Saturday, October 18, 2025

श्री

 श्री 


अनुभव होत राहणे आहे. ते का संक्रांत होतात, कसे होतात, कधी होतात, त्यांच्या पुढे आणि मागे काय असते, ते कुठे कुठे गुंतले असते, हे पूर्ण भगवंतावर सोपवावे. जसा भगवंत हा खरा आहे, त्याचा अनुभव कोरा असतो प्रत्येकाला, तसंच दृश्याशी संबंध आणि परिणाम प्रत्येकाशी कोरा असतो, म्हणून मार्गही *शांत होण्याचा कोरा** असला हवा, म्हणजे दुसऱ्यांना स्पष्टीकरण देण्याची _गरज_ तशी महत्त्वाची ठरू नये. उलट, ती गरज मावळला महत्वाचे आहे.  

आपण काय काम करतो, कसे करतो, काय संपादन करतो, कसे विघटन करतो, कसा काळ अनुभवतो, कसे हालचाली करतो, कसे कप्पे निर्माण होतात, कशी प्रक्रिया जाणवते इतरांची, एकटे का वाटते, त्यात इतरांचा हातभार असतो की नाही, तीच जागा मिळत असते का ती बदलत राहते, ते वस्तू आणि व्यक्ती असतात की बदलत राहतात, हे गूढ आहे....सरळ रेषे सारखे असते की नाही ह्याची चिंता करू नये. शांती अनुभवणे आहे, मग तो *मार्ग* कसाही प्रकट होऊ देवो.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home