Sunday, April 13, 2025

श्री

 श्री 


सत्य काय आहे, ही सांगण्याची, हेतू ठेवून वागण्याची गोष्ट नाही. किंबहुना ते कळायला हेतू हवाच असे नाही. हेतू नसले किंवा तिथं पर्यंत कसे पोहोचावे हे ठाऊक नसेल, तरी हरकत नाही. कारण सत्य होणे, हे आत्माचे विस्तारलेली क्रिया होणे, ही नैसर्गिक बाब होत असावी, त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. ती होत राहणार, कारण जसे दृश्य होणे हा दिव्य भाव आहे, तसे भगवंत होणे हे ही दैवी कृपेचे कार्य आहे. The search for truth will eventually be realized. 

म्हणून दृश्याचे दडपण जरी ओघाने आले, तरी त्याची चिंता करू नये....कारण ते दडपण कायमचे नसते, ते विरघळून जाणार असतेच.   बदलांचे रूप ओळखणे, हा जाणिवेचा अभ्यास आहे. शांती होण्याला वेग येऊ शकतो, जर डोळसपणे त्या मार्गावर लागलो तर.

दुःख येणार नाही, असे काहीही नाही. किंबहुना ते महत्त्वाचे असावेत, कारण त्याचे प्रयोजन जीवनात आहे म्हणून. महत्व ह्या दृष्टीने की कुठलीही गोष्ट कायम नसते, ती बदलते आणि ती प्रकट होते एका गूढ कार्यामुळे आणि नंतर परिवर्तनही पावते. 

ते ओळखण्यासाठी नामस्मरण शांतीने करत राहणे. ते ही भगवंत आपल्याकडून करून घेतो, असा भाव आणणे मनात.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home