Saturday, August 08, 2026

Shree

Shree 

Realization is a need or a pursuit, that gets evolved in some beings. That translates into thoughts, feelings, knowing, action, doing, creating, relating etc. That may mean some form of disciplined thinking or some intent of action to realize a truth or the idea of remembrance. 

The philosophical dimension of the above purpose translates, perhaps, into " _mandala_". Therefore this word denotes a plan, section, space, action, idea, experience. In short, it is a _diagram_. 

However, the question is regarded to be stated properly here for us, which is - should above _diagram_ be always followed for experience of realization or should realization become a reality through any idea of living? This is a personal quest. 

Some way give importance to the diagram as a sequence, others to intellect, others to feelings, others to work, others to still something else. In this, we have connections, relations, responses, memories and so on. 

Hari Om.

श्री

 श्री 


 *आपुलकी* अध्यात्माच्या दृष्टीने म्हणजे सतत घडामोडीत गुंतून राहण्याची गरज न राहणे आणि त्यामुळे शांती अनुभवत राहणे. 

दर रोजच्या व्यवहारात त्याचा अर्थ असा होऊ शकतो, की इतरांच्या वृत्तीमुळे किंव्हा संवादामुळे व्याकुळ होऊ नये किंव्हा चिकित्सेत गुंतून राहू नये. प्रतिक्रिया स्वतःची किंव्हा इतरांची काहीही होत असली, त्याचा विचार करण्यात काही मिळत नसते, हे ओळखणे. म्हणजे कुठल्याही रूपावर त्याच्या स्वभावामुले कष्टी होऊ नये. 

थोडक्यात दृश्यात होणारी आसक्ती कमी होऊ देणे. फारश्या विचारांच्या मागे जाऊ नये. विघटित क्रियेची काळजी करू नये. 

Logic is the working of the Divine Will. It might be referred to as Divine Vibrations. Therefore _acceptance_ is to understand this Divine Logic which operates and sustains us. 

हरि ओम.

Friday, August 07, 2026

श्री

श्री 

निसर्ग, पर्यावरण, अर्थ, संबंध, स्मरण, स्थळ, काळ, कार्य, हेतू, अस्तित्व - ह्या सर्व संकल्पना शांतीचे अर्थ अनुभवात आणू शकतात. तो नैसर्गिक जीवाचा प्रवास असतो, म्हणून त्या अर्थाने शोध होतो, मार्ग गवसतो आणि शेवटी स्थिर होते मन. 

आपण दृश्यात देवाच्या इच्छेने, त्याला हवे म्हणून इथे "होतो", आणि त्याच्याशी परत एकरस व्हावे, म्हणून परत _शोध_, ही गोष्ट, ध्यानात येते. 

देवाला भेटावे, पूर्ण व्हावे, शांत व्हावे, म्हणून सर्व खटपट आपण करतो. शोधेचे स्पष्टीकरण देण्याची खरी गरज नसते कुणालाही आणि कदाचित त्या गूढ अर्थाने सारे घडामोडी होत असावेत - आत आणि बाहेर. स्पष्टीकरण, ही गोष्ट, परावलंबित झाल्यामुळे होते. जिथे भाव वेगळा किंव्हा दुसरा नाही, तिथे स्पष्टीकरणेची गरज उरेल का? 

म्हणून स्पष्टीकरणेतही खूप इतर गोष्टी सूचित होतात. दृश्य काय, वावर काय, प्रतिक्रिया काय, स्मरण काय, अर्थ काय - काहीही दोष मानू नये. सर्व अनुभव पलीकडून आलेले असते, म्हणून ते चक्र स्वीकारावे शांतीने. वेग असा का होतो, असे रूप का असते वगैरे, स्वतःच्या समाधानासाठी प्रश्न विचारायला हरकत नाही, पण दृश्य बदलावे अशी अपेक्षा ठेवू नये.

हरि ओम.

श्री

 श्री 


शोध म्हणजे एका अर्थी श्रद्धा वाढवणे सगळ्या हालचालीत आणि प्रवाहात. प्रवास कुठे नेईल, आणि प्रवाह कसा असेल, ह्यावर आसक्ती न धरणे आणि शांतीने सर्वांना सामोरे जात राहणे. प्रवाह किंव्हा अनुभवामुळे प्रवास जाणवतो - स्थळ, काळ, क्रिया, संबंधांचा. ह्याचा अर्थ की सर्व मनावर असते. तोच प्रवास सूक्ष्माचा होऊ शकतो आणि विशाल स्थितीचे दर्शन देऊ शकतो. तसे झाले तर समजावे की देवाची कृपा जीवावर/ आपल्यावर झाली. 

ह्याचा अर्थ की शोध सर्वांगीण होत असतो किंव्हा शोध हा विधिलिखित जीवाच्या शक्तीचा गुण धर्म म्हणावा. तो गूढ असतो आणि पलीकडे नेण्याचा मार्गही दाखवू शकतो. त्यावर श्रद्धा ठेवून स्थिरतेच्या प्रवासाला तो पदार्पण करून देतो. 

हरि ओम.

श्री

श्री 

अस्तित्व हे सत्य आहे स्वतःसाठी. त्यात खूप सारे स्तर, हालचाली, शक्ती प्रभाव घालत मन होते, अहं भाव होतो आणि अनुभवाचे चक्र सुरू राहते. हे होणार. त्यातून स्थळ आणि काळ आणि बदल किंव्हा कार्य दिसून येते. Phenomenon.

म्हणजे अस्तित्वाला रूप, आकार आणि सूक्ष्म असे अंग असते. सूक्ष्म अंग स्वतः सिद्ध आणि स्वतंत्र आणि खूप शांत असते, इतर सर्व स्थितीत बदल होत राहतो आणि तात्पुरतेपण असते. 

दररोज ध्यानात वरील कार्य संपादन होत राहते, ते कुणीही अडवू शकत नाही, कारण तीच भगवत इच्छा असते. ह्याचा जो परिणाम होतो मनावर, वरील सत्य आत्मसात न झाल्यामुळे, त्याने _भीती ही भावना_ तैय्यार केली जाते आणि तीच खरी मानली जाते, त्यात आसक्ती निर्माण होते आणि खूप गुंतायला होते, खूप सिद्ध होण्याचा आटापिटा केला जातो. 

गोष्टी होणे, असणे, गतिमान राहणे, हा अस्तित्वात असण्याचा भाग आहे आणि तो पूर्णपणे स्वीकारावा लागतो. हा अभ्यास आहे मनाचा. 

 म्हणून अशा अस्तित्वाच्या परिस्थितीत राहताना, जीवाला भगवंताच्या कार्याचा आधार लागतो आणि जाणीव तशी व्हायला लागते.

त्यासाठी प्रत्येक क्षणाला नामस्मरण करत राहायला लागते. 

हरि ओम.

Monday, August 03, 2026

श्री

श्री 

स्वस्थता महत्वाची असते. त्यात काहीही झाले, कुठलीही किंव्हा कधीही हालचाल झाली, काहीही ध्यानात येऊ घातले, तरीही खूप शांत भाव प्रस्थापित व्हायला हवा. त्याला स्थिरता म्हणतात. स्थिरतेत चिंतन आले, विचार आले, भावना आल्या, देह आला, परिस्थिती असावी...सगळ्यांची सांगण घालून *एकमेव शांती भावच* राहायला हवे ध्यानात. 

शुद्ध अस्तित्व शांती भाव आहे. हा प्रश्न सत्य ओळखण्याचा आहे आणि बहिर्मुख ते अंतर्मुख होण्याचा. ह्याने काही मिळते का? व्यवहारात कदाचित सर्व कल्पना बाजूला सारायला लागू शकतात आणि समाधान त्यातून प्रकट होत असावे. अनुभव आणि प्रवास ज्याचा त्याचा असतो. कुणाचा अनुभव जास्ती महत्वाचा आहे, ह्यात पटवण्यात शक्ती खूप लागते आणि तशी खर्च होऊ द्यावी की नाही, हा निर्णय ज्याने त्याने घ्यावा. दुसऱ्यांना खुश ठेवण्याची किंव्हा स्वस्थता देण्याची जबाबदारी आपली नसते. 

फक्त, आपली जबाबदारी अस्तित्वाला _स्वतःचे सर्वांगीण देण्याची_ नक्की असते....म्हणजे रूपातून संपूर्ण पलीकडे होण्याची. त्याचे पर्यवसान असे होते की आपुलकी, श्रद्धा, शांती, प्रयत्न, सैय्यम - हे *भाव* मनात प्रकट होतात. 

इतर जणांशी अत्यंत आपुलकीने (त्यांचे सारे काही शांतीने ऐकून घेऊन) आणि आपण स्वतः श्रद्धेने देवापाशी प्रार्थना करून आयुष्य अनुभवावे. 

शांतीने ऐकून घेण्यात खूप आपुलकी निर्माण होऊ शकते आणि आपण हेवेदावे, अहं, तोडगा, विषय, कोडी - ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊ शकतो. तशी सवय लावून घ्यावी. प्रवास काटेरी आहे. पण त्यातून जे गवसेल ते बुद्धीच्याही पलीकडे मौल्यवान निश्चित ठरेल.

हरि ओम.

श्री

 श्री 


ध्येय असण्याचे जाणवणे, म्हणजे कालांतराने जाणीव शुद्ध होणे, शांती संक्रांत होणे, सूक्ष्म होणे, परिवर्तित होणे, सत्य आत्मसात होणे, स्वतः सिद्ध होणे आणि प्रवासात शांतीने राहणे. 

आयुष्यात कार्य करणे आणि आपल्याकडून कार्य घडवणे, हे असतेच असते. त्यात अस्तित्वाचे प्रश्न ध्यानी येतात आणि त्यावरून शोध प्रकट होतो. अनुभव त्या निमित्ताने आपण बघू शकतो, की त्यावरून सत्या पर्यंत कसे पोहोचू शकू? 

सर्व विषया प्रमाणे, अध्यात्म मध्येही खूप चर्चा असते, खूप कंगोरे असतात, खूप स्तर असतात, खूप संबंधांचे अर्थ असतात. तो भाव आणण्यासाठी वाचन, वावर आणि नामस्मरण - हे तिन्ही गोष्टी करणे हिताचे ठरते.  प्रश्न तिन्ही गोष्टीत येतात आणि ते येऊ द्यावे. त्यातून जी काही काल्पनिक मर्यादा केली गेली असते, ती विरघळू शकते आणि सर्व गोष्टीत भगवंतच सत्य आहे, असा भाव स्थित होऊ शकतो.

हरि ओम.

Thursday, July 30, 2026

श्री

श्री 

प्रत्येकाचा प्रवास असतो _भीती_ ओळखण्याचा संपूर्णपणे आणि शांती आत्मसात होऊ देण्याचा. 

हा प्रवास गूढ असतो आणि तो कसा, कुठे, कधी, काय दर्शन देईल, हे भगवंत ठरवतो. माझ्या हातात काहीही नसते आणि आपल्याला फक्त भीती स्वीकार करावी लागते, शांत राहता. 

काहीही विषय म्हणून बघू नये आणि बुद्धीने उगाचच गुंता सोडवण्याचा आटापिटा करू नये.  सुटण्याचे रसायन गूढ असते, फक्त बौद्धिक नाही. म्हणून भगवंताच्या शक्तीचे सतत स्मरण ठेवायला लागते. 

दृश्य हा गुंता नाही की दोष नाही की न्यूनपणा नाही की व्याकुळता नाही की कष्ट नाही. तो बस असतो अस्तित्वाचा एक भाग. त्यालाही संपूर्णपणे आत्मसात होऊ द्यावे लागते. प्रत्येक गोष्ट बदलणारी असते, तात्पुरती राहते, परावलंबी असते. काहीही हरकत असू नये, कारण कार्य भगवंताचे असते.

हरि ओम.

श्री

श्री 

आपण काहीही म्हणा, संबंध अनेक प्रकाराचे निर्माण होतात, प्रभाव घालतात, बदलत राहतात,  वगैरे. संबंध खूप सूक्ष्म स्तरापासून ते स्थूल स्तराचे असतात आणि त्यातून अनेक वेग वेगळे रूप आणि आकार ध्यानात येत राहतात - प्रवाह. त्या प्रवाहाचा परिणाम, चक्र, गूढ भाव, स्मरण होत असते आणि त्या होण्याला आपण *जबाबदार नाही*. 

"मी" हा भाव निमित्त म्हणून होतो आणि प्रवासात असतो, प्रवाह जाणवतो आणि तात्पुरता असतो.  त्याने व्याकुळ होण्याची गरज नसते आणि सतत भगवंताच्या चिंतनात राहायला लागते. 

भगवंताचे नाम, शुद्ध कार्य, हे गूढ परिणाम प्रस्थापित करतात, म्हणून ते सतत स्वतःच्या संपर्कात असायला हवे. 

संपर्क, परिणाम, खूप स्तरात पसरला असतो आणि सर्व काही शब्दात मांडता येत नाही आणि सांगण्याचीही _गरज_ नसते आणि त्यातून आपण काहीही ठरत नसतो. 

एखाद्या संतांच्या "सहवासात" सर्व मन शुद्ध होते, विचारांच्याही पलीकडे. त्याला वेगळे असे काही वैचारिक प्रयत्न मुद्दामून करण्याची सतत जरूरी असते, असे नाही. तसेच नामाच्या सहवासात योग्य परिवर्तन होते.

श्रद्धा कशी आणि कधी प्रस्थापित होत राहील, हे सांगणे अवघड आणि त्यावरही श्रद्धाच असायला लागते! म्हणून श्रद्धेने दृश्यात वावर करावे मनाने. सर्व योग्य होते.

हरि ओम.



श्री 

आजकाल असे ही वाटू लागले आहे, की हालचालींचे रूप आणि स्थान, ह्या _विशेष_ गोष्टी नसतात कधीही....त्यांना आपण मोल देऊन चालना देत राहतो. हा एक प्रकाराचा गुंता असतो, जो बुद्धीने सुटणे कठीण. 

म्हणून भगवंताचे सतत चिंतन करावे लागते, म्हणजे मनाला सूक्ष्मता येते, स्मरण तसे होते आणि शांत व्हायला होते. आयुष्याची आसक्ती कुठून येते, ह्यात व्याकुळ होऊन हिताचे नाही. सर्व द्यावे लागते आणि रिकामे व्हायला लागते. 

हरि ओम.

श्री

 श्री 


अस्तित्वाचे कारण स्वतःचे रूप - बुद्धी, भावना, देह शोधण्याचा प्रयत्न करत राहते त्याच्या त्याच्या भाषेतून. इथे लक्षात ठेवायला हवे की फक्त रूपाच्या भाषेला मर्यादा असू शकतात, म्हणून फक्त वरील मार्गातून पूर्ण समाधान आत्मसात होणे कठीण जाऊ शकते. 

म्हणून आपल्या शक्तीच्या पलीकडे हालचाली, कार्य करण्याची क्षमता नामात असते, म्हणून नाम घेत रहावे आणि त्यात आपण समरस होऊन जावे.  

आपले रूप सूक्ष्म माध्यमाच्या असण्यामुळे "निर्माण" झालेले असते आणि त्या प्रक्रियेत स्मरण, भाव, चक्र, परिणाम तैय्यार होते आणि त्याचीही एक विशिष्ठ क्रिया सुरू राहते. त्यात आलेले प्रश्न, त्याचा शोध, वगैरे ओघाने येते. त्यात गुंतायला होते, आसक्ती येते, व्याकुळ वाटते, तात्पुरतेपण येते (किंव्हा वाटते)...ह्या साऱ्या भावनांना आपण ध्यानात आणतो, आणि त्याचा परिणाम त्या बरोबरीने भोगतो. 

हे चक्र एकदा स्पष्टपणे ध्यानात ओळखले, की मग ह्यातून शांत असण्याचा मार्ग पत्करला जातो. तिथे नामस्मरणाला श्रद्धेने आत्मसात करायला सुरू होते. आणि तसा अभ्यास शांतीकडे नेते.

हरि ओम.


श्री 

 *मार्ग* - ह्याचा अर्थ की प्रश्नाच्या बरोबरीने श्रद्धेच्या भावनाला आपण प्रकट करत आहोत आणि त्यात परिवर्तित स्वतःला करत आहोत. प्रश्न सर्व स्तरातील असतात, ते स्थूल ते सूक्ष्म स्थिती पर्यंत पोहोचत राहतात, ते सर्वांगीण असतात, बदलणारे असतात, परावलंबित असतात, स्वतःच्या रूपातून आलेले असतात, वगैरे. प्रश्न असणे, हे जीवाचे लक्षण आहे, म्हणून ते येऊ घालणार. त्यांना स्वीकारावे. 

स्वीकार होणे - म्हणजे प्रश्न बघणे,  त्याचा अभ्यास करणे, कुतुहलाने शोध घेणे, मर्यादा ओळखणे, श्रद्धा वाढवत राहणे, हे सर्व त्या बरोबरीने आले. आपण सत्याशी एकरस होण्यासाठी जन्म घेतला असतो आणि त्या करिता "भीती" ही भावना दिलेली असते तिथ पर्यंत नेण्यासाठी. 

हरि ओम.

Sunday, July 26, 2026

श्री

 श्री 


जाणीव नेणीव भगवंती नाही I 
उच्चारणी पाही मोक्ष सदा II 

भगवंत भाव प्रवाह द्वारे जाणून घ्यावे लागते - active engagement. माहीत असणे आणि कार्य करत राहणे, ह्यातून येणारे विचार वेगळे असतात आणि दोघांचीही जरुरी असते. 

नाम घेत रहाताना खूप प्रश्न, संबंधांचे स्वरूप, स्तर, परिस्थितीची चाहूल, हालचाली, मर्यादा अश्या सर्व गोष्टींची शहानिशा होते. ती होणे गरजेची आहे. त्या चिंतनातून आणखीन गूढ अर्थ नामाचा कळत जातो आणि त्यावर अधिकाधिक श्रद्धा बसत जाते. 

प्रश्नांचे स्वरूप बदलते, ते थांबते की नाही, हे माहित नाही. तसेच प्रवाहाचा अर्थ बदलत जातो, प्रवाह थांबत नसावा. तो अर्थ स्थिर झाला, तर प्रवाह वेगळा जाणवेल. 

म्हणून नाम सतत घेण्यावर भर दिलेला आहे.

हरि ओम.

Saturday, July 25, 2026

श्री

 

श्री 

 प्रत्येक जीवाला सर्व स्तराच्या कार्यामुळे एक गूढ "प्रश्न" प्रस्थापित होतो ज्यात गुंतायला जाते. 

 माझ्यासाठी कदाचित हा प्रश्न असावा की क्रिया *का* करावी आणि त्यातून *सिद्ध* होण्याची गरज का निर्माण व्हावी?!! 

 हा प्रश्न इतरांना पटवणे अवघड आणि त्यात स्वतःलाच जळत राहायला लागतं आणि शेवटी मौल्यवान गोष्ट गवसते (असे संतांचे सुचवणे आहे). प्रश्नाचे उत्तर बाहेर नसून, संबंध प्रस्थापित होण्यात आहे आणि त्या संबंधांची रचना बदलण्यात दडलेले असावे. 

 प्रश्न बुद्धीने सुटतो का, रूपाने सुटतो का?....बहुतेक ज्या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो, तसा तो सुटणे कठीण किंव्हा तिथे त्याचे उत्तर नसते. कितीही बुद्धीने चिकित्सा किंव्हा विघटन केले किंव्हा नवीन गोष्टी निर्माण केले, तरी त्यात ते गुंतून राहते, प्रवाह काही थांबत नाही आणि तात्पुरतेपण अनुभवास येते. हा प्रकार खूप गूढ आहे की त्यात वासना, बुद्धी, स्वभाव, दृश्य, संबंध, वस्तू, निर्मिती, हेतू - सर्वच्या सर्व मिसळले असतात. 

 हे पचनी व्हायला योग्य वेळ _द्यायला_ लागतो आणि त्यातून शांतीचा उलगडा होण्यास सुरुवात होते. 

 आपण भगवंताचे कार्य प्रस्थापित होण्यासाठी आलो आहोत. _हा भाव गूढ असतो_. 

 हरि ओम.

 

 

श्री 

 भगवंताचे अस्तित्व, म्हणजे कार्य, जाणून घेण्यासाठी आपल्या रूपातून, आकारातून, परिस्थितीतून, प्रवाहातून, संबंधातून, प्रवासातून त्याला आत्मसात करायला लागते आणि शांती भाव प्रस्थापित करायला लागते. आलेले अनुभव सत्य नसतात, तरीही त्यातून मार्गाची दिशा ध्यानी यायला लागते. 

 म्हणजे बघा काय होत आहे ते! जे सत्य नाही, त्या इतर कुठल्याही गोष्टीला मुल्य देऊन ती खरी आहे असे समजून घेणे आणि त्यात गुंतून राहणे, हा अनुभव पदरी येतो! त्यात मग प्रश्न निर्माण होतो की सत्य काय आहे?! आणि मग त्याचा शोध घेत, शांतीला आत्मसात केले जाते. 

 ज्या गोष्टीत गुंतायला होते, ते कुठून, का, कसे ध्यानात येते - हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते ओळखण्यासाठी मार्ग सुचविले आहेत संतांनी. आणि त्या मार्गावरून गेलो की निश्चित सत्य गवसु शकतं. 

 हरि ओम.

 

 

श्री 

 धावण्यात काही अर्थ नसतो, जर ध्येय निश्चित आत्मसात झाले नसेल तर. आपल्या आत शांती भाव आहे, त्यासाठी कुठे जाण्यासाठी गरज नसते किंव्हा वेगळे असे काही करण्याची गरज नसते....म्हणजे स्वार्थी किंव्हा मर्यादित वृत्ती ठेवून केलेले कार्य तसेच भोग देतात आणि गुंतवून ठेवतात. 

 ह्याचे आकलन व्हायला काळ जाऊ शकतो. आणि तो ओघाने द्यावाही. हालचालींचा अर्थ आणि संबंध आणि निर्मिती - ह्या गोष्टी मनाशी निगडित असतात. म्हणून ते जाणून घेण्यासाठी मार्ग पत्करावा लागतो. इथे जाणून घेणे, म्हणजे कोडी सोडवणे असा होत नाही. जाणून घेणे म्हणजे स्वतःच्या अर्थाला सत्यात विलीन करण्याची परवानगी देणे. 

 हरि ओम.

 

Thursday, July 23, 2026

श्री

 

श्री 

 कशालाही स्पष्टीकरण देण्याची गरज भासू नयेस्वतःलाही नाही. स्पष्टीकरणात एकरस होऊ नये. सत्य भगवंत आहेहे जाणून कार्य करत राहावे अस्तित्वात. 

 कार्य तो करतो आणि त्यातून आपण स्वतःची व्याख्या तैय्यार करतो. म्हणून त्याचे नाम सोडून इतर काहीच स्वतः सिद्ध नसते...इतर सर्व परावलंबित प्रकरण आहे. परावलंबनाचा स्वभाव असतोपरिणाम होतोविचार आणि भावना येत राहतात आणि त्यातून आणखीन विघटिततात्पुरते वाटत राहते. 

 म्हणून वरील सर्व शांत होऊ देणे अभिप्रेत आहेनिदान त्याची नितांत गरज जीवाला ओळखता येते. त्या मार्गावर लागावे.

 हरि ओम.

 

 श्री 

 आयुष्यात विघटन ध्यानात येत राहणार आहे आणि त्यातून होत राहणारा _गूढ परिणाम_. विघटित क्रिया थांबवणे कठीण. ती सामोरे येणेते ध्यानात येणेत्यात निश्चय करणेत्यात शांती भाव आत्मसात होणे सर्व काही वाट्याला येत राहणार आहे. 

 निश्चित हे जाणून घेताना भीती अनुभवात येईल/ निर्माण होईल. एखादी गोष्ट _निर्माण का होतेआणि त्यात कुठल्या प्रकारे आपल्याला गुंतायला होतेहे खरच गूढ असते. निर्मितीच्या रूपाला अंत नाहीम्हणून सुरुवात संकल्पना ही नाही....म्हणून दोन्ही बिंदू ध्यानात न आल्यामुळे ह्या स्थितीला "स्वीकारणे" अभिप्रेत होते. स्वीकार बुद्धीने होत नाहीती चिंतनाने श्रद्धा भाव वाढवत राहिल्यामुळे होते.

 हरि ओम.

  

Shree 

 Interestingly memory operates through connections, relations, flows, patterns, objects. When one says "meaning", it could mean all above things that _create_ a meaning. 

 Critically, the experience of memory could form a source of inquiry and through that source, all things that get preferred to be acted upon. 

 The memory, therefore, seems fluid, evolving, transforming and finally becoming only pure living beyond any limited intent. 

 The problem perhaps is about identifying memory to lead to a _conclusion_ that can be evaluated, traced, justified, produced, made effecient and so on. It still suggests a more deeper question of who we are and why we are here.

 Hari Om.

   

श्री 

 गजल किंव्हा तत्सम कलाकृती खूप आतील भावनांशी सतत संपर्कात असतात. ह्या कलाकृतीचा हेतू "काहीतरी सोडवणे" असा मुळीच नसतोपण फक्त स्वतःला पूर्णपणे त्या भावनांच्या सागरात बुडून ठेवावे. त्या भावना किती अथांगविशालगूढ आहे - कदाचित त्यातून जाणवत असावे. 

 म्हणून कुठल्याही भावना वाईट नाहीकी ते निघायला हवे की पुसून टाकायला हवे की त्यातून निश्चित त्वरित निर्णय असायला हवावगैरे. हे गहन भावना स्वीकारा स्वतः मध्ये आणि हे ही स्वीकारा की ते फक्त असतात आणि त्यांचा "निर्णय" असा काहीही नसतो. 

 म्हणून त्यातून संगीतलिखाणकादंबरी आणि वास्तुशास्त्र हे ही घडू शकतं.

 हरि ओम.