श्री
श्री
कर्म कसे होते आणि का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसे पहिले तर अख्या अस्तित्वाला आपण कार्य करत राहणे, असे ही म्हणू शकतो. म्हणजे अस्तित्वात आत्मा आणि रूप/ दृश्य हे दोन्ही स्थिती असतात, फक्त दृश्यांची संकल्पना किंव्हा होणे हे सर्वस्वी आत्म्यावर अवलंबून ठरते. म्हणजे मूळ तत्व जे आहे, ते आहे आत्मा असण्याच. त्या तत्वाला कशाचीही आडकाठी लागत नाही, कारण सगळ्याच गोष्टी त्या तत्वातूनच _नंतर_ प्रकट होत राहतात. म्हणून गोष्ट किंव्हा रूप हे तात्पुरते आणि बदलणारे आहे. त्याच्याशी संपर्क साधला की मन ही अस्थिर होते. जे इंद्रियांच्या द्वारे दिसून येते, भासते, परिणाम पाडते ते असते दृश्य, जे सतत आपल्याला गुंतून ठेवते. आपण ह्या क्रियेतील काहीही "नाही" आहोत, हा सर्व प्रकृतीचा किंव्हा शक्तीचा खेळ आहे.
ते _जाणण्यासाठी_ नामस्मरण करायला लागते. जाणणे हे मूळ अस्तित्व शक्ती आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home