Tuesday, June 09, 2026

श्री

श्री 

विचार कुठले येतील, कसे येतील, का येतील - ह्यावर आपला अधिकार नसतो. विचार एक प्रवाह दर्शवतो, त्यातून बऱ्याच काही संबंधित गोष्टी प्रस्थापित होऊ पाहतात, जर त्यांना धरून राहिलो तर किंव्हा तसे स्मरण होऊ दिले तर. म्हणजे विचार होण्याचे किंवा असण्याचे कार्य भगवंताला द्यावे, आपल्या मनाला नाही. आपले अस्तित्व म्हणजे "मन" नसते. 

म्हणून मनाने आणि मनातून जे काही निर्माण होत असले, तरी त्यात _गुंतण्याची गरज नसते_. हे अतिशय महत्वाचे निदान आहे, जे आत्मसात करून शांती भाव प्रस्थापित होऊ शकते. मनाची शक्ती सूक्ष्म, विशाल आणि शांत होऊ द्यावी. 

शांत राहिलो, तर मनात बरेच गूढ, सूक्ष्म विचार येत राहतात, ज्याचा अंदाजही केला गेला नसतो. ते नुसते बघावे आणि त्याला हेतू लावू नये (की कुठून आले, का आले, कसे आले, काय घडेल, वगैरे). त्यातून शांती भाव संक्रांत व्हायला लागते. 

त्यातून स्वतःला संपूर्ण स्वीकारणे घडते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home