श्री
श्री
अस्तित्व - दृश्यात वावरताना एकमेकांशी, आकारांशी, वृत्तींशी, घटकांशी, रुपाशी, स्थळाशी, काळाशी _संबंध निर्माण होत राहतात._
बघा, म्हणजे _संबंध_ हे क्रियांचे परिणाम, ज्याच्यामुळे कितीतरी पदार्थ तैय्यार होत राहतात (स्थळ आणि काळ धरून), म्हणून सर्व पदार्थ होण्याचे बीज स्वतःमध्ये असावे, असे जाणून घेणे.
त्या संबंधांचे परिणाम अनंत आहेत, प्रवाह कालीन आहेत, साखळीतील आहेत, बदलत राहणारे आहेत, भावात गुंतवणारे आहेत, विश्व रूप दाखवणारे आहेत, प्रश्न उद्भवणारे आहेत, भावना निर्माण करणारे आहेत, भीती देणारे आहेत, आनंद देणारे आहेत, कार्य घडवणारे आहेत, कष्ट देणारे आहेत, शांत बसवणारे आहेत, एकात एक होणारे आहेत, तात्पुरते ठेवणारे आहेत, वेगळे भासवणारे आहेत....
हे असणार आपल्या _अनुभवात_. त्या अनुभवाच्या मार्गातून स्थिर होणे, श्रद्धा वाढवणे, शांत होणे - हे आपले ध्येय किंव्हा शिकवणूक किंव्हा अभ्यास आहे.
जग बदलत राहत. उद्या बद्दल का चिंता असावी? परिस्थिती कशीही असो, कुणी काहीही म्हणो, गोष्टी कसेही असो, _माझ्यावर परिणाम का करून घ्यावा?_ सर्व भगवंताचे कार्य, लीला, भाव, शक्ती, इच्छा असते. त्या कार्याला शरण जावे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home