श्री
श्री
कशालाही स्पष्टीकरण देण्याची गरज भासू नये, स्वतःलाही नाही. स्पष्टीकरणात एकरस होऊ नये. सत्य भगवंत आहे, हे जाणून कार्य करत राहावे अस्तित्वात.
कार्य तो करतो आणि त्यातून आपण स्वतःची व्याख्या तैय्यार करतो. म्हणून त्याचे नाम सोडून इतर काहीच स्वतः सिद्ध नसते...इतर सर्व परावलंबित प्रकरण आहे. परावलंबनाचा स्वभाव असतो, परिणाम होतो, विचार आणि भावना येत राहतात आणि त्यातून आणखीन विघटित, तात्पुरते वाटत राहते.
म्हणून वरील सर्व शांत होऊ देणे अभिप्रेत आहे, निदान त्याची नितांत गरज जीवाला ओळखता येते. त्या मार्गावर लागावे.
हरि ओम.
श्री
आयुष्यात विघटन ध्यानात येत राहणार आहे आणि त्यातून होत राहणारा _गूढ परिणाम_. विघटित क्रिया थांबवणे कठीण. ती सामोरे येणे, ते ध्यानात येणे, त्यात निश्चय करणे, त्यात शांती भाव आत्मसात होणे सर्व काही वाट्याला येत राहणार आहे.
निश्चित हे जाणून घेताना भीती अनुभवात येईल/ निर्माण होईल. एखादी गोष्ट _निर्माण का होते_ आणि त्यात कुठल्या प्रकारे आपल्याला गुंतायला होते, हे खरच गूढ असते. निर्मितीच्या रूपाला अंत नाही, म्हणून सुरुवात संकल्पना ही नाही....म्हणून दोन्ही बिंदू ध्यानात न आल्यामुळे ह्या स्थितीला "स्वीकारणे" अभिप्रेत होते. स्वीकार बुद्धीने होत नाही, ती चिंतनाने श्रद्धा भाव वाढवत राहिल्यामुळे होते.
हरि ओम.
Shree
Interestingly memory operates through connections, relations, flows, patterns, objects. When one says "meaning", it could mean all above things that _create_ a meaning.
Critically, the experience of memory could form a source of inquiry and through that source, all things that get preferred to be acted upon.
The memory, therefore, seems fluid, evolving, transforming and finally becoming only pure living beyond any limited intent.
The problem perhaps is about identifying memory to lead to a _conclusion_ that can be evaluated, traced, justified, produced, made effecient and so on. It still suggests a more deeper question of who we are and why we are here.
Hari Om.
श्री
गजल किंव्हा तत्सम कलाकृती खूप आतील भावनांशी सतत संपर्कात असतात. ह्या कलाकृतीचा हेतू "काहीतरी सोडवणे" असा मुळीच नसतो, पण फक्त स्वतःला पूर्णपणे त्या भावनांच्या सागरात बुडून ठेवावे. त्या भावना किती अथांग, विशाल, गूढ आहे - कदाचित त्यातून जाणवत असावे.
म्हणून कुठल्याही भावना वाईट नाही, की ते निघायला हवे की पुसून टाकायला हवे की त्यातून निश्चित त्वरित निर्णय असायला हवा, वगैरे. हे गहन भावना स्वीकारा स्वतः मध्ये आणि हे ही स्वीकारा की ते फक्त असतात आणि त्यांचा "निर्णय" असा काहीही नसतो.
म्हणून त्यातून संगीत, लिखाण, कादंबरी आणि वास्तुशास्त्र हे ही घडू शकतं.
हरि ओम.
