Thursday, April 10, 2025

श्री

 श्री 


स्थिर होण्याचा मार्गात असे आढळून येईल की अदृश्य ते दृश्य अशी साखळी, घटक अस्तित्वात वावरत असतात, त्यातील काही दिसून येतात, कशी रुपात असतात, काही जाणवतात आणि काही आपल्या पलीकडे ही असाव्यात. प्रत्येक घटक मनोरचने प्रमाणे जाणून येते, म्हणून सूक्ष्म शक्ती अनुभवण्यास, तसे आपल्या मनाला बनायला लागते. 

मन ही शक्ती आहे, स्थिती आहे, साखळीचा परिणाम आहे, परावलंबित क्रिया आहे, भाव निर्मिती आहे, चक्र आहे, जाणीव आहे. त्यातून स्थिरतेची जाणीव होणे अभिप्रेत आहे. 

स्थळ आणि काळ वेगळे नसते किंव्हा बाहेरचे नसते. ते मनाच्या आतील स्पंदनातून _प्रकट_ होते. स्थळ आणि काळ दृश्याचाच भाग आहे, तर तो साखळीतून, क्रियेतून निर्माण होणार. 

कुठलीही परिस्थिती _संबंध_ दर्शवते, स्थळ आणि काळ दर्शवते. आपण ही स्थळ आणि काळ आहोत. _शांती भाव_ स्थळ आणि काळाची उत्तम आणि सूक्ष्म स्थिती समजावी. म्हणून बदल जो आहे, तो आतील मनोरचनेचा आहे, त्यातून "स्थळ आणि काळाशी" संबंध/ रूप/ अर्थ बदलेल. इथे भाव, संबंध, रूप, अनुभव, परिणाम आणि आकार *एकच* सूचित केलेलं आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home