श्री
श्री
कुठलीही भूमिका घेणे आणि त्याचे स्पष्टीकरण देणे अभिप्रेत नसावे कधीच. सर्व अस्तित्व
शक्तीमुळे होणारे घडामोडी असतात (in the phenomenal
world), त्याला ओळखण्यासाठीचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. तो मार्ग कसा,
कधी, केव्हा, कुठल्या रूपात
जाणवेल, ते सांगणे अवघड असते, म्हणून "तो
मार्ग कळेल" अशी श्रद्धा वाढवत राहायला लागते.
आपण मध्य भागात आहोत. आपल्याला अद्वैत आणि द्वैत,
ह्या दोन्ही गोष्टींची _जाणीव_
आहे आणि आपले अनुभव निर्गुण आणि सगुण ह्या दोघांच्या अस्तित्वामुळे निर्माण
होतात. निर्गुणातून सगुण प्रकट होते...किंव्हा निर्गुण सगुणात _अवतरते_
(it transforms), आणि त्या प्रक्रियेत स्मरण बदलत जाते. म्हणून आपण इथे कसे आलो,
हे ध्यानी स्पष्ट कळत नाही...त्याचे उत्तर रूपातून मांडणे अवघड. सांगण्याचे
तात्पर्य हे की रूप धारण केल्यामुळे आपण झालो आहोत.
अस्तित्व आपल्यासाठी दुहेरी परिणाम करणारे आहे. आतील आणि बाहेरील _कार्य_
(reality), ह्यात संबंध येतात. "मन", हे दोन्ही स्थिती
जोडणारे रसायन आहे. म्हणून सगळ्याचे ध्येय - विचार, भावना,
कृती, इंद्रिये - हे एकच असते आणि ते म्हणजे भगवंत शक्ती
जागी करणे किंव्हा ती आत्मसात करणे किंव्हा ती ओळखणे. त्याला दुसऱ्या भाषेत
"सर्वांगीण परिवर्तन" म्हणता येईल.
द्वैताची चिंता प्रज्वलित ठेवली तर तो गुंता कायम राहणार. अस्तित्व *स्वीकार*
होणे आहे. म्हणजे आपण कोण, आपण इथे कसे आलो, आपण कुठे जाणार -
ह्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे हवी.
प्रश्न आयुष्यात असणार, कारण ते विधिलिखितच आहे. प्रश्न नसलेला माणूस अजून
जन्मात यायचा आहे! तर प्रश्न टाळू नये आणि ते पुढेही ढकलू नये आणि त्यामुळे
उतावळेही होऊ नये. प्रश्नांमुळे अस्तित्वाचे चिंतन होत राहील आणि सत्य कळून येईल.
हरि ओम.
श्री
मी संपूर्ण दुसऱ्यांना कळायला हवा, अशी आपण अपेक्षा का
करत राहतो?!!..
हे द्वैत ह्या परिस्थितीत होणे,अतिशय अवघड आहे आणि
तशी अपेक्षाही ठेवणे हिताचे नाही. ह्याचाच अर्थ हा, की सर्व गोष्टींचे
सत्य एका भगवंताकडे असते, द्वैताच्या कुठल्याही रूपाच्या हातात अर्थातच नाही!
थोडक्यात इतरांची, द्वैताची, परिस्थितीची काळजी
नसावी. घडामोडी होत राहतील. आज ही परिस्थिती तर उद्या ती...असे होत राहणारच. अशा
सऱ्या गोष्टी आलटून पालटून होत राहणार.
आपण स्थिर रहावे. गोष्टी बदलत गेल्या, त्यातून आपले
कर्तृत्व आणि आपली भूमिका अवलंबून करू नये. त्यावर आपण (सत्य) ठरत नसतो.
भगवंताचे चिंतन करत राहावे.
हरि ओम.
श्री
अनुभवाचे स्थान काय असते? ज्याच्या त्याच्या
हेतूवर ह्याचे उत्तर ठरते.
माझ्या मते, अनुभव सिद्ध होण्यासाठी त्याचा वापर असू नये. त्यातून
सिद्ध होणे अवघड, किंबहुना सिद्ध होणे ही वृत्ती अस्थिर भावना जागृत
ठेवते, हे ध्यानात असू द्यावे. आपण पाहिजे ते सत्य मनात
संक्रांत करू शकतो आणि त्या प्रमाणे परिस्थितीचा अर्थ निर्माण करू शकतो आणि त्यात
वावरू शकतो, तसा भाव होऊ शकतो. अर्थात हे सर्व गूढ आहे,
सरळ रेषेचा प्रकार नाही की बुद्धी वापरली आणि तसे घडले! स्वार्थापायी बुद्धी
वापरली गेली तर त्याचा परिणाम भोगायला लागतोच, आणि तो कष्ट देतो,
दुःख देतो. विश्वात व्यवस्था शक्तीची असल्यामुळे आपण केलेल्या कर्माचे किंव्हा
निर्णयाचे फळे भोगायला लागतात.
म्हणून असा विचार करावा की सर्व काही स्थिती, स्तर,
स्वभाव, संबंध देवाने दिले आहेत आणि त्यातूनच अनुभव येतात.
आपण देवाच्या घरी वावरत असतो. हे घर आणि त्यातील सर्व गोष्टी,
संबंध, रूपे, आकार देवाचे असतात,
म्हणून ह्या सर्वांचे काय करावे, हे तोच ठरवतो.
जीव, प्रकृती, शांत स्थिती अशी
आपली परिवर्तनाची दिशा असायला हवी. त्यासाठी तसा अभ्यास मनाने करायला हवा. _अभ्यास_
हा सर्वांगीण चिंतनाचा विषय आहे....मन शुद्ध होण्याचा.
वरील गोष्टीतून काय निष्पन्न होते की एक तर बहिर्मुख प्रतिक्रिया देणे हा
स्वभाव असतो. त्यातून अनंत गोष्टीनं आपण मुल्य देतो, चक्र प्रज्वलित
ठेवतो, क्रिया करतो, गुंतून राहतो,
परिणाम झेलतो, वगैरे. हा न संपणार प्रकार आहे आणि ह्यातून शांती
मिळणे कठीण. परत परत, सतत तेच तेच करून शांतीच्या मार्गाच्या शोधात आपण
जातो. दुसरी गोष्ट ही की चिंता करून कोडी सुटत नाही, कारण चिंता निर्माण
करत राहणे, हेच तर रहस्य असते मनाचे! बऱ्याच विचारातील गोष्टी
"संबंधित", "अपुरे", "बदलणारे",
आणि सर्वांगीण येत राहतात. म्हणजे "चिंता" ही एका विचाराच्या
चक्रातून निर्माण होते, "भीती" देखील विचाराच्या पद्धतीतून होते. म्हणून
असे सांगतात की वृत्ती कुठे गुंतली गेली असते, हे ओळखावे कारण
त्यातूनच अशा सऱ्या भावना येतात.
असो, सांगण्याचे तात्पर्य हे,
की विचार किंव्हा चिंतन भगवंताचे केले की त्या बरोबरीने एकंदरीत शांतीला पूरक
विचार येत राहतील आणि तशी भावना होत जाईल. म्हणजे विचार शक्ती हा न संपणारा किंव्हा
मर्यादित न राहणारा आणि सर्व स्तरात मिसळणारा प्रकार ओळखावा. म्हणून शांत विचार
प्रकट होणे ह्याचा अर्थ की श्रद्धा वाढवणे.
श्रद्धा फक्त संकल्पना नाही, तर ते सत्यात आपण
आणू शकतो. जो दर्जा विचाराला देतो, तोच श्रद्धेला
द्यावा, नाही का?!!...
हरि ओम.
Shree
Experiences, according to me, are ambiguous and don't
display exact words or compartments. They are all over the place, they are
present in all states, they are _of_ space and time and of various scales,
transitions, changes, buffers, and so on.
_Awareness_ of reality doesn't depend on accurate
words for describing or mapping experiences. Experiences will always "tend
to slip" from the _form_ of words and i believe that not all experiences
can get described as such.
Determinism of experiences into architecture - loosely
said as a function or technology or a purpose, is a 'death dealer' according to
me. That means perhaps reducing experiences into some acceptable _form_ of
popular "imagination - access", often perhaps implies that all of
humanity should make sense of! It's quite a stupid idea implying that even the
dumbest of people should "get the thing right in the least amount of
time".
It is a blunder to imagine architecture in that manner.
Life can't be reduced to performance, efficiency, output, material gains,
algorithms and so on. It is criminal to do so and expect others to do so!
If anyone can believe in magic, (which is real by the
way), life can be magical and delightful and the same tendencies can inform
architecture. I don't find any reason why poems or writings or plays should get
excluded from imagining spaces and more sources of inspiration, the better it
is!
Hari Om.
