श्री
श्री
एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की आतील कार्याचे माध्यमाचे अस्तित्व, त्याचा परिणाम, स्थान, *स्वभाव*, गुण, हेतूचे _स्वीकार आपण दृश्यात_ *कसे समजून घ्यावे*?.... तो समजून घेण्याचा प्रकार आहे की स्वीकार करण्याचा की आत्मसात करण्याचा??...
मानवी जीवनात ह्या माध्यमाचे स्थान कसे स्वीकारावे? त्या माध्यमाचे अस्तित्व कसे *जाणून* घेणे?
मला वाटतं की जाणून घेण्याची क्रिया फक्त मनुष्य करू शकतो, म्हणून त्याच्यात परिवर्तन होऊन तो शुद्ध होऊ शकतो. हे तोच ठरवून करू शकतो.
शांत अस्तित्व सगळ्या रूपांच्या पलीकडे आहे. ते आत्मसात करण्यासाठी अंतर्मुख होणे आले आणि तो मार्ग पत्करण्यासाठी आपल्या मनात तो तीव्र प्रश्न निर्माण होणे गरजेचे आहे. आपण सगळ्या स्थितीत, क्रियेत, स्मरणात, साखळीत, स्तरात, भावनेत *परिवर्तन* आणु शकतो. परिवर्तन होण्यासाठी परिस्थितीची जरूरी असते, असे काहीही नाही, नाहीकी बुद्धीची की भावनांची. अर्थात त्याच भाषेतून पलीकडे होणे आले. म्हणजे *प्रपंच हा मार्ग* समजावा, जबाबदारी नाही, की स्पष्टीकरण नाही, की सिद्ध होणे नाही, की हेतू ठेवून व्यवहार करणे असे नाही, की मान्यतासाठी नाही.
प्रपंच हा एक प्रकारे time pass प्रकार असू शकतो. फुकट वेळ घालवण्याचे रसायन! बडबडीला, स्पष्टीकरणेला सीमा नाही, आणि त्यातच आपण आपले हित मानून घेतो, ह्याला अक्षरशः काय म्हणावे?!!
असो, आपण कर्तव्य करावे आणि शुद्ध माध्यमाचे चिंतन करत राहावे.
हरि ओम

0 Comments:
Post a Comment
<< Home