Monday, July 06, 2026

श्री

 श्री 


माझ्या मते, कुठल्याही भीतीला उत्तर देण्याची किंव्हा गुंता सोडवण्याची गरज तशी नसते. भीती, ही स्वाभाविक मानवी भावना ओळखली, तर तिला शांत होण्याचा मार्ग गूढ असतो, हे ओळखावे. 

भीती प्रवाहात असते, खूप गूढ असते आणि क्षणात सामावलेली नसते, जर आणि तर ह्या भाषेत नसते. म्हणून ती शांत होण्याचा प्रवास असतो. 

त्याला शांत व्हायला वेळ लागू शकतो...त्यावरून स्वतःला लेखू नये. भीती अशी का असते, हे सांगणे कठीण इतरांना आणि ते इतरांना कळेल अशी खात्री नाही आणि इतरांना कळली तरी ते साथ देतील असेही नाही. म्हणजे भीती परिस्थितीवर अवलंबून नसून, विचार शरणीत स्थित असते. त्यासाठी शांत होण्याचा मार्ग म्हणजे विचार शरणीत योग्य परिवर्तन होणे.

हरि ओम.

श्री

 श्री 


बहिर्मुखपणामुळे दृश्यात होणाऱ्या हालचाली, बदल, संबंधात, रूपात, आकारात आपण विषय शोधतो, गुंतून राहतो, चक्रात वावरतो, परिणाम भोगतो, स्मरणात असतो. हा अस्तित्व स्थितीचा _एक प्रभाव आहे_. 

"मी" हा भाव आहे किंव्हा एक प्रकारची शक्ती आहे, जिचे कार्य होत राहते. कार्य इथे म्हणजे भगवंताची इच्छा, म्हणून ते स्वीकारावे लागते. माझे होणे, असणे, वावरणे, कृती होणे, निघून जाणे - हे कार्य आहे. 

कार्य ह्याचा अर्थ की माझ्या कृतींना वैयक्तिक रंग लावण्याची गरज नसते. एखादी गोष्टी अशी का ध्यानात येते, अशी का परिणाम निर्माण करते, अशी का व्यवहारात ठेवते - ह्याची चिकित्सा करण्यात वेळ घालवण्याची गरज नसते. आपण तो वेळ घालवतो, कारण "मी करता" ह्या सर्वांगीण भावनेला खूप घट्ट धरून ठेवलेले असते. 

आता ह्याच सर्वांगीण अंतर्मुखातून प्रकट झालेल्या भावनेला शांत होऊ द्यायचे असते. म्हणजेच _कार्याचा_ भाव सर्वांगीण होणे अभिप्रेत आहे. 

हरि ओम.