श्री
श्री
वरील लेखाचे काही आणखीन विचार...
कार्य आपल्यावर सतत होत असतं, आपल्या अगोदर, आपण असताना आणि नंतरही. कार्य सगळ्या स्तरात स्थित असतं, म्हणून त्याने अनुभव, स्मरण, संबंध आणि परिणामांचे स्थान स्थित राहणार. कार्य साखळी असते, म्हणून सर्व स्थिती कार्यकारण संबंधांच्या धाग्यात ओवाळता येतात. प्रत्येक स्थिती कार्याचा स्वभाव बदलतो आणि इतर कार्याच्या रूपावर आधारलेला असतो.
थोडक्यात मूळ कार्य भगवंताचे असते आणि त्यातून सर्व काही प्रज्वलित होते. सूर्याचे किरण हजारो ठिकाणी पसरून अनंत वस्तू त्याचे, त्याचे व्यवहार (हालचाली, मर्यादा, संबंध, स्मरण) करतात, त्या प्रमाणे काहीसे हे घडते.
म्हणून आपल्या जीवनाचा सूत्रधार भगवंत शक्ती आहे, हे ध्यानात कायम ठेवावे.
त्या शक्तीचा परिणाम जाणवणे, म्हणजे योग्य परिवर्तन स्वतः मध्ये घडणे, वृत्ती शिथिल होणे, राग न धरणे, हळुवारपणा येणे, आटापिटा न करणे, श्रद्धा वाढलेली दिसणे,अंतर्मुख होणे, प्रश्न गळून जाणे, विषयात न गुंतले, सर्व स्वीकार करणे, हेतू कशाचाही न शोधणे, आपुलकीचे नाते प्रज्वलित होणे, वगैरे.
आपण शांत मनाने घडामोडी, आतील आणि बाहेरील, नुसते बघा. त्यात कार्य होताना दिसते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home