श्री
श्री
कुणाला काहीही वाटू द्यावे, काहीही फरक पडत नाही. मी कुठून आलो, कसा आलो, काय वाटते, कधी वाटते, कसे वाटते, का वाटते - हे महत्वाचे प्रश्न असावे का इतरांना? आणि मी नाही त्याचा उलगडा केला, तर त्यातून प्रेमाचे महत्व काही गायब होणार आहे का काय?! मी मुका असलो, तर काय प्रेम करणार नाही का?! मी शांत बसलो, तर काय जग बुडी होणार आहे की काय?! मी इथे असलो किंव्हा तिथे, त्याने दृश्यात काय फरक होणार आहे की काय?! मी हे केलं किंव्हा ते केलं, वेळ असा घालवला किंव्हा तसा, त्याने काय त्रास होणार आहे की काय तुला?! मला गोष्टी अस्पष्ट वाटत असल्या तर ते स्पष्ट करण्याचा अट्टाहास मी बाळगू की काय?!
एवढ काय भूत मागे लावले आहे स्पष्टता द्यायला?!!
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home