Monday, October 06, 2025

श्री

श्री 

विचार मंथनाचे कदाचित दोन परिणाम होत असावेत - स्वतःला विषय करणे आणि दुसरे म्हणजे सूक्ष्मात परिवर्तन होणे. हे दोन्ही परिणाम एकत्रित होत राहणार. म्हणून सत्याचा अनुभव आत्मसात करणे महत्वाचे.

आपण पाहिले जे वाचतो, ऐकतो, करतो...ते प्रतिक्रिया देण्याच्या दृष्टीने करतो. ह्याला बहिर्मुख पद्धतीने क्रिया करणे असे म्हणतात.  ह्यात अस्थिरता, परावलंबन, तात्पुरतेपण, वेगळेपण - असे भावना किंव्हा घटक किंव्हा चक्र किंव्हा साखळी किंवा भाव जाणवतो. 

त्याच पद्धतीने पहिले भगवंताकडे बघितले जाते...प्रपंचातील विषय सोडवण्याचा हेतू साठी. नंतर ती नजर अंतर्मुख व्हायला लागते - म्हणजे दोष देणे, त्रागा करणे अशा गोष्टी शांत व्हायला लागतात. शेवटी पूर्ण अंतर्मुख होण्यामध्ये भगवंताची प्रचिती स्थिरावते. 

हे सांगताना असे वाटू शकते की सगळ सरळ रेषे सारखे आहे - सामान्य बुद्धीला रेषच दिसते! त्याचा मार्ग पत्करताना चक्र सामोरे येते, प्रवाह जाणवतो आणि श्रद्धा प्रकट व्हायला लागते. थोडक्यात सूक्ष्माची प्रचिती येते. तेच तेच पाहुणे (राग, द्वेष, प्रश्न, संबंध) हे मार्गावर परत, परत येतील...फक्त वेगळ्या रूपात. म्हणून त्यांच्याकडे कसे बघावे, कसे स्वीकारावे, कसे व्यवहार करावे हे प्रत्येक टप्प्यात ओळखायला लागते.
 व्यवहार योग्य झाला की पाहुणे घरातून निघाले, नंतर काही दिवसांनी वेगळ्या रूपात येण्यासाठी. 

अशा तऱ्हेने आपल्या मार्गाचे स्वरूप आढळून येते. 

हरि ओम.

Sunday, October 05, 2025

श्री

श्री 

रूपाला _घट्ट_ धरणे कदाचित भगवंताची इच्छा असावी. ही प्रक्रिया गूढ असते आणि त्यात बरेच घटक आणि स्तर आणि साखळी आणि चक्र सामील असतात. हे सर्व प्रकट होणारे गोष्टी आहेत, त्यांना पाहुणे मानणे योग्य. म्हणजे ते येणार, वावरणार आणि निघून जाणार किंव्हा परिवर्तित होणार. This is a _phenomenon of becoming_.

हे विचार पचनी पडणे म्हणजे लोकांची प्रतिक्रिया कायम नसते...ते येतात आणि विलीन होतात. मनात तसे काही राहत नाही. म्हणून आपणही प्रतिक्रियांवर लक्ष केंद्रित करू नये. ह्याचा अर्थ वारंवार स्वतःला माफ करणे, परत प्रयत्न करणे, सकारात्मक राहणे, श्रद्धा वाढवणे, सैय्यम ठेवणे हे अभिप्रेत असते. 

प्रतिक्रिया ह्यावर निष्कर्ष त्वरीत आणू नये. निकाल लावणे हे काही आपले ध्येय नाही, आणि निकाल जरी लावला तरी त्यातून खरे समाधान सामावलेले असते का, ह्याचा विचार करावा. ह्याचा अर्थ की निष्कर्ष, जी बुद्धीची गरज असावी, त्यातून समाधान प्रकट होते असे काहीही नाही. तरीही पदोपदी निष्कर्ष, ही गोष्ट असणार आपल्या अनुभवात. तर ते होऊ द्यावे आणि परिणामांना सामोरे जावे. 

निकाल काय, परिणाम काय, प्रतिक्रिया काय, ह्यावरून आपण ठरत नसतो. 

दृश्याचा कुठल्याही हालचाली वरून आपण ठरत नसतो. "ठरणे" म्हणजे खूप साऱ्या चक्रातून निष्कर्षाला येणे. मग ते ठरणे ताबा मिळवणे असावे की हताश होणे की असमाधानी राहणे, त्याने काहीही ठरत नसते. ह्याचाच अर्थ की शांती, हेच आपले स्थान आहे. 

लोकं नेहमी शांतीच्या शोधात राहणार. भीती खूप गूढ पद्धतीने प्रकट होते, संबंध आणते आणि क्रिया करायला भाग पाडते. त्यात आपण पैसा, नातीगोती, काम, हेतू, सतत गुंतवून ठेवणे असे निरनिराळे आपल्या भोवती कवच घालून ठेवतो. कवच एका दृष्टीने फसवे आहेत आणि दुसऱ्या दृष्टीने प्रमाण. 

स्वस्थ आपल्याला अजिबात बसवत नाही! ते का, हे ठाऊक नाही, म्हणून सर्व स्तर, साखळी, भाव आपल्या बरोबर असतात. 

ह्याचा पर्याय म्हणा, किंव्हा ओळख म्हणा....शांती भाव प्रस्थापित करणे आले.

हरि ओम.


Shree 

Space is to be shared to all kinds of imagination. The idea of separation or individuality is not tenable and causes deep fracture. This means that _awareness_ needs a comprehensive understanding of existence, not a speck of it.

Architecture can be considered, among other things, as an action of awareness. Hence all thoughts, processes, built forms respond to this function of awareness. 

All spaces therefore can be comprehensively conceived. And that perhaps also becomes the critical dimension of architecture....what are the architecture's intentions? 

Awareness is an idea of discovery of connections. The issue with the mind is that it latches onto a concept and normalizes it. If we see individuality as a problem, but some years of engagement with this idea can normalize the phenomenon. No one looks at individualism with scorn or skepticism, but normalizes it as if it is a natural phenomenon of a modern mindscape. 

And so is with a human life. Anything can be seen as critical or something that is considered absolutely normal. It is upto the mind. 

In this awareness, the search is for the Truth which is beyond any human choice. 

Hari Om.

Saturday, October 04, 2025

श्री

 श्री 


मला ठामपणे काही तसे माहित नाही - कारण निर्मिती क्रियेमुळे सर्व काही बदलणारे असते, संबंधित असते, स्थळ आणि काळाच्या चौकटीत वावरत राहते, ते येते आणि जाते, ते प्रवाह दर्शवते वगैरे. ह्या सर्व गोष्टींना विश्व भाव संबोधले आहे. "भाव" म्हणजे कार्य आणि जाणीव आणि चक्र ह्या प्रामुख्याने तीन घटक त्यात असावेत.... _स्मरण_ (किंव्हा होत राहणे एका विशिष्ठ पद्धतीने). 

हा विश्व भाव अस्तित्वाच्या कार्यात असतोच. त्या भावात, शांती रस संक्रांत होणे आपला मार्ग असतो. 

विश्व भावाचा परिणाम मनावर होत असतो, म्हणून त्यातून विघटन, साखळी, संबंधांचे प्रकार, स्तर, चक्र, विचार, भावना, विषय, प्रश्न असे अनुभवात होणारे घटक वावरत राहतात. ह्या घटकांना "मी" म्हणतो. विघटित रूप आणि आकार एकमेकांच्या संबंधात येतात आणि गुंतून राहतात. ह्या क्रियेचे परिणाम किंव्हा होणारी भावना आहे तात्पुरतेपण, वेगळेपण, भीती, अर्धवटपणा.

ह्यातून मोकळे होण्यासाठी जाणीव शुद्ध करणे आहे, जे नामस्मरणातून होऊ शकते. 

हेतूच्या पलीकडे होणे, म्हणजे स्थिर होणे आहे. गोष्टी योग्यच होतात, आपल्याला कितीही विघटन दिसले तरीही, त्यातून कितीही चिंता झाली तरीही, कितीही विषय सोडवण्याची खुमखुमी उत्पन्न झाली तरीही. 

सर्व भगवंताचा खेळ आहे, त्याची इच्छा आहे, तो आहे इथे, त्याचे राज्य आहे, त्याचे कार्य आहे. लोकांचे दिसणे, वागणे, व्यवहार - ह्याची चिंता "सोडून द्यावी". ज्या विचारांच्या साखळीमुळे चिंता होते, _ती साखळी शिथिल करत रहावी_. 

 _साखळी_ ह्या क्रियेतून "संकल्पना" होते संबंधांची किंव्हा अस्तित्वाची. म्हणून साखळी बदलावी आणि शांती रस स्थित करावे. 

हरि ओम.


श्री 

विघटन सगळीकडे बघून, कप्पे बघून, बोलणे ऐकून, व्याकुळ होऊ नये किंव्हा चिंतातुर भावना सोडवण्याचा प्रयत्न असू नये. सध्याच्या परिस्थितीमुळे भावना चिंतित होतील, संबंध व्याकुळ करतील, स्पष्टता मांडता येणार नाही आणि मतभेद जास्त प्रमाणात असतील. All of these are signs of fragmentation and individualism. आत्ताच्या काळाची "दिशा" तशी काहीशी दर्शवत आहे. 

त्यावरून आपल्यावर आघात होत राहणार. आघात होणे अटळ आहे, पण त्यात किती गुंतून रहावे, हे आपल्या जाणिवेवर ठरवता येते. काही सत्य विधान पचवायला लागतात, की कुणी कुणासाठी पुरक नसते. कुठलीही गोष्ट कायम नसते, शाश्वती देत नाही. आपण जसे आलो, तसे जाणार आहोत. आपल्या हातात पूर्ण काहीच नसते. सर्व भगवंत कार्य करतो, म्हणून त्याच्या असण्यावर श्रद्धा ठेवावी. प्रपंचात हेतू ठेवू नये. जे येईल, ते स्वीकारावे. जे जाईल, ते जाऊ द्यावे. जे बदलत राहील, ते बदलू द्यावे. गोष्टी शांतीकडेच जात राहतात, त्याचा दृश्यावर होणारा परिणाम गूढ असतो. शांती रसावर श्रद्धा ठेवणे. तिला मनात संक्रांत करता येते. तिच्यावर सर्वात जास्ती लक्ष द्यावे.

हरि ओम.


श्री 

आपले रूप जरी मर्यादित असले, तरीही त्यातून अंतर्मुख परावृत्त करणारे बरेच घटक दिलेले असतात, जसे की विचार, भावना वगैरे. म्हणजे प्रस्थापित झालेल्या रूपातून आपण स्वतः विलीन होऊ शकतो आणि सत्याचा शोध आत्मसात करू शकतो. अर्थात हा प्रवास झाला आपला आणि त्याचा मार्ग रुपातूनच निर्माण करणे आले. 

म्हणजे अंतर्मुख होणे ही नैसर्गिक बाब मानावी रुपाची. त्याचे घटक असावेत traditions, patterns, continuations, introspections, doubts, expressions, surrendering and so on. ह्याकडे निश्चित लक्ष केंद्रित होणे आहे प्रत्येकाचे...आज किंव्हा उद्या. की आपण बिंदू नसून, प्रवाह आहोत. प्रत्येकाचा प्रवास आहे. प्रवास दिलेला आहे. प्रवासाला भगवंताची इच्छा मानावी. म्हणून रूप कायम कसे राहील असा विचार करण्यापेक्षा, रुपात परिवर्तन होईलच आपल्या हितासाठी, असा विचार करावे.

हरि ओम.