागते. जशी वासना सतत आपल्या बरोबर येते आणि त्यावरून परिस्थिती देत राहते (वासनेतूनच आपला जन्म झाला असतो आणि अनुभव ध्यानी येत राहतात), तसंच नामस्मरणाने भगवंताची जाणीव आणि कार्याची आठवण सतत आपल्या बरोबरीने येत राहतात. म्हणून कुठल्याही परिस्थितीत (आतील किंव्हा बाहेरील), भगवंताचे स्मरण चालू राहू द्यावे. त्यांनीच मनाला स्वस्थता प्राप्त होईल. 

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

शंका घेत, चिकित्सा करत, कोडी सोडवत भगवंताचे चिंतन _बरोबरीने_ करावे. भगवंताचे चिंतन आपल्या रुपावर आधारलेले ठेऊ नये...म्हणजे रूप जे काही दाखवेल, _त्यावरून_ भगवंताला ठरवू नये (त्याला मर्यादेत जाणून घेऊ नये). त्यावरून असे ओळखावे की रूपाच्या किंव्हा बुद्धीच्या तर्काने भगवंत मांडणे कठीण...ह्या प्रयत्नाला टप्पा मानावे. टप्पा ह्याचा अर्थ की सर्वांगीण चिंतनाचा प्रभाव आणखीन खूप विशाल असतो जो कुठल्याही घटकेच्या पलीकडे जातो. म्हणून श्रद्धा ठेवावी. योग्य अनुभवातून भगवंताचे दर्शन होईल.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

भगवंताचे कार्य असते, आणि ते गूढ असते. म्हणून ते कसे, कधी प्रकट होते, हे स्वीकारावे शांतीने.

 

विविधता आपल्या अनुभवात राहणार. सर्व विविधता एका सत्य माध्यमातून प्रकट होतात आणि संबंधित राहतात. मग कुणी ओरडेल, रागावेल, व्यवहार करेल, गाणी गाईल, चित्र काढेल, खेळेल...सर्व एकाच माध्यमातून येत राहते. ही जाणीव प्रज्वलित ठेवण्यासाठी नामस्मरण करत राहावे. आपले वासना, पूर्वीच्या आठवणीत राहणाऱ्या गोष्टी, पुढच्या गोष्टी, संबंध, हे सर्व मान्य आहे मला...तरीही व्याकुळ होण्याची गरज नाही. अभ्यासासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत. आपण शांत रहावे. 

 

कशालाही धरून रहाण्याची गरज नसते. सर्व भगवंताचे आहे, म्हणून ध्यानी गोष्टी येतील आणि जातील प्रवाह सारखे, पण सर्व प्रवाह भगवंताचे असणे दर्शवते. म्हणून हालचालींवर चिंता करू नये. 

 

मी ही भगवंताकडून आलो आहे आणि त्यामुळे अनुभवांचे स्थान ध्यानी प्रकट होत राहते. अनुभवांमुळे संबंध येणार आणि त्याने विषय, कोडी प्रकट होतील. व्याकुळता येईल...हे सगळं होईल.

 

ह्या सर्व घडामोडींना महा कारण आहे, जे भगवंत ठरवतो. 

 

सुरू, शेवट, मध्य, साखळी, त्याचे स्वरूप, स्थळ, काळ ह्यावर टीका ठेवू नये किंव्हा दोष देऊ नये. 

 

मी, भाव,स्थळ, काळ, क्रिया माझ्या हाथी नसते...माझा हक्क त्यावर नसतो. म्हणून कर्तव्य करावे आणि शांत रहावे.

 

हरि ओम.

 

 

श्री 

 

अस्तित्व अनुभव असतो ज्यात परिणाम होतात, संबंध येतात, जाणीव असते, कार्य असते. अस्तित्वात दोन पद्धतीने राहता येते - प्रपंच किंव्हा भगवंत. दोन्ही मनोरचनेमुळे स्थित करता येते. त्यासाठी प्रपंचाचा स्वभाव ओळखता आला हवा, मग त्यातून योग्य निश्चय, योग्य प्रयत्न, योग्य श्रद्धा असा मार्ग पत्करणे आले. आणि त्यातून शेवटी शांती भाव स्थित होते. थोडक्यात अस्तित्व ही खरी संकल्पना आहे सध्या... न देह, न भावना, न विचार, न वासना, न साखळी. खटपट जी असते, ती ह्या भावनेसाठी असावी, म्हणजे भगवंत भाव आत्मसात करण्यासाठी. 

 

प्रपंचाशी _संबंध_ वासनेतून जोडला जातो किंवा स्थित होतो, जे आपण घेऊन आलो असतो बरोबरीने. वासनेला शांत कसे करावे हे ओळखावे. हा बौद्धिक प्रश्र्नाशी फक्त सवाल मर्यादित नाही आहे. हा प्रश्न सर्वांगीण स्थितीशी निगडीत आहे, म्हणून बौद्धिक भाषेच्या/ संबंधाच्या/ क्रियेच्या/ परिणामांच्या व्यतिरिक्त, इतर सारे साखळीच्या घटकांमधून हे जाणून घ्यावे लागते. जाणून घेणे, हा अट्टाहासाचा विषय नसून, ती सहज साध्य क्रिया होणे गरजेचे असते. त्यासाठी चिंतन करत राहावे.

 

विषय शेवट पर्यंत नेणे, बुद्धी भेद ह्यात गुंतणे, सिद्ध होण्यात उगाचच खटपटीत जुटून राहणे, अपेक्षा धरणे, वासनेला पकडून राहणे, खूप चिकित्सा करणे - हे सर्व शांत होऊ द्यावे. 

 

परिस्थिती स्वीकारावी पूर्णपणे. मी चा अर्थ, क्रिया, व्यवहार, संबंध, नाती, वृत्ती, परिणाम - हे संपूर्ण शांतीने स्वीकारावे. सर्व युद्ध आपले नसतात. काय येते आणि काय जाते ह्याचा हिशोब मांडू नये. कसे रूप होते परिस्थितीचे, ह्या बद्दलही चिंता करू नये. हालचाली अशा का असतात, ह्याने व्याकुळ होऊ नये. 

 

मी तात्पुरता आणि अर्धवट आहे. मान्य करावे. त्याने काही ठरत नसते. पूर्ण होण्याचीही बौद्धिक धडपड करण्यात गरज नसते, तो मार्ग सोयीचा ठरतो असे नाही. प्रवाह स्वीकारावे. आतून स्पंदनांचा वावर कसा प्रकट होतो, हे शांतीने बघावे.

 

सर्व गोष्टी पूर्ण असतील, वाटतील, पटवता येतील अशी अपेक्षा सोडून द्यावी. लोकांनी आपल्याला सहकार्य करावे, ही अपेक्षाही सोडून द्यावी. आपली शांती कशावरही निर्भर करू नये. शांती म्हणजे सत्य भावना, जी प्रपंचाच्या कुठल्याही घटकावर _ठरत_ (logical) नाही.  दुसऱ्या अर्थाने, सर्व गूढ आहे. मी काय ऐकतो, काय बोलतो, काय सांगतो हा निव्वळ आनंदाचा भाग असावा.

 

हरि ओम.

 

 

Shree 

 

There is no need to seriously question one's worth that is inherited from Existence. That inheritance makes one experience or encounter or create many things in one's journey. All of this can be accepted as God's Will. One can call God as a Being or as an Action or as a Medium or as a Phenomenal Presence or within a Self. 

 

I am not sure why, where, how I am made and this creates its own inner dynamics. The real learning is to understand the connection of this uncertainty with dynamics and letting the Divine Will get established. Acceptance of this situation is a fundamental requirement to become steady amidst the experiences one feels. Acceptance isn't a decision...maybe it is a process of transformation. 

 

Does this inheritance have an advantage? I don't think it is necessary to come to a logical answer or an answer that expresses efficiency. If it is inheritance, why not just purely accept it and discharge a pure action? 

 

Hari Om.

 

 

श्री 

 

भगवंताचे चिंतन कुठल्याही परिस्थितीत करू शकतो आपण. चिंतनासाठी योग्य वेळ, स्थळ हवे, अशी कल्पना असू नये. कधीही चिंतन केले, की ते योग्यच ठरते. 

 

 _विघटित_ अस्तित्वाचे _स्वरूप_ आपल्यात पदार्पण झाल्यामुळे आपण असतो, अनुभव होतात, प्रवाह आणि बदल जाणवत राहतात, साखळी असते, संबंध प्रस्थापित होतात, व्यवहार होतो वगैरे. मग त्यात विचार आणि भावना आणि देह अशी संकल्पना _निर्माण_ होते. त्यात मग गुंतून राहणे, मर्यादा जाणवणे, त्याला धरून राहणे आणि त्याचे परिणाम भोगणे अशा गोष्टी होतात. 

 

मग काय आठवते आणि काय नाही, ह्याची चिंता लागते. म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्यामुळे जी वृत्ती होते, त्यातून आपण स्मरणेची व्याख्या करतो आणि अपेक्षा ठेवतो. _स्मरण स्थित असणे, ही आपली मालमत्ता नाही, हे मान्य करावे._

 

स्मरणेचे रूप भगवंताच्या कार्यातून प्रस्थापित होते. *कार्य*. हेच सत्य आहे.

 

हरि ओम.

 

 

Shree 

 

We have a purpose, "we" and "purpose" and realization from this understanding. Therefore it is going to be felt as a journey. No need to worry of existential role and the intensity of fragments and idea of perfection. Things of the mind crave for some answers to a begining, a middle and an inference. The search persists. The form of search takes many ways, tendencies, patterns, actions, engagements, connections and so on. 

 

I don't think that the answer is of resolving above situation as an intellectual idea. Which means that everything, all differences, all separations (and all effects because of this idea) have a rightful place in existence that only requires acceptance. 

 

The feelings of separation may be there, but that doesn't compel one to do anything as a compulsion. Place, time, movements are all incidental as a _flow of things_ but aren't things in themselves. What causes this flow?

 

Hari Om.

 

 

श्री 

 

आयुष्यभर चिंतन करणे भाग पडते कारण त्यात मन परिवर्तन होण्याचे प्रयत्न असते. परिवर्तन होण्यासाठी सर्वांगीण नाम आत जाणे, शुद्धी प्राप्त होणे गरजेचे आहे. ते नाम घेऊन, कर्तव्य करत, सैय्यम ठेवत, श्रद्धा वाढवत हाथी घ्यायला लागते. म्हणून परिवर्तनाचे स्वरूप गूढ असते, ज्यावर पूर्ण श्रद्धा लागते ठेवायला. 

 

ह्याचा अर्थ की रूपातून सिद्ध होणे, गुंतणे, शंका येणे, दृश्यांची बाधा होणे, परावलंबित सुख किंव्हा दुख होणे, तात्पुरते वाटणे, भोग येणे, हालचालींचा परिणाम करून घेणे, अस्थिर वाटणे, व्याकुळ वाटून घेणे, असे स्थित असणारच. तिथून सुरुवात करून, ही आसक्ती कमी होणे अभिप्रेत आहे. म्हणजेच सूक्ष्म आणि अंतर्मुख होत जाणे. 

 

हे कसे घडते, त्यासाठी भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवणे लागते, कारण त्याचे कार्य गूढ असते आणि ते योग्य पद्धतीने होतच असते. एखाद्या क्षणी आपण किंवा इतर मंडळी हालचालींमुळे खूप दुखावले जाऊ शकतो, पण त्याही परिस्थितीत नाम घेणे सोडू नये. गोष्टींचे वावर, हा भगवत इच्छेचा प्रांत आहे, म्हणून घडामोडी त्याच्या इच्छेने होत असतात, हे शांतीने स्वीकारणे. 

 

आपण नात्यांच्या केंद्रस्थानी किंव्हा एका मानसिक जाळ्यात गुंतले गेलो असतो. जाळ, हे संबंधांचे असते. पण प्रश्न असा आहे, की त्यातून व्याकुळ होणे का शांत होणे, हे मनावर निर्भर आहे. जाळ्यात वावरणे, हा काही दोष नाही की न्यूनतेचे लक्षण नाही की स्वतःची व्याख्या नाही की त्यातून सिद्ध होण्याचा अर्थ नाही. वस्तुस्थितीला तसे काही कारण नाही, की ते कोडे सारखे सोडवता येऊ शकू. हे एकदा ध्यानात घेतले की कर्तव्य भाव आचरणात यायला सुरू होतो.

 

हरि ओम.