Sunday, April 13, 2025

श्री

 श्री 


भगवंत सर्व प्रकाराचे, सर्व स्तरातले, सर्व रुपातले, सर्व आकाराने, सर्व चक्रातले कार्य करतो. हे एकमेकांवर साखळी प्रमाणे जोडून ठेवणे ही त्याची लीला आहे, म्हणून एकातून एक, परिवर्तन होऊ पाहणारे, संबंधित असलेले गोष्टी किंव्हा पदार्थ किंवा रूपे प्रकट होतात. 

सर्व प्रवाह जोडले गेलेले आहे, कुठेही खंडित स्थिती किंव्हा "नाही" (vacuum) असत नाही. सर्व त्याच्या कार्याने "भरले" गेलेले आहे. असा काळ नाही किंव्हा स्थळ नाही किंव्हा स्थिती नाही, जिथे त्याचे अस्तित्व लोप पावते. म्हणजे आपण नेहमी त्याच्या संपर्कात असतो, फक्त ती जाणीव कमी - जास्त फरकाने सर्व पदार्थात असते.

साहजिकच त्याचा अर्थ असा निघतो की आपल्या कार्याला खूप साऱ्या स्तरांमध्ये वावरणाऱ्या शक्तीचे समावेश होते. मग चौकट कशासाठी?! हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चौकट का केली जाते आणि ते केल्याने देखील सत्य पुढे जाणवेल हे ध्यानात ठेवावे. सत्य भगवंत प्रकट करतो. ते कधी येईल, कसे होईल, कुठल्या रूपात होईल हे शांतीने सैय्यम ठेवावे. 

शांत होणे म्हणजे स्थिरावलेली श्रद्धा. आपण जर एकच आहोत, तर एवढ विभक्त आणि विघटित विचार का करत राहतो?!

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home